https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २१ जुलै, २०२०

निसर्गाचे लॉकडाऊन, अनलॉक!

निसर्गाचे लॉकडाऊन व अनलॉक!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायबाप सरकार ज्याप्रमाणे लॉकडाऊन व अनलॉक असा दुहेरी कार्यक्रम अंमलात आणते अगदी त्याचप्रमाणे निसर्गही वागतो याचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे काय? म्हणजे बघा, वासना असो नाहीतर भावना, आपल्या या जाणिवा जागृत कोण करतो तर निसर्ग! हा झाला त्या महान निसर्गाचा कळ लावण्याचा प्रकार! ही कळ लावून दिली की या कळीला आपल्या बुद्धीने प्रतिसाद कसा द्यायचा हे कोण ठरवतो, तर तेही निसर्गच ठरवतो. पण इथे निसर्ग थोडा  शिथिलही होतो. जाणिवांच्या कळीला प्रतिसाद कसा द्यायचा याची अर्धी चावी निसर्ग त्याच्या ताब्यात ठेवतो. तिथे तो त्याची पूर्ण हुकूमशाही राबवतो. आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रिया हा निसर्गाच्या ताब्यातील त्या अर्ध्या चावीचा भाग झाला आणि हा अनैच्छिक भाग म्हणजे निसर्गाचा कडक लॉकडाऊन झाला. आता गंमत अशी की निसर्ग त्याची अर्धी चावी मानवी बुद्धीच्याही ताब्यात देऊन  टाकतो. ही असते बौध्दिक स्वातंत्र्याची चावी! निसर्ग निर्मित जाणिवांना प्रतिसाद कसा द्यायचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य निसर्गाकडून आपल्या बुद्धीला याच अर्ध्या चावीने मिळते. या निर्णय स्वातंत्र्यात तर बुद्धीचा खरा कस लागतो. आपल्या बुद्धीकडून  शरीराच्या माध्यमातून होणाऱ्या ऐच्छिक क्रिया हा निसर्गाने आपल्या बुद्धीच्या ताब्यात दिलेल्या अर्ध्या चावीचा भाग होय आणि हा ऐच्छिक भाग म्हणजे निसर्गाचा अनलॉक होय. आहे की नाही निसर्गाच्या लॉकडाऊन व अनलॉकची आश्चर्यकारक करामत!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा