https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ५ जुलै, २०२०

मन की बात!

मन की बात!

समाज माध्यमावर सक्रिय असलेली माणसे त्यांच्या पोस्टस मधून व्यक्त होतात तेंव्हा ती त्यांची मन की बात समाज व्यासपीठावर उघड करीत असतात. समाज माध्यम ही खरं तर मनमोकळ्या (मन मोकळे करणाऱ्या) गप्पांची चावडी असते किंवा कट्टा असतो. या चावडी किंवा कट्टयावर लोक त्यांच्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या किंवा सद्या घडत असलेल्या छोट्या मोठ्या घटनांची तथा स्वानुभवाची झलक सादर करीत असतात. या सादरीकरणात स्वतःच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आयुष्यातील विविध विषय येतात. या पोस्टसमध्ये भावना व विचार यांचे मिश्रण असते. काहीजण त्यातही दुसऱ्यांचे लेखन, विचार चोरून अॉनलाईन तस्करी करीत असतात. काहीजण इकडच्या पोस्टस तिकडे फिरवण्याचेच काम करतात. त्यात स्वतःची बौद्धिक मेहनत नसते. पण ते फिरवणे सुध्दा त्यांची मन की बातच असते. प्रत्येकाच्या वाट्यास येणारी परिस्थिती सारखी नसल्याने प्रत्येकाचे स्वानुभव व विचार एक नसतात. त्यात विविधता असते. विविधतेने नटलेली ही मन की बात कधी करमणूक प्रधान तर कधी विचार करायला लावणारी असते.

-ॲड.बी.एस.मोरे©६.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा