https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, ३१ मे, २०२०

मनाशी मैत्री

मनाशी मैत्री!

ओम् अशी आध्यात्मिक संज्ञा विश्वाला कोणी दिली? दिलीही असेल कोणीतरी साधु संतांनी! म्हणून तेच सत्य मानायचे काय? शेवटी देव कोणी पाहिलाय? ते सत्य आहे की अशीच कोणाच्या तरी डोक्यातून आलेली संकल्पना आहे? कोणीतरी देव मानतो म्हणून आपणही देव मानायचा का? मानणे व असणे यात फरक नाही का? बरं देवाला मानल्यावर त्याची प्रार्थना  अमूक अमूक वेळी व अमूक अमूक पद्धतीनेच केली पाहिजे हे कोणी ठरविले? कोण ओम् सुख शांती परमेश्वरा म्हणेल तर कोण हरी हरी म्हणेल तर कोण आणखी काही! म्हणजे देवाचे अस्तित्व जसे वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता येत नाही तशी देवाची प्रार्थना कशी करावी यावर धर्माचे एकमत नाही. विविध धर्म विविध पद्धतीने देवाला मानतात व भजतात. असे मानणे व भजने हे वैश्विक सत्य नाही हेच यातून सिद्ध होत नाही का? आपल्या डोक्यात एखादी  गोष्ट लहानपणापासून भरवली गेली की मनाला त्या गोष्टीची सवय लागते. नंतर आयुष्यात सत्य काय हे मनाला कळल्यावर सुध्दा मन त्याला न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा टाकून देऊ शकत नाही. मग त्या न पटणाऱ्या गोष्टी सुध्दा आपल्या मनाला मरेपर्यंत चिकटूनच राहतात. हे फक्त देवाचेच नाही तर कोणत्याही गोष्टीचे असेच आहे. मनाला जेवढा दाबण्याचा प्रयत्न करावा तेवढे ते चेंडूसारखी उसळी घेऊन उलटे वागते. म्हणून मनाशी कठोर वागण्याऐवजी त्याच्याशी गोड मैत्री करण्यातच बुद्धीचा शहाणपणा!

-ॲड.बी.एस.मोरे©१.६.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा