https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

सुसंस्कृतपणा व कायदा!

सुसंस्कृतपणा व कायदा!

(१) भौतिक वासनेच्या खालच्या पातळीवरून आध्यात्मिक भावनेच्या वरच्या पातळीवर उंचावताना मानवी मनाची ना खाली ना वर अशी अवस्था होते. मनाच्या अशा गोंधळलेल्या, संभ्रमित अवस्थेत मध्यवर्ती भूमिका घेऊन विवेक बिंदू निश्चित करताना मानवी बुद्धीची ओढाताण होते या बौद्धिक कसरतीचा अनुभव अनेक माणसे वेळोवेळी घेत असतात. 

(२) भौतिक वासनेचा पूर्णपणे त्याग करून आध्यात्मिक भावनेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचणे म्हणजे साधुसंत होणे. असे साधुत्व मिळविणे म्हणजे सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होणे होय. भौतिक वासनांविषयी जेंव्हा माणसाच्या मनात विरक्ती निर्माण होते तेंव्हाच माणूस सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होण्याचा निर्णय घेतो. असे संन्यासी होणे हे नैसर्गिक आहे का या मुद्यावर वाद निर्माण होऊ शकतो. पण भौतिक वासनांबद्दल विरक्ती निर्माण होऊन येणारे साधुत्व व भौतिक वासना आणि आध्यात्मिक भावना यांच्यात संतुलन साधत निर्माण होणारा मनाचा सुसंस्कृतपणा यात खूप फरक आहे. प्रेम, करूणा, परोपकार यासारख्या उच्च मानवी भावना आध्यात्मिक भावना होत असे माझे वैयक्तिक मत आहे.

(३) भौतिक वासना व आध्यात्मिक भावना या दोन्हीही गोष्टी जर मानवासाठी नैसर्गिक आहेत तर मग दोन्हीही नैसर्गिक गोष्टींना एकत्रित ठेऊन त्यांचा नीट म्हणजे संतुलित सांभाळ करणे ही मानवी कृतीही नैसर्गिकच झाली. मग याचा अर्थ एवढाच निघतो की सुसंस्कृत वर्तन हेच मानवासाठी नैसर्गिक वर्तन आहे. तरीही शेवटी भौतिक वासनेचा पूर्ण त्याग करून फक्त आध्यात्मिक भावनेला चिकटून राहात संन्यासी होणे हे नैसर्गिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हा वादाचा मुद्दा राहतोच. 

(४) विवाहबद्ध होऊन वासना व भावना यात संतुलन साधत प्रजोत्पादन करणे व सांसारिक जबाबदाऱ्याही पार पाडणे याला मानवी मनाचा सुसंस्कृतपणा म्हणता येईल. पण काही विशेष वैयक्तिक कारणामुळे काहीजण विवाहच करीत नाहीत किंवा विवाह करूनही नंतर घटस्फोटाने एकटे राहण्याचा निर्णय घेतात. हा काही अंशी संन्यासी होण्याचाच प्रकार झाला असे माझे वैयक्तिक मत आहे. हे मत एकटे राहणाऱ्या लोकांना कदाचित आवडणारही नाही. कारण मानवी मनाची माणुसकी काय किंवा मानवी मनाचा सुसंस्कृतपणा काय हे ठरवताना मानवी बुद्धीचा कस लागतो. वेगवेगळ्या माणसांची बुद्धी याबाबतीत वेगवेगळी चालते आणि मग त्यातून खूप वादविवाद होतात. 

(५) अशा वादविवादातून समाजात गोंधळ, अराजक निर्माण होऊ नये म्हणून समाजाच्या सामूहिक बुद्धीने ठरवलेला सुसंस्कृतपणा हा समाजाचा कायदा झाला व तो कायदा हाच मनुष्यासाठीचा नैसर्गिक कायदा म्हणून मान्य करण्यात आला. मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करणाऱ्या अशा कायद्याला समाजमान्यता मिळविण्याची प्रक्रिया हीच लोकप्रतिनिधींकडून कायदे मंडळात कायदा बनविण्याची प्रक्रिया होय. 

(६) या कायद्याचे दोन भाग पाडण्यात आले. पहिला भाग म्हणजे समाजाच्या विवेकबुद्धीने निश्चित केलेले मनुष्याचे सुसंस्कृत वर्तन जे वासना व भावना यांच्यात सुवर्णमध्य साधते. कायद्याच्या या पहिल्या भागाला दिवाणी कायदा म्हणतात. दुसरा भाग म्हणजे मानवी सुसंस्कृतपणाची मध्यवर्ती पातळी सोडून वासनेच्या खालच्या पातळीवर उतरणाऱ्या मानवी मनाला रोखणारा फौजदारी कायदा. हा फौजदारी कायदा मानवी मनाला असंस्कृत बनू देत नाही (भ्रष्टाचार करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण होय) व असंस्कृतपणाहूनही खालची पातळी म्हणजे जंगली पातळी गाठू देत नाही (अत्याचार, खून, बलात्कार, दरोडा यासारख्या हिंसक गोष्टी करणारे वर्तन हे जंगलीपणाचे लक्षण होय). संन्यासी होण्यास मात्र कोणताच कायदा अडवू शकत नाही. कारण संन्यासी माणूस समाजालाच काय तर निसर्गालाही कोणताही त्रास देत नसतो. थोडक्यात काय तर सामाजिक कायदा हा मानवी सुसंस्कृतपणा निश्चित करतो!

-ॲड.बी.एस.मोरे©१.८.२०२०

गुरुवार, ३० जुलै, २०२०

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी लिहित नसतो!

मी लाईक्स साठी वगैरे लिहित नसतो. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. घरात वहीत लिहून स्वतःच त्याकडे बघत बसण्यापेक्षा चारचौघात विचार जाण्यासाठी फेसबुक हे माध्यम छान व व्हॉटसअप पेक्षा मोठे वाटले म्हणून मी फेसबुकवर! पण यात अनेक प्रकारचे वाचक असल्याने गडबड ही होतेच अधूनमधून! पण त्या हनी ट्रॕप घटनेमुळे आता समाजमाध्यमावरच काय तर इतर कोणत्याही अॉनलाईन संभाषणात सावध राहिले पाहिजे हे मात्र नक्की! या घटनेनंतर मी फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारलेली काही खाती तपासली तर अनफ्रेंड करताना गायब झाली. म्हणजे ती फेक होती. वृत्तपत्रात लिखाण छान पण तिथे ओळख हवी, आतल्या गोटात उठबस हवी. पूर्वी मी लिहायचो तिकडे पण संपादक महाशय लिखाणातला मूळ आशयच कट करायचे आणि बऱ्याच वेळा लिखाणाला प्रतिसादच देत नसायचे. म्हणजे आपण ढ व ते हुशार असा काहीसा प्रकार. इथे फेसबुकवर तसे काही नसते. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे व्यक्त होऊ शकता. मी दुसऱ्यांचे लिखाण आवडले तर त्यांच्या नावानेच ज्ञान संवर्धनासाठी पोस्ट करतो. पण ती पोस्ट माझी नाही हे जाहीर करतो. पण ९०% लिखाण हे माझे स्वतःचे मूळ लिखाण असते व म्हणून ते माझ्या नावानेच प्रसिद्ध करतो. ज्ञान, चिंतन व मनन यातून मनात निर्माण होणाऱ्या वैविध्यपूर्ण विचारांमुळे व लिखाणाच्या आवडीमुळे, त्या छंदामुळे व तसेच लोकांबरोबर ज्ञान, विचार शेअर करण्यात मला स्वतःला आनंद मिळतो म्हणून मी इथे फेसबुकवर वाचकांच्या सोबत व्यक्त होत असतो.

-ॲड.बी.एस.मोरे©३१.७.२०२०

बुधवार, २९ जुलै, २०२०

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

समाजमाध्यमावर किती खोटे वागावे?

मी माझे खरे अनुभव समाज माध्यमावर शेअर करतो ते माझे दुःख हलके करण्यासाठी मुळीच नाही. माझे वय ६४ आहे. आता कसले आले आहे दुःख हलके करणे? खूप गोष्टी पचवल्यात या आयुष्याने! पूर्वी कुठे होती समाजमाध्यमे वैयक्तिक दुःख हलके करायला? तेंव्हा स्वतःचे दुःख हलके करणे हा माझ्या सत्य लिखाणाचा हेतूच नाही. माझे अनुभव हे आत्मचरित्र म्हणून मी समाज माध्यमावर माझ्या पोस्टसमधून खुले करतो जेणे करून इतर समदुःखी लोकांना हलके वाटेल हे जाणून की कोणीतरी आहे तिथे जे आपलेच दुःख भोगतोय आणि दुसरा हेतू हा की इतर लोक माझ्या अनुभवातून अगोदरच सावध होतील. या गोष्टी लोकांपासून लपवून वर जायचे का? छे, ही तर स्वतःचीच शुद्ध फसवणूक झाली! अशा खोट्या चेहऱ्याने जगून काय उपयोग? लोक माझ्यासारखे जर मोकळे झाले असते तर जगातील बऱ्याच आत्महत्या थांबल्या असत्या. पण लोक खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसतात, उगाच लाजतात, घाबरतात व खोटे जीवन जगतच मरतात. मला असे जगणे आवडत नाही म्हणून मी हा असा आहे!

-ॲड.बी.एस.मोरे©२९.७.२०२०

मंगळवार, २८ जुलै, २०२०

आजपासून सर्व नातेवाईक ब्लॉक!

आजपासून सर्व नातेवाईकांना मी ब्लॉक करीत आहे!

(१) मित्रांनो, आज मी तुम्हाला मनातले सांगत आहे. मी लहानपणापासून न घाबरता मला जे योग्य वाटले त्याप्रमाणेच वागत आलो. खोट्या चेहऱ्यांनी फिरत खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसणाऱ्या समाजातील ढोंगी माणसांचा मला पहिल्यापासूनच तिटकारा आहे. गुंड, मवाली लोक स्वतःला साजूक तुपातले म्हणवून घेत नाहीत. आम्ही तसेच आहोत हे ते सांगतात. ते स्वतःचे खरे रूप झाकत नाहीत. त्यामुळे निदान  त्यांच्यापासून थोडे सावध तरी राहता येते. पण डबल ढोलकी माणसांचे काय? म्हणून मनात एक आणि ओठात दुसरे असणाऱ्या खोट्या चेहऱ्याच्या ढोंगी माणसांची मला गुंडांपेक्षा जास्त भीती वाटते.

(२) मी जो वकील झालो आहे तो मी माझ्या स्वकष्टाने व स्वतःच्या हिंमतीवर झालो आहे. माझे लहानपणापासून बाहेर काम करून मी माझे शालेय व कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरात दोन वेळेचे जेवण मिळत होते हाच तो काय घरचा पाठिंबा! मला इतर भावंडे होती पण ती दहावी, अकरावी पर्यंत कशीबशी येऊन पोहोचली आणि तिथेच ठप्प झाली. म्हणजे शेवटी शिक्षण हे तुम्हाला तुमच्या कष्टानेच घ्यावे लागते. माझ्या शाळेची, कॉलेजची फी मी स्वतः बाहेर काम करून भरली आहे. माझ्या शालेय जीवनात सुद्धा मी प्रौढ साक्षरता वर्ग घेत होतो व त्यातून दरमहा  ५० रूपये मिळायचे त्यातून शाळेची फी भरत होतो. मी वकील होण्याला तर मला घरातूनच विरोध होता. नातेवाईकांचे तर विचारूच नका. याला भिकेचे डोहाळे लागले असे म्हणून जवळच्या लोकांकडूनच माझा अपमान झाला, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण मी डगमगलो नाही. लहानपणापासूनच आत्मनिर्भर झाल्याने घरातील लोकांची वा इतर कोणाचीही पर्वा न करता मी वकील झालो व माझ्या पद्धतीने या आव्हानात्मक व्यवसायात टिकून राहिलो. यात मला ना माझ्या आईवडिलांची मदत झाली ना कोणा नातेवाईकाची. वकिलीत सुध्दा काँग्रेसचे तत्कालीन बडे प्रस्थ बॕ. ए. आर. अंतुले यांच्या विरूद्ध सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात हायकोर्टात याचिका दाखल करणे असो किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे असो या सर्व गोष्टी मी एकट्याच्या हिंमतीवर केल्या. यात घरातल्या माणसांचा किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांचा सहभाग नव्हता की पाठिंबा नव्हता.

(३) पण मी कृतघ्न नाही. लग्न झाल्यावर मला वकिलीत कमी पैसे मिळत असल्याने माझी व माझ्या बायकोची भांडणे व्हायची. माझा हा स्वभाव असा बंडखोर असल्याने त्याचा माझ्या बायकोला खूप त्रास व्हायचा. मग आमची ती भांडणे आमच्या नातेवाईकांपर्यंत जायची. मग मला संसाराच्या दोन गोष्टी सुनवल्या जायच्या. काहीवेळा नातेवाईकांबरोबर उसनवारीही झाली आहे. पण मी कोणाचेही पैसे बुडवले नाहीत. सगळ्यांचे उसने पैसे चुकते केले. पण माझीही एक वकील व धडपड्या, धाडसी माणूस म्हणून  माझ्या नातेवाईकांना काही ना काहीतरी मदत झालीच आहे. बाहेरच्या जगाबरोबर ९० टक्के देवाणघेवाण सुरू असताना नातेवाईक मंडळी बरोबर निदान १० टक्के तरी देवाणघेवाण ही होणारच ना!

(४) या पार्श्वभूमीवर २६ व २७ जुलै, २०२० च्या मध्यरात्री मी एका महिला फेसबुक फ्रेंडच्या हनी ट्रॕप मध्ये सापडलो. एकवेळ समाजात माझी बदनामी झाली तरी चालेल पण ही गोष्ट  समाज हिताच्या दृष्टिकोनातून उघड करायचीच या हेतूने मी लगेच फेसबुकवर ती पोस्ट टाकली व नंतर स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला याबाबत ईमेलने अॉनलाईन तक्रारही केली. सामाजिक हितासाठी हे रॕकेट उघड झालेच पाहिजे म्हणून मी जे सत्य घडले ते न घाबरता उघड केले आहे. पण हे सत्य उघड केल्याने माझ्यासारखा माणूस आपला नातेवाईक असल्याची लाज माझ्या कोणत्याही  नातेवाईला वाटू नये किंवा त्यांना माझ्यामुळे कोणताही त्रास होऊ नये म्हणून मी आजपासून माझ्या सर्व नातेवाईकांना माझ्या फेसबुक व व्हॉटसअप खात्यांवरून ब्लॉक करीत आहे.

(५) आता माझे एकट्याचे काय व्हायचे ते होऊनच जाऊद्या. नाहीतरी मला आयुष्यात तग धरून राहण्यासाठी बाहेरच्या क्लायंटस व मित्र मंडळींनीच आधार दिला आहे. शेवटी "एकला चलो रे" हेच माझे खडतर जीवन आहे. माझ्या मयताला कोणीही नातेवाईक हजर असण्याची मला बिलकुल गरज नाही. नाहीतरी मेल्यावर आपल्या डेड बॉडीचे काय होते हे मेलेल्या माणसाला कळतच नाही. मग मी नातेवाईक मंडळीनी माझ्या मयताला यावे म्हणून माझ्या बिनधास्त जगण्याला का आवरावे? पण माझ्या या अशा बिनधास्त जगण्याने माझ्या नातेवाईक मंडळींची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांना मी आजपासून ब्लॉक करीत आहे. पण नातेवाईक ज्या गावात, शहरात, विभागात राहत आहेत तिथले माझे मित्र मात्र बिलकुल ब्लॉक होणार नाहीत याची नातेवाईक मंडळींनी नोंद घ्यावी.

-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०

सोमवार, २७ जुलै, २०२०

निवडक मित्रांसाठीच हे फेसबुक खाते!

काही निवडक मित्रांसाठीच आहे हे फेसबुक खाते!

(१) माझ्या या फेसबुक खात्यावर फक्त काही निवडक व्यक्तीच माझे मित्र आहेत, बाकीची मंडळी नुसती नावापुरती आहेत ही गोष्ट मला माहित आहे. माझ्या रोजच्या विचारांतून या काही निवडक मित्रांशी मी बोलत असतो व त्यामुळे माझ्याशी वेगळे वैयक्तिक बोलण्याची तशी गरज नाही. आता फेसबुक इनबॉक्स चॕटिंग नकोच नको!

(२) काल मध्यरात्री (२६ व २७ जुलैच्या मधली रात्र) मला हनी ट्रॕप करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मागे एका माणसाने इनबॉक्स मध्ये अगोदर चांगले बोलून अचानक होमो लैंगिकतेचे फोटो पाठवले. कोणाला कसा ओळखू आणि कितीजणांना ब्लॉक करीत बसू? ६४ वय होऊन अनुभवाने परिपक्व व ज्ञानाने प्रगल्भ झालो असलो तरी शेवटी मीही एक माणूसच आहे ना! असे काही विचित्र घडले, माझ्या पोस्टसवर कोणी काही विचित्र कमेंटस केल्या की मग मी वैतागून जाऊन फेसबुक खातेच बंद करून टाकतो. पूर्वी पण अशाच काही गोष्टींमुळे वैतागून जाऊन मी माझी दोन फेसबुक खाती कायमची बंद केली. पण विचार थांबत नाहीत. ते लोकांना सांगावेसे वाटतात म्हणून पुन्हा हे तिसरे फेसबुक खाते उघडले. पण त्यालाही काल दृष्ट लागली. हनी ट्रॕपच्या जाळ्यात काल कसा ओढला गेलो हे कळलेच नाही. मग रात्रभर झोप आली नाही. सकाळी नाष्टा वगैरे न करता स्थानिक पोलीस स्टेशन व सायबर क्राईम सेलला तक्रार केली.

(३) माझ्या सततच्या विचारांतूनच या काही निवडक फेसबुक मित्रांशी माझी मैत्री सुरू आहे. मी आता व्हॉटसअप पण कमी करणार आहे. नको ते गुड मॉर्निंग, गुड नाईटसचे औपचारिक संदेश व नको ती इकडून तिकडून फिरणारी माहिती! पूर्वी आमच्या काळात ही समाजमाध्यमे नव्हती तेच खूप चांगले होते. पोस्ट कार्डस, अंतर्देशीय पत्रांतून होणारा संवाद खूप जवळचा वाटायचा. समोरासमोर बोलणे व्हायचे तेंव्हा समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रत्यक्ष बघायला मिळायचे. त्यामुळे फसगत होत नसायची. आता या अॉनलाईन संवादात समोरची व्यक्ती तिकडून कोणत्या मूड मध्ये आहे, तिच्या मनात काय चाललेय, ती पुढे काय करणार आहे याचा अंदाजच येत नाही. मला तर मोबाईल वरून स्क्रीन शॉटस कसे घ्यायचे हेही माहित नव्हते. एका फेसबुक मित्रानेच ते शिकवले. ते माहित नसते तर मला काल त्या हनी ट्रॕप चॕटिंगचे पुरावेच ठेवता आले नसते. मग माझ्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता. या सर्व गोष्टी फार भयंकर आहेत. काय पण अनुभव! माणसे पैसा मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ लागलीत! अॉनलाईन व्यवहार तर मला जमतच नाहीत. मला कधी एटीएम ने बँकेतून पैसे काढता आले नाहीत.

(४) अशा परिस्थितीत मी या अॉनलाईन समाज माध्यमावर का रहावे आणि कशासाठी रहावे? फक्त ज्ञान व अनुभवावर आधारित माझे विचार मांडण्यासाठी? पण आज माणसाला चांगल्या विचारांचे कोठे सोयरसुतक आहे! काहीजण मलाच म्हणतील की, अहो मोठमोठे विचार मांडणारे तुम्ही हनी ट्रॕप मध्ये असे कसे हो सापडलात? त्यामुळे मित्रांनो, आता माझ्याशी फेसबुक इनबॉक्स, व्हॉटसअप वर संवाद करू नका. माझ्या पोस्टस आवडल्या तर लाईक करा. लेखन ही माझी आवड आहे, छंद आहे. म्हणून मी फेसबुक सारख्या समाज माध्यमावर आहे. पण मला अॉनलाईन जग हे आता खूपच आभासी वाटू लागलेय. औपचारिकता खूपच भरलीय या जगात! इथे निर्मळ मैत्री हे केवळ मृगजळ आहे.

(५) पण याच फेसबुकने मला काही चांगले मित्र दिले. कालच्या घडलेल्या प्रसंगात हेच मित्र पुढे आले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला आधार दिला. दोन वकिलांनी तर प्रत्यक्ष फोन करून मला स्थानिक पोलीस स्टेशन, सायबर क्राईम सेल चे ईमेल आयडी पाठवून ईमेलने पोलीस तक्रार करण्याबाबत मार्गदर्शन केले, धीर दिला. माझे काही मनसैनिक मित्र, मैत्रिणींनी त्या हनी ट्रॕपवाल्या फेक फेसबुक अकाऊंटसचा पाठलाग केला. हे खरे प्रेमही मला याच अॉनलाईन जगातील फेसबुक वर मिळाले. त्यामुळे इथे सगळ्याच गोष्टी वाईट  नाहीत व सगळीच माणसे ढोंगी नाहीत. पण इथे सावधानता ही खूप महत्त्वाची!

(६) माझ्या या तिसऱ्या फेसबुक अकाऊंटसवर या कोरोना लॉकडाऊन काळात पटापट झालेले माझे मित्र किती तर जवळजवळ ३४०० व मला माझ्या कालच्या हनी ट्रॕप प्रसंगात माझ्या त्या जाहीर पोस्टवर मला जाहीर पाठिंबा देणारे मित्र  किती तर जवळपास फक्त १५० च! म्हणजे फेसबुकवर माझे खरे मित्र किती तर फक्त ४ टक्केच! मग बाकीच्या ९६ टक्के  लोकांना मित्र म्हणून उगाच का मिरवत बसू? या ९६ टक्के तथाकथित मित्रांना हळूहळू रामराम करायला हवा! वेळ मिळेल तसे ते काम करणे आवश्यक झालेय. आता यापुढे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे हेच आव्हान असणार आहे. कारण बरीच मंडळी माझ्या पोस्टस, माझे विचार वाचून फ्रेंड रिक्वेस्टस पाठवत असताना दिसत नाहीत.

(७) महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारून काहीही वैचारिक सुसंवाद निर्माण होत नाही. एकतर माझे ९५ टक्के लिखाण हे मराठीत असते. मी काय लिहितोय हेच त्यांना कळत नाही. आता परप्रांतातील फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना वकील हाच निकष ठेवावा तर त्यातही भाषेची अडचण येतेच. शेवटी माझी मातृभाषा मराठी! म्हणून मायबोली मराठी हीच माझ्या लिखाणासाठी मला योग्य व सोपी भाषा आहे. इंग्रजी भाषा ही फक्त काही कायदेशीर व्यवहारासाठी वापरायची. बाकी इतर ठिकाणी फक्त आणि फक्त मराठी भाषाच वापरायची! बाकी या तथाकथित ९६ टक्के मित्रांना हळूहळू रामराम कसा करायचा ही आणखी एक नवीन डोकेदुखी! कारण जर कोणाला अनफ्रेंड करायचे असेल तर प्रत्येक खात्याला स्पर्श करावा लागतो. आता एवढ्या खात्यांना स्पर्श करणे म्हणजे महादिव्यच! मग या खोट्या, वरवरच्या फेसबुक मित्रांना असेच नावाला ठेऊन पुढच्या फ्रेंड रिक्वेस्टस स्वीकारताना काळजी घेणे एवढेच सद्या तरी ठीक वाटतेय! माझे काही निवडक चांगले फेसबुक मित्र इथे आहेत. त्यांच्या मैत्रीसाठी माझे हे फेसबुक खाते चालू ठेवावे असे म्हणतोय!

-ॲड.बी.एस.मोरे©२८.७.२०२०


देव भावनेला देवाचा आधार!

देव भावनांना देवाचा आधार!

सजीव मनाची नैसर्गिक वासना जनावरांना जशी असते तशी माणसांनाही असते आणि मनाच्या या वासनेला मनाच्याच बुद्धीचे जे बळ लाभलेले असते त्याला बुद्धीबळ म्हणतात. जनावरे याच बुद्धीबळावर स्वार होऊन त्यांचा शरीर घोडा पळवतात व त्यांच्या मूळ वासनांची तृप्ती करतात. तहान, भूक, झोप, लैंगिकता या त्या मूळ नैसर्गिक वासना होत. पण माणसांचे गणित निसर्गाने थोडे वेगळे बनवले आहे. ते तसे का बनवले याचे कारण त्या निसर्गालाच ठाऊक! पण एवढे मात्र खरे की या वेगळ्या गणितामुळेच माणूस इतर जनावरांपासून वेगळा झाला. जनावरांमध्ये माणसांपासून वेगळे असलेले प्राणी व पक्षी हे दोघेही आले. हे गणित एकाच गोष्टीने झाले आणि ती म्हणजे माणसांना जनावरांच्या वासनांसोबत दिलेली उच्च मानवी भावना! प्रेम, करूणा, परोपकार, कृतज्ञता इत्यादी उच्च भावना या माणसांनाच असतात. निसर्गात देव आहे अशी श्रद्धाच नव्हे तर तसा ठाम विश्वास असणारे आस्तिक लोक या उच्च मानवी भावनांना देव भावना असेही म्हणू शकतील. मानवी मनात जनावरांच्या मूळ नैसर्गिक वासना व या देव भावना ज्या सुद्धा नैसर्गिकच आहेत यांचे मिश्रण आहे. ते जर संयुग झाले असते तर वासना व भावना यांचा वेगळा विचार करण्याचा प्रश्नच मानवी मनात निर्माण झाला नसता. पण मानवी मनात संयुग न होता ते मिश्रण झाले व मग मानवी बुद्धीपुढे प्रश्न निर्माण झाला की वाईट वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना मनात ठेऊनच वागायचे की चांगले वागायचे म्हणजे जनावरांच्या वासना व मानवी भावना या दोन्ही मध्ये संतुलन ठेवीत विवेकाने वागायचे? जी मानवी बुद्धी वासना व भावना यांच्या संतुलनावर लक्ष केंद्रित करून त्या संतुलनाची तृप्ती करण्यालाच स्वतःचे बळ अर्थात बुद्धीबळ देते अशा बुद्धीला विवेकबुद्धी म्हणतात. पण कधीकधी असे होते की मानवी मनात असलेल्या वासना व भावनांचे मिश्रण थोडे इकडेतिकडे होते, त्यांच्यातील संतुलन बिघडते व मग मानवी बुद्धी थोडीशी भ्रमिष्ट होऊन बुद्धीबळाचा शरीरावरील ताबा सुटतो व शरीर रूपी घोडा उधळतो. भरकटलेली बुद्धी व उधळलेला शरीर रूपी घोडा माणसाला कधी जनावर बनवून टाकतो हे कळतच नाही. या विश्लेषणातून एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे मानवी बुद्धीचे चांगले वागणे म्हणजे काय तर वासना व भावना यांच्या मिश्रणात संतुलन ठेवीत विवेकाने वागणे. असे विवेकी वागण्यासाठी मनातील देव भावनांना बळ प्राप्त होणे आवश्यक असते. देव भावनांना देव शक्ती मिळण्यासाठी मग आस्तिक लोक देवाचा आधार घेतात. देवावर श्रद्धा, विश्वास ठेऊन मिळविलेला तो आधार खूप मोठे काम करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत व त्यांचे मर्द मावळे जेंव्हा शत्रूवर चढाई करीत तेंव्हा हर हर महादेव अशी आध्यात्मिक आरोळी देत चढाई करीत. महादेवावर असलेली श्रद्धा, विश्वास त्या मर्द मावळ्यांत अशी चेतना निर्माण करीत असे की आपण देव भावनेच्या रक्षणासाठीच म्हणजेच धर्मासाठी जनावरांच्या वासनेने जगणाऱ्या दुष्ट शत्रूवर महादेवाचे रौद्र रूप अंगात संचारून घेत चढाई करीत आहोत. देव भावनांचा वासनांमुळे चोळामोळा होऊ नये म्हणून आस्तिक माणसे देवाचा आधार घेतात व यात काही चूक आहे असे मला वाटत नाही.

-ॲड.बी.एस.मोरे©२७.७.२०२०

रविवार, २६ जुलै, २०२०

भुतांचा बाजार!

भुतांचा बाजार!

(१) हल्ली थोडी चांगली सवय लागत चाललीय व ती म्हणजे रात्री झोपून सकाळी उठायची सवय. घुबडासारखे रात्रभर जागून दिवसाची झोप घेणे हा प्रकार माणसासाठी विचित्रच! पण मी आयुष्यात थोडा विचित्र म्हणजे जरा हटकेच वागलो. त्यामुळे थोडे नुकसानही झाले. पण त्या वेगळे वागण्यातली वेगळी मजाही घेता आली.

(२) तर काय झाले की, काल रात्री मला कायदा नीट समजावून सांगणारे एक स्वप्न पडले. मला झोपेत स्वप्ने पडतात व झोपेतून उठल्यावर ती बरोबर लक्षातही राहतात हे विशेष! कालच्या स्वप्नात मी रात्रीच्या वेळी चालू असलेल्या एका  फार मोठ्या भुतांच्या बाजारात फिरत होतो. त्या मोठ्या बाजारात ती भुते जी देवाणघेवाण करीत होती ती विचित्रच होती. थोडक्यात सुसंस्कृत मानवी मनासाठी ती घाणेरडी होती. पण त्या विचित्र, घाणेरड्या व्यवहारांच्या, देवाणघेवाणीच्या पाठीमागे भुतांचे एक बळ होते आणि ते म्हणजे हातात तलवारी, बंदूका घेऊन फिरणाऱ्या काही आंडदांड भुतांचे. काही ठिकाणी या देवाणघेवाणीत थोडी जरी गडबड होताना दिसली की ही आंडदांड तलवारधारी, बंदूकधारी भुते तिथे पोहोचायची व मग तिथला व्यवहार शांतपणे पार पडायचा. त्या बाजारात मीही न घाबरता त्या भुतांप्रमाणेच बिनधास्त फिरत असल्याने मला त्या भुतांनी अडवले नाही. विशेष म्हणजे ती भुते माणसांसारखीच दिसत होती. पण वागत मात्र विचित्र होती. त्या बाजारात ज्या मोठमोठया जाहिराती लावल्या होत्या त्या बघून तर माझे डोके फिरायची वेळ आली होती. मी जर भुतांच्या त्या बाजारातील भुतांचे ते व्यवहार, भुतांची ती विचित्र, घाणेरडी देवाणघेवाण, त्यांच्या त्या भयंकर जाहिराती इथे शब्दांत वर्णन करू लागलो तर लोक सहन करूच शकणार नाहीत इतका विचित्र प्रकार होता तो. नरक नरक ज्याला म्हणतात ना तोच मला त्या बाजारात दिसला.

(३) मी ठरवले होते की रात्रभर त्या भुतांच्या बाजारात फिरायचे व सकाळ झाली की काय होतेय ते बघायचे. जसजशी पहाट सुरू झाली तसतशी त्या बाजारात सावरासावर सुरू झाली. सामानाची बांधाबांधी, जाहिराती काढून टाकणे हे प्रकार सुरू झाले. सकाळ होताना तो बाजार शांत होऊ लागला, ती भुते गायब होऊ लागली. आणि एकदाची सकाळ झाली, सूर्यकिरणांचा प्रकाश पडला. तो भुतांचा बाजार तिथून नष्ट झाला होता. आता तिथून पाय काढता घ्यावा असे वाटत असतानाच तिथे दुसरी वर्दळ सुरू झाली. दुसरा बाजार सुरू झाला. तो होता खऱ्या माणसांचा बाजार! ज्या ओट्यांवर रात्री भलतेच व्यवहार चालू होते तिथे छान टेबल, खुर्च्या आल्या. त्यावर मस्त स्वच्छ कपड्यातील माणसे हळूहळू येऊन बसू लागली. टेबलावर संगणक आले. त्यावर टायपिंगचे काम सुरू झाले. माझ्या मनाजोगते सुसंस्कृत मानवी व्यवहार त्या दिवसाच्या बाजारात सुरू झाले ज्या ठिकाणी काल रात्री तो भुतांचा बाजार भरला होता.

(४) मी या माणसांच्या बाजाराचे निरीक्षण करीत पुन्हा तिथे फिरू लागलो. हळूच काही ठिकाणी लक्ष गेले तर तिथे काल रात्री जी काही आंडदांड भुते हातात तलवारी, बंदूका घेऊन फिरत होती त्यापैकी काही थोडी भुते हळूच त्या टायपिस्ट लोकांच्या मागे असलेल्या दारात येऊन उभी राहिली व त्यांच्या तलवारीचा धाक त्या टायपिस्टना दाखवू लागली. खरं म्हणजे तो धाक होता की खोडसाळपणा होता हेच मला कळेनासे झाले. कारण ती भुते हळूच त्यांच्या तलवारीचे पुढचे टोक त्या टायपिस्ट लोकांच्या शर्टाच्या कॉलर्स मध्ये घुसवायची व टायपिस्ट लोकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करायची. ते टायपिस्ट लोक पण त्या भुतांना ओळखत होते असेच वाटू लागले. कारण त्या भुतांनी त्यांच्या तलवारीचे टोक त्या टायपिस्ट लोकांच्या कॉलर्स मध्ये घुसवून त्यांची कॉलर इकडेतिकडे फिरवली की ते टायपिस्टस मागे वळून हातानेच त्या भुतांना खुणवायचे व बाबांनो तुमचे काय ते नंतर देतो असे नजरेनेच खुणवायचे. हा प्रकारच मला कळेनासा झाला. भुतांचे आणि माणसांचे हे असे गुपचूप संबंध असू शकतात? मनाला ते पटत नव्हते. पण प्रत्यक्षात तर मी माझ्या डोळ्यांनी ते बघत होतो.

(५) माझी झोप पूर्ण झाली व माझे ते स्वप्न भंग पावले. खरं सांगतोय की, हा लेख त्या स्वप्नावर आधारित आहे व झोपेतून उठल्यावर अंघोळ न करताच लिहित आहे. पडलेले स्वप्न विसरून जाईल या भीतीने मी असे स्वप्न जागा झालो की एका कागदावर कच्चे लिहून ठेवतो व नंतर त्याचा लेख बनवतो. आज मी तसे न करता डायरेक्ट लेख लिहायलाच बसलोय. प्रत्येक स्वप्न मला काहीतरी शिकवते, संदेश देते. मला त्या स्वप्नातून जे कळते ते मी माझ्या लेखात उतरवतो व तो लेख वाचकांसाठी फेसबुक वर प्रसिद्ध करतो.

(६) कालच्या स्वप्नाने डार्विनने सांगितलेला बळी तो कानपिळी हा नियम समोर आला. रात्री  चालू असलेला भुतांचा बाजार म्हणजे जंगली व्यवहार जे वाघ, सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांना शोभतात, पण माणसांना नाहीत. हेच दिवसा चालू झालेल्या माणसांच्या सुसंस्कृत बाजाराने सिद्ध झाले. आता बळी तो कानपिळी हा नियम दोन्ही बाजारांना लागू पण वेगळ्या पद्धतीने! भुतांच्या जंगली बाजारात तलवारी, बंदूका यांच्या दहशतखोर बळावरच आर्थिक व्यवहार सुरू होते. पण माणसांच्या सुसंस्कृत बाजारात त्या दहशतखोर बळाचाच कान माणसांनी पिरगळून टाकला होता. कशाच्या जोरावर तर सूर्यप्रकाशाच्या जोरावर! सूर्यप्रकाशाची ताकद एवढी मोठी की रात्री मोकळ्या फिरणाऱ्या  तलवारी, बंदूका दिवसा लपून बसतात. पण स्वप्नातली काही भुते ज्याप्रमाणे दिवसाच्या सुसंस्कृत मानवी बाजारात त्यांच्या तलवारीने खोडसाळपणा करीत होती अगदी त्याचप्रमाणे "बळी तो कानपिळी" हा जंगली प्राण्यांसाठी असलेला निसर्ग नियम माणसांतही आणू पाहणारी काही दहशतखोर माणसे त्या रात्रीच्या  भुतांप्रमाणे माणसांतही फिरत आहेत हेच त्या स्वप्नातल्या दृश्याने स्पष्ट केले.

(७) पण त्या स्वप्नातली विशेष गोष्ट ही होती की, हातात तलवार, बंदूक नसलेली टायपिस्टस मंडळी त्या तलवारधारी भुतांना न घाबरता "गप्प बसताय की नाही आता, नंतर तुमची ती शिते तुम्हाला देण्यात येतील, तोपर्यंत आम्हाला आमची कामे करू द्या" अशी एका ताकदीच्या जोरावर सांगत होती आणि ती ताकद म्हणजे सूर्यप्रकाशाची ताकद! सूर्यप्रकाश ही अंधाराचे जाळे नाहीसे करणारी प्रचंड मोठी ताकद आहे. त्यात सत्य ज्ञानाचीही ताकद आहे. हीच ताकद "बळी तो कानपिळी" या नियमालाही योग्य मार्ग शिकवते. बळाचा योग्य वापर कसा करायचा हे शिकवते. ही विशेष अक्कल फक्त माणसांनाच निसर्गाने दिली आहे. म्हणून बळी तो कानपिळी हा जंगली नियम माणसांना पूर्णपणे लागू नाही. तो अयोग्य वर्तन करणाऱ्या काही माणसांना धडा शिकविण्यासाठीच काही अंशी लागू आहे हेच मला काल रात्रीच्या स्वप्नाने अधोरेखित करून दाखविले. काल रात्रीच्या स्वप्नाने मला कायदा पुन्हा शिकवला. जमलेच तर तुम्हीही शिका!

-ॲड.बी.एस.मोरे©२६.७.२०२०


शनिवार, २५ जुलै, २०२०

माझी मराठी लेखनाची आवड!

माझी मराठी लेखनाची आवड!

१९४७ ते १९९७ अशी भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेंव्हा मी त्याकाळी केलेल्या मराठी लेखनाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई या संस्थेकडून पारितोषिक मिळाले व तो पुरस्कार १९९८ साली देण्यात आला. त्याला आता २२ वर्षे पूर्ण झाली. मराठी लेखनाची मला पूर्वीपासूनच आवड आहे. फेसबुक वरील माझे मराठी लिखाण ही त्या मूळ आवडीची एक झलक आहे. श्री. पंडित हिंगे, अध्यक्ष, पुणे मराठी वृत्तपत्र लेखक संघ यांनी आज माझ्या "बेभरवशाचे जीवन" या लेखावर प्रोत्साहनपर कमेंट केली व माझी ती जुनी आठवण जागृत केली. विशेष म्हणजे पंडित हिंगे हे पुण्याच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आहेत हे कळले. १९९८ साली श्री. गणेश केळकर हे मुंबईच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष होते. ते आता हयात नाहीत.

-ॲड.बी.एस.मोरे©२५.७.२०२०

बेभरवशाचे जीवन!

बेभरवशाचे जीवन!

(१) कुठून आलात तुम्ही, कुठून आलो मी? आपण सगळेजण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी, कोणाच्या तरी घरी, कोणत्या तरी आईबापाच्या पोटी जन्मलो आहोत. हळूहळू या जगाची ओळख आपल्याला होत गेली, अनुभव मिळत गेले. आपण अजूनही जिवंत आहोत व कसे का असेना पण जगत आहोत यासाठी आपण निसर्गाचे व समाजाचे खूप आभार मानायला हवेत. आजूबाजूला जर आपल्याच समाजाने निर्माण केलेल्या शाळा नसत्या तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला शाळेत कसे घातले असते. आजूबाजूला दवाखानेच नसते तर आपण आजारी पडल्यावर आपण कुठे गेलो असतो? या समाजाचे खूप उपकार आहेत आपल्यावर ही गोष्ट विसरता कामा नये.

(२) पण आपले जीवन सरळसाधे, सरळसोपे नाही. ज्यावेळी निसर्गाने गुलाबाची निर्मिती काट्यांबरोबर केली तेंव्हाच निसर्गाने या जगात अर्थकारणाबरोबर राजकारण सुरू केले. काय म्हणावे या निसर्गाला! जीवन दिले म्हणून कृतज्ञ भावनेने निसर्गाचे आभार मानावेत तर याच जीवनात एकीकडून जगण्याचा आधार व दुसरीकडून मरण्याची भीती देऊन हे जीवन बेभरवशाचे करून टाकले.

(३) हा लेख लिहिण्यापूर्वीच सातारा, खंडाळा येथील कण्हेरी गावातून विनायक मामाचा फोन आला. हा विनायक मामा (विनायक धनवडे) आमच्या वरळीच्या घरी बरेच वर्षे राहिला. गावी शेती व मुंबईला गिरणी कामगार म्हणून नोकरी  करीत असलेला हा मानलेला मामा आमच्या घरातलाच एक कुटुंब सदस्य होऊन गेला. तो आता ७५ वर्षाचा आहे. दोन वर्षापूर्वी चैत्र महिन्यात त्याच्या कण्हेरी गावच्या जत्रेला गेलो होतो. त्यावेळी तिथे त्याचा थोरला मुलगा संदीप व धाकटा मुलगा किरण हे दोघेही भेटले. संदीप हा साधारण ३५ वर्षाचा विवाहित मुलगा ज्याला चार वर्षाचा छोटा मुलगा आहे. ही दोन्हीही मुले विवाहित व स्वभावाने विनायक मामा सारखीच खूप गोड!

(४) माझी व माझ्या सोबत जत्रेला आलेल्या बळी या आतेभावाची या सर्वांनी खूप बडदास्त ठेवली. विनायक मामा बरोबर गावात, शेतात खूप फिरलो. जत्रेत खूप मजा केली. त्यावेळी विनायक मामाचा थोरला मुलगा संदीप याने घरात आम्हाला जेवण वाढले, रात्री जत्रेतले खेळ दाखवले. आज अचानक विनायक मामा गावाहून फोन करतात व दुःखद बातमी देतात की त्यांचा थोरला मुलगा संदीप गेला. ते ऐकून मला खूप धक्का बसला. कारण संदीप कोरोना मुळे नाहीतर त्याच्या किडनीला अचानक कसले तरी इन्फेक्शन झाल्याने व ते छातीपर्यंत वर चढून त्याचे छातीत पाणी साचल्याने व मग त्या पाण्याच्या दबावाने हार्ट अटॕक आल्याने संदीप आठच दिवसांत गेला. धाकटा भाऊ किरण याने मुंबईवरून गावी जाऊन लाखाच्या वर तिकडे खाजगी रूग्णालयात खर्च केला पण त्याला यश आले नाही. संदीप कायमचा निघून गेला.

(५) काय म्हणावे या अशा घटनांना? आश्चर्य हे की ७५ वर्षाच्या विनायक मामाच्या अंगावर पाच वर्षापूर्वी त्यांचाच एक बैल उधळतो, संपूर्ण बैलगाडी विनायक मामाच्या छातीवर उलटी होते, त्यांच्या बरगड्या मोडतात व एवढा मोठा शारीरिक आघात होऊनही विनायक मामा वाचतात व त्यांचा तरूण मुलगा अचानक काहीतरी होते व अचानक या जगाचा कायमचा निरोप घेतो. म्हातारा बाप जगतो व तरूण मुलगा जातो. केवढे मोठे हे दुःख आणि कसले हे निसर्गाचे विचित्र वागणे!

(६) माणूस चांगल्या भावनेने देवाला मानतो, त्याला शरण जातो. पण सत्य हेच आहे की नुसत्या चांगल्या भावनेने जगात चांगले होईलच याची काहीही खात्री नसते. या जगात काही वाईट गोष्टी याच निसर्गाने म्हणा किंवा देवाने म्हणा निर्माण केल्या आहेत त्यांची कीड कुठून तरी चांगल्या गोष्टींना लागते व चांगल्या गोष्टी अचानक सडून नष्ट पावतात. मग ते कष्टाने वाढवलेले शेतीतले उभे पीक असो किंवा आईवडिलांनी मोठ्या कष्टाने वाढवलेले मूल असो! काय म्हणावे निसर्गाच्या की देवाच्या या खेळाला? आपण देवाला चांगला, दयाळू असे आपल्या चांगल्या भावनेने मानून त्याची भक्ती करतो, प्रार्थना करतो आणि देव हा असा उलट वागतो. त्याचे हे उलट वागणे माणसाच्या समजण्याच्या पलिकडचे असते म्हणून मग माणूस देवाला सोडून नियतीला दोष देऊन मोकळा होतो. म्हणजे देवाला नियती भारी पडते?

(७) कुठून कळ दाबली जाते, कुठून चक्र फिरते आणि आपण या जगात जन्म घेतो. मग जीवन काय ते हळूहळू आपल्याला कळू लागते. तुम्ही कुठले, मी कुठला, पण आपली या जीवन चक्रात योगायोगाने ओळख होते, जगण्याचे विचार, व्यवहार यांची आपल्यात देवाणघेवाण होते. ही देवाणघेवाण होत असताना आपले कधीकधी खटकते, मग रूसवे, फुगवे होतात. पण आपण मनाने चांगले असतो. जगात जर आपल्या सारखे सगळे चांगले असते तर जगात आपल्याला सगळीकडे फक्त सहज सुंदर असे अर्थकारणच दिसले असते. पण नाही, त्या खोडकर निसर्गाने म्हणा नाहीतर देवाने म्हणा, गुलाबाची निर्मितीच मुळी काट्यांबरोबर केली. हेच ते काटे जे गुलाबाला सरळसाधे, सहज सुंदर अर्थकारण करू देत नाहीत. त्यांना टोचून त्रास द्यायचा एवढेच माहित. काट्यांच्या या उपद्रवी टोचण्यातून मग सुरू होते राजकारण!

(८) राजकारण ही अर्थकारणाला लागलेली कायमची कीड आणि ती कोणी लावलीय तर त्या महान निसर्गाने किंवा देवानेच! प्लेग घ्या, स्वाईन फ्लू घ्या नाहीतर सद्याचा कोरोना घ्या, या सर्व गोष्टी हे काटेच आहेत व मग हे काटे काढून टाकण्यासाठी वैद्यकशास्त्र व आरोग्य व्यवस्था! शेवटी या आरोग्य व्यवस्थेचा संबंध कशाशी आहे तर रोगजंतू, विषाणू या काट्यांशी आणि म्हणूनच आरोग्य व्यवस्था ही सुद्धा कडू राजकारणाचाच एक भाग होऊन गेलीय.

(९) अशा या डबल ढोलकी जीवनात म्हणजे गुलाब व काटे, अर्थकारण व राजकारण अशा दोन्ही गोष्टी समांतर असणाऱ्या जीवनात तुम्ही व मी जन्म घेतला आहे व असे हे जीवन आपण जगत आहोत. आपले हे जीवन बेभरवशाचे आहे. कोरोना हा काही एकमेव काटा नाही या जगात! पुढे कोरोनावर लस आली तरी हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही. कारण बाकीचे असंख्य काटे या जगात शिल्लक राहणार आहेत व निर्माणही होणार आहेत. आपण आता एकमेकांच्या संपर्कात आहोत. पुढच्या क्षणाचा आपला भरवसा नाही कारण आपले जीवन बेभरवशाचे आहे. तेंव्हा जमेल तेवढा आपला संपर्क व आपली वैचारिक, व्यावहारिक  देवाणघेवाण आनंदी करूया! विनायक मामा यांच्या कण्हेरी गावच्या जत्रेतील लोकनाट्यात मीही सहभागी झालो होतो. त्यावेळी तमाशा कलावंतांबरोबर काढलेला फोटो या लेखाच्या सोबत जोडत आहे. शेवटी या जगातील आपले बेभरवशाचे जीवन एक तमाशाच बनून राहिले आहे ना!

-ॲड.बी.एस.मोरे©२५.७.२०२०

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

मेल्यावरही चांगल्या आठवणीत रहावे!

मेल्यावरही चांगल्या आठवणीत राहण्यासाठी चांगले जगायला हवे!

(१) जगात माणसे येतात, जातात पण जगाचे व्यवहार थांबत नाहीत. जग काय किंवा निसर्ग काय ही एक फार मोठी संस्था आहे. राष्ट्र ही छोटी संस्था तर जग ही मोठी संस्था! राष्ट्र हे अनेक नागरिकांचे बनते तर जग हे अनेक सजीव, निर्जीव पदार्थांचे बनलेले आहे. राष्ट्राचा कायदा असतो तसा जगाचा (निसर्गाचा) सुद्धा कायदा असतो. राष्ट्रध्वज हे राष्ट्राचे भावनिक प्रतीक असते. त्याचप्रमाणे काही लोकांसाठी  देव हे जगाचे (निसर्गाचे) प्रतीक आहे. मीही देवाला निसर्गाचे प्रतीक मानणाराच आस्तिक आहे.

(२) इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की, ज्याप्रमाणे राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात राष्ट्राविषयीची चांगली भावना दडलेली असते त्याचप्रमाणे देवाच्या प्रतीकात जगाविषयीची (निसर्गाविषयीची) चांगली भावना दडलेली असते. पण राष्ट्राचे सर्व नागरिक ज्याप्रमाणे चांगले नसतात त्याप्रमाणे जगातील (निसर्गातील) सर्व सजीव, निर्जीव पदार्थ चांगले नसतात. त्यांच्यात विषारी किंवा विध्वंसक गुण असतात. ज्याप्रमाणे दुर्गुणी नागरिकांमुळे राष्ट्राविषयीच्या चांगल्या भावनेला ठेच पोहोचते व या चांगल्या भावनेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज अपमानित होतो, डागाळला जातो, अगदी त्याचप्रमाणे विषारी पदार्थ व दुर्गुणी प्राणीमात्रांमुळे जगाविषयीच्या किंवा निसर्गाविषयीच्या चांगल्या भावनेला खोल ठेच पोहोचून या चांगल्या भावनेचे प्रतीक असलेला देव अपमानित होतो, डागाळला जातो.

(३) महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगली भावना जिवंत असते म्हणून चांगली प्रतीकेही जिवंत असतात. जिवंत राष्ट्र हे राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात जिवंत असते व जिवंत जग (निसर्ग) हे देवाच्या प्रतीकात जिवंत असते. राष्ट्रीय व्यवहारांत जसा राष्ट्रध्वज सोबतीला असतो त्याप्रमाणे जगाच्या (निसर्गाच्या) व्यवहारांत देव सोबतीला असतो. पण राष्ट्रध्वज सोबतीला ठेऊन राष्ट्रद्रोह करणारे काही दुर्गुणी नागरिक असतात त्याप्रमाणे देवाला सोबतीला घेऊन वाईट कर्मे करणारी माणसेही असतात. वाघ, सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यांना देव कळत नाही. कारण चांगल्या वाईटातला फरकच त्यांना कळत नाही. पण माणसाला हा फरक कळतो म्हणून त्याच्या मनात चांगल्या भावनेतून देव निर्माण होतो व तो देव जगात चांगल्या गोष्टींचे जतन व वाईट गोष्टींचे निर्दालन करण्याचा प्रयत्न करतो.

(४) जगात माणसे येतात तशी जातातही, पण त्यांच्या जाण्याने जग (निसर्ग) नावाची संस्था बंद पडत नाही, तिचे व्यवहार बंद पडत नाहीत.  याचे कारण म्हणजे गेलेल्या माणसांची जागा जगात नव्याने आलेली माणसे घेतात. माणूस काय किंवा जगातील इतर पदार्थ, वनस्पती व प्राणी काय त्यांच्यात सतत परिवर्तन होतच असते. नवीन गोष्टी जुन्या होतात, जुन्या गोष्टी नष्ट पावतात व त्यांची जागा पुन्हा नवीन गोष्टी घेतात. हे रहाटगाडगे, चक्र सतत चालूच आहे.

(५) माणसाचे जगणे या रहाटगाडग्यात काही काळापुरतेच असते. माणूस मेल्यावर त्याचा चेहरा जगाच्या व्यवहार पटलावरून नाहीसा होतो. जवळची नातेवाईक मंडळी त्याचा चेहरा फोटोत घालून ठेवतात तर महापुरूषांचे चेहेरे लोक चित्रांत, पुतळ्यांत जतन करून ठेवतात.  जगात जगताना लोकांच्या चांगल्या भावनेला ठेच पोहोचणार नाही व या चांगल्या भावनेवर आधारित असलेली प्रतीके डागाळली जाणार नाहीत याची काळजी घेत चांगले जीवन जगून आदर्श निर्माण करणारी माणसे लोकांच्या कायम स्मरणात राहतात. म्हणून मेल्यावरही चांगल्या आठवणीत राहण्यासाठी चांगले जगायला हवे!

-ॲड.बी.एस.मोरे©२४.७.२०२०

बुधवार, २२ जुलै, २०२०

वो देखो जला घर किसी का!

वो देखो जला घर किसी का!

कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एखाद्या घरावर जेंव्हा आकाश कोसळते तेंव्हा अनपढ या जुन्या हिंदी चित्रपटातील "वो देखो जला घर किसी का" हे दुःखद गीत आपोआप ओठांवर येते. त्या घराचे ते जळणे आपल्यापासून आता दूर नाही याची जाणीव होते.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.७.२०२०

वो देखो जला घर किसी का!

वो देखो जला घर किसी का
ये टूटे हैं किसके सितारे
वो क़िस्मत हँसी और ऐसे हँसी
के रोने लगे ग़म के मारे
वो देखो जला घर किसी का...

गया जैसे झोंका हवा का
हमारी ख़ुशी का ज़माना
दिए हमको क़िस्मत ने आँसू
जब आया हमें मुस्कराना
बिना हमसफ़र है सूनी डगर
किधर जाएँ हम बेसहारे
वो देखो जला घर किसी का...

हैं राहें कठिन दूर मंज़िल
ये छाया है कैसा अँधेरा
कि अब चाँद-सूरज भी मिलकर
नहीं कर सकेगा सवेरा
घटा छाएगी बहार आएगी
ना आएँगे वो दिन हमारे
वो देखो जला घर किसी का...

इधर रो रही हैं आँखें
उधर आसमाँ रो रहा है
मुझे कर के बरबाद ज़ालिम
पशेमान अब हो रहा है
ये बरखा कभी तो रुक जाएगी
रुकेंगे ना आँसू हमारे
वो देखो जला घर किसी का...

वो देखो जला घर किसी का
ये टूटे हैं किसके सितारे
वो किस्मत हँसी और ऐसी हँसी
के रोने लगे गम के मारे
वो देखो जला घर किसी का.



मंगळवार, २१ जुलै, २०२०

कोरोनासोबत जीवशास्त्राचा अभ्यास!

कोरोनासोबत जीवशास्त्राचा अभ्यास!

अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व पुढे विधीशास्त्र शिकून  वकिलीत पडल्यानंतर माणसांतील संबंधावरच लक्ष केंद्रित केले गेल्याने इतर गोष्टी हळूहळू नजरेतून सुटत गेल्या. माणूस सोडून या जगात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींचा अभ्यास सुटला तर मनुष्याचे जीवन कठीण होऊ शकते हे कोरोनाने सिद्ध केले आहे. या गोष्टी म्हणजे सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन, अन्न व औषध पुरवणाऱ्या वनस्पती, सूक्ष्मजीव, मोठे जीव व शेवटी माणूस. या सर्व गोष्टींचे एकमेकांशी अत्यंत जवळचे नाते आहे. पण माणूस सोडून सृष्टीत असणाऱ्या इतर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग तिथेच फसतो. या पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले याचा रोचक इतिहास डार्विन शास्त्रज्ञाने सांगितला. पण आपला इतिहासाचा अभ्यास माणसाच्या इतिहासापुढे जातच नाही. हवा, पाणी व इतर मूलद्रव्यांनी अमिबा सारखे प्राणी कसे निर्माण केले. सजीव सृष्टी काय अशीच हवेतून पटकन निर्माण झाली नाही. तर अगोदर वनस्पती व कोरोना सारखे अर्धजीव, अर्धजीवातही कोरोना सारखे सूक्ष्म अर्धजीव व वनस्पती सारखे मोठे अर्धजीव, नंतर टी.बी. च्या रोगजंतूसारखे सूक्ष्म  पूर्णजीव (जिवाणू), नंतर पाली, साप यासारखे  सरपटणारे प्राणी, मग हवेत उडणारे पक्षी, मग ससे, हरणे यासारखे वनस्पतीजन्य प्राणी, नंतर वाघ, सिंहासारखे मांसाहारी प्राणी व सर्वात शेवटी शाकाहारी व मांसाहारी असा माणूस. हा एवढा मोठा लांबलचक प्रवास व इतिहास आहे पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा! हा इतिहास  किती जण वाचतात, अभ्यासतात? वैज्ञानिक सत्य हे आहे की माणसांचा नुसता माणसांशीच नव्हे तर इतर अनेक व विविध निर्जीव व सजीव पदार्थांशी अत्यंत जवळचा संबंध आहे. इतका की आपले संपूर्ण मानवी जीवनच या इतर सर्व पदार्थांवर अवलंबून आहे. कोरोना विषाणू हा अशाच अनेक व विविध अर्धजीवी पदार्थांतला एक अत्यंत सूक्ष्म पदार्थ! पण या अत्यंत सूक्ष्म अर्धजीवाने संपूर्ण जगाला जेरीस आणलेय की नाही? सूक्ष्मजीव शास्त्रात अशा सूक्ष्म अर्धजीवी विषाणूंचा व सूक्ष्म पूर्णजीवी जिवाणूंचा सखोल अभ्यास असतो. या अभ्यासातूनच पुढे सखोल अभ्यासाचे औषधनिर्माण शास्त्र उदयास आले. किती अवघड आहेत या गोष्टी! आपल्याला मात्र पटकन कोरोनावर लस हवीय! एवढी का सोपी गोष्ट आहे ती?

-ॲड.बी.एस.मोरे©२२.७.२०२०

अती शहाणा त्याचा बैल रिकामा!

शिक्षणाने माणूस अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होतो का?

सद्या कोरोनाच्या भीतीमुळे सरकारने धार्मिक प्रार्थनास्थळे, देवस्थानांना कुलूप लावून त्यांचे लॉकडाऊन केले असले तरी त्यामुळे लोकांची देवावरील श्रद्धा बिलकुल कमी होणार नाही. उलट आता ती श्रद्धा जास्त वाढेल असे माझे मत आहे. खाजगी रूग्णालयातील लाखांच्या घरातील बिले बघितली आणि मग धर्माची चाड नसलेले विज्ञान किती मोकाट सुटू शकते याची जाणीव या कोरोनानेच मला करून दिली. एक कोरोना विषाणू जगातील वैज्ञानिक प्रगतीचे जर तीन तेरा वाजवू शकतो तर मग या विज्ञानावर डोळे झाकून विश्वास ठेवणे ही सुद्धा एक मोठी अंधश्रद्धाच आहे असेच मी म्हणेन. शिक्षण कमी होते तेंव्हा किती आनंदी व शांत होतो मी! लहानपणी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जायचो तेंव्हा निरागस भावनेने त्या सावळ्या विठ्ठल मूर्तीकडे बघत बसताना केवढा मोठा आधार वाटायचा मला त्या मूर्तीचा व केवढा मोठा आनंद व्हायचा मला त्या सुंदर मूर्तीकडे बघत बसण्याचा! कारण माझी त्यावेळी देवावरील श्रद्धा मजबूत होती. तिला कोणी भोके पाडली नव्हती. पण जसजसा मी मोठा होत गेलो व अधिक शिक्षण घेत गेलो तसतशी माझी देव श्रद्धा डळमळीत होऊ लागली. माझे मन अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होत गेले आणि अतीशहाणा होऊन मी देवालाच उलट प्रश्न विचारू लागलो. पुढे पुढे तर देवाचे अस्तित्वच नाकारत नास्तिकतेकडे झुकू लागलो. आणि मग हा कोरोना आला! या कोरोनाने माझे डोळे खाडकन उघडले. कुठे येऊन पोहोचलो होतो मी अती बुद्धीवादी, अती विज्ञानवादी होऊन! देवालाच उलट प्रश्न करायला लागलो मी! आता मी मलाच प्रश्न करतोय की, निसर्ग विज्ञानात धर्म नावाची गोष्ट नाही काय? त्या निसर्गात देव नाही काय? विज्ञाननिष्ठ होणे म्हणजे अधार्मिक होणे काय? बुद्धीवादी होणे म्हणजे भावनेचा, देवावरील श्रध्देचा चोळामोळा करून टाकणे काय? निसर्गाचे वैज्ञानिक सत्य कळण्यासाठी मला नास्तिक होणे ही पूर्वअट आहे काय? आस्तिक राहून मी नैसर्गिक वागू शकत नाही काय? आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक वागणे म्हणजे तरी काय? नैसर्गिक वर्तनात जर नैतिकता येते तर मग धर्माचा भाग आलाच ना! म्हणजे निसर्गाच्या विज्ञानात धर्म आला. आता या धर्मात देव आणायचा की नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा व बुद्धीचा प्रश्न! नास्तिक लोक म्हणतील की नैतिक वागायला देवच कशाला हवाय? मग पुढे ते असेही म्हणतील की विज्ञानात धर्म कशाला हवाय? काहीजण तर असेही म्हणतील की, नास्तिक व्हायला हिंमत पाहिजे. पण या कोरोनाने हे सर्व प्रश्न माझ्यासाठी तरी निकालात निघाले आहेत. मला देवाची भीती वाटत नाही तर आधार वाटतो आणि मरतानाही हा आधार घेऊनच मला मरायचेय! भले नास्तिकांच्या दृष्टिकोनातून  हा आधार आभासी असेल. मला एवढे मात्र कळते की, मानवी बुद्धीचे व ज्या विज्ञानाच्या जोरावर ती उड्या मारते त्या विज्ञानाचे बऱ्याच गोष्टींवर बिलकुल नियंत्रण नाही. आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रियांचेच घ्या! आपल्या  बुद्धीला या अनैच्छिक क्रियांवर तिच्या ऐच्छिक इच्छाशक्तीच्या जोरावर किती नियंत्रण ठेवता येते? ही मानवी बुद्धी त्या पृथ्वीला उलटी का फिरवू शकत नाही? जन्म, जीवन, मृत्यू या जीवनचक्रावर या मानवी बुद्धीचे किती नियंत्रण आहे? निसर्गाच्या या विज्ञानावरच जर मानवी बुद्धीचे पूर्ण नियंत्रण नाही तर मग या बुद्धीला शेवटी शरणागती स्वीकारणे आलेच ना! आता नास्तिक निसर्गाच्या ताकदीला मानतील पण देवाला मानणार नाहीत. तो त्यांचा प्रश्न आहे. मला मात्र आता म्हातारपणी माझा हा असला अती बुद्धीवादाचा, अती विज्ञानवादाचा अर्थात अती शहाणपणाचा किडा डोक्यातून काढून टाकायचाय. मला आता पुन्हा लहान व्हायचेय व देवाला जवळ करायचेय! चिरंतन विश्रांती घेण्यासाठी मृत्यूशय्येवर जाताना ते विज्ञान, ते तत्वज्ञान, ती अतीशहाणी बुद्धी मला सोबतीला मुळीच नको! मला माझ्या श्रद्धेतला तो देवच बरोबर हवाय! शेवटी एक प्रश्न राहतोच की, शिक्षणाने माणूस अती बुद्धीवादी, अती विज्ञान वादी होतो का?

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

निसर्गाचे लॉकडाऊन, अनलॉक!

निसर्गाचे लॉकडाऊन व अनलॉक!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायबाप सरकार ज्याप्रमाणे लॉकडाऊन व अनलॉक असा दुहेरी कार्यक्रम अंमलात आणते अगदी त्याचप्रमाणे निसर्गही वागतो याचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे काय? म्हणजे बघा, वासना असो नाहीतर भावना, आपल्या या जाणिवा जागृत कोण करतो तर निसर्ग! हा झाला त्या महान निसर्गाचा कळ लावण्याचा प्रकार! ही कळ लावून दिली की या कळीला आपल्या बुद्धीने प्रतिसाद कसा द्यायचा हे कोण ठरवतो, तर तेही निसर्गच ठरवतो. पण इथे निसर्ग थोडा  शिथिलही होतो. जाणिवांच्या कळीला प्रतिसाद कसा द्यायचा याची अर्धी चावी निसर्ग त्याच्या ताब्यात ठेवतो. तिथे तो त्याची पूर्ण हुकूमशाही राबवतो. आपल्या शरीराच्या अनैच्छिक क्रिया हा निसर्गाच्या ताब्यातील त्या अर्ध्या चावीचा भाग झाला आणि हा अनैच्छिक भाग म्हणजे निसर्गाचा कडक लॉकडाऊन झाला. आता गंमत अशी की निसर्ग त्याची अर्धी चावी मानवी बुद्धीच्याही ताब्यात देऊन  टाकतो. ही असते बौध्दिक स्वातंत्र्याची चावी! निसर्ग निर्मित जाणिवांना प्रतिसाद कसा द्यायचा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य निसर्गाकडून आपल्या बुद्धीला याच अर्ध्या चावीने मिळते. या निर्णय स्वातंत्र्यात तर बुद्धीचा खरा कस लागतो. आपल्या बुद्धीकडून  शरीराच्या माध्यमातून होणाऱ्या ऐच्छिक क्रिया हा निसर्गाने आपल्या बुद्धीच्या ताब्यात दिलेल्या अर्ध्या चावीचा भाग होय आणि हा ऐच्छिक भाग म्हणजे निसर्गाचा अनलॉक होय. आहे की नाही निसर्गाच्या लॉकडाऊन व अनलॉकची आश्चर्यकारक करामत!

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

सोमवार, २० जुलै, २०२०

देवा, विश्व शांती!

देवा, विश्व शांती!

(१) खरं तर, देवश्रद्ध आस्तिकाकडून एवढी ईश्वर प्रार्थना पुरेशी आहे. देवा या शब्दात  जगातील सर्व देव आले, विश्व या शब्दात विश्व आले किंवा निसर्ग आला व शांती या शब्दात मनाचे मोठे समाधान आले, परमोच्च आनंद आला. वैश्विक शांती मध्ये स्वतःची शांतीही आली.

(२) पण विश्वात किंवा निसर्गात देव आहे ही फक्त श्रध्दा आहे व श्रध्दा ही फक्त भावनिक असते. ही भावना प्रत्यक्षात उतरण्यासाठी म्हणजेच श्रध्देचे रूपांतर विश्वासात होण्यासाठी देव हा प्रत्यक्षात दिसला पाहिजे.

(३) आता न दिसणाऱ्या देवापुढे विश्व शांतीची केलेली प्रार्थना ही सुध्दा मानवी मनाची चांगली भावना आहे. पण या भावनेचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत होण्यासाठी देवाशी प्रत्यक्षात संपर्क प्रस्थापित झाला पाहिजे. तसा संपर्क निर्माण झाल्याशिवाय विश्व शांती, कल्याण योजनेत देवाने काय मदत केली पाहिजे व तुम्हाला या योजनेत काय योगदान द्यायला हवे यावर देव व तुम्ही असे दोघांना समोरासमोर बसून नीट चर्चा कशी करता येईल? पण तसे काहीच करता येत नसल्याने देव श्रध्दा व देव प्रार्थना हवेत विरून जातात.

(४) देवाची व विश्व शांती, कल्याणाची भावना अशी हवेत विरून गेल्यावर मात्र निसर्गाची प्रत्यक्ष जाणीव (जी वासनिक व भावनिक अशी संमिश्र असते) व स्वतःची बुद्धी या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. नैसर्गिक जाणिवांशी बुद्धीची मैत्री हाच मानवी जीवनाचा व मानवी प्रगतीचा पाया आहे.

(५) पृथ्वीभोवती हवेचे जे वातावरण आहे ते वजनाने हलके आहे. पण या वातावरणाला चिकटलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जमीन व पाणी या दोन गोष्टी वजनाने जड आहेत. या गोष्टी एकमेकांना चिकटलेल्या आहेत.

(६) आपल्या हलक्या फुलक्या मनाची तुलना हवेशी तर आपल्या जड शरीराची तुलना जमीन, पाणी यांच्याशी करता येईल. याच विचाराने प्रेम, करूणा यासारख्या आपल्या पूरक नैसर्गिक भावनांची तुलना हवेशी तर तहान, भूक, लैंगिकता यासारख्या आपल्या मूलभूत नैसर्गिक वासनांची तुलना जमीन, पाणी यांच्याशी करता येईल.

(७) हवा, मन व मनातील भावना या तिन्ही गोष्टी वजनाने हलक्या असल्या तरी त्यांची प्रत्यक्षात जाणीव होते म्हणजे त्या प्रत्यक्षात अनुभवता येतात. कारण त्या जड असलेल्या भौतिक वासनांना चिकटलेल्या असतात. पण देवाच्या भावनिक श्रध्देचे रूपांतर मात्र प्रत्यक्ष जाणिवेत व अनुभवात होत नाही. त्यामुळे तिथे बुद्धीचे काहीच चालत नाही. देवश्रद्धेच्या भावनेत प्रत्यक्ष जाणीव, अनुभव नसल्याने या भावनेशी बुद्धीची मैत्री होऊ शकत नाही.

(८) प्रेम, करूणा या नैसर्गिक भावनांची प्रत्यक्ष जाणीव होत असल्याने, त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत असल्याने या भावनांशी बुद्धीला मैत्री करता येते. बुद्धीला नुसती मूलभूत वासनांशी मैत्री करून चालत नाही तर पूरक भावनांशीही मैत्री करावी लागते व या मैत्रीतून वासना व भावना यांच्यात योग्य संतुलन साधावे लागते. असे संतुलन साधता येणाऱ्या बुद्धीला विवेकी किंवा न्याय बुद्धी म्हणतात.

(९) प्रेम, करूणा या भावनांना भूक, लैंगिकता या वासनांचे भौतिक जडत्व प्राप्त झालेले आहे. पण तसे भौतिक जडत्व देवावरील भावनिक श्रद्धेला प्राप्त होऊ शकत नाही आणि जिथे असे भौतिक जडत्व नाही म्हणजे जिथे फक्त आणि फक्त आध्यात्मिक भावना आहे तिथे बुद्धीचे काम नाही. म्हणून कितीही घोळ घोळ घोळले तरी बुद्धीला केवळ भावनेवर आधारित असलेली देव श्रद्धा पटणे ही गोष्ट शक्यच नाही. म्हणून देवाला व देवाच्या विश्व शांतीच्या निव्वळ  भावनिक प्रार्थनेला फक्त भावनेवर म्हणजे फक्त हवेवर सोडून देऊन बुद्धी त्यापासून स्वतःला मोकळी करून घेते व तिच्या नैसर्गिक कामाला लागते.

-ॲड.बी.एस.मोरे©२१.७.२०२०

विषाणूचा पाठलाग!

विषाणूचा पाठलाग (चेसिंग द व्हायरस)!

(१) बळी तो कानपिळी या निसर्ग नियमाचे डार्विन या शास्त्रज्ञाने पुराव्यानिशी खूप छान विश्लेषण केले आहे. या नियमाला इंग्रजीत survival of the fittest म्हणतात. निसर्गाने पृथ्वीवर जीवन निर्माण केले आणि कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी माणसाने सद्या अलगीकरण व विलगीकरण या ज्या पद्धती  अंमलात आणल्या आहेत त्यातील अलगीकरण पद्धतीचा अवलंब करून निसर्गाने मानवेतर जीवन व मानवी जीवन यांचे अलगीकरण केले, पण विलगीकरण केले नाही. तसे केले असते तर काल गटारीला मांसाहारी माणसांना मटण खाताच आले नसते. निसर्गाने अलगीकरण तर केले पण बळी तो कानपिळी हा नियम दोन्ही जीवनांत समान ठेवला.

(२) काय समानता साधलीय बघा या निसर्गाने कायद्याच्या बाबतीत! पुन्हा गंमत अशी की, बळी तो कानपिळी या निसर्गाच्या कायद्याचा नियम समान पण बळाचे प्रकार वेगळे! म्हणजे मानवेतर प्राण्यांना शारीरिक बळ दिले पण त्यांना बौद्धिक बळात कमकुवत ठेवले आणि माणसांना बौद्धिक बळात सामर्थ्यशाली केले पण शारीरिक दृष्ट्या कमकुवत केले व तसे करून दोन्ही जीवनांत झेंगाट लावून दिले. बरं, निसर्ग इतकेच करून गप्प बसला नाही तर मानवेतर प्राण्यांच्या शारीरिक बळात पण त्याने दुजाभाव केला. वाघ, सिंहासारख्या प्राण्यांना हरणे, ससे या प्राण्यांपेक्षा इतके सशक्त केले की हरणे, ससे यांच्यासारख्या शरीराने अशक्त असलेल्या प्राण्यांनी त्यांचा आत्मविश्वास किंवा मनोबल वाढविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात ते कधीही यशस्वी शकणार नाहीत. एकटेच काय हे असे सगळे अशक्त प्राणी एकवटले तरी त्या अशक्त एकीचा वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र, सशक्त प्राण्यांना काही फरक पडणार नाही. बिचाऱ्या अशक्त प्राण्यांना हे सशक्त प्राणी शरीर (बाहु) बळाच्या बाबतीत चितपट करणार आणि त्यांना खाऊन टाकणार अशीच त्या डोकेबाज निसर्गाची अफलातून योजना!

(३) पण या सर्व बाहुबली प्राण्यांना पुरून उरली ती माणसाची तीक्ष्ण बुद्धी! निसर्गाने माणसाला असे बुद्धीबळ बहाल केले की त्याने भल्या भल्यांची वाट लावली. ज्या निसर्गाने हे असे बुद्धीबळ माणसाला प्रदान केले ते बुद्धीबळ नंतर निसर्गालाही भारी पडू लागले. मग निसर्ग व माणूस या दोघांतच मोठा खेळ सुरू झाला. मानवी बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी मग निसर्गाने काहीना काहीतरी आव्हाने निर्माण करायला सुरूवात केली. निसर्गाने अशी आव्हाने निर्माण करायची आणि मग मानवी बुद्धीने ती परतून लावायची असा तो जबरदस्त खेळ सुरू झाला. कोरोना विषाणूची सद्याची दहशत हा याच खेळाचा भाग आहे. माणसाच्या बुद्धीला घायकुतीला आणायचे निसर्गाचे केवढे मोठे हे षडयंत्र? माणसा माणसांमध्येच भांडणे लावून दिली निसर्गाने! अमेरिका चीनला दोष देतेय तर चीन अमेरिकेला भीक घालत नाही. तर मध्येच जागतिक आरोग्य संघटना रोज नवे नवे फतवे काढतेय!

(४) लोकमतच्या दिनांक १८ जुलै, २०२० च्या अंकात छापून आलेली एक बातमी मी वाचली. ही बातमी खूप छोटी आहे पण तिचा अर्थ खूप मोठा आहे. बातमी अशी आहे की, स्पेनच्या एका शेतात ८७ मिंक प्राण्यांना (जे सशासारखे दिसतात) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आल्याने स्पेनचे सरकार तिकडच्या ९२७०० मिंक प्राण्यांना कसलीही दयामाया न दाखवता ठार करणार आहे. आता ही प्रचंड मोठ्या प्रमाणातील प्राणी हिंसा होत असताना तिकडचे काय आणि इकडचे काय प्राणी मित्र काहीही करू शकणार नाहीत. कारण मानवी बुद्धी ही मानवेतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ असल्याने ती शेवटी मानवाचे अस्तित्व कसे टिकेल याचाच विचार करणार. आला ना शेवटी निसर्गाचा बळी तो कानपिळी हा नियम पुढे! वासना व भावना यात संतुलन साधणाऱ्या बुद्धीला न्याय किंवा विवेकी बुद्धी म्हणतात. केला ना न्याय याच बुद्धीने मिंक प्राण्यांचा!

(५) कोरोना विषाणूचा हा असा पाठलाग सुरू आहे मानवी बुद्धीकडून! इंग्रजीत या मोहिमेचे "चेसिंग द व्हायरस" असे नामकरण केले गेले आहे. याच मोहिमे अंतर्गत आता पालिका कर्मचारी पोलीस बळ (बळी तो कानपिळी हा नियम आलाच ना शेवटी) सोबत घेऊन घरोघरी अँटीजेन चाचणी किटस घेऊन फिरणार व या विषाणूचा "चेसिंग द व्हायरस" या मोहिमे अंतर्गत जोरात पाठलाग करणार. समजा या अँटिजेन मशीनने चहा व खारीबटर खाऊन घरामध्ये लॉकडाऊन करून अगदी व्यवस्थित जगणाऱ्या माझ्या सारख्या ६४ वर्षाचे वय असलेल्या माणसाला चुकून कोरोनाग्रस्त म्हणून घोषित केले तर मग आमची रवानगी सरळ कुठे होणार तर त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये का तर ती अँटिजेन मशीन तशी सांगते म्हणून!

(६) हल्ली माणसाचा स्वतःपेक्षा अशा यंत्रांवरच विश्वास जास्त वाढलेला दिसतोय. म्हणून तर आता निवडणूकांत ईव्हीएम मशिनचा वापर अगदी डोळे झाकून केला जातो. आता तर ते अॉनलाईन शिक्षण, अॉनलाईन व्यवहार पुढे आलेत. माणूस आता हळूहळू यंत्रवत होऊ लागलाय. माणसाची नैसर्गिक बुद्धी हळूहळू यंत्राच्या कृत्रिम बुद्धीकडे गहाण पडू लागलीय.

(७) मी तर आता वयानुसार किंवा कदाचित त्या कोरोनामुळे सुद्धा मरण्याची शक्यता आहेच. पण मरताना या गोष्टी बघवत नाहीत की, लोक कोरोना झालेल्या माणसांना वाळीत टाकतात. इतकेच काय पण कोरोनामुळे एखादी व्यक्ती मृत्यूमुखी पडली तर त्या व्यक्तीचे फार जवळचे नातेवाईक सुध्दा त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मग त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार परस्पर सरकारी कर्मचाऱ्यांकडून किंवा स्वयंसेवी संस्थांकडून केला जातो. असे मृतदेह बेवारस होतात, पण अशा व्यक्तीने मागे ठेवलेल्या संपत्तीवरील वारसा हक्क मात्र ही नातेवाईक मंडळी सोडत नाहीत. कोरोनामुळे मृत झालेल्या व ज्याचा मृतदेह बेवारस ठरवला जातो अशा माणसाची संपत्ती सरकारजमा करायला मात्र ही नातेवाईक मंडळी तयार होत नाहीत. तो वारसा हक्क त्यांना हवाच असतो. खरंच, या कोरोनाने जगाची खरी रीत व सत्य परिस्थिती दाखवून दिली. माणसाला निसर्ग या काय गोष्टी दाखवून राहिलाय व का याचेच माझ्या बुद्धीला आश्चर्य वाटतेय!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.७.२०२०


रविवार, १९ जुलै, २०२०

बुद्धीला प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते!

बुद्धीला प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते!

(१) बुद्धीला प्रश्न पडतात तेंव्हा ती त्या प्रश्नांचा मागोवा घेत त्यांची उत्तरे शोधते व अशी उत्तरे शोधत आयुष्याचे धडे शिकत जाते. आपली ज्ञानेंद्रिये आपल्या मेंदूतील बुद्धीला माहिती पुरवतात तर आपल्याला होणाऱ्या वासना, भावना यांच्या जाणिवा याही आपल्या बुद्धीला माहिती पुरवतात. माहिती हे बुद्धीचे खाद्य असते. हे खाद्य मिळाले नाही तर बुद्धी उपाशी राहून मरेल. हे खाद्य बुद्धीचे कच्चे अन्न असते.  ते खाण्यास म्हणजे ज्ञान या अर्थाने वापरण्यास योग्य होण्यासाठी बुद्धी त्यावर प्रक्रिया करते. प्रश्न सुरू करून बुद्धी त्या प्रक्रियेचे इंजिन सुरू करते. बुद्धीला प्रश्न पडणे हेच बुद्धीच्या जिवंत पणाचे लक्षण असते. बुद्धीला जर प्रश्न पडले नाहीत तर ती गंजते. शालेय शिक्षण हे मूलभूत प्रश्नोत्तरांचे शिक्षण असते तर कॉलेज शिक्षण हे गंभीर प्रश्नोत्तरांचे शिक्षण असते. निसर्ग हीच मोठी शाळा व हेच मोठे कॉलेज आहे. म्हणून औपचारिक शाळा, कॉलेजात न शिकणारी माणसेही निसर्गाच्या शाळा, कॉलेजात सतत अनौपचारिक शिक्षण घेत असतात.

(२) मी कमला मिल या कापड गिरणीच्या खर्च (कॉस्टिंग) खात्यात कारकून म्हणून कामाला लागलो तेंव्हा मी कॉमर्स शाखेचा पदवीधर (बी.कॉम.) होतो. परंतु कापसावर होणारी प्रक्रिया, तो प्रक्रिया खर्च काय असतो याची बिलकुल माहिती नव्हती. म्हणजे बी.कॉम. पदवीतून मिळालेले माझे ज्ञान जुजबी होते. मग हळूहळू कॉस्टिंग खात्याच्या वरिष्ठांची बोलणी खात कापूस खरेदी खर्च, कापसापासून धागा बनविण्याचा खर्च, धाग्यापासून कापसाचे तागे बनविण्याचा खर्च, मग त्या ताग्यांची धुलाई, रंगरंगोटी, डिझाईन वगैरे करण्याचा खर्च, या संपूर्ण प्रक्रियेत घाम गाळणाऱ्या कामगारांचा पगार, मग या सगळ्या खर्चांची गोळाबेरीज करून त्यावर केंद्रीय कर म्हणजे उत्पादन शुल्क (एक्साईज)अधिक केल्यावर येणाऱ्या एकूण कापड खर्चात कापड गिरणी मालकाचा नफा अधिक करायचा व मग कापडाची विक्री किंमत काढायची. या विक्री किंमतीवर मग पुढे कापड दूकानदार विक्री कर लावून ग्राहकाला कापड विकायचे. अशी ती लांबलचक प्रक्रिया होती. तिचे ज्ञान त्या कॉस्टिंग खात्यात कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यावरच मला प्राप्त झाले. बी.कॉम. पदवी नसलेले काही वरिष्ठ लोक त्या खात्यात माझे बॉस होते कारण त्यांना त्या  कामाचे प्रॕक्टिकल ज्ञान होते.

(३) नंतर मी बऱ्याच कंपन्यांत नोकऱ्या केल्या. तिथे विविध प्रकारचे ज्ञान मिळविले. मग कंपनी  सेक्रेटरी (इंटर) पूर्ण करून कंपनी सेक्रेटरीला मदतनीस म्हणून सेक्रेटरीयल प्रॕक्टिसचेही थोडे काम केले. मग पुढे एलएल.बी. करून वकिली करीत जगाचेही भरपूर ज्ञान मिळविले. परंतु माझ्या बुद्धीने मिळविलेले हे ज्ञान खूपच अपुरे आहे. म्हणून तिला सतत प्रश्न पडतात मग ते प्रश्न विज्ञानाचे असोत, धर्माचे असोत, निसर्गाचे असोत, देवाचे असोत, अर्थकारणाचे असोत, राजकारणाचे असोत, कलेचे असोत की क्रिकेट  सारख्या खेळांचे असोत. माझ्या बुद्धीवर या सर्व प्रश्नांचा सतत भडिमार चालू असतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न माझी बुद्धी सतत करीत असते.

(४) खरं तर, सगळ्यांनाच असे प्रश्न पडले पाहिजेत. तुम्ही ते विचारले पाहिजेत. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणारा एकच गुरू सापडू शकत नाही. कारण निसर्गाच्या सर्व शाखांचे पूर्ण ज्ञान असणारा गुरू या जगात असूच शकत नाही. म्हणून मी कोणालाही गुरू करून घेतला नाही. बाकी आयुष्यात बरेच गुरू भेटले ज्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या. पण माझा खरा गुरू एकच आणि तो म्हणजे निसर्ग. त्या निसर्गात देव आहे असे मानून मी त्या देवालाच उलट प्रश्न करतो. आता देवाला मी असे उलट प्रश्न केल्यावर काहीजण उगाच भावनिक का होतात हेच मला कळत नाही. आपण ज्याच्या वर प्रेम करतो, ज्याच्या वर विश्वास टाकतो त्यालाच प्रश्न करणार नाही तर मग कोणाला करणार? लहान मुले आईवडिलांनाच प्रथम प्रश्न विचारणार ना! मग मी वयाने कितीही मोठा झालो, जगातील काही जुजबी ज्ञान मिळवले तरी निसर्गापुढे म्हणा किंवा निसर्गातील देवापुढे म्हणा मी लहान मूलच ना!

(५) तुम्हीच निवडून दिलेल्या तुमच्या सत्ताधारी लोकांना उलट प्रश्न केले नाहीत तर ते तुम्हाला गृहीत धरतील, तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तुमच्या बोडक्यावर बसतील. म्हणून त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. कारण आपण त्यांना आपले मायबाप समजतो. त्यांनीही मुले असे प्रश्न का करतात म्हणून रागावू नये. पण काही मुले खोडकर असतात. ती उगीच चेष्टा करायची म्हणून काहीतरी प्रश्न कुत्सितपणे विचारत राहतात. हे असले उद्योग खरेच चुकीचे आहेत. काही माणसे उगाच वाद घालायचा म्हणून केवळ वादासाठी वाद घालतात. हे तर अतिशय निंदनीय आहे.

(६) साधारण साठी ओलांडली की माणसाचा मृत्यूकडे प्रवास सुरू होतो. माझे वय सद्या ६४ चालू आहे. म्हणजे या प्रवासात मी पुढे येऊन पोहोचलोय. पण माझ्या बुद्धीला सतत प्रश्न पडतच राहतात. समाजमाध्यमांवर माझ्या  लेखांतून, छोट्या छोट्या विचार वाक्यांतून मी या प्रश्नांना उघड करतो. माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो. पण बरेच प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतात. म्हणून माणूस हा मरताना ज्ञानाच्या बाबतीत अतृप्त राहूनच मरतो. मानवी बुद्धी ही जिज्ञासू असते म्हणून ती सतत प्रश्न करते. तिला प्रश्न विचारू द्या! तुम्ही जर तिला प्रश्न विचारताना अडवले, रोखले तर ती गंजून जाईल!

-ॲड.बी.एस.मोरे©२०.७.२०२०

शनिवार, १८ जुलै, २०२०

लज्जा!

देवाला पण लाज वाटत असेल का?

लज्जेची भावना ही माणसातच आहे. जनावरे न लाजता त्यांची नैसर्गिक क्रियाकर्मे बिनधास्त उरकतात. पण माणूस मात्र काही नैसर्गिक गोष्टी करायलाही लाजतो. हो, पण म्हणून तर तो माणूस आहे ना! नाहीतर जनावरांत व माणसांत काही फरकच राहिला नसता. आता ही लज्जेची भावना देवाने माणसात घातली म्हणावी तर पुन्हा प्रश्न निर्माण होतो की ही लज्जेची भावना देवाने माणसात पूर्णपणे का नाही घातली? ती भावना अर्धवट घातल्यामुळे  काही माणसे निर्लज्जपणे वागतात. कधीकधी ही निर्लज्ज माणसे त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस करतात. माणसांचा हा निर्लज्जपणा तो देवही खुशालपणे बघत रहातो हे मात्र विचित्र वाटते. मग हा निर्लज्जपणा एका बाजूने म्हणजे नुसत्या माणसाच्या बाजूने नसून तो दुसऱ्या बाजूने म्हणजे देवाच्या बाजूनेही आहे हे उघड होते. देवाला जर अशा गोष्टींची लाज वाटली असती तर त्याने त्यांचा बंदोबस्त केला असता ना! माणूस अर्धा लाजरा, अर्धा निर्लज्ज आहे तर मग माणसाला असा अर्ध्या अक्कलेचा बनवणारा तो देवही तसाच आहे काय? खरंच माणसाला असा अर्धा लाजरा बनवला याची देवाला लाज वाटत असेल काय?

-ॲड.बी.एस.मोरे© १९.७.२०२०

मै हूं ना!

माझ्या हातात सर्वोच्च सत्ता आली आणि मी कोरोनाला पळवून लावले!

काल असेच एक भारी स्वप्न मला पडले. माझ्या हातात अचानक सर्वोच्च सत्ता आली. मग मी जनतेला रेडिओ व टी.व्ही. वरून एक भाषण ठोकले. ते भाषण एकंदरीत असे होते.

"प्रिय नागरिक बंधू, भगिनींनो! अगोदर तुम्ही हे लक्षात घ्या की कोरोना विषाणूवर औषध नाही. पण हा विषाणू घशाला व फुफ्फुसाला किती त्रास देतो, तो कोणत्या माणसावर हिंसक हल्ला करून ठार मारतो व कोणत्या माणसाला फक्त अस्वलासारख्या गुदगुल्या करून सोडून देतो याची मी गोड बोलून चीनकडूनच माहिती काढून घेतली आहे. पण चीनवर माझा विश्वास नसल्याने त्याला क्रॉस चेक करण्यासाठी मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षाला तरी कोरोनाचे ज्ञान आहे का याची चाचपणी करून घेतली आहे. पण ही चौकशी करीत असताना मनातून दोघांनाही शिव्या हासडून शेवटी मी आपल्याच संशोधकांशी व मोठ्या डॉक्टरांशी चर्चा करून मूलभूत माहिती काढली आहे. हे सर्व काम मी दोन दिवसांत उरकले. मग मी तिसऱ्या दिवशी परदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांना भारतात येऊच दिले नाही. त्यांचा विमानतळांवरच मस्त बंदोबस्त केला. खाणे पिणे, वैद्यकीय सुविधा सगळ्या गोष्टी त्यांना विमानतळांवरच व तसेच त्यांच्या आजूबाजूच्या असलेल्या थ्री स्टार, फोर स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलात केल्या आहेत. पण परिस्थिती थोडी  गंभीर असल्याने तुम्ही यापुढे फक्त आठ दिवस लॉकडाऊन मध्ये रहायचे आहे. तुम्ही आता मास्क व शारीरिक अंतर ठेऊन काम करण्याची संस्कृती आत्मसात करायला हवी. जी माणसे वृद्ध आहेत, न्यूमोनिया वगैरे होऊन गेलेल्या आजारांनी ज्यांची फुफ्फुसे कमकुवत झाली आहेत, ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह सारखे आजार आहेत त्यांना कोरोना विषाणू ठार मारू शकतो. अशा लोकांनी मात्र आठ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यावरही घराबाहेर पडायचे नाही. बाकी ठणठणीत असलेल्या माणसांनी बिनधास्त मास्क लावून बाहेर पडायचे. पण शारीरिक अंतराचा नियम मोडायचा नाही. तसे केल्यास पोलीस त्यांना अटक करून सरळ जेलमध्येच रवानगी करतील. राखीव ठेवलेल्या काही विषाणूरोधक इंजेक्शन्सचा उपयोग फक्त १० ते २०% गंभीर  रूग्णांवरच केला जाणार आहे. गंभीर रूग्ण कोण तर जुनाट आजारांनी अगोदरच प्रतिकार शक्ती कमकुवत झालेले रूग्ण ज्यांचे मूळचे आजार शरीरात कोरोना विषाणू घुसला की बळावतात. बाकीच्या ठणठणीत माणसांच्या शरीरात चुकून किंवा  निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणू घुसलाच तर त्यांच्या मजबूत प्रतिकार शक्तीला, सशक्त मनोबलाला मदत म्हणून फ्लू वर असलेली औषधे देऊन त्यांनी घरी राहूनच बरे व्हायचे आहे. खाजगी रूग्णालयात जाऊन त्यांचा धंदा वाढवायचा नाही. सर्व सरकारी रूग्णालयांत, प्राथमिक आरोग्य केंद्रात फ्लूच्या गोळ्यांची, प्रतिकार शक्ती आणखी वाढवून शरीरातून कोरोना विषाणूची क्रियाशीलता संपवणाऱ्या  टॉनिक्सच्या गोळ्यांची व्यवस्था केलेली आहे. तेंव्हा या कोरोनाला बिलकुल घाबरायचे नाही. आठ दिवसांनी लॉकडाऊन उठला की मास्क लावून शारीरिक अंतर नियमाचे पालन करीत व अधूनमधून हातावर सॕनिटायझर शिंपडत तुम्ही  बिनधास्त कामाला जायचे आहे. उद्योगधंदे फक्त पहिले आठ दिवसच बंद राहतील. नंतर ते चालू होतील. हे सर्व नियमबद्ध कामकाज चालू असताना या विषाणूवर लस शोधण्याचे प्रयोग चालूच राहतील. पण लस कधी येईल याचा भरवसा देता येत नसल्याने उगाच ती गोष्ट डोक्यात घेऊन फिरू नका. कोरोना शरीरात घुसू नये म्हणून काळजी घ्यायची आहे. पण चुकून घुसलाच तर त्याची गच्छंती साध्या फ्लूच्या गोळ्यांनीही होते. पण हे फक्त ८०% ठणठणीत लोकांच्या बाबतीत होऊ शकते. बाकी २०% कमकुवत लोकांना धोका आहेच. त्यांनी जास्त काळजी घ्यायची आहे. पण त्यांच्यासाठीही ती विषाणूरोधक इंजेक्शन्स तयार ठेवलेली आहेतच व सोबत अॉक्सिजन, वेन्टिलिएटर्सची सोय आहे आणि ती सुध्दा सरकारी रूग्णालयांत! या २०% लोकांना या सरकारी रूग्णालयांत सहज प्रवेश मिळेल. बाकी ८०% ठणठणीत लोकांना रूग्णालयात अॕडमिट व्हायची गरजच भासणार नाही. आठ दिवस दम काढा. या आठ दिवसांत विमान तळावर असलेल्या भारतीयांनी व तुम्हीही मास्क वगैरे नियम पाळून संचार करायचा आहे. नोकरी, धंदा, व्यवसाय करायचे आहेत. बाकी काय मी आहेच ना (मै हूं ना)"! 

असे हे लय भारी स्वप्न मला पडले. यातले खरे काय, खोटे काय हे मला माहित नाही. पण मला हे असे स्वप्न पडले हे मात्र खरे आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१८.७.२०२०

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

Reality is different in advocacy!

REALITY IS DIFFERENT IN ADVOCACY!

(1) In a society where the major population is poor and uneducated, advocacy has a little role to play as earning profession at least for the person coming from poor & uneducated family. Yes, it is true that Dr. B.R. Ambedkar became law in his own by becoming an architect of Indian constitution inspite of being born in socially backward class family & suffering all kinds of hardship, but it is also true that he did not make his advocacy as profession of his own  livelihood. He fought throughout his life by all legal means for upliftment of lower class without bothering about his own income and safety. He thus made advocacy a truly noble profession.

(2) But today there are thousands of advocates (of which I am one) coming from poor and uneducated families who dare to enter into legal profession with attraction of dignity and high income earned by few top advocates from legal profession. It is dangerous for persons coming from poor and uneducated families to make this profession as means of earning livelihood. I can tell this by my own experience (which some advocates may criticise) that it is very very difficult to survive in this profession at least in India if you are making your poor family totally dependent on the income to be earned from legal profession. This is because the reality is different in advocacy in a country like India having large number of population poor and uneducated.

(3) There are two basic points to be seriously noted in this connection.  First point is that advocacy has not become an essential service in a country like India like marketing of essential commodities such life essential food, medical and police service. The poor and uneducated people in India are less aware even about their basic human rights and they are habitual to digest injustice. They prefer settling their disputes with the help of local agents who act as settlers. These settlers are not qualified lawyers, but they are  trained in settling disputes by using some pressure of local panchayats or politicians out of court and get such settlements documented by executing small affidavits before local notaries or small agreements registered with local registrars of documents. The poor people avoid going to courts because of inability to pay high advocates fees and long delay in judicial process. This fact has proved that advocacy is not an essential service on which people should remain dependent on mass scale. It is needed by few rich businessmen and the few powerful politicians who engage services of top lawyers of country by paying their very high fee.

(4) If advocacy does not make itself  essential service, then does it make it as entertainment service? That is not at all possible because the law is a serious subject & not a subject matter of entertainment. The poor people will buy tickets and will go to watch movies in cinema halls instead of going to advocates. The law and its legal maxims, principles  do not attract poor & uneducated mass. The term justice is not the same for rich class and poor mass. It is very very different for these two categories. As aforesaid, rich hire top advocates and poor engage local settlers. So where will many advocates coming from poor and uneducated families go? They just struggle for their basic survival. Even the workers having full time jobs can be said to be in a better position and more secured than these poor advocates.

(5) The foundation of this article is based on two main points which are essential for learning by such poor advocates viz. advocacy is not an essential service in the countries like India and advocacy is not at all entertainment art anywhere in the world. I had decided in last week to remain away from social media till the present corona lockdown gets lifted completely making people free to attend their regular jobs with masks & social distancing code but I could not sleep yesterday with a serious thought that I have made a wrong choice of making advocacy as means of earning my livelihood  without proper study in advance. But how could a textile mill worker's son i.e. me make such study well in advance is also a big question. The purpose of this article based on my personal experience is not to lower the dignity of noble profession of advocacy and not to discourage newcomers who are enthusiastic about entering into this profession, but to caution those coming from poor & uneducated families with the fact that reality is different in advocacy so that those who want to come in this noble and dignified profession can come well prepared. Thank you!

-Adv.B.S.More©18.7.2020

मर्यादित संपर्क!

मोठी माणसे, मोठा संपर्क!

जोपर्यंत लोक तुमच्या उच्च श्रेणीच्या ज्ञानाला, संशोधनाला व अभिव्यक्तीला पैसा व सन्मान या रूपात उच्च किंमत देत नाहीत तोपर्यंत लोकांशी उगाच संपर्क वाढविण्यात अर्थ नाही. जगात अशी बरीच उदाहरणे आहेत की ज्यात छोट्या गोष्टी करून माणसे मोठी झाली आहेत व होत असतात. खरं तर, जगातील हे फार मोठे आश्चर्यच आहे व अशा आश्चर्याबरोबर जगायला प्रामाणिक माणसांनी शिकायला हवे. जर पैसा व सन्मान छोटा तर मग संपर्क का मोठा? असा मोठा संपर्क मोठ्या लोकांनाच करू द्या! जगाने जर तुम्हाला मर्यादित ठेवायचाच विडा उचलला असेल तर अशा जगाशी संपर्क मर्यादित ठेवणे हेच योग्य होय! इतकेच नव्हे तर तुम्ही जर देवावर श्रध्दा ठेवणारे आस्तिक असाल व त्या देवाच्या व्यवस्थेत जर तुम्हाला योग्य न्याय मिळत नसेल तर त्या देवाशीही संपर्क मर्यादित ठेवणेच योग्य होय!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.७.२०२०

GOD RESTING!

GOD RESTS WITHIN NATURE AND ITS SYSTEM!

The Nature is giant material mass having its energy and system that governs such mass and energy. We human beings are only small part of such mass and energy. How did such Nature having mass, energy &  system came into existence is a big question that goes on challenging  human mind. This question created two classes of human beings within  society viz. theists who believe in existence of God and atheists who do not believe in existence of God. The theists believe that God created  Nature containing material mass, energy and system. How could the Nature come into existence without  its creator is a logical question that supports the belief of theists. The atheists do not have such question. They see Nature only as Nature  without God within it. But what truly  attracts me is the system of Nature governing total material mass and total energy within Nature. One can observe that the system of Nature is such that it has its own force (most powerful energy) of law that is independent and which strongly supports the said system. The system of Nature backed by said independent force of law appears to be perfect in its own way. This is because it has its own automatic check and balance mechanism. The solar system having sun at the centre and other planets including earth revolving around sun has perfect system of its own. Even the ecological system that is evolved on earth has perfection of its own. For example, air motion, water cycle, food chain, life cycle etc. which are parts of such ecological system evolved on earth move in order means in disciplined way in terms of law i.e.system of Nature. The food, whether vegetarian or non-vegetarian, that man eats gives him proteins and vitamins which  support the human body's life preservation and life protection (immune) system. The immune system creates antibodies to fight against foreign enemies such as germs and viruses who dare to destroy economic and political system of body. Both economic and political systems of human body support and check and balance each other. Even the social system developed by human society is founded on the  basic system of Nature. The social system also has two branches viz. economics and politics. They are inter connected and they support and check and balance each other. The industrial and business (economic) masters and political masters work together and support and check and balance each other. The social government is an artificial political authority created by human society for the purpose of encouraging its own economic activism and also for exercising political cotrol over such activism. The democratic social government contains the people elected representatives and people selected government servants for civil and criminal law execution  along with an independent judiciary. The elected representatives and selected servants support and also check and balance each other. They are again checked and balanced by an independent judiciary. All this goes on so systematically that one can see it as the wonder of Nature. Some lapses, injustices do take place within system, but they are checked & balanced automatically by system itself. If the system of Nature is working automatically, then what is the role of God within Nature and such system? I feel that God is just resting within Nature & its system and he comes live with his special action within system of Nature through his messengers or incarnations only in the event of some serious failure or breakdown within system of Nature. In my view,  system of Nature itself is religion (dharma) of God within Nature. This religion is a wonderful experience of Nature for which I always salute God resting within Nature and its system!

-Adv.B.S.More©17.7.2020

गुरुवार, १६ जुलै, २०२०

ONLINE MIND, OFFLINE BODY!

ONLINE MIND, OFFLINE BODY?

(1) The physical economy appears to have been lowered in grade by digital economy by shifting from physical movement of things to online movement of things. This is like soft mind taking over hard body by moving high in the sky by saying good bye to hard body with no plan of returning to earth. It is death of not only body on earth but also the death of mind in sky because mind cannot be separated from body.

(2) The online companies insisting on online business are flourishing and traditional companies running business by physical movement of things from physical stock of things stored at some place of storage are crying for their survival. How long it can go on? It is nothing but illusion because it is universal truth that no soft mind can exist without hard body.

(3) The present covid-19 epidemic has forced people to stay at home and work online. But what can be actually moved online? Can you move physical goods or physical services online? The people cannot be kept in dark room by digital or online masters.

(4) What is corona? It is virus with its physical existence. The physics of corona has restricted physical  movement of people. The corona physics attacking human physics just to stop human physics from moving and for what? what is the result? The online companies are flourishing over world! This change is surprising. It does not seem to be natural. Oh, it is really wonderful to see this world having online mind, offline body!

-Adv.B.S.More©17.7.2020

माहितीचा फवारा!

माहितीचा फवारा उडवत पृथ्वी गरगर फिरली आणि पृथ्वीवरील माणसांची डोकी फिरली! -ॲड.बी.एस.मोरे

Knowledge without developing skill or theory without practice is like knowing science without applying technology or simply learning without earning! -Adv.B.S.More

Digital technology can transfer knowledge or money online, but online transfer of technical skill in knowledge or commercial skill in earning money difficult! -Adv.B.S.More

चिंध्या चिवडणारा माणूस!

चिंध्या चिवडणारा माणूस!

(१) माणूस बुद्धीमान आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने विश्वात विखुरलेल्या अनेक गोष्टींना चिवडत व त्या गोष्टींतील विविधता चोखत बसतो. विज्ञान, धर्म, तत्वज्ञान हे झाले मूलभूत चिवडणे आणि मग त्यावर आधारित तंत्रज्ञान, कला, क्रीडा,अर्थकारण, राजकारण व कायदा हे झाले चोखणे. या बौद्धिक उचापती करीत असताना माणूस शारीरिक धावपळही करीत असतो. या सर्व चिवडाचिवडीतून तो काय मिळवतो तर मिळकत म्हणजे स्थावर व जंगम मालमत्ता. मी माझ्या बुद्धीने आयुष्यभर अशाच चिंध्या चिवडत बसलो आणि शेवटी मिळकत काय मिळविली तर मुंबईपासून लांब असलेल्या डोंबिवलीत ५५० चौ. फूटाची एक वन बीएचके सदनिका आणि तीही एका जुन्या इमारतीत.

(२) माणसाची मिळकत स्थावर असो की जंगम त्या मिळकतीवरील माणसाची मालकी कोण ठरवणार तर माणसांनीच बनवलेले सरकार! बरं, मिळकत म्हणजे नुसती स्थावर व जंगम मालमत्ताच नसते तर त्यात माणसाचे शरीर व त्याचे मनही येते. माणसाच्या शरीरावर होणारे अत्याचार व बलात्कार व मनाचा होणारा छळ या गोष्टींपासून सुरक्षितता कोण देणार तर तेच सरकार जे माणसांनीच बनवलेले असते.

(३) निसर्गातील देव माणसाचे संरक्षण करतो की माणसाला जगण्याची प्रेरणा व लढण्याची शक्ती देऊन माणसालाच लढत जग म्हणतो? यासाठीच तर माणसांनी माणसांसाठी स्वतःचे स्वतंत्र सरकार बनवलेय ना! निसर्गातील देव दिसत नाही म्हणून मग हे आपलेच दिसणारे सरकार असाच काहीसा प्रकार! पण हे सरकार व या सरकारचे कायदे असतानाही माणसाची नैसर्गिक साधनसंपत्तीवरील मालकी व त्याचे शरीर व मन सुरक्षित आहे का? तसे असते तर मालमत्तेच्या सीमावादावरून खून पडले नसते, शरीरावर अत्याचार, बलात्कार झाले नसते व मानवी मनाचा छळ झाला नसता. या गोष्टी तर चालूच आहेत.

(४) कारण या सरकारमध्ये शेवटी कोण आहेत तर माणसेच जी त्यांचा मूळ स्वार्थ, ढोंगीपणा, बावळटपणा, हिंसकपणा सोडत नाहीत. या मूळ मानवी स्वभावामुळे माणसांचे सरकार हे आतून पोखरलेले व अंतर्गत विश्वास, ताळमेळ नसलेले असते. ते माणसांना देऊन देऊन किती संरक्षण देणार? या सरकारने कितीही चांगले कायदे केले तरी सरकारमध्ये ताळमेळ नसेल तर या कायद्यांचा माणसांवर  वचक, धाक रहात नाही.

(५) निसर्गाचे विज्ञान त्यातील विविध पदार्थ व मूलभूत व्यवस्थेसह माणसाला नीट कळलेय का? तसे असते तर मग या विज्ञानाच्या बरोबर धर्म व तत्वज्ञान या गोष्टींची माणसाला गरज का भासते? त्यात तरी एकवाक्यता आहे का? तशी असती तर समाजात धार्मिक व तात्त्विक वादच निर्माण झाले नसते. खरं तर, निसर्गात असते वेगळेच आणि माणसे माणसांना दाखवतात भलतेच! असे भलतेच दाखवून अशा खोट्या गोष्टींवर समाजात निरर्थक चर्चा, वादविवाद व हाणामाऱ्या घडवून आणण्यात काही लोकांचा दुष्ट हेतू असतो. अशी दुष्ट माणसे सरकार मध्ये असतील तर मग सरकार नावाच्या व्यवस्थेला कीड लागली म्हणूनच समजा!

(६) मला एवढेच म्हणायचे आहे की, खरंच निसर्गातील नैसर्गिक गोष्टी एवढ्या अवघड, गुंतागुंतीच्या आहेत का? की त्या माणसानेच त्याच्या स्वार्थापोटी खूप अवघड, गुंतागुंतीच्या करून टाकल्यात? माणसाला सरळसाधे, सोपे जीवन जगता येत नाही का? विज्ञान, धर्म, तत्वज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, अर्थकारण, राजकारण व कायदा या गोष्टी चिवडून नव्हे तर त्यांचा अक्षरशः बौद्धिक कीस पाडून शेवटी मी काय मिळवले तर ५५० चौ. फूटाची एक जुनी वन बीएचके सदनिका! यासाठीच का मी केला एवढा मोठा अट्टाहास?

(७) माझे सोडा, पण शेवटी ज्यांनी भरपूर पैसा, संपत्ती, सत्ता या गोष्टी मिळविल्यात त्यांच्या हातात तरी शेवटी काय राहणार आहे? या सर्व गोष्टींच्या मागे आयुष्यभर धावताना सरळसाधे जीवन जगण्यात जो आनंद आहे, जी शांती आहे ती त्यांनी गमावलीय का? भरपूर बौद्धिक कसरत करून मी मिळवलेले भरपूर ज्ञान काय किंवा सत्ता, संपत्तीच्या मागे धावून भरमसाट प्रमाणात मिळवलेल्या या गोष्टी काय, शेवटी या सर्व चिंध्याच! पण माणसाला चिंध्या चिवडत शेवटी हातात गाळ घेऊन मरण्यातच जर आनंद वाटत असेल तर त्याला तो महान निसर्ग तरी काय करणार!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.७.२०२०


बुधवार, १५ जुलै, २०२०

YOUR LIFE IS YOUR OWN!

YOUR LIFE IS YOUR OWN, DO NOT SPOIL IT BY ITS COMPARISON WITH OTHERS!

You cannot mould other things as per your desire and thinking. Let them remain as they are because they are not you! Each one is unique  in its own way as you are unique in your own way. You may see misery of poor people and luxury of rich people around you. But if you are incapable of removing misery of poor people or incapable of earning luxury of rich people, just accept that fact. This is because as your incapacity has its own story, poor suffering from misery and the rich enjoying from luxury have their own stories. You cannot change their stories with your limited strength. You may at the most improve upon your own story by consistent study and smart work. Your improvement of self will be your own and nobody can claim right over that because your life is your own. Similarly, the others lives are their own and you have no right to intermeddle with theirs unless you hold authority in law for lawful entry into their lives. You must be able to enjoy your own life with whatever it has. Take the example, if you have long chronic habit of remaining awake whole night while world sleeps, do not blame yourself just because you cannot sleep during night as world sleeps. Just accept the fact that your habit is nothing but your night shift working because you can think and write well in peace when world sleeps. You have seen Mumbai's textile mill workers 24 hours three shift working day and night. Just think that you have been given night shift by textile mill because of your peculiar habit. The misconception about the term success must be left. If you think that world has not given higher value or worth to your hard earned knowledge and talent, you must also see to people who are more learned and more talented than you but serving lower category jobs. Such eye opening comparison is helpful. You cannot see your own success because you are wrongly comparing your success with the success of others. Just look at the movement of celebrities as your entertainment without trying to step into their shoes because your life is your own! Please do not spoil it by its comparison with others!

-Adv.B.S.More©16.7.2020

HOPE MY DREAM COME TRUE!

GETTING BORED BY PASSING TIME  WITHOUT WORTH BUT I STILL HOPE MY DREAM COME TRUE!

Lockdown or unlock makes no difference to me as I know even after unlock and Mumbai's local trains restart running what I am going to do is using of just one to two percent of my knowledge and expertise and earning of meagre income from that small work which I am forced to earn for keeping my small family survived. It is a tragedy that after having top knowledge of world, I am at the bottom line of the world struggling just for survival at the age of 64 years! So no fear for corona death and no enthusiasm for unlock at least for me. If world does not bother about my valuable knowledge, why should I bother about world and start free teaching class for world making my valuable knowledge further cheap? I am getting bored by passing time without worth but I still hope my dream come true!

-Adv.B.S.More©16.7.2020