https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ९ जून, २०२०

कालाय तस्मै नमः!

कालाय तस्मै नमः!

काळानुसार बदलले पाहिजे हे खरे आहे. पण बदल स्वीकारण्यासाठी जो चपळपणा व जो आत्मविश्वास तरूण वयात असतो तो उतार वयात राहत नाही. उदाहरणार्थ, मी लहानपणी किंवा तरूण वयात पोहायला शिकलो नाही. आता या वयात पोहणे शिकणे हे मला कठीणच जाणार. तसेच या वयात ड्रायव्हिंग शिकण्याचे आहे. हल्ली १२ ते १४ वयाची लहान मुले सुद्धा  सहजपणे स्कूटर चालवायला शिकतात. पण मी आता स्कूटर शिकायला गेलो किंवा इतर काही माझ्यासाठी नवीन असलेल्या तांत्रिक गोष्टी शिकायला गेलो तर मला ते शिकणे नीट जमणार नाही. कारण आता तो पूर्वीचा जोर, उत्साह, उमेद, आत्मविश्वास राहिला नाही. मनात इच्छा असूनही ते कठीण वाटते. तेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत. पण नाईलाजच झाला तर मात्र बळेच अॉनलाईन वकिलीच्या काही बेसिक गोष्टी मला शिकाव्या लागतील. कालाय तस्मै नमः!

-ॲड.बी.एस.मोरे©१०.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा