https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १४ जुलै, २०२४

गोंधळ की धिंगाणा?

गोंधळ की धिंगाणा?

मानवी मनाची भटकंती थांबता थांबत नाही. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी या धावत्या, भटक्या मनाची स्थिती असते. या मनात भावना व बुद्धी यांचा सतत खेळ चाललेला असतो. काहीजण याला भावना व बुद्धीची मारामारी म्हणतात. हा अविकसित मानवी मनाचा गोंधळ आहे की विकसित मानवी मनाचा धिंगाणा हे कळायला मार्ग नाही. परंतु हे मात्र खरे की अशा या मानवी मनाला मनानेच आवर घालणे हे व्यक्तीपुढेच नव्हे तर समाजापुढेही आव्हान असते. अशा अनेक उतावीळ मानवी मनांना आवर घालण्याचा प्रयत्न सामाजिक कायदा करीत असतो. कायद्याला असे उतावीळ होऊन चालत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १४.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा