https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

समाजमाध्यमी मैत्री!

समाज माध्यमावरील मित्रांशी असलेली वैचारिक मैत्री ही फक्त हवेतली मैत्री, शेवटी प्रत्यक्ष व्यवहार व मदतीसाठी जवळ कोण आहे याला महत्त्व असते, मुले तिकडे परदेशात व आईवडील इकडे भारतात, त्यांनी दररोज कितीही आॕनलाईन गुजगोष्टी करोत, पण दूर परदेशात स्वतःच्या मुलांवर आलेले संकट दूर करायला भारतातील आईवडील तिकडे प्रत्यक्षात धावून जाऊ शकत नाहीत व भारतात आईवडिलांवर आलेले संकट दूर करायला परदेशातील मुले इकडे प्रत्यक्षात धावून येऊ शकत नाहीत, शेवटी प्रत्यक्षात जवळ काय आहे याला महत्व असते! -ॲड.बी.एस.मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा