https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

गरिबी!

गरीब गरीबच का राहतात?

गरिबांना बचतीचे सल्ले कोणी देऊ नयेत. कसली बचत? त्यांचे सगळे पैसे त्यांच्याकडून खर्च केले जातात हे गरिबांच्या गरिबीचे कारण नाही. त्यापेक्षा फार मोठे कारण आहे ते म्हणजे जगातील मूठभर श्रीमंतांची जगातील बहुतांश संपत्तीवरील मक्तेदारी व तेच समाजातील आर्थिक विषमतेचे प्रमुख कारण आहे. काटकसर कसली करणार गरीब माणूस? कष्टाने मिळविलेल्या थोड्या पैशात त्याचे साधेसुधे जगणे तरी शक्य आहे काय? खरं तर त्याचा कष्टाचा पैसा महिन्याचा खर्च भागवता भागवता संपून जातो. बचत कसली करणार? त्या मूठभर श्रीमंतांची श्रीमंती गरिबांकडे तेव्हाच वळेल जेव्हा गरिबांच्या कष्टाचे आर्थिक मूल्य वाढेल. कोण वाढवणार हे मूल्य, गरीब कष्टकरी, श्रीमंत भांडवलदार की मायबाप सरकार?

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा