https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

जय श्री हनुमान!

जय श्री हनुमान!

माझ्या पौराणिक माहिती प्रमाणे श्री हनुमान हा श्री महादेवाचा/शंकराचा अवतार तर श्रीराम व श्रीकृष्ण हे  श्रीविष्णूचे अवतार. रामायणात श्री हनुमान श्रीरामाचे भक्त (अर्थात शिवशंकरानेच केली श्रीविष्णूची भक्ती) म्हणून सतत दिसतात तर महाभारतात काही प्रसंगात भिमाचे गर्वहरण करताना व कौरव पांडव युद्धात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण सारथ्य करीत असताना त्या रथावर श्रीहनुमान दिसतात. श्रीविष्णूचा अवतार श्री परशुराम यांचा क्षत्रिय विनाशाचा अधर्म रोखण्यासाठीही श्री हनुमान यांनी आपली शक्ती दाखवत परशुरामाला युद्धात हरवले व झाडाला बांधून ठेवले. म्हणजे श्रीविष्णूलाच शिवशंकराने हरवले. अधर्माविरूद्धची/अन्यायाविरूद्धची ही सतत चालणारी लढाई आहे. आधुनिक काळातील कायदा हाही अन्यायाविरूद्धचा धर्म आहे. असे म्हणतात की श्रीविष्णू व शिवशंकर या देवांचे व तसेच लक्ष्मी व पार्वती या देवतांचे अवतार त्यांचे अवतार कार्य संपले की संपुष्टात आले. पण शिवशंकराचा एकमेव अवतार श्रीहनुमान याचे अवतार कार्य संपले नाही कारण जगातून अधर्म/अन्याय संपूर्णपणे नष्ट झाला नाही. म्हणून वकील या भूमिकेत मी कायदा क्षेत्रात आहे अर्थात धर्म कार्यात आहे याचा मला अभिमान आहे. तसे तर न्यायाधीश, वकीलच नव्हे तर इतर सुद्धा म्हणजे पोलीस, प्रशासकीय अधिकारी, मंत्रीगण, लष्कर हे सर्वच धर्मकार्याचे अर्थात ईश्वर कार्याचे संरक्षक पुजारी आहेत हे त्यांनी नीट ध्यानात ठेवले पाहिजे. त्यांचा भ्रष्टाचार म्हणजे अधर्म होय. अधर्म जास्त काळ टिकत नाही. अतिरेक केला तर मग आहेच शिवशंकराचा जागृत अवतार श्री हनुमान!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.१२.२०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा