https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, १० जुलै, २०२४

आयुष्य कठीणच नव्हे तर असुरक्षित झालेय!

आयुष्य कठीणच नव्हे तर असुरक्षित झालेय!

बेदरकार वाहनाने धडक दिल्याने रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलीस हवालदाराचा मृत्यू, धनिक पुत्राच्या भरधाव कारने धडक देऊन दूरवर फरफटत नेल्याने महिलेचा मृत्यू, गर्दीत लोकल ट्रेन पकडताना रेल्वे रूळावर पडून महिलेने तिचे दोन्ही पाय गमावले, डॉक्टरच्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू, वकिलाच्या हलगर्जीपणामुळे कोर्टाने वकिलाला झापले, पोलिसांनी गंभीर गुन्ह्याचा तपास नीट केला नाही म्हणून न्यायालयाचे पोलिसांवर ताशेरे, एकतर्फी प्रेमातून मुलाने मुलीचा भररस्त्यात खून केला व बघ्याच्या गर्दीतले लोक त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी मोबाईलमधून त्या खूनाचा व्हिडिओ काढत बसले, कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबाची आत्महत्या, भोंदू बाबाने भोळ्या भक्तांना फसवले, असल्या बातम्या दररोज वाचायला मिळत आहेत. त्यातून समाजमनाचा स्तर तर कळतोच पण आयुष्य नुसते कठीणच नव्हे तर किती असुरक्षित झालेय हेही कळते. या नकारात्मक बातम्या परिस्थितीच्या हिमनगाचे फक्त वरचे टोक आहे. त्याखाली बरंच काही नकारात्मक आहे जे वर दिसत नाही. म्हणून सर्वकाही आलबेल आहे असे नाही. अशा नकारात्मक वातावरणात देवाचे नाव घेऊन सकारात्मक मानसिकता जपणे ही खूप अवघड गोष्ट आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा