https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

माणूस कुठे हरवलाय?

माणूस कुठे हरवलाय?

शरणागत होऊन अन्याय सहन करीत जगणे व अन्याय अती झाला की शेवटी अन्यायापुढे आत्महत्या करणे किंवा योद्धा होऊन अन्याय सहन न करता अन्यायाविरूद्ध लढत जगणे व अन्याय अती झाला की शेवटी अन्यायाचा खून करणे या दोन टोकांमध्ये माणसाचे अमूल्य जीवन कुठेतरी हरवलेय. या दोन टोकांमध्येच जगा व जगू द्या या न्याय धोरणाचे कुठे तरी तीन तेरा वाजलेत. या दोन टोकांमध्येच न्यायाने जगण्याचे अर्थकारण व अन्यायाविरूद्ध नेटाने लढण्याचे राजकारण अधांतरी लटकलेय.

-ॲड.बी.एस.मोरे©१०.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा