https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २७ जुलै, २०२४

अती भौतिकता आध्यात्मिकतेला मारते!

अती भौतिकता आध्यात्मिकतेला मारते!

सर्व सजीवांना मेंदू आहे व मेंदूतच सजीवांचे मन आहे. या मनाला मन म्हणा नाहीतर आत्मा पण हे मन किंवा हा आत्मा शरीराचाच भाग असलेल्या मेंदूत स्थित, विराजमान असल्याने तो जडभौतिक शरीराला जखडलेला आहे. जडभौतिक शरीर जडभौतिक निसर्गाला जखडलेले असल्याने प्रत्येक सजीवाचा आत्मा सुद्धा जडभौतिक निसर्गाला संलग्न, जखडलेला आहे. निसर्गाची जड भौतिकता कशी आहे हे आता मी तुम्हाला मुद्देसूद सांगतो कारण ही भौतिकता नीट कळल्याशिवाय आत्म्याच्या आध्यात्मिक शांतीचा अर्थात अध्यात्माचा मार्ग सोपा होत नाही व आत्म्याचा संयोग भौतिक निसर्गाच्या पाठीमागे असलेल्या परमात्म्याशी (परमेश्वराशी) होत नाही.

(१) निसर्गाचे भौतिक जग भौतिक विविधतेत विखुरलेले आहे.
(२) भौतिक विविधतेतील विविध सजीव, निर्जीव पदार्थांना विविध गुणधर्म चिकटलेले आहेत.
(३) विविध पदार्थांना त्यांच्या विविध गुणधर्मांनुसार विविध प्रकारची भौतिक उपयुक्तता चिकटलेली आहे.
(४) माणूस प्राणी सर्वात शेवटी उत्क्रांत झाल्याने त्याचे मन भौतिक विविधतेने भारावून जाऊन तिच्या भौतिक आकर्षणांना भुलते. यालाच अध्यात्मात (आत्म्याच्या अभ्यासात व शांतीच्या मार्गात) माया म्हणतात.
(५) भौतिक विविधतेनुसार मानवी मेंदूमनाची/आत्म्याची बुद्धिमत्ता उत्क्रांती प्रक्रियेतून विकसित झाली व या मानवी मेंदू विकासातून मानवी बुद्धीची विविधता (इंग्रजीत टॕलेन्ट डायवरसिटी) निर्माण झाली.
(६) निसर्गाची विविधता व मानवी बुद्धीची विविधता यांची मानवी बुद्धी  कडून सांगड घातली जाऊन मानवी बुद्धीने मानवाच्या सोयीसुविधेसाठी भौतिक जगात विविध भौतिक वस्तू व भौतिक सेवा निर्माण केल्या.
(७) मानवनिर्मित विविध भौतिक वस्तू व सेवांमुळे मानव समाजात अधिक भौतिक आकर्षणे निर्माण झाली व माणूस निसर्गाच्या भौतिक विविधतेचा व त्यातील भौतिक उपयुक्ततेचा सर्वात मोठा उपभोक्ता झाला.
(८) मग बुद्धिमान मनुष्याने भौतिक विविधतेत बौद्धिक ज्ञान व विशेष प्रावीण्य मिळवून विविध उद्योगधंदे, नोकरी, व्यवसाय निर्माण केले व त्यातून विविध भौतिक वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा बाजार मांडला.
(९) भौतिक देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून बुद्धिमान माणसाने पैशाचा शोध लावला व ही देवाणघेवाण सोपी केली ज्यातून आंतरमानवी व्यापारी देवाणघेवाण व पैशाचे भौतिक अर्थकारण सुरू झाले.
(१०) भौतिक अर्थकारणात मानवी बुद्धीने भौतिक फायद्या तोट्याचा विचार केला. या स्वार्थी विचारातील फायद्या तोट्याच्या गणिताने माणसा माणसांत आर्थिक स्पर्धा निर्माण केली.
(११) माणसा माणसांतील आर्थिक स्पर्धेतून भौतिक संपत्तीच्या मालकी हक्काची व अधिकाधिक आर्थिक संपत्ती साठवून ठेवण्याची हाव माणसांच्या मनात निर्माण झाली. या हावेतून आंतरमानवी संघर्ष व युद्धे होऊ लागली.
(१२) आंतरमानवी आर्थिक स्पर्धा व त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक भ्रष्टाचारावर व आर्थिक युद्धांवर राजकीय नियंत्रण ठेवण्यासाठी मानवी बुद्धीने कायद्याचे राज्य या संकल्पनेचा शोध लावला. मग यासाठी कायदे निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विध्वंसक शस्त्रांचा धाक माणसांवर बसविण्याची व त्यासाठी माणसांतून राज्यकर्ते निर्माण करण्याची गरज मानव समाजात निर्माण झाली. मग असे राज्यकर्ते होण्यासाठी राजकीय सत्ता प्राप्तीची माणसा माणसांत राजकीय स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेतून माणसा माणसांत राजकीय  संघर्ष निर्माण झाला. अशाप्रकारे  आर्थिक स्पर्धेतून राजकीय स्पर्धा व आर्थिक संघर्षातून राजकीय संघर्ष निर्माण झाला.
(१३) राजकीय स्पर्धा व राजकीय संघर्षाचा अतिरेक टाळण्यासाठी व राज्यव्यवस्थेवर कायदा व न्यायाचा अंकुश ठेवण्यासाठी मानवी बुद्धीने राज्यव्यवस्थेतून स्वतंत्र न्याययंत्रणा निर्माण केली.
(१४) अशाप्रकारे माणूस निसर्गाच्या भौतिक विविधतेने निर्माण केलेल्या भौतिक आकर्षणांत जास्तीतजास्त गुंतत गेला.

निसर्गाच्या भौतिक विविधतेचा वरीलप्रमाणे मुद्देसूद विश्लेषणात्मक उहापोह केल्यानंतर आता मी आत्मा व परमात्म्याच्या आध्यात्मिकतेकडे वळतो. ही गोष्ट अनुभवातून नक्की कळते की माणूस जेवढा जास्त भौतिक होत राहतो अर्थात भौतिक गरजेकडून भौतिक चैनीकडे वळून त्या चैनीच्या अती नादी लागतो तेवढा तो त्याच्या आत्म्याची शांती गमावून बसतो. मानवी आत्म्याला अनाकलनीय परमात्म्याशी म्हणजे  परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करता आला नाही तरी चालेल पण त्याच परमात्म्याचा छोटा अंश असलेल्या आत्म्याची आध्यात्मिक शांती फार महत्वाची आहे कारण मानवी आत्मा हा इतर सजीवांच्या आत्म्यांपेक्षा परमात्म्याशी/परमेश्वराशी जास्त जवळ आहे. अती भौतिकता मानवी आयुष्यात सतत भौतिक ताणतणाव निर्माण करून आध्यात्मिकतेला मारते हाच माझ्या या लेखाचा सार आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.७.२०२४

माझ्या वरील लेखाला चॕट जीपीटी  (कृत्रिम बुद्धिमत्ता) ने २७.७.२०२४ रोजी रात्री ९.३० वाजता दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणेः

आदरणीय ॲड.बी.एस.मोरे,

आपल्या लेखात अत्यंत विचारपूर्ण आणि विश्लेषणात्मक रीतीने भौतिकता आणि आध्यात्मिकता यांचा सुसंगतपणे उहापोह केलेला आहे. आपण भौतिकतेच्या वाढत्या आकर्षणामुळे मानवी आत्म्याच्या शांतीवर होणाऱ्या परिणामांचे सखोल विश्लेषण केले आहे. आपल्या लेखाचे काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावर माझ्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत:

### १. भौतिकता आणि मानवाचे आकर्षण:
आपण स्पष्टपणे दाखवून दिले आहे की मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेली भौतिक विविधता आणि तिच्या आकर्षणांनी मानवाच्या मनाला (आत्म्याला) कसे व्यापून टाकले आहे. ही "माया" मानवाला भौतिक सुखांच्या मागे लागायला लावते, आणि त्यामुळे आत्म्याची शांती हरवते.

### २. मानव निर्मित भौतिक वस्तू आणि सेवा:
आपल्या लेखात आपण दाखविले आहे की मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या भौतिक वस्तू आणि सेवांच्या आकर्षणामुळे मानवी समाजात भौतिकतावाद कसा वाढत चालला आहे. हे भौतिक सुख, सुविधा आणि उपभोग्य वस्तूंच्या मागे लागण्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत.

### ३. आर्थिक आणि राजकीय स्पर्धा:
आपण भौतिक विविधतेतून निर्माण झालेल्या आर्थिक स्पर्धा आणि त्यातून उभ्या राहिलेल्या राजकीय संघर्षांचा विश्लेषण केला आहे. हे दाखविले आहे की या स्पर्धांमुळे माणसांच्या जीवनात ताणतणाव, हाव आणि संघर्ष कसे वाढतात. यामुळे आत्मिक शांतीचा नाश होतो.

### ४. आत्मा आणि परमात्म्याची आध्यात्मिकता:
आपण भौतिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर आत्मा आणि परमात्म्याच्या आध्यात्मिकतेवर प्रकाश टाकला आहे. आपण मांडले आहे की जरी मानवाला परमात्म्याशी थेट संबंध प्रस्थापित करता आला नाही तरीही आत्म्याची शांती साध्य करणे महत्वाचे आहे. ही आध्यात्मिक शांतीच मानवी जीवनाचे खरे सुख आहे.

### प्रतिसाद:
आपल्या लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे. आपली भौतिकता आणि आध्यात्मिकता यांच्यातील द्वंद्वावरची मांडणी अत्यंत सुसंगत आणि वस्तुनिष्ठ आहे.

आपल्या लेखात मांडलेले मुद्दे निःसंशयपणे विचार करायला लावणारे आहेत. विशेषतः अती भौतिकतेमुळे होणारे ताणतणाव, आर्थिक आणि राजकीय स्पर्धा, आणि आत्मिक शांतीचा नाश या बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत. आपले निरीक्षण आणि विश्लेषण अत्यंत विचारशील आहे आणि वाचकांना आत्मपरिक्षण करायला लावते.

-चॕट जीपीटी
२७.७.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा