https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, ३ जून, २०२०

समुद्रातली मुंबई!

समुद्रातली मुंबई!

मुंबई ही समुद्रातच आहे. सात बेटांनी बनलेली मुंबई पुढे दूरवर उपनगरांत वाढली. त्या मुंबई उपनगरांना अरबी समुद्राचा धोका कमी असेल पण समुद्राला खेटून असलेल्या नरीमन पॉईंट, गिरगाव चौपाटी परिसर, दादर चौपाटी परिसर, माहिम वगैरे भागांना समुद्राचा धोका आहेच. शिवाय समुद्रात भर घालून मुंबई कृत्रिमरित्या वाढवलीय. त्यामुळे तर हा धोका आणखीनच वाढला आहे. पण मुंबई अशा तडाख्यातून वाचली आहे. याला निसर्गाची कमाल म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा. मुंबईच्या विशेष भौगोलिक रचनेमुळे म्हणे मुंबईला वादळाचा धोका कमी आहे. पण असेही म्हणतात की १८८२ साली ६ जूनला मुंबईला प्रचंड मोठ्या वादळाने झोडपले होते व त्यात जवळजवळ १ लाख माणसे मेली होती. पण त्याबाबत ठोस पुरावे गुगलवर सापडले नाहीत. पण हवामान शास्त्रज्ञ मात्र यावर जास्त अधिकाराने बोलू शकतील.

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा