https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

गाठ पडली ठका ठका!

गाठ पडली ठका ठका!

राजकारण, धर्म, जात हे विषय हल्ली फारच धोक्याचे वाटू लागलेत. लोक खूप संवेदनशील असतात या विषयांवर! म्हणून हल्ली मी या विषयांवर सावधपणे व्यक्त होतोय. यात वाद वाढत गेले तर लोक भावनातिरेकाने जीव घ्यायला कमी करीत नाहीत. हे समाजमाध्यम आहे. हितशत्रू लोक प्रतिक्रिया देत नसतीलही पण गुपचूप तुमच्या लिखाणाचे वाचन करीत नसतील कशावरून? मी पूर्वी खूप सडेतोड लिहायचो. पण हल्ली तसले रोखठोक लिखाण कमी केलेय. आपण पोटतिडकीने लिहून काही उपयोग नाही हे कळून चुकलेय. माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या चाव्या मोठ्या लोकांच्याच हातात आहेत हेच खरे! त्यांना राग आला तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला चिलटा सारखे चिरडून मारतील हे सत्य लक्षात घेऊन हळूहळू सावध लिहायला, सावध प्रतिक्रिया द्यायला शिकत चाललोय. काही धूर्त मंडळी ही खूप हुशार, कावेबाज, दगाबाज असतात. ज्या गोष्टी मला या ६४ वयात कळू लागल्यात त्या काही लोकांना तरूणपणातच त्यांच्या घरातूनच कळलेल्या असतात. त्यामुळे मध्यम वयातच अशा व्यक्ती व्यवहार चतुर झालेल्या असतात. त्यांच्यापुढे या उतार वयात मी शहाणपणाचा आव आणून समीक्षा करणे हा मूर्खपणा होय! म्हणून माझे सामान्य जीवन आनंदात व शांतीत जगण्याचा प्रयत्न करतोय. जवळ नुसते ज्ञान असून उपयोग नसतो. इतरही बऱ्याच गोष्टी जवळ लागतात मोठी हिंमत करायला. त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत हे सत्य आहे. त्यामुळे स्वतःचा वकूब बघून वागायला हवे. नाहीतर गाठ पडली ठका ठका असे व्हायचे!

-ॲड.बी.एस.मोरे©१३.१०.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा