https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ३० डिसेंबर, २०२३

तुकड्यांचे आर्थिक मूल्य!

तुकड्यांचे आर्थिक मूल्य!

विविध पदार्थ, वनस्पती, पशूपक्षी व माणसे जशी निसर्गात विखुरलेली आहेत तसे निसर्गाचे विज्ञानही निसर्गात विखुरलेले आहे. एका माणसाला या विखुरलेल्या विविध गोष्टींवर व विखुरलेल्या विज्ञानावर एकट्याचे स्वराज्य निर्माण करता येत नाही, मग सुराज्याचा तर प्रश्नच नाही.

एकटा माणूस त्याच्या आयुष्यात फार तर विखुरलेल्या तुकड्यांच्या काही तुकड्यांमध्ये प्रावीण्य मिळवू शकतो व त्या प्रावीण्याच्या जोरावर त्या ठराविक तुकड्यांवरच मर्यादित राज्य करू शकतो. विखुरलेल्या या सगळ्या तुकड्यांना आर्थिकदृष्ट्या एकत्रित करून त्यांचे एकत्रित आर्थिक मूल्य मोजून तेवढाच पैसा बाजारात खुला करण्याचे काम देशाच्या मध्यवर्ती बँकेचे (भारतीय रिझर्व्ह बँक हे उदाहरण) असते.

माझा प्रश्न हा आहे की, अनैसर्गिक व असामाजिक वर्तनातून पर्यावरण प्रदूषित करणारे विनाशी घटक पर्यावरणात सतत निर्माण होत असतात व त्यांच्याकडे वातावरण बिघडवण्याचे उपद्रव मूल्य (न्युसन्स वॕल्यू) जबरदस्त असते. हे विनाशी उपद्रव मूल्य देशाची मध्यवर्ती बँक विखुरलेल्या तुकड्यांच्या एकूण आर्थिक मूल्यातून वजा करते काय?

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.१२.२०२३

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

छळणाऱ्या गोष्टी!

मनाला छळ छळ छळणाऱ्या उपद्रवी गोष्टी!

जग विविधतेने भरलेले आहे पण त्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या प्रत्येक विविधतेशी प्रत्येकाची मैत्री होऊ शकत नाही. त्यातील बऱ्याच गोष्टी दुरून डोंगर साजरे प्रकारातील असतात. निरनिराळे खेळ प्रकार, निरनिराळ्या कलाकृती, राजकारण इतकेच काय कसले ते देवधर्मी अध्यात्म या माझ्यासाठी तरी अशाच दुरून डोंगर साजरे प्रकारातील गोष्टी  आहेत. त्यामुळे कदाचित लोक मला निरस, अरसिक म्हणतील पण मला त्याची पर्वा नाही. कारण इतरांसाठी फायद्याच्या असणाऱ्या या गोष्टी त्यांचा खुळा नाद केल्याने मला मात्र उपद्रवी, छळवादी होतात.

जोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्या क्रियाशीलतेशी मैत्री संबंध जुळवत नाही तोपर्यंत इतरांची क्रियाशीलता तुमच्यासाठी कायम परकी राहणार. परक्या माणसांना मायाप्रेमाने तुम्ही जवळ करण्याचा प्रयत्न केला तर तुमची फजिती होणार त्यापेक्षा ती गोष्ट टाळलेली बरी.

मूलभूत, आवश्यक गोष्टी कोणत्या व त्यांना पूरक गोष्टी कोणत्या म्हणजे गरजा कोणत्या व चैनी कोणत्या याची यादी प्रत्येकाने करायला हवी. मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून पूरक गोष्टींकडेच जास्त लक्ष दिले तर मनाला पूरक गोष्टींचाच खुळा नाद लागतो. अशा पूरक गोष्टींचीच मनाला सवय लागते, मनाला त्यांचे वेड, व्यसन लागते. त्यामुळे चैनच मनाची गरज बनते. उद्योगधंद्याचे जाहिरात तंत्र (मार्केटिंग) मानवी मनाच्या या वेडावर, व्यसनावर चालते. मनाला चिकटलेली अशी चैन पुढे मनाचा छळ सुरू करते. दारू सिगारेटचे, जुगाराचे व्यसन हे याच छळवादी प्रकारातले. पण याच छळवादी मानसिक वेडावर काही चालू माणसे गडगंज श्रीमंत होतात व व्यसनाधीन माणसे भिकेला लागतात.

स्वतःच्या मनाला उगाच चिकटून घेतलेल्या अशा पूरक चैनीच्या, व्यसनी गोष्टी कोणत्या याची यादी बनवा व त्यांना अती किंमत न देता होता होईल तेवढ्या त्या दूर ठेवा. त्यांची छळवादी सवय जबरदस्तीने मोडून काढता आली नाही तरी ती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. या उपद्रवी गोष्टींची किंमत हळूहळू शून्यावर आणा. स्वतःपुढे काय वाढून ठेवलेय हे न बघता जगाचा निष्फळ विचार करणे सोडून द्या. आभासात, कल्पनाविश्वात जगणे सोडून देऊन वास्तवात जगायला शिका. स्वतःच स्वतःचा मानसिक छळ करू नका!

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.१२.२०२३

गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे!

माझ्या माहितीनुसार (चुकत असेल तर स्पष्ट करून सांगा) ओशो हेच सांगतात की भौतिकतेचा अत्युच्च आनंद घ्या मग संपृक्त अवस्था प्राप्त होईल. त्या अवस्थेला पोहोचल्यावर भौतिकता जरा सुद्धा आवडणार नाही आणि मगच तुम्ही भौतिक मार्ग सोडून आध्यात्मिक मार्गावर याल. असे कुठे होते काय? हे तत्वज्ञान भांडवलदार लोकांना पटले असते तर जगात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालीच नसती. गंमत ही आहे की अध्यात्म गरीब लोकांना सांगून त्यांना ठेविले अनंते तैसेची रहावे शिकवले जाते म्हणजे षडयंत्री लोकांना मलई खायला रान मोकळे. अशावेळी अध्यात्मातला देव शांतपणे ही गंमत बघत असतो. आपण वास्तवातले अध्यात्म शिकले पाहिजे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २८.१२.२०२३

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण!

जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण!

जात हा ज्ञात शब्दाचा अपभ्रंश असावा. पिढ्यानपिढ्या ठराविक  समाज वर्गाकडे निसर्ग विज्ञानाचे विशिष्ट ज्ञान व त्यातील कौशल्य (विशिष्ट विज्ञान-तंत्रज्ञान) संचयित झाल्याने विशिष्ट ज्ञान कौशल्यावर आधारित व्यवसाय, उद्योगधंदा करणाऱ्या लोकसमूहाचा विशिष्ट समाज वर्ग निर्माण झाला असावा व त्या वर्गाची विशिष्ट जात निर्माण झाली असावी. अशाप्रकारची जात ही ज्ञानाधारित असल्याने तिला जात म्हणण्याऐवजी ज्ञात म्हटले तर समाजातील विविध जाती या ज्ञाती म्हणून दिसू लागतील.

विज्ञानाला धर्माचा रंग देऊन किंवा विज्ञानावर धर्माचा मुलामा चढवून एखाद्या समाज वर्गाने विज्ञानाचा गाभा पिढ्यानपिढ्या स्वतःच्या ताब्यात ठेवून बहुजन समाजाला ज्ञानापासून खरंच पिढ्यानपिढ्या वंचित ठेवले का अर्थात ज्ञानाला सामाजिक दृष्ट्या संकुचित करून ठेवले का हा जातीचा (माझ्या मते ज्ञातीचा) इतिहास अभ्यासण्याचा विषय आहे. यावर डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल संशोधन करून शूद्र पूर्वी कोण होते यावर संशोधनात्मक कारणमीमांसा करीत निष्कर्ष काढला आहे. परंतु ज्याला हे संशोधनात्मक आंबेडकरी साहित्य वाचण्याचा आळस, कंटाळा असेल त्याने स्वतःचा काॕमन सेन्स (सामान्य जाणीव) वापरला तरी समाजातील जातसंघर्षाची कारणे कळतील.

डाॕक्टरांच्या मुलाबाळांनी वैद्यकीय ज्ञान स्वतःकडे एकवटून ठेवून तोच वैद्यकीय व्यवसाय पिढ्यानपिढ्या करायचे ठरवले तर डाॕक्टरांचीही ज्ञानाधारित डॉक्टर जात (ज्ञात) बनेल. वकिलांच्या मुलाबाळांनीही पिढ्यानपिढ्या तेच केले तर वकील वर्गाचीही जात (ज्ञात) बनेल. हेच काय पण पोलीस, लष्कर, उद्योजक व व्यापारी, अर्थकारणी यांच्याही ज्ञानाधारित जाती (ज्ञाती) बनतील. प्रश्न आहे तो सफाई कामगारांचे काय करायचे? त्यांच्या मुलांनीही पिढ्यानपिढ्या सफाई कामगार बनूनच जगायचे का? म्हणजे ज्ञान वंचित राहिल्याने पिढ्यानपिढ्या खालच्या दर्जाची कनिष्ठ कामेच करीत रहायचे का? जन्माने अशी जात (वंचित ज्ञानाधारित वंचित ज्ञात असे वाचावे) त्यांच्यावर उच्च ज्ञान वर्गीय समाजाने लादल्यामुळेच समाजात शूद्र हा समाज वर्ग निर्माण झाला व त्या वर्गातून अनेक शूद्र जाती निर्माण झाल्या हे महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन वाचल्यास कळेल. जन्माने अशी शूद्र जात विशिष्ट कनिष्ठ वर्गावर उच्च वर्गीय समाजाने लादल्याने शूद्रांचा ज्ञान, अर्थ व राज (सत्ता) विकास होऊ शकला नाही म्हणून भारतीय राज्य घटनेत अशा कनिष्ठ (शूद्र) जातींच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक विकासासाठी जातनिहाय आरक्षण कायद्याने निर्माण करावे लागले, ही मूलभूत गोष्ट लक्षात घ्यायला हवी.

समाजाने जर अशी विशिष्ट जात विशिष्ट समाज वर्गावर जन्माने लादली तर अशी गोष्ट मनुष्याच्या नैसर्गिक स्वातंत्र्य, विकासाच्या आड येते. डॉक्टरच्या मुलाला इंजिनियर होऊ वाटले तर त्याला इंजिनियर होऊ दिले पाहिजे. वकिलाच्या मुलीला जर आंतरराष्ट्रीय कंपनीची व्यवस्थापिका होऊ वाटले तर तिला तशी व्यवस्थापिका होऊ दिले पाहिजे. माझ्या मुलीला मी तेच निवडीचे स्वातंत्र्य दिले व वकील होण्याऐवजी ती आंतरराष्ट्रीय कंपनी व्यवस्थापिका झाली. म्हणजे माझी वकिली माझ्याबरोबरच संपणार. माझे वडील गिरणी कामगार पुढारी होते पण मी कामगारच झालो नाही. कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन वकील झालो तर मग पुढे कामगार पुढारी होण्याचा प्रश्नच उरला नाही. जन्माने माझ्या वडिलांची, माझी व माझ्या मुलीची जात एकच व ती म्हणजे मराठा. पण ज्ञानकर्माने आमच्या एकाच मराठा कुटुंबात तीन जाती (ज्ञाती) निर्माण झाल्या त्या म्हणजे अनुक्रमे कामगार पुढारी, वकील व व्यवस्थापन. आमच्या या तीन जाती आमच्या वैयक्तिक ज्ञानकर्मावर आधारित आहेत. आमचे नातेवाईक केवळ मराठा समाजाचे आहेत या एकाच निकषावर आमचे आमच्या नातेवाईकांशी बौद्धिक, वैचारिक पातळीवर जमेलच असे नाही. तिथे वैचारिक आंतरविरोध व जातसंघर्ष असू शकतो व त्याला मुख्य कारण म्हणजे ज्ञानकर्मावर आधारित निर्माण झालेल्या आपआपल्या कुटुंबातील आमच्या अंतर्गत जाती (ज्ञाती) या वेगवेगळ्या आहेत. त्यात समानता नाही. एवढेच काय एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेली मुले एकाच जैविक रक्ताची असली तरी ती बौद्धिक, वैचारिक दृष्ट्या पुढे एकसारखी राहतील याची शास्वती देता येत नाही. कारण बौद्धिक कष्ट व कर्म वेगळे असते. हाताची पाच बोटे सारखी नसतात त्यातलाच हा भाग. असे म्हणतात की वेगवेगळी असलेली हाताची ही पाच बोटे एक झाली तर एकजूटीची मूठ बनते व जेवण करणे सोपे जाते. पण एकाच आईबापाच्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या हातांची नुसती बोटेच वेगळी नसतात तर त्यांच्या मुठीही वेगळ्या असतात ही गोष्ट विसरता कामा नये. एकाच कुटुंबातील अशी सगळीच मुले उच्च शिक्षित झाली तरी अशा उच्च विद्याविभूषित भावाबहिणींमध्ये सुद्धा वैचारिक संघर्ष असू शकतो कारण त्यांच्या वैचारिक जाती (ज्ञाती) वेगवेगळ्या असू शकतात. एकाच धर्मात अनेक पंथ व एकाच जातीत अनेक पोट जाती असतात व त्यांच्यात आंतर विरोध असतो त्यातलाच हा प्रकार. माझ्या मते, शिक्षण, व्यवसाय निवडीच्या स्वातंत्र्यात कौटुंबिक व सामाजिक अडवणूक केल्यानेच आंतरविरोध व जातसंघर्ष निर्माण होतो.

माझ्या या लेखाचा थोडक्यात अर्थ एवढाच आहे की प्रत्येकाची जात (ज्ञात) ही जन्माने नव्हे तर प्रत्येक मनुष्याच्या ज्ञानकर्माने ठरते. हे तत्व समाजमान्य व्हायला हवे तरच जन्माधारित जातीपातींचा अंत होऊन जातसंघर्ष नष्ट होईल व मग आरक्षण या विषयावर कायमचा समाजमान्य तोडगा निघेल. सद्या तरी समाजात जातीनिहाय आरक्षण व ज्ञातीनिहाय संरक्षण हे दोन्ही मुद्दे हे वास्तविक मुद्दे आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

आध्यात्मिक मार्गावर केव्हा, का, कुठे?

आध्यात्मिक मार्गावर केव्हा, का, कुठे?

मानवी ज्ञानेंद्रियांना सहज कळणारे निसर्गाचे वैज्ञानिक वास्तव भौतिक आहे व म्हणून ते जड आहे. म्हणून विज्ञानाला भौतिक विज्ञान म्हणणे योग्य होईल. पदार्थ विज्ञान, रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र, जीव शास्त्र इतकेच काय मानव समाज शास्त्र या  सर्व भौतिक विज्ञानाच्याच शाखा आहेत. या भौतिक विज्ञानाच्या कुशल वापराला तंत्रज्ञान म्हणतात. म्हणून विशाल अर्थाने मानव समाज शास्त्रीय सामाजिक कायदा हा सुद्धा तंत्रज्ञानाचाच भाग होय असे माझे वैयक्तिक मत आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाला मानवी स्पर्श देणारे समाजमान्य नैतिक तत्वज्ञान हा सुद्धा मानव समाज शास्त्रीय कायद्याचा भाग आहे हेही माझे वैयक्तिक मत आहे. पण मानव स्पर्शी असे नैतिक तत्वज्ञान जर समाजमान्य नसेल तर ते माणसाच्या वैयक्तिक पातळीवरच राहते. मानव स्पर्शी तत्वज्ञान हे मानवी जीवनाला तात्त्विक बैठक व तात्विक दिशा देत मानवी जीवन अर्थपूर्ण करण्याचे काम करते. तत्वज्ञानाने मानवी मनाला काही काळ स्थिरता व शांती लाभत असली तरी ती चिरकाल टिकेल याची शास्वती नसते इतका जड भौतिकतेचा मनावरील प्रभाव शक्तीशाली असतो.

निसर्गाची जड भौतिकता नश्वर देह मृत्यूने नष्ट होईपर्यंत मानवी मनाला घट्ट चिकटलेली असते. हा चिकटा निघता निघत नाही. तो अशाप्रकारे शरीर, मनाला घट्ट चिकटलेला असल्याने पटकन जाणवतो, कळतो व म्हणून तोच वास्तव, मूर्त वाटतो. निसर्गाची भौतिकता गोल चक्रात फिरणारी व परिवर्तनशील आहे. म्हणजे ती पूर्णतः नश्वर नाही. ती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत परिवर्तित (ट्रान्सफाॕर्म) होते. उदा. मनुष्य मृत्यू पावला की त्याचे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत रूपांतर (परिवर्तन) होते. मनुष्याचा सजीव देह अशाप्रकारे नश्वर आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा मृत्यू अटळ आहे व माणूस या भौतिक निसर्ग नियमाला अपवाद नाही. मग माणूस हळूहळू विचार करतो की या परिवर्तनशील नश्वर भौतिकतेला, नश्वर भौतिक देहाला किती चिकटून रहायचे. भौतिक देह व या देहाला चिकटलेल्या भौतिक मनाच्या सहाय्याने मिळवलेली भौतिक संपत्ती, नातीगोती सगळे या भौतिक निसर्गातच सोडून जायचे आहे. मग निसर्गाच्या या भौतिक वैज्ञानिक वास्तवाचा विचार करून मनुष्य निसर्गातील मूळ ईश्वर तत्वाचा व सत्वाचा शोध घेण्यास सुरूवात करतो. त्यासाठी निसर्गाच्या मूर्त (काॕन्क्रिट) जड भौतिक वास्तवाच्या आत खोलवर हलके फुलके असे (भौतिक जडत्व नसलेले) ईश्वरी मूलतत्व व सत्व याच जड भौतिक निसर्गात आहे जे अमूर्त म्हणजे अनाकलनीय आहे याची जाणीव मानवी मनाला व्हावी लागते. तशी जाणीव झाली की माणूस त्या मूळ ईश्वरी तत्वाशी व सत्वाशी एकरूप होण्याचा व त्यातून जड भौतिक मनाला आध्यात्मिक आनंद शांती व स्थिरता देण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात तो आध्यात्मिक मार्गावर येतो. या आध्यात्मिक जाणिवेतून त्याच्या मनात भौतिक कर्मे करताना सुद्धा परमेश्वराचा आधार वाटतो.

विज्ञानातले व कायद्यातले सगळंच सगळ्यांना जसं कळत नाही तसं अध्यात्मातले सगळंच सगळ्यांना कळत नाही. आध्यात्मिक बाबतीत माझ्यासारख्या ज्या लोकांना पूर्ण अध्यात्म समजत नाही व ते समजत नसल्याने ज्यांना आध्यात्मिक सिद्धी प्राप्त करता येत नाही अशा वरवर अध्यात्म करणाऱ्या माझ्यासारख्या  सामान्य लोकांसाठी "श्रमिक हो घ्या इथे विश्रांती" म्हणजे काही काळ का असेना पण जड भौतिक मनाला हलक्या फुलक्या आध्यात्मिक अवस्थेत आणून त्या मनाला भौतिक जडत्वापासून मुक्ती द्यायचे ठिकाण म्हणजे ईश्वराचे ध्यान व प्रार्थनास्थळ हाच आध्यात्मिक थांबा असतो व तेवढाच त्या थांब्याचा आध्यात्मिक उद्देश असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

मोजक्यांचे मोजके खेळ!

मोजक्यांचे मोजके खेळ!

आयपीएल क्रिकेट सामन्यांत क्रिकेट खेळाडूंचा लिलाव होतो. त्यांच्यावर गडगंज पैसा जवळ असणारे श्रीमंत अर्थसम्राट करोडो रूपयांची बोली लावतात आणि त्या बोलीवर या खेळाडूंचे खेळ मूल्य ठरते. हा प्रकार म्हणजे बुद्धिमान माणसाची भन्नाट कल्पना. या कल्पनेच्या खोलात गेले की कळते की खेळाडूच काय पण कलाकार, राजकारणी वगैरे सर्व सेलिब्रिटी मंडळी मूठभर अर्थसम्राट लोकांकडून वापराच्या वस्तू झाल्या आहेत. सर्वसामान्यांचे हित वगैरे या सर्व फेक आश्वासनांच्या गोष्टी आहेत. हे सर्व मोजक्या मर्जीतल्या लोकांचे (कंपूगिरी) आपसातले मोजके खेळ आहेत जे सर्वसामान्य लोकांनी फक्त बघत रहायचे व त्यावर फक्त टाळ्या वाजवायचे काम करायचे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

डिजिटल क्रांतीचा धुमाकूळ!

डिजिटल क्रांतीचा धुमाकूळ!

जगातील डिजिटल क्रांतीने भाषिक मर्यादांच्या भिंती ओलांडून सर्व भाषिकांना जवळ आणण्याचे काम सुरू केले आहे. भाषिणी नावाचे ॲप एका सेकंदात एका भाषेचे भाषांतर दुसऱ्या भाषेत करते असे माझ्या दिनांक २३.१२.२०२३ च्या लोकसत्ता वृत्तपत्रात वाचण्यात आले व मी खूप आश्चर्यचकित झालो.

वेगाने प्रगत होत चाललेल्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा भाषिणी हा एक छोटा भाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा तर आणखी पुढचा भाग. नशीब अजून तरी कृत्रिम भावना हा प्रकार निर्माण झाला नाही. भावना अजून तरी नैसर्गिक पातळीवरच स्थिर आहे. तिला कृत्रिमतेचा स्पर्श अजून तरी झाला नाही.

ई काॕमर्स, आॕनलाईन बँकिंग हे शब्द अंगवळणी पडल्यानंतर आॕनलाईन निवडणूक सुद्धा पुढे आली आहे. या आॕनलाईन निवडणूक यंत्रणेचे एक तांत्रिक मोड्युल बाजारात आलेय. तसेच न्यायालयांतून आॕनलाईन दावे व खटले दाखल करण्याची यंत्रणा उभी राहिलीय. नशीब अजून तरी आॕनलाईन जस्टिस देणारे कृत्रिम तंत्रज्ञान निर्माण झाले नाही. जोपर्यंत मानवी भावना नैसर्गिक राहतील तोपर्यंत मानवी न्याय सुद्धा वकील व न्यायाधीश यांच्या स्वतंत्र माध्यमातून नैसर्गिकच राहील असे मला वाटते. आमच्या सारखी जुन्या काळातील माणसे मात्र या डिजिटल क्रांतीने हळूहळू कालबाह्य होत चालली आहेत हे मात्र खरे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

अमर कलाकार!

अमर कलाकार!

पूर्वीच्या मराठी चित्रपटातील जयश्री गडकर, उषा चव्हाण यासारख्या मराठी अभिनेत्री यांनी त्यांची कला खऱ्या अर्थाने जपली होती. किती ते त्यांचे शालीन सौंदर्य. तमाशातील फडावर लावणी नृत्य करताना सुद्धा अंग उघडे राहणार नाही याची दक्षता घेतली जायची. त्यांच्या शालीन आविष्कारातून तमाशा शब्दाविषयी आदर वाटायचा. उच्च पातळीवरील कला, संस्कृतीची एक छाप पाडून गेलेत हे जुने कलाकार. ते हे जग सोडून गेलेच नाहीत. त्यांच्या उच्च कलेच्या ठेव्यातून ते अमर आहेत. आताच्या धांगड धिंगाणा कला, संगीताशी त्यांच्या जुन्या कला, संगीताची तुलनाच करता येणार नाही. त्या कलाकारांना रसिक म्हणून माझे वंदन!

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.१२.२०२३

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

चाबऱ्या फ्रेंड रिक्वेस्टस!

चाबऱ्या फ्रेंड रिक्वेस्टस!

माझ्या या नवीन फेसबुक खात्यावर माझा मिशीवाला चेहरा बघून नवीन फ्रेंड रिक्वेस्टस पाठवणाऱ्या हौसी लोकांना हे माहित नाही की हे माझे पाचवे फेसबुक खाते आहे व फालतू टाईमपास करण्यासाठी मी हे नवीन खाते उघडले नाही. काही चाबऱ्या होमोसेक्सुअल लोकांनी (ज्यात चाबरे म्हातारेही होते) त्यांचा तो अंतःस्थ चाबरा हेतू दाखवून मला या नवीन खात्यावर फ्रेंड रिक्वेस्टस पाठवल्या. अशा लोकांना लगेच ब्लॉक करण्याशिवाय पर्याय रहात नाही. तसेच काही नवोदित मित्रांना माझ्या वैचारिक पोस्टस सोडून इनबाॕक्स मध्ये येऊन माझ्याशी हितगुज करण्यात रस दिसतो. या सर्वांना पुन्हा सावध करून सांगतो की माझे फेसबुक खाते हे टाईमपास खाते नाही! 

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.१२.२०२३

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

माणसांवर राज्य कुणाचे?

माणसांवर राज्य कुणाचे?

माणसाचा जन्म झाला रे झाला की त्याच्या जैविक गरजांचे रडगाणे सुरू होते. जन्मल्याबरोबर आईच्या दुधासाठी बाळाचे रडणे हा हळूहळू वाढत जाणाऱ्या या रडगाण्याचा पहिला भाग. बाळाचे स्तनपान करून दूध पाजणारी बाळाची आई हे जैविक गरजा भागविण्यासाठी बाळाला मिळालेले पहिले साधन.

जैविक गरजा एकीकडे व त्या गरजा भागविण्यासाठी निसर्ग व समाजात असलेली साधने दुसरीकडे अशी परिस्थिती असते. अर्थात एकीकडे  भूक तर दुसरीकडे भूक भागविणारे अन्न यांच्या कचाट्यात माणूस सापडतो. साधनप्राप्ती सहज शक्य होत नाही. त्यासाठी स्पर्धात्मक कष्ट करावे लागतात. अर्थात जैविक गरजा व जैविक साधने यांच्यामध्ये कष्ट असते. जैविक गरजा व जैविक साधने यांच्यात नैसर्गिक आकर्षण निर्माण करून गरजा व साधनांना एकत्र आणायचे काम निसर्गाचा कायदा करतो तर जैविक साधनांच्या  स्पर्धात्मक कष्टाला सामाजिक शिस्त व वळण लावण्याचे काम सामाजिक कायदा करतो.

परमेश्वराची नुसती आध्यात्मिक भक्ती करीत राहिल्याने जैविक भूक नष्ट होत नाही व भुकेचे समाधान करणारी जैविक साधने हातात येत नाहीत. त्यासाठी स्पर्धात्मक कष्ट  करावेच लागते. देवधर्म केल्याने अशा कष्टाला बळ मिळते का व  असे कष्ट सुसह्य होते का हा वादाचा मुद्दा आहे. देवधर्माने कदाचित अशा कष्टाला एक काल्पनिक मानसिक आधार मिळत असेल. पण तो किती हे देवधर्म करणाऱ्या लोकांना माहित असेल. पण सामाजिक कायद्याने स्पर्धात्मक कष्टाला एक सामाजिक शिस्त व वळण लागते हे मात्र खरे आहे.

माणसांवर राज्य कुणाचे या प्रश्नाचे उत्तर काय तर जैविक गरजा व जैविक साधने निर्माण करून त्यांना जोडणाऱ्या नैसर्गिक कायद्याचे व त्यामागे असलेल्या निसर्गाचे एक राज्य आणि साधनांसाठी कराव्या लागणाऱ्या स्पर्धात्मक कष्टाला शिस्त व वळण लावणाऱ्या सामाजिक कायद्याचे व त्यामागे असलेल्या समाजाचे दुसरे राज्य. म्हणजे माणसांसाठी दोन राज्ये आहेत व ती म्हणजे एक निसर्गाचे राज्य व दुसरे समाजाचे राज्य. यात परमेश्वराचा भाग किती हे त्या परमेश्वरालाच माहित!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१२.२०२३

जरा जपून समाजकार्य करा!

जरा जपून समाजकार्य करा!

ज्या मानव समाजात आपण माणूस म्हणून राहतो त्या समाजाच्या हितासाठी समाजकार्य करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर तुम्हाला चांगले समाजकार्य करायचे असेल तर समाज विघातक काम करणाऱ्या लोकांविरूद्ध तुम्हाला लढावे लागेल म्हणजे त्यांच्याशी तुम्हाला पंगा घ्यावा लागेल. मग त्यातून तुमचे हितशत्रू निर्माण होणार ही गोष्ट निश्चित. तुमच्या चांगल्या समाजकार्याचे तोंड भरून कौतुक करणारे तुमचे हितचिंतक समाज हिताच्या अशा आरपार लढाईत तुमच्या पाठीमागे किती उभे राहतात यावर समाज योद्धा म्हणून तुमचे यश अवलंबून आहे. तुमचे हितशत्रू तुम्हाला तुमच्याच हितचिंतकांच्या मनात तुमच्या विरूद्ध विष पेरू शकतात. त्यासाठी ९९% चांगली कामे करणाऱ्या तुमची १% चूक पुरेशी आहे. त्या १% चुकीचा तुमचे हितशत्रू एवढा मोठा बाऊ करतील की तुमचे हितचिंतकच तुमचे शत्रू बनतील व तुम्हाला संपवण्यात पुढाकार घेतील. हा घाबरवण्याचा प्रयत्न नाही तर अशा गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत व पुढेही घडत राहतील म्हणून सावध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. घाबरून कोणी समाजकारण (राजकारण हा आणखी मोठा विषय) करण्याचे सोडून देणार नाही पण ते करताना तुमच्या हितशत्रूंपासूनच नव्हे तर पलटी खाणाऱ्या हितचिंतकांपासून सुद्धा सावध राहिले पाहिजे हे सरळ स्पष्ट शब्दांत सांगण्याचा प्रामाणिक हेतू या लेखामागे आहे हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे. जरा जपून समाजकार्य करा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.१२.२०२३

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

मनाचे स्वातंत्र्य!

मेंदूमनाचा स्वयंनिर्णयाचा अधिकार अर्थात मनाचे स्वातंत्र्य!

सजीवांचे मेंदूमन खरंच स्वतंत्र आहे काय? मनुष्य हाही सजीव प्राणी असल्याने त्याच्या मेंदूमनालाही हा प्रश्न लागू आहे. माझ्या मते मनुष्याचे मेंदूमन निसर्गाचे निसर्गमन व मानव समाजाचे समाजमन या दोन बाह्य मनांच्या कचाट्यात सापडलेले आहे. तसे पाहिले तर समाजमन हाही निसर्गमनाचाच एक भाग पण त्याचा एक वेगळाच प्रभाव मानवी मेंदूवर असल्याने सोयीसाठी समाजमनाला निसर्गमनापासून थोडे वेगळे धरले आहे.

मूलभूत नैसर्गिक गरजांपुरत्या मर्यादित असलेल्या आवश्यक गोष्टी कोणत्या हे निसर्गमन मानवी मेंदूला शिकवत असते तर या आवश्यक गोष्टींच्या पलिकडे जाऊन उपभोगता येणाऱ्या सुखकर व अतीसुखकर अशा चैनीच्या गोष्टी कोणत्या व त्यासाठी नैसर्गिक मूलभूत गोष्टींचा विकास कसा करायचा हे समाजमन मानवी मेंदूला शिकवत असते.

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या म्हणजे आवश्यकतेपुरत्या मर्यादित असलेल्या गोष्टी (नेसेसिटीज) व विकासाच्या अत्युच्च पातळीवर असलेल्या श्रीमंती थाटाच्या चैनीच्या गोष्टी (लक्झरीज) यांच्या बरोबर मध्ये शरीर, मनाला सुखसमाधानी, सोयीस्कर, आरामशीर ठेवणाऱ्या गोष्टी (कम्फर्टस) असतात. या कम्फर्ट झोन मध्ये मानवी मन स्थिर राहिले तर ते आनंदी व शांत राहते. यालाच मानवी मेंदूमनाचा मध्यम मार्ग असे म्हणता येईल. मानवी मेंदूमनाचे एक जैविक घड्याळ आहे. या जैविक घड्याळाच्या सेकंद काट्याला गरज, मिनिट काट्याला आराम व तास काट्याला चैन असे म्हणता येईल का? मला वाटते वेळेचे हे वर्गीकरण गरज, आराम व चैन या अनुक्रमे तीन गोष्टींना लागू होणार नाही कारण त्यांचा संदर्भ वेगळा आहे. पण गरज, आराम व चैन या तीन गोष्टींचे चक्र मेंदूमनात सतत गोल फिरत असते एवढे मात्र नक्की. माझ्या मते मानवी शरीर, मनाला सुख व शांती मध्यम म्हणजे आराम अवस्थेत लाभू शकते व या अवस्थेतच मेंदूमन स्थिर रहायला हवे. निसर्ग व समाज या दोन्हींमध्ये परमेश्वर असेल तर त्यालाही गरज व चैन यांच्या बरोबर मधल्या म्हणजे स्थिर अशा आराम अवस्थेत सुख व शांती लाभत असेल. म्हणून या मध्यम अवस्थेतच मानवी मनाचा परमेश्वर मनाशी (परमात्म्याशी) सुसंवाद निर्माण होऊन दोन्ही मने एकजीव होऊ शकतात असे मला वाटते.

प्रश्न हा आहे की, निसर्गमन व समाजमन या दोन बाह्य मनांच्या प्रभावाखाली सतत असणाऱ्या मानवी मनाला स्वयंनिर्णयाचा अधिकार किती? कधीकधी मनाच्या चैनीचा प्रश्नच नसतो. शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टी जर आवश्यक म्हणून न करता त्या चैनीच्या गोष्टी म्हणून केल्या म्हणजे आवश्यक गोष्टींचा (गरजांचा) मर्यादेपलिकडे, प्रमाणाच्या बाहेर अतिरेक केला तर गरजांचे रूपांतर चैनीत होऊन गरजाच त्रासदायक होऊ शकतात. शेवटी विचारपूर्वक स्वयंनिर्णय घेण्याचा मानवी मनाला मर्यादित का असेना पण अधिकार आहेच. याबाबतीत डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनाला पटतात. त्यांच्या मते, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य व मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१२.२०२३

बुधवार, २० डिसेंबर, २०२३

मनाला आवरा!

गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

मन म्हणजे हलकी हवा तर शरीर म्हणजे जड पृथ्वी. प्रश्न असा आहे की जड पृथ्वीने तिच्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणावर राज्य करावे की त्या हवेच्या आवरणाने पृथ्वीवर राज्य करावे? अर्थात मनाने शरीरावर राज्य करावे की शरीराने मनावर राज्य करावे?

यासाठी अंतराळ म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया. अंतराळ म्हणजे एक प्रचंड मोठी निर्वात म्हणजे हवा नसलेली पोकळी. या निर्वात पोकळीने ग्रह, ताऱ्यांच्या जड भौतिक विश्वाला झेलले आहे ज्यात भौतिक हवाही आली जिला वजन आहे म्हणजे तीही जडच. हवा जड ग्रहांच्या तुलनेने हलकी आहे पण तिलाही वजन असल्याने तीही तशी जडच असा निष्कर्ष निघतो. जड भौतिक विश्वाला अंतराळातील निर्वात पोकळी झेलतेय हे खरेच आश्चर्यकारक, चमत्कारिक आहे. जड भौतिक विश्वाला निसर्ग मानले तर अंतराळातील निर्वात पोकळीला की त्या पोकळीत असलेल्या अदृश्य अनाकलनीय शक्तीला परमेश्वर मानावे काय आणि मानले तर त्या पोकळीतील त्या परमेश्वरापर्यंत आध्यात्मिक भक्तीने पोहोचता येईल काय? अंतराळ पोकळीने झेललेल्या जड भौतिक विश्वाला वेळ काळाचे बंधन असल्याचे दिसून येते. पण असे वेळ काळाचे बंधन पोकळीतील त्या परमेश्वराला असेल का किंवा तो परमेश्वर कोणत्याच बंधनात नसेल का? हे सगळे प्रश्न या जर तर च्या तार्किक गोष्टी ज्यांना तर्काशिवाय कसलाही आधार नाही. खरं तर आपण त्या पोकळीत जन्मत नाही, जगत नाही व मरतही नाही. आपले सगळे काही आपल्या जड पृथ्वीच्या जड वातावरणातच होते.

आता जड पृथ्वीवरून ती ज्याच्या बंधनात आहे त्या जड वेळेचा विचार करूया म्हणजे आपल्यालाही वेळेचे बंधन समजेल. जड पृथ्वीला जड वेळेने बंधनात ठेवलेय म्हणून तर पृथ्वीवरील सर्व जड पदार्थ (ज्यात माणसेही आली) जड वेळेच्या बंधनात आहेत. अमूक अमूक वेळेत (२४ तास) पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते व अमूक अमूक काळात (वेळेचा मोठा भाग म्हणजे ३६५ दिवसांचा काळ) पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार प्रदक्षिणा घालते. तिच्या या कर्माचे व त्या कर्माच्या वेळेचे बंधन तिच्यावर कोणी बरे घातले? मध्यवर्ती सूर्याने की त्या अंतराळ पोकळीतील अदृश्य शक्तीने म्हणजे परमेश्वराने? काही कळायला मार्ग नाही. आपण काही गोष्टी (परमेश्वर सुद्धा) आपल्या तर्काने मानतो. पण या तर्काला कसलाच वैज्ञानिक पुरावा नाही. तर्काने मानणे व प्रत्यक्षात असणे यात फरक नाही का?

पृथ्वीचे वेळेचे एक घड्याळ आहे जे तिने माणसांसहीत पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर लादलेय. माझ्यावर वेळेचे बंधन मग मी तुम्हाला सोडतेय होय असेच ती अप्रत्यक्षपणे तिच्यावरील व तिच्यातील पदार्थांना म्हणते. या वेळेच्या (घड्याळाच्या) बंधनात गोल फिरत राहून दिवसांमागून दिवस कधी जातात व आपण कधी म्हातारे होतो हे कळतच नाही. वेळेचे घड्याळ आपल्या अवस्थांत बदल करते. ते आपल्याला बालपण, तरूणपण व म्हातारपण दाखवते व त्याबरोबर जन्म मरणाचा फेराही दाखवते जो फेरा परमेश्वराची कोणी कितीही आध्यात्मिक भक्ती केली तरी चुकता चुकत नाही.

माणसांनी वेळेच्या बंधनात राहून कालानुरूप जीवनकर्मे करीत राहणे मी समजू शकतो. पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेड लागल्यासारखे नुसते धावत रहायचे हे मला पसंत नाही. मी माझ्या गरजा कमी केल्या आणि या घड्याळांच्या काट्यांनाच माझ्या बंधनात ठेवले म्हणजे वेळेची दादागिरी चालू दिली नाही. तुम्हीही हे करू शकता जर तुम्ही तुमच्या गरजा कमी केल्या तर. विकासाच्या नावावर तुम्ही तुमच्या गरजा सतत वाढवतच राहिला तर तुम्हाला तुमचे आयुष्य पुरणार नाही. तुम्हाला शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.१२.२०२३

वेळेला मुठीत ठेवा!

गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

मन म्हणजे हलकी हवा तर शरीर म्हणजे जड पृथ्वी. प्रश्न असा आहे की जड पृथ्वीने तिच्या सभोवताली असलेल्या हवेच्या आवरणावर राज्य करावे की त्या हवेच्या आवरणाने पृथ्वीवर राज्य करावे? अर्थात मनाने शरीरावर राज्य करावे की शरीराने मनावर राज्य करावे?

यासाठी अंतराळ म्हणजे काय हे प्रथम समजून घेऊया. अंतराळ म्हणजे एक प्रचंड मोठी निर्वात म्हणजे हवा नसलेली पोकळी. या निर्वात पोकळीने ग्रह, ताऱ्यांच्या जड भौतिक विश्वाला झेलले आहे ज्यात भौतिक हवाही आली जिला वजन आहे म्हणजे तीही जडच. हवा जड ग्रहांच्या तुलनेने हलकी आहे पण तिलाही वजन असल्याने तीही तशी जडच असा निष्कर्ष निघतो. जड भौतिक विश्वाला अंतराळातील निर्वात पोकळी झेलतेय हे खरेच आश्चर्यकारक, चमत्कारिक आहे. जड भौतिक विश्वाला निसर्ग मानले तर अंतराळातील निर्वात पोकळीला की त्या पोकळीत असलेल्या अदृश्य अनाकलनीय शक्तीला परमेश्वर मानावे काय आणि मानले तर त्या पोकळीतील त्या परमेश्वरापर्यंत आध्यात्मिक भक्तीने पोहोचता येईल काय? अंतराळ पोकळीने झेललेल्या जड भौतिक विश्वाला वेळ काळाचे बंधन असल्याचे दिसून येते. पण असे वेळ काळाचे बंधन पोकळीतील त्या परमेश्वराला असेल का किंवा तो परमेश्वर कोणत्याच बंधनात नसेल का? हे सगळे प्रश्न या जर तर च्या तार्किक गोष्टी ज्यांना तर्काशिवाय कसलाही आधार नाही. खरं तर आपण त्या पोकळीत जन्मत नाही, जगत नाही व मरतही नाही. आपले सगळे काही आपल्या जड पृथ्वीच्या जड वातावरणातच होते.

आता जड पृथ्वीवरून ती ज्याच्या बंधनात आहे त्या जड वेळेचा विचार करूया म्हणजे आपल्यालाही वेळेचे बंधन समजेल. जड पृथ्वीला जड वेळेने बंधनात ठेवलेय म्हणून तर पृथ्वीवरील सर्व जड पदार्थ (ज्यात माणसेही आली) जड वेळेच्या बंधनात आहेत. अमूक अमूक वेळेत (२४ तास) पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते व अमूक अमूक काळात (वेळेचा मोठा भाग म्हणजे ३६५ दिवसांचा काळ) पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार प्रदक्षिणा घालते. तिच्या या कर्माचे व त्या कर्माच्या वेळेचे बंधन तिच्यावर कोणी बरे घातले? मध्यवर्ती सूर्याने की त्या अंतराळ पोकळीतील अदृश्य शक्तीने म्हणजे परमेश्वराने? काही कळायला मार्ग नाही. आपण काही गोष्टी (परमेश्वर सुद्धा) आपल्या तर्काने मानतो. पण या तर्काला कसलाच वैज्ञानिक पुरावा नाही. तर्काने मानणे व प्रत्यक्षात असणे यात फरक नाही का?

पृथ्वीचे वेळेचे एक घड्याळ आहे जे तिने माणसांसहीत पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर लादलेय. माझ्यावर वेळेचे बंधन मग मी तुम्हाला सोडतेय होय असेच ती अप्रत्यक्षपणे तिच्यावरील व तिच्यातील पदार्थांना म्हणते. या वेळेच्या (घड्याळाच्या) बंधनात गोल फिरत राहून दिवसांमागून दिवस कधी जातात व आपण कधी म्हातारे होतो हे कळतच नाही. वेळेचे घड्याळ आपल्या अवस्थांत बदल करते. ते आपल्याला बालपण, तरूणपण व म्हातारपण दाखवते व त्याबरोबर जन्म मरणाचा फेराही दाखवते जो फेरा परमेश्वराची कोणी कितीही आध्यात्मिक भक्ती केली तरी चुकता चुकत नाही.

माणसांनी वेळेच्या बंधनात राहून कालानुरूप जीवनकर्मे करीत राहणे मी समजू शकतो. पण घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेड लागल्यासारखे नुसते धावत रहायचे हे मला पसंत नाही. मी माझ्या गरजा कमी केल्या आणि या घड्याळांच्या काट्यांनाच माझ्या बंधनात ठेवले म्हणजे वेळेची दादागिरी चालू दिली नाही. तुम्हीही हे करू शकता जर तुम्ही तुमच्या गरजा कमी केल्या तर. विकासाच्या नावावर तुम्ही तुमच्या गरजा सतत वाढवतच राहिला तर तुम्हाला तुमचे आयुष्य पुरणार नाही. तुम्हाला शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून गरजा कमी करा, वेळेला मुठीत ठेवा!

-©ॲड.बी.एस.मोरे, २०.१२.२०२३

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

निसर्ग विचार करायला भाग पाडतो!

निसर्ग विचार करायला भाग पाडतो!

मूलद्रव्ये, निर्जीव पदार्थ, वनस्पती, सूक्ष्मजीव, प्राणी, माणसे (माणूस हा उच्च वर्गीय प्राणी आहे) ही सर्व निसर्गाची वैविध्यपूर्ण साधनसंपत्ती पृथ्वीवर कायम तीच राहते. तिच्यात एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत सतत परिवर्तन होत राहते एवढेच काय ते वैशिष्ट्य या साधनसंपत्तीचे आहे. या परिवर्तनशील साधनसंपत्ती भोवती पुन्हा पुन्हा जन्मणारी, पुन्हा पुन्हा जगणारी, पुन्हा पुन्हा मरणारी माणसे बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन अवस्थांतून पुढे पुढे जात गोलाकार फिरत राहतात. हे निसर्गाचे भले मोठे गोल चक्र आहे त्यात निसर्ग माणसांना गोल गोल फिरवत राहतो.

या वैविध्यपूर्ण साधनसंपत्तीशी योग्य आंतर समन्वय साधता आला तर माणसांचे भरणपोषण होऊन जगणे सुसह्य होते आणि या साधनसंपत्ती बरोबर आंतर विरोध निर्माण झाला तर याच साधनसंपत्ती कडून विविध आजार निर्माण होऊन जगणे असह्य होते. मानव समाजातही जेंव्हा आंतर मानवी आंतर विरोध (उदा. धर्म, जातपात इ.) निर्माण होतो तेंव्हा समाज स्वास्थ्य बिघडते.

हे आंतर समन्वयी भरणपोषणाचे व आंतर विरोधी आजार, संघर्षाचे कर्म बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन अवस्थांतून जात माणसे गोल गोल फिरत आयुष्यभर करीत शेवटी त्यांच्या मृत्यूने निसर्गातच नष्ट होतात (म्हणजे सजीव अवस्थेतून निर्जीव अवस्थेत परिवर्तीत होतात).

या गोल जीवनचक्रातून माणसांना गोल गोल फिरायला लावणारा निसर्ग (की निसर्गात सुप्त व गुप्त असलेला तो अनाकलनीय परमेश्वर) त्याची ही अजब करामत माणसांना दाखवताना मानवी बुद्धीला विचार करायला भाग पाडतो. या अनिवार्य नैसर्गिक विचार प्रक्रियेमुळे काही गोष्टी कळण्यास मदत होत असली तरी त्यामुळे मन अस्थिर होऊन चीड  वैताग सुद्धा येतो या अनिवार्य विचार प्रक्रियेचा कारण विचारांच्या लाटा जबरदस्तीने, बळेच थांबवता येत नाहीत मग मनाचा कितीही निश्चय करा.

उतार वयात तर थांबता न थांबणारी ही विचार प्रक्रिया खूपच त्रासदायक होते कारण मेंदूत आयुष्यभराच्या कटू गोड आठवणी साठलेल्या असतात व त्या जबरदस्तीने विचार करायला भाग पाडतात. इतकेच काय झोपेत स्वप्नेही निर्माण करतात. त्यात तुम्ही जर उच्च शिक्षित व अनुभव संपन्न अर्थात ज्ञानसंपन्न व प्रगल्भ असाल तर ही विचार प्रक्रिया जरा जास्तच जोरात धावते व उतार वयात शरीराचे अवयव थकलेले, क्षीण झालेले असल्याने ती जास्तच त्रासदायक होते. अशा परिस्थितीत एखादी कृती करताना मनात दुसरा विचार येणे किंवा दुसरेच विचार मनात चालू असणे व त्यामुळे समोर असलेल्या कृतीवर नीट लक्ष नसणे व कृती पूर्ण झाल्यावर फलिताकडे अपूर्ण, असमाधानी, शंकेखोर मनाने एकटक बघत राहणे म्हणजे त्याच गोष्टीत बराच वेळ अडकून राहणे अशा कार्यात अडथळा आणणाऱ्या गोष्टी घडत राहतात. निसर्ग विचार करायला भाग पाडतो व त्यातून तो मनाला त्रासही देतो. पण तरीही मेंदूत विचार येणे हेच तर जिवंतपणाचे लक्षण आहे ना!

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.१२.२०२३

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

कळतंय पण वळत नाही!

कळतंय पण वळत नाही!

पदार्थांचे गुणधर्म व त्यांना नियंत्रित करणारे निसर्ग नियम व माणसांचे स्वभाव व त्यांना नियंत्रित करणारे समाज नियम या गोष्टी आपल्या पूर्ण नियंत्रणात नसतात. त्यामुळे पदार्थ असोत की माणसे त्यांच्यात आपण पूर्ण किंवा आमूलाग्र बदल घडवून आणू शकत नाही. हे सर्वजण तसेच चालणार, तसेच वागणार व तसेच राहणार हे नीट ध्यानात ठेवायचे. जोपर्यंत तुमच्यात मध आहे तोपर्यंत मधमाशा तुमच्या भोवती गोंगावणार व मध संपला की तुम्हाला सोडून जाणार. गुळाला चिकटणारे मुंगळेही याच स्वार्थी स्वभावाचे. माणसे या स्वार्थी स्वभावाला अपवाद नाहीत. निःस्वार्थ मायाप्रेम, निःस्वार्थ सेवा या गोष्टी मानव समाजात दिसत असल्या तरी त्या अत्यंत दुर्मिळ असतात. वापरा आणि फेकून द्या असाच स्वार्थी जगाचा सर्वसाधारण नियम आहे. या सर्वच गोष्टी कटू सत्य असल्या तरी त्यांच्यातील दोष शोधत बसण्याऐवजी त्यांना कसा व किती प्रतिसाद द्यायचा हे आपल्या मनालाच ठरवावे लागते. खरं तर आपल्याला न जुमानणाऱ्या, न पटणाऱ्या या स्वार्थी गोष्टींना प्रमाणाबाहेर महत्व व प्रतिसाद देण्यात आपणच चूक करीत असतो. आपल्या मनाचा हा दोष ओळखून तो वेळीच दुरूस्त केला पाहिजे. आपल्या मनात जर काही गोष्टींमुळे तणाव निर्माण होत असेल तर दोष त्या गोष्टींपेक्षा त्यांना प्रमाणाबाहेर महत्व व प्रतिसाद देणाऱ्या आपल्या मनाचा असतो. आपल्या मनाचा हा दोष आपणच सुधारू शकतो. त्यासाठी कोणत्याही मानसतज्ज्ञाची गरज नसते. काही गोष्टी टाळता येत नसल्या तरी त्यांना किती प्रतिसाद द्यायचा याचे प्रमाण मनाला नीट कळले पाहिजे. त्यांना प्रतिसाद कसा द्यायचा हे मनाला माहित असले तरी तो किती द्यायचा हे मनाला नीट कळत नाही आणि जरी कळले तरी नीट वळत नाही. कळतंय पण वळत नाही असाच मनाचा तो सावळागोंधळ असतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१२.२०२३

तू मोठा, मी छोटा?

तू मोठा, मी छोटा?

बाजारात फिरताना दुकानदारांकडून खूप शिकण्यासारखे असते. छोटा दुकानदार कधी स्वतःच्या छोट्या दुकानाची तुलना मोठ्या दुकानाशी करीत बसत नाही. स्वतःच्या छोट्या  दुकानालाच ईश्वरी देणगी समजून त्याच दुकानाच्या दारात उभा राहून स्वतःचा व्यापार, धंदा वाढविण्याचा जमेल तेवढा प्रयत्न करतो व मिळेल त्यात खूश राहतो. मी मात्र त्याची वकिली भारी, माझी वकिली साॕरी अशी तुलना करीत बसलो. तो धंदा आहे, माझा उच्च शैक्षणिक वकिली व्यवसाय आहे असे म्हणत माझ्या तथाकथित उच्च शिक्षित बुद्धीचे तुणतुणे वाजवत बसलो आणि मिळालेय त्यातला आनंद घालवून बसलो. चलो, देर है दुरूस्त है!

-©ॲड.बी.एस.मोरे,१७.१२.२०२३

शनिवार, १६ डिसेंबर, २०२३

तर काय करायचे?

तर काय करायचे?

बुद्धी शिवाय भौतिकतेच्या सागरात पोहणे शक्य नाही व भावनेशिवाय आध्यात्मिकतेच्या आकाशात विहार करणे शक्य नाही. पण या दोन्ही गोष्टी एकमेकांना चिकटलेल्या असल्याने यांची सांगड कशी घालायची हा पुन्हा जड बुद्धीचाच प्रश्न. आध्यात्मिक श्रद्धा भावनेच्या मदतीने जड बुद्धीचे हे सांगड काम सहज, हलकेफुलके होत असेल तर मग आध्यात्मिक श्रद्धा भावना महत्वाची ठरते. पण जड बुद्धीच्या भौतिक मार्गात आध्यात्मिक श्रद्धा भावना अडथळा आणत असेल किंवा श्रद्धा भावनेच्या आध्यात्मिक मार्गात जड बुद्धी अडथळा आणत असेल तर काय करायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१२.२०२३

आध्यात्मिकतेच्या वाटेवर!

आध्यात्मिकतेच्या वाटेवर!

"पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा" या पांडुरंग/विठ्ठलाविषयी (श्रीकृष्ण) वापरात असलेल्या वाक्याचा अर्थ मी पंढरपूर येथे माझे जवळजवळ पाच सहा वर्षांचे बालपन घालवूनही कळलाच नाही. त्या विठ्ठल मूर्तीत परब्रम्ह म्हणजे संपूर्ण ब्रम्हांडाचे तेज व ताकद असलेला परमेश्वर सूक्ष्म स्वरूपात कसा बघायचा हे कळले नाही. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दाखविले तेंव्हा अर्जुन ते रूप डोळ्यांत साठवू न शकल्याने भयभीत झाला याचा अर्थ परब्रम्ह शब्दात समाविष्ट आहे हेही कळले नाही. हिंदू धर्मातील विविध देवदेवता या विश्वातील वैशिष्ट्यपूर्ण विविधतेचे प्रातिनिधीक दर्शन आहे हे सुद्धा कळले नाही. कोणत्याही देवमूर्तीत परब्रम्ह सूक्ष्म स्वरूपात बघून परब्रम्हाची मनोभावे प्रार्थना करण्याचे कळले नाही. कळलेच नाही तर वळेल कसे आणि वळलेच नाही तर कोणत्याही देवदेवतेकडे बघताना आध्यात्मिक भाव निर्माण होतीलच कसे? त्या आध्यात्मिक वाटेवर चालायला आता कुठे हळूहळू शिकतोय. पण भौतिकता गोचीडासारखी शरीर व मनाला चिकटलीय. तिला फेकूनही देता येत नाही. तिच्या विळख्यात राहून आध्यात्मिक साधना करणे हे कठीण काम आहे. काल शनिवार दिनांक १६.१२.२०२३ चे परळ मंदिरातील देवदर्शन तसे वरवरचेच!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१२.२०२३
(आध्यात्मिकतेच्या वाटेवर)

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आध्यात्मिक संकेत!

मला मिळालेले आध्यात्मिक संकेत, इशारे (सिग्नल्स)!

मी आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्या बुद्धीलाच जास्त महत्व दिले आणि भावनेला कमी महत्व दिले. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन वकिली सारख्या बौद्धिक व्यवसायात आलो. पण बुद्धीला मर्यादा आहेत हे विसरलो. आज सहज लोकमान्य टिळकांचा एक प्रेरणादायी विचार समोर आला आणि माझ्या जिवाची घालमेल मी स्वतःच करून घेतोय, माझे जीवन मी स्वतःच कठीण करून घेतोय, थोडक्यात मी चुकतोय याची आतून जाणीव झाली. "जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते" हेच ते लोकमान्य टिळकांचे वाक्य ज्याने मला माझी चूक दाखवून दिली.

बुद्धीची मर्यादा न जाणता तिलाच अती महत्त्व दिल्याने झाले काय तर मी इतरांच्या बुद्धीशी माझ्या बुद्धीची  बौद्धिक तुलना करू लागलो. तो वकिलीत एवढा यशस्वी मग मी का नाही झालो तसा यशस्वी? हा प्रश्न मला सतावू लागल्यावर मी त्याची बौद्धिक चिकित्सा करू लागलो. आणि डोंगर पोखरून उंदराचा शोध लावला. तो शोध म्हणजे लग्नानंतर माझ्या पत्नीने मला मुंबईतील वरळी बी.डी.डी. चाळीत राहू दिले असते तर माझी खूप प्रगती झाली असती. पण तिच्यामुळे डोंबिवलीत आलो व मुंबईतील नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणचे प्रवासी अंतर वाढल्यामुळे त्या प्रवासाला वैतागून आलेल्या संधी सोडून दिल्या व मोठ्या यशाला मुकलो. या बौद्धिक चिकित्सेतून मी माझ्या मागे राहण्याचे खापर सरळ पत्नीवर टाकून मोकळा झालो हा विचार न करता की मुंबईत राहून मी काय मोठा दिवा लावणार होतो? वास्तविक इतरांशी स्वतःची तुलना करणेच चुकीचे. या जगात प्रत्येक पदार्थ, प्राणीमात्राची ताकद वेगळी, आवाका वेगळा, भूमिका वेगळी जी वैशिष्ट्यपूर्ण असते. माणसांतही प्रत्येकाचे टॕलेंट वेगळे असते व त्याबरोबर कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. हीच तर निसर्गाची विविधता आहे. या वैशिष्ट्यपूर्ण विविधतेचा आनंद घ्यायचा सोडून मी स्वतःची तुलना या विविधतेबरोबर करीत बसलो. कसली ही माझी मागासलेली बुद्धी!

उठसूट पत्नीला दोष देणे हे माझ्या कंपनी क्लायंटच्या व्यवस्थापकीय संचालकालाच पटले नाही. त्याने मला काल सरळ त्याच्या कॕबिनमध्ये बोलवून माझ्या रागाची पर्वा न करता दोन खडे बोल सुनावले. "क्या मोरे साब, आप हमेशा आपकी मिसेस को ही आप करियर मे पिछे रहने के लिये दोषी क्यूं ठहराते हो, चाल वातावरण में आपके लडकी का उच्च शिक्षण और अच्छा विकास होने में आपके मिसेस को डर लगा होगा इसलिये उन्होने डोंबिवली में थोडा बडा घर और थोडा अच्छा वातावरण देखके डोंबिवली रहना पसंद किया होगा, इससे कठिनाई आपको हुई लेकिन आपके लडकी का अच्छा विकास हुआ ऐसा आप पाॕजिटिव्ह क्यूं नही सोचते, हर वक्त पत्नीको दोष देते हो जिसने आप का जीवनभर साथ निभाया"! वर उल्लेखित लोकमान्य टिळकांच्या बुद्धी कुठपर्यंत व श्रद्धा कुठून सुरू हे थोडक्यात सांगणाऱ्या प्रेरणादायी विचार वाक्याला सुसंगत असा हा एक संकेत मला त्या संचालकाकडून काल मिळाला जो मला माझ्यात बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल हे नक्की!

काल परवाच मला सुधारण्यासाठी आणखी एक संकेत मला माझ्या माजी लिगल स्टेनोकडून मिळाला. मी माझ्या पत्नीला सतत दोष देणे हे बहुतेक त्यालाही आवडले नसावे. मग तो सरळ मला म्हणाला "आता यावर जास्त लांबलचक लिहू नका, सरळ फोन करून प्रत्यक्ष बोला". पण शेवटी मी करायचे ते केलेच. याच विषयावर भला मोठा लेख त्याला पाठवून दिला. माझ्या चौकस व चिकित्सक बुद्धीला लिखाणाची भारी खाज! पण तो बुद्धीचा खोटा गर्व व भ्रम होता. या संकेतातून मी चुकतोय हे मला कळले. इतकेच कंपनी संचालकाचे वरील खडे बोल मी माझ्या सद्याच्या लिगल टायपिस्ट -कम-असिस्टंटला सांगितले तेंव्हा त्याने मला हेच सांगितले की तुमच्या पत्नीने डोंबिवलीला राहणे पसंत का केले हे तुम्ही नीट समजून घ्या व तिने तुम्हाला आयुष्यभर दिलेली साथ लक्षात घ्या. हा लोकमान्य टिळकांच्या विचार वाक्याला सुसंगत असा तिसरा संकेत व सुधारण्याचा इशारा.

चौथा संकेत मिळाला तो वकिलांच्या ग्रूपवरील एका वकिलाच्या अनाहूत सल्ल्याने. हा १००० वकिलांचा मोठा ग्रूप आहे. या ग्रूपमध्ये संपूर्ण भारतातील वकील आहेत. त्यात सुप्रीम कोर्टात प्रॕक्टिस करणारे मोठे काउन्सेल्स आहेत. या ग्रूपवर काही  वकिलांना माझे बौद्धिक लिखाण आवडले व त्यांनी त्याचे स्वागतच केले. पण आज एका वकिलाने मात्र "हमारे सन्माननीय ॲड. बलिराम मोरे साब, आप अब थोडा बॕकफूट पर जाकर बॕक सिट पर बैठिये, यहाँ ऐसे विचार लिखने के लिये सभी वकील गण पात्र है" हे वाक्य त्या ग्रूपवर टाकले व माझ्या बौध्दिक मर्यादेचा आणखी एक संकेत देऊन थांबण्याचा इशारा दिला.

तसे तर काही संकेत मला पूर्वीही मिळत होते पण माझी बुद्धी त्यांना जुमानत नव्हती. एक जवळचा वकील मित्र मला अध्यात्माविषयी नीट समजावून सांगायचा प्रयत्न करायचा. पण मी त्यालाच माझ्या बौद्धिक विचारांचे तुणतुणे वाजवून दाखवायचो. पण त्याची परमेश्वरावर गाढ श्रद्धा आहे व अध्यात्माविषयी त्याचे विचार ठाम आहेत. मीच या बाबतीत डळमळीत आहे. ना तळ्यात ना मळ्यात अशी माझ्या मनाची स्थिती आहे. मला धड आस्तिक म्हणता येणार नाही व धड नास्तिक म्हणता येणार नाही. दोन्ही मध्ये कुठेतरी मध्येच लटकतोय मी.

माझ्या बुद्धीला भारी माज आहे. या बुद्धीच्या कोनातून देवप्रतिमांकडे पाहिले तर ती आध्यात्मिक भावना मनात निर्माण होत नाही. बुद्धीच्या अती घमेंडीपणामुळे माझी देवश्रद्धा (भावना) कोरडी पडते. अहो, मी झोपेतून उठल्यावर व झोपताना जी देव प्रार्थना करतो ती सुद्धा गणिती पद्धतीने करतो कारण काय तर माझ्या बुद्धीचा शहाणपणा. मग त्या प्रार्थनेत आध्यात्मिक भावच रहात नाही व एक प्रार्थना फुकट गेली म्हणून मग दुसरी, तिसरी प्रार्थना म्हणण्याचा मला मंत्रचळ लागतो.

बुद्धीचा हा अती शहाणपणा मला कुठेतरी थांबवायचा होता पण नीट कळत नव्हते. पण आज लोकमान्य टिळकांचे "जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते" हे विचार वाक्य वाचण्यात आले आणि मग माझ्या बुद्धीच्या मर्यादा आहेत हे वास्तव मला कळले. मग या मर्यादे पुढे काय? तर श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास, आध्यात्मिक श्रद्धा हे उत्तर सुद्धा मला लोकमान्य टिळकांच्या याच वाक्यातून मिळाले. टिळकांच्या  या वाक्याला सुसंगत असे वरील संकेत, इशारे (सिग्नल्स) ही मला मिळाले आहेत. तेंव्हा आता चला सुधारणेच्या वाटेवर पुढे! बुद्धीची मर्यादा समजली की तिला थांबवून मनाला ईश्वरापुढे लीन करायचे मग बाकी प्रश्न आपोआप सुटतील!

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.१२.२०२३

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

RELIGION AND POLITICS

LET WE NOT MAKE RELIGION AS POLITICAL ISSUE!

I am myself a Hindu and regard this religion as all inclusive religion inclusive of science and principle of world as one family (vasudhaiv kutumbakam). As declared by Hon'ble Supreme Court Hindu is a culture (way of life जीवनशैली) and it is great culture. Let us follow it, let us respect it along with other religious people who are also part of great Hindu Indian culture without making it any political issue provided other religions also respect India's major religion viz. Hindu religion which is Indian way of life. Give respect, take respect. Secularism cannot be one sided!🙏🙏

-©Adv.B.S.More, 14.12.2023

उतार वयातला आनंदयात्री!

उतार वयातला आनंदयात्री!

आयुष्यभर नैसर्गिक व सामाजिक कर्तव्यकर्मे पार पाडून पाडून वृद्ध व्यक्तीचे शरीर थकलेले व मृत्यूची चाहूल लागून मन थोडेफार उदास झालेले असते. तरूणपणाचा जोम व उत्साह व तसेच वास्तवातील उत्सुकता संपलेली असते. त्यामुळे उतार वयात शरीर व मनाला आराम देणे ही नैसर्गिक अपरिहार्यता असते व तिचा स्वीकार केला पाहिजे.

मग उतार वयात वृद्ध माणसाने जीवन कसे जगावे? माझ्या मताने ते एक आनंदयात्री बनून जगावे? पण या वयात आनंदयात्री कसे बनावे? तर माझ्या मते, स्पर्श करा आणि निघून जा (टच अँड गो) पद्धतीने आनंदयात्री बनावे. हा टच अँड गो काय प्रकार आहे? मला सुचलेल्या यातील काही गोष्टी खालीलप्रमाणे.

(१) आपली दैनंदिन जीवनकर्मे हळूहळू व वरवर करणे.
(२) शारीरिक व्यायाम हलका फुलका करणे.
(३) काही निसर्गकर्मे थोडा जास्त वेळ घेतात (उदा. शौचकर्म). तिथे टच अँड गो चालत नाही. त्यांना थोडा जास्त वेळ देणे. पण तरीही तिथे जास्त पाणी लावत न बसणे.
(४) झोपेतून उठल्यावर दात ब्रशने जास्त घासत न बसता वरवर घासून चूळ भरून मोकळे होणे.
(५) अंघोळ करताना अंगाला जास्त साबण लावून बाथरूममध्ये अंग चोळत बसण्याऐवजी वरवर साबण लावून अंगावर पाणी ओतून मोकळे होत बाथरूममधून लवकर बाहेर पडणे.
(६) माध्यमांतील बातम्या टक लावून न बघता व सखोल न वाचता वरवर बघणे व वाचणे.
(७) आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपला आवाका व नियंत्रण यांच्या बाहेर असल्याने त्या मनाला जास्त लावून न घेणे.
(८) जगाचा जास्त खोलवर विचार न करणे.
(९) आपली शारीरिक, बौद्धिक, आर्थिक, राजकीय ताकद चाचपून दुनियादारी करणे. ती जेवढी कमी तेवढे उत्तम.
(१०) लोक फार शहाणे असतात. स्वतःचे झाकून ठेवून दुसऱ्याचे वाकून वाकून बघत असतात. अशा लोकांना हेरून त्यांच्याशी वास्तव गोष्टींवर, स्वतःच्या अभ्यासातून मिळवलेल्या सत्य ज्ञानावर व तसेच स्वतःच्या अनुभवावर जास्त चर्चा न करणे. त्यांच्याशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवणे.
(११) खेळाडू व कलाकार यांच्या करमणूकीच्या कार्यक्रमांत जास्त न रमणे. कारण अशी करमणूक हे काल्पनिक स्वप्नरंजन असते. स्वतःच स्वतःची करमणूक करून घेण्यास शिकणे.
(१२) इतकेच काय परमेश्वर कधी प्रत्यक्ष दिसणार नाही की जवळ बसून आपल्याशी हितगुज करणार नाही हे पक्के ध्यानात ठेवून त्याच्या जास्त नादी न लागणे. अंधश्रद्ध मनाने जास्त देवधर्म व देवप्रार्थना न करणे. होता होईल तेवढी तिर्थस्थळे टाळणे कारण त्या ठिकाणी भाविक गर्दी करतात. त्यांच्या जीवघेण्या गर्दीत गुदमरून जाऊन मौल्यवान जीव जाण्याचा धोका असतो. अशा प्रसंगी तिथे कोणताही देव जीव वाचवायला धावून येत नाही. अर्थात या आध्यात्मिक बाबतीत जेवढ्यास तेवढे वागणे.

वरील टच अँड गो पद्धतीने उतार वयातील जीवन मंद ज्योतीप्रमाणे सहजसुंदर, सुखी व शांत होते. मी माझ्या उतार वयात वरील टच अँड गो पद्धत अवलंबित आहे. पण त्यासाठी मनाची प्रगल्भता, ठाम निश्चय व कौशल्य(प्रफेशनल स्किल) या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे मी करतो म्हणून तुम्ही या गोष्टींचा अवलंब करू नका. ते धोक्याचे होऊ शकते. कोणी तसा अवलंब केल्याने कोणाचे काही नुकसान झाल्यास त्याला मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.१२.२०२३

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

माझे लेखन विज्ञान, धर्म व कायदा या तीनच गंभीर विषयांवर व त्यांच्या अंतर्गत संबंधाच्या तुलनात्मक अभ्यासावर आधारित संशोधनपर, सखोल चिकित्सक व विश्लेषक असते म्हणून ते सगळ्यांना रूचत नाही. जगातील बाकी सगळ्या गोष्टी या तीन प्रमुख विषयांशी निगडीत व त्यांच्यात समाविष्ट आहेत. पण लोकांना मूलभूत गोष्टींऐवजी त्यांच्या भोवती फिरणाऱ्या वरवरच्या गोष्टीत रूची असल्याचे दिसते. त्यामुळे माझा मूलभूत अभ्यास, विचार व लेखन कुठे आणि कोणाबरोबर शेअर करायचे हा माझा कायमचा प्रश्न व सततची खंत राहिली आहे. कारण या मूलभूत विषयांत रूची असणारी माणसे माझ्या संपर्क व संगत क्षेत्राच्या बाहेर फार दूरवर आहेत ज्यांच्यापर्यंत मी ना कधी पोहोचू शकलो ना आता उतार वयात कधी पोहोचू शकेन. सखोल चिकित्सक अभ्यास व विचार कोणा आवडे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

DIVIDE AND RULE POLICY OF NATURE!

DIVIDE AND RULE POLICY OF NATURE!

The divide and rule policy is not man oriented. This is Nature oriented policy. The Nature made world is divided in diverse elements and matters having diverse properties. In fact, journey of Nature and its expanded world is from division of the united matter (say God particle) by way of big bang explosion of such united matter/particle.

The journey of Nature is from division to re-union in cyclic rotation. This may be called as Nature's law of re-union. But this re-union is from division and it is the basic fact of Nature. We the people experience this law of re-union in our birth, life and death cycle & in our daily cyclic routine from waking up from sleep, working and then going to sleep. We are compelled to follow this process by force of Nature's law of re-union. But as we grow old by our aging process (which is also part of Nature's law of re-union) we become weak and tired in our day to day working.

Our retirement from our employment/engagement in our cyclic life business has its origin in this cyclic tiredness. The fact remains that the Nature follows its policy of divide and rule in application of its law of re-union moving in cyclic rotation from division of world in diverse elements and matters.

-©Adv.B.S.More,13.12.2023

विज्ञानाला जोड धर्म व कायद्याची!

विज्ञानाला जोड धर्म व कायद्याची!

निसर्गधर्माचे वैज्ञानिक निसर्गनियम निसर्गातील सर्व सजीव, निर्जीव पदार्थांना (ज्यात उच्च जैविक व पर्यावरणीय पातळीवरील प्रचंड मोठी बुद्धिमत्ता असलेली माणसेही आली) समसमान लागू नाहीत तर विविध पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांनुसार वेगवेगळ्या नियमांनी लागू आहेत. त्यामुळे माणसाला लागू असलेला वैज्ञानिक निसर्गधर्म कोणता म्हणजे माणसाचे नैसर्गिक वर्तन काय व कसे या प्रश्नापासून मानवी बुद्धीच्या वैचारिक समजेचा आंतर्बाह्य संघर्ष सुरू होतो. याच वैचारिक संघर्षातून निसर्गात देव म्हणजे परमेश्वर आहे की नाही हा विचार पुढे आला. प्राचीन काळी मानवी बुद्धीची वैज्ञानिक समज आताइतकी प्रगल्भ नसल्याने देवाचे अस्तित्व मान्य करून त्या देवाची मनधरणी करणारा आध्यात्मिक धर्म निर्माण झाला. पृथ्वीवरील अनेक प्रदेशांत असे अनेक धर्म निर्माण झाला. यावर वैज्ञानिक चिंतन करून देवाचे अस्तित्व नाकारणारा गौतम बुद्धांचा नास्तिक धम्म (धर्म नव्हे) नंतर निर्माण झाला. आंतरमानवी वैचारिक संघर्षातून आता आस्तिक धर्म विरूद्ध नास्तिक धम्म असे वाद समाजात सुरू आहेत. या वादात निसर्ग पडत नाही की मानलेला देव पडत नाही. कारण हा मानवाच्या वैचारिक संघर्षातून निर्माण झालेला वाद आहे.

पूर्वी जगातील मानवी जीवनशैली धर्माला बांधली होती. पण धर्माने जगात हाहाकार माजवला तेंव्हा मानव समाजाला धर्माऐवजी निसर्ग  विज्ञाननिष्ठ कायद्याची व त्यावर आधारित शासनव्यवस्थेची गरज निर्माण झाली. पण अजूनही कायदा आधारित शासन व्यवस्थेला धर्माच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या!

प्रथमतः ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निसर्गाचे विज्ञान व त्याचा प्रत्यक्ष उपयोग करणारे तंत्रज्ञान हीच जगातील मूलभूत गोष्ट आहे. धर्म (किंवा धम्म) व कायदा या दोन्ही गोष्टी मूलभूत विज्ञानाला पूरक गोष्टी आहेत. या पूरक गोष्टी माणसाच्या भावना व बौद्धिक तर्क यावर मुख्यतः आधारित असल्याने  त्या शंभर टक्के वैज्ञानिक असू शकत नाहीत कारण यातील काही गोष्टी केवळ मानवी भावना व तर्क यावर आधारित आहेत. त्यांना वैज्ञानिक पुराव्याचा ठोस आधार नाही. तसे असते तर धर्मावरून वाद निर्माण झाले नसते व कायद्याचा योग्य अर्थ लावण्यासाठी कनिष्ठ न्यायालये ते उच्च न्यायालये ते सर्वोच्च न्यायालय अशी न्यायालयीन उतरंड समाजाला निर्माण करावी लागली नसती.

भावनिक-तार्किक तत्वज्ञान जेंव्हा मूलभूत विज्ञानाला वरचढ होते तेंव्हा मूलभूत विज्ञानाची वाट लागते. मग आभासी कल्पनांची तर गोष्टच नको. भावनिक-तार्किक तत्त्वज्ञान असो की आभासी कल्पना असोत, या गोष्टी मनात घोळत राहिल्याने समोरच्या नैसर्गिक वास्तवावरून वैज्ञानिक दृष्टी (मूळ लक्ष) हटली की अपघात, दुर्घटना होण्याचा धोका असतो.

निसर्गाचे वैज्ञानिक नियम हेच जगाचे मूलभूत सत्य आहे जे धर्म (किंवा धम्म) व कायदा यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, नव्हे ते जगात सर्वश्रेष्ठ आहे. विज्ञानाला पूरक असलेल्या धर्म व कायदाया गोष्टींपासून मानवी जीवनशैली (संस्कृती) आकार घेते. पण या पूरक गोष्टी विज्ञानापासून वेगळ्या केल्या की त्या डोईजड होतात व मानवी जीवन अवघड करून टाकतात. त्यांचे अती लाड अंगाशी येतात. कायदा भ्रष्टाचारी होऊ शकतो व संस्कृती सोयीनुसार बदलते हे सत्य लक्षात ठेवले तरी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

लग्नाला चला बघा लग्नाला चला!

एखाद्या गडगज श्रीमंत असलेल्या उद्योगपतीच्या किंवा पाॕवरबाज राजकीय नेत्याच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या मैदानात तयार केलेल्या राजमहालात असले की सार्वजनिक सभांमधून किंवा टी.व्ही. सारख्या माध्यमांतून एकमेकांवर जबरी टीकेचे आसूड ओढणारी राजकीय मंडळी, मंत्री, संत्री त्यांच्या खास रूबाबात अशा ठिकाणी जमा होतात तेंव्हा या मंडळींचे एकमेकांना आलिंगन देणे, खळखळून हसत एकमेकांशी हातात हात घालून गोड बोलणे, हळूच कानात हसत हसत काहीतरी बोलणे वगैरे गोष्टी खरंच बघण्यासारख्या असतात. सामान्य माणसांना या असल्या राजेशाही थाटाच्या लग्न सोहळ्यासाठी ना कसले निमंत्रण असते ना आत प्रवेश असतो. काही माध्यमांतून अशा सोहळ्याचे दर्शन सामान्यांना घडते आणि त्यांचे डोळे दिपून जातात. डोळे दिपणे म्हणजे थक्क होणे. पण एकमेकांशी तावातावाने भांडणारी ही मंडळी अशा कार्यक्रमात एवढी दिलखुलास कशी होऊ शकतात याचे मात्र फार आश्चर्य वाटते. धर्म, जातपात काय किंवा इतर मुद्दे काय, लोकांच्या मेंदूचा किती भुगा करतात ही मंडळी आणि पुन्हा अशा सोहळ्यात एकत्र येऊन हसतात काय, खिदळतात काय! समाजातील सर्वसामान्य माणसांना वाकुल्या दाखवण्याचाच हा प्रकार नव्हे काय?

पण मी या राजकीय मंडळींना असे नावे ठेवले तर हीच मंडळी वकील म्हणून मला म्हणतील की "तुम्ही वकील मंडळी नाही का तुमच्या अशिलांच्या वतीने न्यायालयात तावातावाने युक्तिवाद करता व पुन्हा कोर्टाच्या कँटिनमध्ये एकमेकांशी हसत खेळत गप्पा मारीत बसता किंवा वकिलांच्या खास मेळाव्यात न्यायाधीश मंडळींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून छान हितगुज करता, अगदी तसेच आमचे आहे". शेवटी ही राजकीय मंडळी आहेत. वेळ आली तर वकिलांचे सुद्धा तोंड बंद करतील मग सामान्य लोकांची तर गोष्टच विसरा. प्रश्न हा आहे की सर्वसामान्य लोकांनी यांचे हे असले विरोधाभासी वागणे निमूटपणे बघून ते सहजपणे घ्यायचे काय आणि ते किती घ्यायचे?

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.१२.२०२३

ढ पण चालू विद्यार्थी?

ढ पण चालू विद्यार्थी?

काही हुशार मुले ही जरा जास्तच हुशार असतात. ती ढ मुलांबरोबर संगनमत करून ढ मुलांच्या ऐवजी त्यांच्या वतीने स्वतःच परीक्षा देतात आणि ढ मुलांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न करतात. याला प्रोक्झी तोतयेगिरी म्हणता येईल. अशी प्रकरणे आमच्या काळातही घडत होती व वर्तमान काळातही अशा बातम्या माध्यमातून येत असतात. ही अशी तोतयेगिरी हुशार विद्यार्थी ढ मुलांच्या मैत्रीसाठी किंवा त्यांच्या प्रेमापोटी करीत नाहीत तर अशा ढ मुलांकडून मिळणाऱ्या पैशासाठी करतात. अशाप्रकारे गैरमार्गाने मिळणाऱ्या पैशासाठी हे अती हुशार विद्यार्थी नुसत्या विद्या देवतेशीच  गद्दारी करीत नाही तर अशा गैरव्यवहारात पैशाचा गैरवापर करून लक्ष्मी देवतेचाही अपमान करतात. लक्ष्मी चंचल असते असे म्हणतात. त्यामुळे ती याप्रकारच्या अप्रामाणिक विद्यार्थ्यांना कायम साथ देईलच असे नसते. पण विद्या देवता मात्र बौद्धिक मेहनतीचा आळस करणाऱ्या या ढ विद्यार्थ्यांना कायम लांबच ठेवते. तोतयेगिरी करणारे अती हुशार विद्यार्थीही कायद्याच्या कचाट्यात कधीतरी सापडतातच. एकवेळ लक्ष्मी देवता या ढ विद्यार्थ्यांना काही काळ जवळ करेल पण विद्या देवता मात्र अशा ढ विद्यार्थ्यांना तिच्याजवळ जराही फिरकू देत नाही. पण काही ढ मुले पुढे त्यांच्या चालूगिरीमुळे आयुष्यात नुसता भरपूर पैसाच नाही तर इतर बरेच काही मिळवतात व स्वतःला यशस्वी म्हणवून घेत समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवतात आणि विशेष म्हणजे समाजही अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांचा उदो उदो करण्यात कमीपणा मानत नाही. पण कोणता समाज? ज्या समाजात अप्रामाणिक व भ्रष्ट लोकांचा भरणा जास्त असतो अशाच समाजात अशा ढ पण चालू विद्यार्थ्यांची चलती असते. पण तसे तर दुधात पाणी मिसळून भेसळयुक्त दूध विकणारा दुधवालाही भरपूर पैसे मिळवून समाजात निर्लज्जपणे राहतो.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१२.२०२३

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

मैत्रकुल!

मैत्रकुल!

मैत्रकुल ही निराधार मुलामुलींना शिक्षण व निवारा देण्याचा प्रयत्न करणारी संस्था. या संस्थेच्या कल्याण येथील वसतीगृहात मी करोना लॉकडाऊन काळात भेट दिली होती व तिथल्या निराधार मुलामुलींशी चर्चा केली होती. तिथे मला असे कळले की या संस्थेचे संस्थापक व संचालक श्री. किशोर जगताप हे दोन्ही पायांनी अपंग असल्याने व्हिलचेअर वर असतात. संस्थेचे चांगले कार्य बघून मी खरंच भारावून गेलो होतो. पण अचानक दि. ११.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकात मैत्रकुल संस्थेचे संस्थापक श्री. किशोर जगताप यांच्याविरूद्ध विनयभंग व पोक्सो (बाल लैंगिक शोषण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची बातमी वाचली. याची योग्य ती पोलीस व न्यायालयीन चौकशी होईलच. पण एका चांगल्या सामाजिक कार्याला असले गालबोट लागणे हा मनाला धक्का होता. प्रामाणिकपणे समाजकार्य करणे हे तसेही आता धोक्याचे झाले आहे. कारण समाजातील विघ्नसंतोषी व भ्रष्टाचारी लोकांना प्रामाणिक या शब्दाचेच वावडे आहे. जेवढ्यास तेवढे असा हा कलियुगी जमाना आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.१२.२०२३

रविवार, १० डिसेंबर, २०२३

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

जीव मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

शाळा, काॕलेजातील मुले सहलीच्या निमित्ताने पाण्याजवळ गेली आणि खोलीचा अंदाज न आल्याने खोल समुद्रात, नदीत, तलावात बुडाली, अशा बातम्या अधूनमधून माध्यमात येतात व मन सुन्न होते. खरंच पाणी आणि आगीशी खेळ नको. पट्टीचे पोहायला येत असेल तर पाण्यात व अग्नीसुरक्षा तंत्रात तज्ञ असाल तर आगीत उतरावे न पेक्षा नको. तसेच अनोळखी ठिकाणी, निर्मनुष्य ठिकाणी एकट्याने जायचे दिवसाही धाडस नको, मग रात्रीची तर गोष्टच सोडा. आठवा ती मुंबईतील ओसाड शक्ती मिल कंपाऊंड मध्ये एकटे जाण्याचे धाडस केल्याने महिला पत्रकारावर बलात्कार झाल्याची भयानक घटना. आठवा ती एका मुलुंडच्या जंगलात सकाळी एकटे जाण्याचे धाडस केल्याने वकिलाला बिबट्या वाघाने खाल्ल्याची काही वर्षापूर्वीची भयानक घटना. मी साधारण १९६२ ते १९६६ या पाच वर्षाच्या काळात पंढरपूरला १ ली ते ५ वी इयत्तेत शाळेत शिकत होतो तेंव्हा तिथल्या चंद्रभागा नदीच्या पाण्यात किनाऱ्यापासून छातीभर पाण्यापर्यंत चालत जाऊन तिथेच पोहायचा प्रयत्न करायचो. पोहण्यात तरबेज असणारी कोळ्याची पोरे पुढे खोल नदी पात्रात बिनधास्त पोहायची. त्यांचे ते पोहणे बघून मला एकदा सहज पुढे जाण्याचा मोह झाला. पण एक पाऊल पुढे टाकल्याबरोबर पाणी गळ्याला लागले. मग घाबरून लगेच उलटा होऊन पोहत मागे फिरलो. कसले ते पोहणे. नुसतेच कडेकडेने तरंगणे. नदीच्या गावात पंढरपूरी राहूनही मी पोहायला शिकलो नाही. कोणी मला शिकवलेही नाही. मात्र तरीही ती चंद्रभागा नदी उनाडक्या करण्याचे माझे आवडते ठिकाण होते. पण तरीही जपून वागलो  म्हणून वाचलो. मस्ती कधीकधी जिवावर बेतते हे मात्र खरे. अगदी साठ वयात मी लोणावळ्याला एका रिसाॕर्ट मध्ये वरून गोल गोल चक्राकार फिरत खाली छातीभर पाण्यात घसरत येण्याचा आगाऊपणा केला होता. खाली पाणी छातीभर असले तरी वरून गोल चक्राकार फिरत येताना वेग भलताच वाढतो व त्या जोराने माणूस त्या पाण्यात खाली जाऊन गोल गटांगळ्या खात राहतो. मला पंढरपूरच्या चंद्रभागा नदीनंतर मृत्यूच्या दाढेतला तो फार भयंकर अनुभव ६० वयात लोणावळा रिसाॕर्ट मध्ये आला. याला कारण माझी निर्बुद्ध मस्ती. बुद्धी दिलीय ना त्या निसर्गाने म्हणा की परमेश्वराने मग ती नीट वापरा आणि भलते सलते धाडस करू नका. निसर्गाचे विज्ञान वरवर दिसते तेवढे खरंच सोपे नाही. त्यातील काही भागाचेच तंत्र तुम्ही आयुष्यात अवगत करू शकता. विज्ञानाच्या सर्वच शाखांत तुम्ही तज्ञ होऊ शकत नाही. मग जिथे अज्ञान आहे किंवा अर्धवट ज्ञान आहे तिथे भलते सलते धाडस करू नका. देव अशावेळी वाचवायला येत नाही. कारण असे संकट तुम्ही निर्बुद्धपणे स्वतःहून ओढवून घेतलेले असते जे निसर्गाच्या नियमांविरूद्ध असते. मित्रांनो, जीव खूप मोलाचा आहे, तो धोक्यात घालू नका!

-©ॲड.बी.एस.मोरे, ११.१२.२०२३

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

अवास्तवाशी मैत्री?

अवास्तवाशी मैत्री?

सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आणि लाचखोर, भ्रष्टाचारी शासकीय कर्मचाऱ्यांवर या केसेस पडल्यावर न्यायालयांत त्यांची दोषसिद्धी होऊन या लोकांना  शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त ८ टक्के म्हणजे केसेस पडल्यावर ९२% लोक न्यायालयातून निर्दोष सुटले. गुरूवार, दिनांक ७.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकात ही बातमी वाचली व एक माणूस म्हणूनच नव्हे तर एक वकील म्हणून माझे मन सुन्न झाले. वकील हा खरं तर न्यायासाठी लढणारा न्यायदूत असतो. पण अशा   वातावरणात त्याची वकिली कशी  चालणार?

इंग्रजीत ट्रूथ इज बिटर म्हणजे सत्य कटू असते अशी म्हण आहे. पण सत्य नुसते कटू नसते तर ते भयानक असते असे म्हणावे लागेल. कारण भ्रष्टाचारी सोडा पण खून, बलात्कार यासारखे भयंकर हिंसक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार सुद्धा पुराव्याअभावी संशयाचा फायदा मिळून न्यायालयांतून निर्दोष सुटून पुन्हा राजरोसपणे असले गुन्हे करण्यासाठी मोकाट सुटतात तेंव्हा मात्र कायदा, शासन व न्याय या तिन्ही गोष्टींवरील लोकांचा विश्वास उडतो.

वरीलप्रमाणे कायद्याचे राज्य या संकल्पनेवरील लोकांचा विश्वास उडाला की मग लोक अवास्तव गोष्टींच्या नादी लागतात कारण त्यांना भयानक वास्तव झेपत, पचत नाही. मनाला काल्पनिक, खोटं, भ्रामक, आभासी समाधान देणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टींचे पेव समाजात फुटलेय. अंधश्रद्धा हा त्यातलाच एक भाग. अशा आभासी, खोट्या मानसिक समाधानासाठी अवास्तव, निरर्थक गोष्टींत गुंतवून घेण्याची लोकांची मानसिकता ओळखून  तिचा गैरफायदा घेण्याच्या कुहेतूने काही धूर्त लोकांनी आभासी गोष्टींचे उद्योगधंदे सुरू केले ज्यावर या धूर्त लोकांचे अर्थकारण व राजकारणही चालू आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी लोकांची परिस्थिती आहे. स्वतःची बुद्धी नीट वापरून अशा परिस्थितीवर मात करण्याचे सोडून लोक देवधर्माच्या नादी लागून या संकटातून सुटण्यासाठी नवस, उपवास यासारखी धार्मिक कर्मकांडे करतात तेंव्हा मात्र ही परिस्थिती आणखी बिकट होते. कारण या परिस्थितीला देव नाही तर लोकांची भ्रामक मानसिकता जबाबदार असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.१२.२०२३

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

LIFE IS A CIRCLE!

LIFE IS A CIRCLE!

The life is a circle. You have to go round this life circle touching diverse life points standing on this circle for your touch and temporary stay at those points. Since these life points standing  on the life circle are meant only for your temporary stay with them you are not supposed to get struck with any one life point for long time. But some life points on life circle are very tricky and they tempt you to get struck with them for long time thereby trapping you in a vicious circle. This tricky situation demands intelligent move from you to get away from such silly points & their vicious circle fot moving on to the next life points waiting for you for your touch. This is challenging job. Live with this reality of life without getting trapped in vicious circle including that of imaginary things bombarded on your mind by some fools or crooks!

-©Adv.B.S.More, 9.12.2023

ओसीडी बाबा की जय!

ओसीडी बाबा की जय!

माझ्या जीवन चक्रातील त्याच त्या जीवन बिंदूंवर मी पुन्हा पुन्हा गोल फिरत येतोय व त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतोय म्हणून मी स्वतःचे उप नामकरण ओसीडी बाबा असे केले आहे. ओसीडी चा इंग्रजी विस्तार आॕब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसआॕर्डर असा आहे व याला मराठीत मंत्रचळ असे म्हणतात. हा एक मानसिक आजार आहे असे वैद्यकीय शास्त्र म्हणते. तसे असेल तर हा आजार हे माझे वास्तव आहे.

थोडक्यात मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे व या वास्तवात मी जगतो. आभासी चलनवलनात व भ्रामक कल्पनांत जगण्यापेक्षा मला वास्तविक होऊन वास्तवात जगणे पसंत आहे. आता माझ्या या चक्री वास्तवापेक्षा लोकांचे वास्तव जर वेगळे असेल तर त्यांचे माझे न जुळल्याने ते माझी चेष्टा करीत राहून मला त्यांच्यापासून लांब ठेवणार हे आलेच. हेही माझे एक वास्तव आहे व लहानपणापासूनच मी जगापासून थोडा हटके वागत असल्याने या वास्तवाचा अनुभव लहानपणापासून मी घेत आलो आहे. या वास्तवाचा स्वीकार मी केला आहे.

म्हणून माझी थोडक्यात ओळख लोकांना करून देण्यासाठी मी माझे उपनामकरण ओसीडी बाबा असे केले आहे जेणेकरून लोक त्यांना माझा ओसीडी आजार लागू नये म्हणून मला आणखी लांब ठेवतील. ओसीडी बाबा हे उपनामकरण आध्यात्मिक नसून वास्तविक आहे कारण मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे. लोक माझ्यापासून लांब राहिल्याने ओसीडी बाबा म्हणून ते माझा जयजयकार करणार नाहीत. मग त्यांनी मी स्वतःच माझा तसा जयजयकार करण्यापासून मला रोखू नये ही त्यांच्याकडून माझी किमान, माफक अपेक्षा आहे. ओसीडी बाबा की जय!

-©ॲड.बी.एस.मोरे उर्फ ओसीडी बाबा, ८.१२.२०२३

बिटकाॕईन?

बिटकाॕईन?

दिनांक ७.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकातील बातमीनुसार एका बिटकाॕईनचे मूल्य सुमारे (?) ३६ लाख ७९ हजार रूपये? हा काय प्रकार आहे? क्रिप्टो एक्सचेंज व बिटकाॕईन म्हणजे आभासी चलन आर्थिक व्यवहारात कोणी व का सुरू केले? याला जगभरात (भारत धरून) सरकारी मान्यता नसेल तर मग सरकारच्या मध्यवर्ती बँकेच्या नाकावर टिच्चून हे आभासी चलन अर्थ व्यवहारात कसे चालू आहे? डिजिटल क्रांतीचा हा भाग असेल तर ही क्रांती आर्थिक व्यवहारातील गैरव्यवहारास प्रोत्साहन देणारी ठरेल काय? मग तुफान गाजलेल्या भारतातील नोटबंदीचे काय? ई.डी. चे याबाबतीत धोरण काय आहे? हे आभासी चलन आर्थिक भ्रष्टाचार वाढवेल की कमी करेल? माझ्या डोक्यात या आभासी चलनातून अनेक प्रश्न निर्माण झालेत. माझ्या जुजबी माहितीप्रमाणे बिटकाॕईन हे कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही आणि त्याला कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेचे पाठबळ नाही म्हणजे त्याची शासनमान्य हमी नाही. म्हणजे ते भ्रामक/काल्पनिक चलन आहे व त्यामुळे या चलनास भारतात बंदी आहे. माझा प्रश्न हा आहे की अशा आभासी, भ्रामक, काल्पनिक चलनाची बातमी होतेच कशी? याचा अर्थ हे आभासी चलन समांतर अर्थव्यवस्थेचा भाग बनून कायद्याच्या राज्यात कायदा व शासन व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून आपला काळा कारभार बिनधास्त करीत आहे. मग लोकांचा विश्वास कायदा व शासन व्यवस्थेवरून कमी  होईल की नाही?

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.१२.२०२३

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

भ्रष्टाचार!

असल्या भ्रष्टाचारी वातावरणात मी भ्रष्ट न होता माझी वकिली टिकवली हे माझे आयुष्यातील फार मोठे यश! -ॲड.बी.एस.मोरे

MUSIC!

INTRODUCING MYSELF IN STAR MAKER MUSIC FORUM!

I am advocate having 35 years of legal practice and 67 age. I live at Dombivli in state of Maharashtra. I love music specially old Hindi and Marathi film songs of golden era. But I am just a bathroom singer and afraid to sing with fear that my singing may be found insulting to big legends in music like Mohammed Rafi, Kishor Kumar, Mukesh, Lata Mangeshkar, Asha Bhosale, Suman Kalyanpur etc. I am their one of the big fans. I am just zero in music before them. Salute to them!

-Adv.B.S.More, 8.12.2023

शरण तुला भगवंता!

मानवी विकास हा उत्क्रांतीचाच भाग!

पिढ्यानपिढ्या आपली मान ताणत झाडावरची पाने खाण्याचा अथक सातत्यपूर्ण प्रयत्न करीत राहिल्याने हळूहळू जिराफ या प्राण्याची मान लांब झाली. सगळ्या प्राण्यांनी असे लांब व्हायचे प्रयत्न केले पण सगळे लांब झाले नाहीत. काहीजण प्रयत्न करूनही आखूडच राहिले. त्यांनी मग "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान" ही म्हण डोक्यात घेऊन आखूड जीवन जगणे पसंत केले असावे. म्हणजे आळस केल्याने त्यांची उत्क्रांती खुंटली असावी. माणूस हाही एक प्राणीच असल्याने त्याच्या बाबतीत सुद्धा उत्क्रांतीचा हा प्रयत्नवादी नियम सार्थ ठरला असावा.

यातून हा वैज्ञानिक निष्कर्ष काढता येईल की, सजीवांची उत्क्रांती ही सजीवांनी केलेल्या सातत्यपूर्ण, अथक प्रयत्नांतूनच झाली असावी. हा बोध घेऊनच मानव समाजात "प्रयत्नांती परमेश्वर" ही म्हण निर्माण झाली असावी. या म्हणीनुसार माणूस त्याच्या साचेबंद, रटाळ नैसर्गिक जीवनात नाविन्य शोधतो व त्यातून मूलभूत नैसर्गिक वास्तवातून नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करीत राहतो. या नवनिर्माणालाच मानवी विकास असे म्हणतात. याचा अर्थ निसर्गाचे विज्ञान जर साचेबंद, रटाळ वास्तव तर मानवी बुद्धीचे तंत्रज्ञान हे नाविन्यपूर्ण नवनिर्माणाचे वास्तव असे म्हणता येईल.

नवनिर्माणाच्या याच ध्यासातून व तशा सातत्यपूर्ण, अथक प्रयत्नांतून मानवाने इतर प्राण्यांच्या पुढे जाऊन स्वतःचा विकास केला आहे. या मानवी प्रयत्नांना पूरक विकासाची नैसर्गिक संधी निसर्गात दडलेली आहे म्हणून हे नवनिर्माण माणसाला शक्य झाले आहे. या संधीलाच  निसर्गाची किंवा परमेश्वराची कृपा असे म्हणता येईल. पण या कृपेची अट प्रयत्न हीच आहे. आळसातून विकास किंवा नवनिर्माण शक्य नाही.

प्रयत्न हे नुसते विकासाचेच नसतात तर विकासाच्या आड येणाऱ्या वाईट  सवयी, वाईट विचार सोडण्याचेही असतात. याचा अर्थ हाच की आपण निसर्गाला काही मागायचे नसते तर सातत्यपूर्ण, अथक प्रयत्न करून निसर्गातून ते घ्यायचे असते. पण असे प्रयत्न करूनही काही भौतिक गोष्टी साध्य झाल्या नाहीत तर त्याने निराश न होता निसर्गाचा निर्माता, आईबाप, सगळं काही कोणीतरी परमेश्वर आहे असे मानून "शरण तुला भगवंता" हे एकच वाक्य शांतपणे मनी उच्चारून शांत व्हायचे असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.१२.२०२३

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

Atheism versus Theism

ATHEISM VERSUS THEISM!

I seriously and studiously watched the conclusive function of 16th and 17th September, 2023 Atheists Conference video and was delighted to hear thought provoking lecture of great poet, dialogue writer and  learned philosopher Shri Javedji Akhtar. Some basic questions and points came in my mind after listening to lecture of Javedji Akhtar & question answer session that followed after lecture. All those sitting on dias including Mr. Javedji Akhtar and members of audience are learned & intellectual persons and still following questions/points continue in my mind.

(1) Is world communally divided by God believing religion or otherwise?

(2) Can any nation be communal by its culture which may not be religious culture?

(3) Will there be end to caste based communalism once all people become atheists?

(4) Are our names such as Javed, Thempton, Peter, Ramesh etc. have their origin to religion and by what names we shall be recognised if such religion disappears from world?

(5) Why even the scientists, doctors, engineers who are learned in science do believe in God and continue to remain religious? Does it mean they are intellectually scientific but emotionally religious? How long this gap between science and religion shall continue in the minds of intellectual persons?

(6) Is the term "blind faith" wrong because faith is blind all time? What is the difference between logical but unproved belief in God and unproved (yet to be proved) science fiction?

(7) Are community culture and religion inter mixed? How can we separate religion from culture in Indian context?

(8) Can human brain act in illogical and irrational way in relation to the scientific facts? Are illogical, irrational and unscientific same things?

(9) Does being atheist mean being scientific and being theist mean being unscientific? Because even some scientists, doctors, engineers are theists?

(10) Is conflict between atheism and theism mean conflict between science and religion?

As a lawyer having learned about basic science in school curriculum and law in college curriculum and having practised law for almost 35 years in and out of courts established by social government, I have my thoughtfully conceived philosophy about theism. I do believe in God because I have my own logic. That logic is nothing can happen automatically and there cannot be creation without there being creator and for me that creator is God. My belief in God is definitely logical (which logic is yet to be proved as there are many things in universe which are yet to be proved by science) but definitely NOT unscientific. This is mainly because my own understanding about God is NOT the same as that of other theists and their God religion. It is different. It is scientific. I do NOT believe that God answers prayers. All religions have many mythological beliefs called  superstitions. I do NOT follow them. I logically think that there must be all powerful God particle in  universe (within Nature) having all powerful mass, energy and spirit which has created Universe/Nature by big bang explosion of its sub-particle as well as by its evolution and this God particle must be controlling Nature as per diverse laws of Nature which are NOT religious but scientific. For me, my God is scientific, logical and also rational and I have to follow him by being scientific, logical and rational!

-Adv.B.S.More©25.10.2023

https://youtu.be/1jtaAdnAZtk?si=gBElliBrhqBgIZDD

स्वतःच्या मर्यादा व स्वतःची प्रमाणे ओळखली पाहिजेत!

स्वतःच्या मर्यादा व स्वतःची प्रमाणे ओळखली पाहिजेत!

कोणतीही गोष्ट मर्यादेत व प्रमाणात केली ती त्रासदायक होत नाही. उतार वयात हा नियम जरा जास्तच कडक होतो. नाहीतरी उतार वयात शरीर व मनाची लवचिकता कमी झालेलीच असते.

मर्यादा व प्रमाणबद्धतेचा नियम सर्वांना लागू असला तरी प्रत्येकाची जडणघडण व परिस्थिती सारखी नसल्याने प्रत्येकाच्या मर्यादा जशा वेगळ्या असतात तशी प्रमाणेही वेगळी असतात. त्यामुळे सक्रिय राहण्याचा प्रत्येकाचा आवाका वेगळा असतो.

काहींची वये इतकी लांबतात की त्यांचा वृद्धापकाळ त्यांच्या बाल व तरूण वयापेक्षा खूप मोठा होतो. लांबलेल्या या आयुष्याला बोनस आयुष्य म्हणावे की प्रमाणबद्धता चुकलेले आयुष्य म्हणावे हे कळत नाही. पण या बाबतीत समसमान परिस्थिती नाही.

पण आयुष्य लांबलेली माणसे जेंव्हा उतार वयातही बाल व तरूण वयात असल्याप्रमाणे उंच उड्या मारायला जातात तेंव्हा कधीतरी हाडे मोडून घेतात. स्वतःच्या मर्यादा व स्वतःची प्रमाणे ओळखली पाहिजेत!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.१२.२०२३


I AM NOT RETIRING!

I AM NOT RETIRING FROM ADVOCACY AND FROM BEING SOCIAL!

My dear friend Adv. Vijay Tawde, thank you very much for sharing this eye opening video with me. This is really great inspiring video at the turning point of my social declaration that I am retiring from advocacy. I am actually lucky to be in legal profession as an advocate because this profession is basically social and I am basically social minded person.

The decision of retirement from advocacy was sad & bad decision of killing myself means killing my inborn social spirit. Hence, I am cancelling said foolish decision of retirement from advocacy. It is correct to say that advocate never retires till he is dead by his body and mind. The dead here also means physically and mentally handicapped or incapacitated. This video made me realise my silly  mistake and I am now back to my advocacy including legal consultancy once again. I am also restarting my facebook account once again along with my other social activities such as my society's executiveship and other social contacts.

I have not worked as any servant or employee in any private or government organization to get retired compulsorily after reaching age of say 58 or 60 with some pension or bank balance in my hand? What will I do after retiring from advocacy? Just sitting idle at home? Just writing my thoughts in the social media without face to face social contacts with people or just chatting with my wife who is also idling away her time on you tube and TV entertainment after finishing her household work including some round up in market for purchasing vegetables? She is alright with her household work because she has been doing so with interest as a full time housewife since our marriage in the year 1985. But how can I be like her all of a sudden? Can I share my intellectual ideas and thoughts with her? Can I give my social speeches to her in home? Absolutely not!

Let me remain creative as earlier and social too till I really become incapable of being so by force of Nature and thank you friend once again for opening my eyes by sharing this inspiring video!🙏🙏

-Adv.B.S.More, 6.12.2023