https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

मानवी जीवन सर्वोत्तम का?

मानवी जीवन सर्वोत्तम का?

निसर्गाची भौतिकता अशुद्ध आहे, प्रदूषित आहे. निसर्गाच्या भौतिकतेत हिंसाचार आहे, भ्रष्टाचार आहे, व्यभिचार आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे. निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेने भारलेले मानवी शरीर व मानवी मन भोगी आहे, वासनांध आहे. हे भौतिक मानवी मन त्याच्या  आतल्या अंतरात्म्याचे म्हणजे शुद्ध आध्यात्मिक आत्म्याचे अस्तित्वच नाकारते. अंतरात्म्याचे अस्तिव नाकारणारे भौतिक मन निसर्गातील  परमात्म्याचे म्हणजे शुद्ध चैतन्याचे अर्थात परमेश्वराचे अस्तित्व नाकारते आणि म्हणून अशा भौतिक मनाला परमेश्वराच्या शुद्ध अध्यात्माचे वावडे असते. मानवी जीवन सर्वोत्तम आहे कारण अनेक मूलद्रव्ये, अनेक पदार्थ यांची भेसळ असलेल्या निसर्गाच्या अशुद्ध भौतिकतेतही शुद्ध अंतरात्म्याची व त्याबरोबर शुद्ध परमात्म्याची आध्यात्मिक अनुभूती घेण्याची सुवर्णसंधी परमेश्वराने फक्त मनुष्यालाच दिली आहे, इतर पदार्थ, प्राणीमात्रांना नाही ज्यांना या शुद्ध चैतन्याची जाणीवही नसते. जिथे जाणीवच नाही तिथे अनुभूती कसली?

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.१.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा