https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ६ जून, २०२४

परिवर्तन!

परिवर्तन!

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. जसजसे माणसाचे वय वाढत जाते तसतसा हा नियम पदोपदी अनुभव देत राहतो. या निसर्ग नियमानुसार सळसळत्या तारूण्याच्या घोड्यावर आरूढ झालेली तरूण पिढी प्रगल्भ ज्ञान व परिपक्व अनुभव गाठीशी असलेल्या जुन्या जाणत्या पिढीचा पाणउतारा करायला मागेपुढे पहात नाही. जोश आहे पण होश नाही या तारूण्यावस्थेचा हा परिणाम असतो. वय जसजसे वाढत जाते तसतशी कालची आपली माणसे आज आपली रहात नाहीत. अगदी सहज हालचाल करणारे आपले कालचे शरीर आज कुरकुर करायला लागते. थोडक्यात कालचा भूतकाळ आजचा वर्तमानकाळ रहात नाही. अशा बदललेल्या परिस्थितीत बदललेल्या लोकांच्या पाठीमागे लागणे आणि बदललेल्या शरीराला बळेच ओढून ताणून कठीण व्यायाम करायला भाग पाडणे म्हणजे निसर्ग नियमाच्या विरोधी वागणे व त्यातून स्वतःला स्वतःच्या हट्टाने त्रास करून घेणे होय. थोडक्यात काय तर ता म्हणता ताक ओळखावे आणि पळत्याच्या पाठीमागे धावणे सोडून द्यावे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा