https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

कायदा व धर्म वेगळे नाहीत!

कायदा व धर्म यांना वेगळे समजणे मुळातच चुकीचे!

मानव समाज हा निसर्ग सृष्टीचाच एक छोटा भाग आहे. त्यामुळे फुले व काटे या दोन्ही गोष्टी जशा निसर्गाच्या भाग आहेत तशाच त्या मानव समाजाच्याही भाग आहेत. या दोन्ही भागांतील फुलांचा आस्वाद कसा घ्यायचा याचे आर्थिक नियम व या दोन्ही भागांतील काट्यांना बाजूला कसे करायचे याचे राजकीय नियम निसर्गाच्या मूलभूत कायद्यात आहेत व हा नैसर्गिक कायदा निसर्गाच्या विज्ञानाचा भाग आहे. निसर्गातील व समाजातील फुलांचे आकर्षण व निसर्गातील व समाजातील काट्यांची भीती प्रत्येक मनुष्याला असते. प्रत्येक माणूस या सर्व फुलांना एकटाच ओरबाडू लागला व सर्व काट्यांशी एकटाच लढू लागला तर त्यातून समाजातील एकही माणूस आर्थिकदृष्ट्या सुखी व राजकीयदृष्ट्या शांत, सुरक्षित होऊ शकणार नाही. म्हणून निसर्गाच्या आर्थिक व राजकीय कायद्याचाच पूरक भाग असलेला समाजाचा आर्थिक व राजकीय कायदा बुद्धीमान माणसांनी शोधला व त्या सामाजिक कायद्याच्या अंमलबजावणी साठी मानव समाजातूनच एक स्वतंत्र राज्यव्यवस्था निर्माण केली. समाजाचे नीतीनियम पाळले नाहीत तर समाजाकडून कोणालाच फुलांचे सुख मिळणार नाही व कोणालाच काट्यांपासून संरक्षण मिळणार नाही असा या सामाजिक कायद्याचा दंडक असतो. निसर्गाच्या व मानव समाजाच्या कायद्यांत समाविष्ट असलेल्या नीतीनियमांनाच नीतीधर्म म्हणता येईल. म्हणून कायदा व धर्म यांना वेगळे समजणे हे मुळातच चुकीचे आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. मी सायन्स लॉ एक्सप्रेस नावाचे फेसबुक पेज सुरू केले व माझ्या फेसबुक खात्याचेही तेच नाव आहे. निसर्ग, निसर्गाचे विज्ञान, त्या विज्ञानात असलेला कायदा व त्या कायद्याचाच धर्म असा माझ्या ज्ञान, विचारांचा सारांश आहे. तो सर्वांना तसा पटेलच असे नाही. म्हणून वाचकांना नम्र विनंती की या लेखातील पटेल तेवढेच घ्यावे व बाकीचे सोडून द्यावे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा