https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २० जून, २०२४

प्रतिकार!

प्रतिकार!

माणूस पूर्णपणे सुसंस्कृत व समंजस व्हायला अजून खूप काळ लागणार आहे. लोकसंख्या वाढीने तर आता जीवघेण्या स्पर्धेतून अहंकार, द्वेष, मत्सर, हिंसक प्रवृत्ती यासारख्या नकारार्थी भावना अनेक पटीने वाढवल्या आहेत. या आव्हानात्मक वातावरणात अहिंसा तत्वाची नुसती जपमाळ ओढत बसण्यात अर्थ नाही कारण अन्यायाविरूद्ध जशास तसा प्रतिकार ही आजच्या काळाची पूर्वीपेक्षाही जास्त गरज आहे व त्यासाठी आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे पुनर्जागरण व अनुपालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण आपल्या लढवय्या महापुरूषांच्या स्मृती जागृत करून अन्यायाविरूद्ध लढण्याची चेतना जागृत केली पाहिजे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.६.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा