https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २१ मार्च, २०२४

कलियुगाची समाप्ती?

कलियुगाची समाप्ती?

उत्क्रांती काळ म्हणजे संक्रमण काळ. माणूस या संक्रमण काळातून हळूहळू विकसित होत पुढे चालला आहे. विकास म्हणजे नुसता भौतिक विकास नव्हे तर आध्यात्मिक विकासही. माणूस सद्या वैज्ञानिक दृष्ट्या सुशिक्षित झाला आहे पण आध्यात्मिक दृष्ट्या सुसंस्कृत होणे बाकी आहे. दोन्ही दृष्ट्या विकसित युग म्हणजे सतयुग. सतयुग येणे बाकी आहे. सद्या कलियुग चालू आहे. कलियुग म्हणजे कलीने काड्या घालण्याचे, उपद्रव करण्याचे युग. या युगात कलीचा प्रभाव जरी वाढला असला तरी देव निष्प्रभ झालेला नाही. कलीला फटके देत त्याला त्याची जागा दाखवून देण्याचे देवकार्य चालू आहे. या कलीला पूर्णपणे नष्ट करून कलियुगाचा पूर्ण अंत करून सतयुग प्रस्थापित करण्यासाठी देवाचा पूर्णावतार होणे बाकी आहे.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे असे लवकर व्हावे अर्थात सतयुग लवकरात लवकर यावे ही परमेश्वर चरणी प्रार्थना!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.३.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा