https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

भावना कल्लोळ!

भावना कल्लोळ!

जगातील प्रत्येक निर्जीव गोष्ट  चिवट अंगभूत गुणधर्म व कठोर तर्क यांच्या संयुक्त मिश्रणावर आधारित कठोर नियमाने बध्द आहे आणि प्रत्येक सजीव गोष्ट जहाल वासना, मवाळ भावना आणि कठोर तर्क यांच्या संयुक्त मिश्रणावर आधारित थोड्या सैल व थोड्या कठोर अशा संमिश्र  नियमाने बध्द आहे. या संमिश्र  नियमाला वाघ, सिंहासारखे क्रूर प्राणी व नैतिकतेचा टेंभा मिरवणारा मनुष्य प्राणी अपवाद नाहीत. मनुष्य प्राण्याने स्वतःसाठी व मानव समाजासाठी निसर्गाकडून ज्ञात करून घेतलेले सर्व नीतीनियम, कायदे हे निसर्गानेच बनविलेल्या जहाल वासना, मवाळ भावना व कठोर तर्क यांच्या संयुक्त मिश्रणावर आधारित आहेत, हे मनुष्याने विसरता कामा नये. -बी.एस.मोरे, वकील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा