https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मानवता व कायदा!

मानवतेचे कायदे अधांतरी व न्याय असमान!

मानवी मनातील सदसद्विवेकबुद्धी हाच खरं तर मानवतेचा मुख्य आधार! सदसद्विवेकबुद्धीचा हा आधार घेऊन पुढे सरकलेल्या मानवतेला समाजमान्यता मिळणे म्हणजे मानवतेचे समाज कायद्यांत रूपांतर होणे. पण राज्यघटनेसह असे समाज कायदे लोकशाही संसदेत संमत झाले की लगेच समाजात मानवता प्रस्थापित झाली असे होत नाही. या समाज कायद्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी हा मानवतेचा पुढचा टप्पा असतो. पण याच टप्प्यावर ही मानवता अधांतरी राहते. लोकशाही संसदेत बहुमतानेच काय पण सर्वमताने संमत झालेल्या समाज कायद्यांची अंमलबजावणी पुढे नीट होईल याची शास्वती नसते. याचे कारण म्हणजे शासन नियुक्त कायदा अंमलदार व लोक यांच्या सदसद्विवेकबुद्धीत असलेली भली मोठी तफावत, असमानता! मानवतेचा प्रमुख आधार काय तर मनुष्याची सदसद्विवेकबुद्धी आणि ही सदसद्विवेकबुद्धीच जर असमान असेल तर मग समाजात मानवता समान कशी राहील? ती कायम अधांतरीच राहते! त्यामुळे मानवतेवर आधारित न्याय सुद्धा कायमच असमान राहतो. मग भले "कायद्यापुढे सगळी माणसे समान" असे कायद्यात भल्या मोठ्या अक्षरात लिहिलेले का असेना!

-ॲड.बी.एस.मोरे©१५.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा