https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये!

मुगल बादशहा औरंगजेब १७०७ ते १६१८ असे एकूण ८८ वर्षे आयुष्य जगला तर छत्रपती  शिवाजी महाराज हे १६३० ते ते १६८० म्हणजे फक्त ५० वर्षे आयुष्य जगले. औरंगजेबाच्या आयुष्याची लांबी जास्त पण जगण्याची उंची खूप कमी. याउलट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याची लांबी खूपच कमी म्हणजे फक्त ५० वर्षे (१६३०-१६८०) पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानत! तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पण फक्त ६४ वर्षे जगले (१८९१-१९५६) म्हणजे त्यांच्या आयुष्याची लांबी तशी कमीच पण त्यांच्या जगण्याची उंची खूप मोठी. उगाच नाही आपण डॉ.आंबेडकर यांना महामानव मानत! अर्थात माणूस किती वर्षे जगला याला महत्व नाही तर तो कसा जगला याला महत्व आहे. आनंद पिक्चर मध्ये राजेश खन्नाच्या तोंडून या संदर्भात एक अर्थपूर्ण वाक्य बाहेर पडलेय "बाबू मोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये"! मनुष्य जीवन खूप अनमोल आहे. त्या जीवनाचे मनुष्याने सार्थक केले पाहिजे.

-ॲड.बी.एस.मोरे©२२.९.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा