https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

झोपडपट्टीतला कोरोना!

झोपडपट्टीतला कोरोना!

अहो, कोरोना असा का आटोक्यात येत असतो फक्त स्वयसेवी संस्था व डॉक्टरांच्या प्रयत्नांनी? झोपडपट्टीतील लोकांची मजबूत प्रतिकार शक्ती व न घाबरण्याची वृत्ती हे मुख्य कारण आहे या गरिबांच्या वस्तीत कोरोना आटोक्यात राहण्यासाठी. अशा स्वयंसेवी संस्था व डॉक्टर उच्चभ्रू वस्तीत लावून बघा व मग काय फरक पडतोय का ते बघा. वांद्रे येथील बेहराम पाडा किंवा धारावी झोपडपट्टी बघा. शिरायलाही जागा नाही तिथल्या गल्ली बोळात व एका एका छोट्या घरात १० ते १५ माणसे राहतात तिथे. ही खास भारतीय प्रतिकार शक्ती आहे. जगाच्या तुलनेत भारतात एवढी प्रचंड मोठी लोकसंख्या असूनही इथे कोरोना आटोक्यात आहे याचे मुख्य कारण म्हणजे साजूक तुपातले न खाता चटणी भाकरीवर दाटीवाटीने राहून निर्माण झालेली भारतीय प्रतिकार शक्ती! स्वयंसेवी संस्था व डॉक्टर हे पूरक सेवा देतात. पण मजबूत प्रतिकार शक्तीच नसती तर त्या पूरक सेवेचा किती उपयोग झाला असता याचा नीट विचार करावा लोकांनी!

-ॲड.बी.एस.मोरे©२.८.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा