https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

परप्रांतीय मजूर व मराठी माणूस!

कोरोनामुळे महाराष्ट्रात मराठी माणूस आणखी बेकार होतोय का?

कोरोनाला घाबरून परप्रांतीय कामगारांनी मुंबई  सोडली, महाराष्ट्र सोडला तेंव्हा किती ओरड केली काही लोकांनी! परप्रांतीय कामगारांची कामगार कायद्याप्रमाणे स्थलांतरीत कामगार म्हणून कामगार आयुक्तांकडे नोंदणी होतेय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाला घाबरून आपआपल्या राज्यांत परत जाणारे परप्रांतीय जर महाराष्ट्रात रितसर नोंदले असतील तर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी कायद्याने आडकाठी नाही. पण ज्यांची महाराष्ट्रात अशी नोंदच नाही त्यांचे पुन्हा कायदेशीर नोंदणी न करताच स्वागत करणे चालू असेल तर ते फार चुकीचे आहे. मागे मा. राजसाहेब ठाकरे हे या मुद्यावर बोलले आहेत. मला तर यामागे वेगळेच अर्थकारण असल्याचे दिसून येते. इथे मराठी माणसांना डावलून या परप्रांतीयांचे कोरोना लॉकडाऊन काळातच स्वागत होताना दिसत आहे कारण हे मजूर स्वस्तात राबतात. ते स्वस्तात मिळतात कारण त्यांच्या राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्याप्रमाणे उद्योगधंद्याचा विकास झाला नाही. म्हणून तिकडे खूप बेकारी आहे. ते मजूर स्वस्तात काम करतात म्हणून इथल्या व्यापारी, उद्योगपतींना हे परप्रांतीय मजूर फायदेशीर वाटतात. पिळवणूकीवर आधारित असलेल्या या आर्थिक फायद्यासाठी या परप्रांतीयांचे पुन्हा स्वागत करून मराठी माणूस या महाराष्ट्रात बेकार केला जातोय का? परप्रांतीय मजूर पुरवठा करणारे ठेकेदार या परप्रांतीय मजूरांकडून मधल्या मध्ये त्यांच्या स्वस्त पगारातूनही कमिशन खात या परप्रांतीय मजूरांची आणखी पिळवणूक करीत नसतील कशावरून? शिवाय महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणजे महाराष्ट्राचा भूमीपुत्र या मराठी मातीतच या परप्रांतीय मजूरांच्या स्वागतामुळे बेकार होतोय त्याचे काय करायचे?

-ॲड.बी.एस.मोरे©७.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा