https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

नैसर्गिक वर्तन!

कोरोना आणि माणसाचे नैसर्गिक वर्तन?

(१) माणूस ना पूर्ण वासनिक ना पूर्ण भावनिक, ना पूर्ण भौतिक ना पूर्ण आध्यात्मिक, ना पूर्ण वैज्ञानिक ना पूर्ण धार्मिक व ना पूर्ण ज्ञानी ना पूर्ण अज्ञानी! अशा अर्धवट माणसाकडून पूर्ण नैसर्गिक वर्तन शक्य आहे का हा मला पडलेला एक मूलभूत प्रश्न! निसर्गाच्या नैसर्गिक सादाला पूर्णपणे नैसर्गिक प्रतिसाद देण्याच्या मानवी कृतीलाच मानवाचे पूर्ण नैसर्गिक वर्तन म्हणता येईल.

(२) माणूस हा असा अपूर्ण, अर्धवट असल्याने त्याने शासन व्यवस्थेचे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ असे तीन तुकडे केले व हे तीन तुकडे एकमेकांवर अंकुश ठेवीत कायदा व न्याय यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण खरंच यात हे तीन तुकडे यशस्वी झालेत का? जगातून अन्याय संपलाय का? हजारो कायदे व लाखो न्यायनिवाडे, बापरे मला धडकीच भरते यांच्या भरतीकडे बघत!

(३) निसर्गाने माणसाला अपूर्ण, अर्धवट ठेऊन त्याच्यापुढे नैसर्गिक वागण्याचे आव्हान उभे केलेय. मानवी वर्तन, मग ते शैक्षणिक असो, आर्थिक असो की राजकीय असो, ते खरोखरच नैसर्गिक आहे का हा प्रश्न महत्वाचा आहे. याचे कारण म्हणजे याच प्रश्नाच्या उत्तरात नैसर्गिक न्याय लपला आहे. 

(४) पण माणसाला निसर्गाशी पूर्णपणे समरस होत पूर्णपणे नैसर्गिक वर्तनातून नैसर्गिक न्याय मिळविणे शक्य झालेय का? त्यासाठी बुद्धीमान  माणसाला निसर्गाचे पूर्ण ज्ञान नको का? पण निसर्गाचे असे पूर्ण ज्ञान कोणत्याच माणसाला नसते आणि मग अशा अर्ध ज्ञानातून सुरू होतो तो सावळागोंधळ व अन्याय! सद्या कोरोनाच्या बाबतीत असेच काहीसे वाटत आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा