https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

श्रीमंती!

अबब, केवढी ही श्रीमंती!

जगातील मूठभर नव्हे तर फक्त ५ श्रीमंतांनी जगातील बहुसंख्य लोकांना गरीब ठेवलेय. एवढी प्रचंड संपत्ती या ५ जणांकडे एकवटलीच कशी? लोकांच्या मतांवर निवडून येणारी सरकारे काय करीत आहेत? या ५ जणांची श्रीमंती जसजशी पुढे वाढत जाईल तसतशी जगातील गरिबी वाढत जाईल. आपल्या महान परमेश्वराला फक्त हे ५ श्रीमंत लोकच अत्यंत प्रिय झालेले दिसत आहेत. मग आपण काय करायचे? काही नाही आपण ईश्वर नाम सत्य है असे म्हणत आपल्या महान परमेश्वराचा जप करीत बसायचे व हेच आपले प्रारब्ध म्हणून जमेल तेवढे आनंदात जगायचे!

-©ॲड.बी.एस.मोरे, १७.१.२०२४

(संदर्भः आॕक्सफॕम संस्थेचा वार्षिक विषमता अहवाल, बातमी लोकसत्ता दिनांक १६.१.२०२४)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा