https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २९ जुलै, २०२०

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

मी माझे खरे अनुभव समाज माध्यमावर शेअर करतो ते माझे दुःख हलके करण्यासाठी मुळीच नाही. माझे वय ६४ आहे. आता कसले आले आहे दुःख हलके करणे? खूप गोष्टी पचवल्यात या आयुष्याने! पूर्वी कुठे होती समाजमाध्यमे वैयक्तिक दुःख हलके करायला? तेंव्हा स्वतःचे दुःख हलके करणे हा माझ्या सत्य लिखाणाचा हेतूच नाही. माझे अनुभव हे आत्मचरित्र म्हणून मी समाज माध्यमावर माझ्या पोस्टसमधून खुले करतो जेणे करून इतर समदुःखी लोकांना हलके वाटेल हे जाणून की कोणीतरी आहे तिथे जे आपलेच दुःख भोगतोय आणि दुसरा हेतू हा की इतर लोक माझ्या अनुभवातून अगोदरच सावध होतील. या गोष्टी लोकांपासून लपवून वर जायचे का? छे, ही तर स्वतःचीच शुद्ध फसवणूक झाली! अशा खोट्या चेहऱ्याने जगून काय उपयोग? लोक माझ्यासारखे जर मोकळे झाले असते तर जगातील बऱ्याच आत्महत्या थांबल्या असत्या. पण लोक खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसतात, उगाच लाजतात, घाबरतात व खोटे जीवन जगतच मरतात. मला असे जगणे आवडत नाही म्हणून मी हा असा आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा