https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, २५ फेब्रुवारी, २०२४

मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना!

मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना!

दैनंदिन जीवनात व निसर्गसृष्टीत आपोआप होणाऱ्या काही गोष्टी  अनैच्छिक असतात. त्या विचार करण्यासाठी नसतात कारण त्यावर मानवी मेंदूमनाचे नव्हे तर निसर्गाचे प्रत्यक्ष नियंत्रण असते जे मानवी मेंदूच्या आवाक्याबाहेर असते.

मानवी मेंदूमन ऐच्छिक कृतीसाठी विचार करते जो विचार नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतो. ऐच्छिक गोष्टींपैकी काही गोष्टी तात्पुरत्या अल्पकालीन ऐच्छिक कृतीसाठी असतात ज्यावर मेंदूमनाने वरवर तात्पुरता विचार करायचा असतो. त्यावर सखोल विचार करणे चुकीचे. पण काही ऐच्छिक गोष्टींवर मात्र मेंदूमनाला सखोल विचार करावा लागतो. अशा सागोष्टी दीर्घकालीन योजनाबद्ध ऐच्छिक कृतीसाठी असतात.

मानवी मेंदूमनाच्या विचार प्रक्रियेत वरील तीन गोष्टींची गल्लत करणे, त्यांची एकमेकांत भेळमिसळ करणे चुकीचे.

मानवी मेंदूमनाच्या वरील विचार प्रक्रियेतून वैद्यक शास्त्राच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येईल की काही सामान्य आजार तात्पुरत्या अल्पकालीन ऐच्छिक वैद्यकीय कृतीसाठी असतात जे नुसत्या औषधांनी बरे होतात तर काही गंभीर आजार दीर्घकालीन सखोल वैचारिक ऐच्छिक वैद्यकीय कृतीसाठी असतात ज्यांना औषधांबरोबर सर्जिकल ट्रिटमेंटची गरज पडू शकते.

मानवी मेंदूमनाच्या वरील विचार प्रक्रियेतून समाजशास्त्र व तसेच सामाजिक कायद्याच्या बाबतीत विचार केला तर असे दिसून येईल की माणसांनी माणसांवर केलेल्या काही सामान्य अन्यायांचे निरसन सामाजिक कायद्याचा सामान्य विचार करणाऱ्या शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेच्या पातळीवर करता येते तर काही गंभीर सामाजिक अन्यायांचे निरसन सामाजिक कायद्याचा सखोल विचार करणाऱ्या शासनाचा स्वतंत्र भाग असलेल्या न्याय यंत्रणेच्या पातळीवर करता येते.

वरील विश्लेषणातून मानवी विचार प्रक्रियेची मूलभूत रचना थोडक्यात सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.२.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा