https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १७ जून, २०२४

माणसांमुळे पृथ्वी बनलीय आगीचा गोळा!

माणसांमुळे पृथ्वी बनलीय आगीचा गोळा!

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचीच काय पण जगाची लोकसंख्या किती होती, त्याही पूर्वी प्राचीन, अर्वाचीन काळात ती किती होती? आजच्या तुलनेने ती खूपच कमी होती. पण मानवी स्वभाव आज जसा आहे तसाच पूर्वीही स्वार्थी, लोभी, मत्सरी व अहंकारी होता. त्यातून जगण्याची व दुसऱ्यावर सत्ता गाजविण्याची स्पर्धा, ईर्षा व त्यातून भांडणे, युद्धे या गोष्टी तेव्हाही होत्या. विचार करा या सर्व तापदायक गोष्टी लोकसंख्या वाढीने किती प्रमाणात गुणाकाराने वाढल्या असतील व त्यामुळे ही पृथ्वी माणसांच्या इच्छा, आकांक्षा, राग, लोभ, द्वेष, अहंकार इत्यादींच्या स्फोटक वातावरणामुळे किती मोठा आगीचा गोळा झाली असेल?

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा