https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

वकिली व्यवसायातील मक्तेदारी?

वकिली व्यवसायात ठराविक वकिलांचीच मक्तेदारी निर्माण झालीय काय?

मान्य आहे की वकिली, डॉक्टरकी हे विशिष्ट शैक्षणिक पात्रतेवर आधारित असे फार उदात्त व्यवसाय आहेत. फायदा समोर ठेऊन चालणारे ते उद्योगधंदे नव्हेत. पण मग या व्यवसायांचेही स्वतंत्र प्रश्न आहेत. वकिली व्यवसायाचे योग्य नियमन करण्यासाठी प्रत्येक राज्यासाठी राज्य बार कौन्सिल व राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय बार कौन्सिल आहे. पण या व्यवसायाचे नियमन करणे म्हणजे व्यावसायिक निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून वकिलांवर शिस्तभंग कारवाई करणे फक्त एवढेच बार कौन्सिलचे काम नव्हे. वकिलांचे कल्याण व त्यांची सुरक्षा हे सुद्धा बार कौन्सिलचे उद्देश आहेत. काही वकिलांची वकिली तूफान चालते, ते फी कमाई चांगली करतात. म्हणजे फक्त तेच कायद्यात हुशार असतात काय? १०% वकिलांची भरपूर फी कमाई एकीकडे व ९०% वकिलांची अत्यंत  क्षुल्लक फी कमाई दुसरीकडे हा काय प्रकार आहे? वकिली व्यवसायात ही मक्तेदारी का व कशी निर्माण झाली? क्षुल्लक फी कमाई वर जगणारे ९०% वकील या कोरोना लॉकडाऊन काळात उपाशी मरत नसतील काय? अशावेळी बार कौन्सिलचे त्यांच्याविषयीचे कर्तव्य काय? या सर्व गोष्टींचा विचार आता झालाच पाहिजे. या ९०% वकिलांची परिस्थिती या कोरोना लॉकडाऊन काळात खूपच हलाखीची झाली आहे याकडे सरकार व बार कौन्सिलने दुर्लक्ष करून कसे चालेल? कारण फक्त १०% मोठे नामांकित वकील हेच न्यायव्यवस्थेचा भाग नाहीत तर त्यांच्याबरोबर क्षुल्लक फी कमाई करणारे इतर ९०% वकीलही या व्यवस्थेचा भाग आहेत.

-ॲड.बी.एस.मोरे©८.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा