https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २० जुलै, २०२४

मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या आणि मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला!

मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या आणि मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला!

मुंबईतील कापड गिरण्या चालू होत्या तेव्हा त्यात नोकरी करणाऱ्या मराठी माणसांची घरे व नोकऱ्या दोन्ही गोष्टी मुंबईतच जवळ होत्या. कापड गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईत घरे राहिली पण नोकऱ्या गेल्या. गिरणी कामगारांची मुले मोठी झाली व लग्ने होऊन संसारी झाली. पण मुंबईतले एकच छोटे घर सर्व मुलांना लग्नानंतर अपुरे पडू लागले. म्हणून ते छोटे घर विकून आईवडील, पोरं अशी सर्वच मराठी माणसे मुंबईबाहेर लांब रहायला गेली. आता घरे मुंबईबाहेर व इतर उद्योगातील नोकऱ्या मुंबईत अशी अवस्था झाल्याने बंद पडलेल्या गिरण्यांतील कामगारांची मराठी पोरं लोकल ट्रेनला लटकत दररोज जीव मुठीत घेऊन घर मुंबईबाहेर तर नोकरी मुंबईत अशा लटकत्या अवस्थेत जगत आहेत. पण हे सर्व स्थित्यंतर घडेपर्यंत मुंबईतील झोपडपट्ट्या काबीज करून त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधलेल्या इमारतींच्या फुकटच्या सदनिकांत मराठी माणसे किती रहात आहेत हा अभ्यासाचा विषय आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा