https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, ३० मे, २०२४

प्रदूषण, प्रदूषण आणि प्रदूषण!

प्रदूषण, प्रदूषण आणि प्रदूषण!

पर्यावरण संरक्षण कायद्यात जल, वायू, ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या तरतूदी आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, हरित न्यायालय यंत्रणा याच कायद्याच्या भाग आहेत. खरं तर वनस्पती व मानवेतर पशुपक्षी निसर्गात प्रदूषण करीतच नाहीत. अतीशहाणा माणूसच त्याच्या नको त्या उद्योगामुळे निसर्गात विविध प्रकारचे प्रदूषण करतो. निसर्गाच्या विविधतेत या मानवनिर्मित विविध प्रदूषणाची भर पडलीय व जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे हे मानवनिर्मित प्रदूषण वाढत गेले व ते वाढतच आहे. जंगली प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण करणे काय, किंवा मानवी निवासस्थानांसाठी व औद्योगिक कारखान्यांसाठी जंगले जाळून, डोंगर फोडून पर्यावरणाचा नाश करणे काय, हे सर्व उद्योग म्हणजे प्रदूषणाचे उद्योग. हे प्रदूषण  नको त्या मानवी उद्योगामुळे होत असल्याने त्याचे औद्योगिक प्रदूषण असे नामकरण केले पाहिजे. हे औद्योगिक प्रदूषण जल, वायू, ध्वनी प्रदूषणाच्या पलिकडे गेलेय. रात्रीचा वाढत चाललेला मानवनिर्मित प्रखर प्रकाश हा प्रकाश प्रदूषणाचा नवीन प्रकार. रस्त्यावरील वाहतूक कोंडी काय किंवा दृष्टीस पडणाऱ्या मानवी वर्तनाचे इतर भयंकर प्रकार काय, हे सर्व दृष्टी प्रदूषणाचे प्रकार. मानवी प्रदूषणाचा पुढचा विचित्र प्रकार म्हणजे मानवी विचार प्रदूषण.  समाजात धार्मिक, वांशिक, जातीय, भाषिक, प्रांतिक द्वेष पसरवणारे संकुचित मानवी विचार हे तर समाज स्वास्थ्य बिघडवणारे भयंकर विचार प्रदूषण होय. हे सर्व अनैसर्गिक व म्हणूनच बेकायदेशीर होय. उलट्या बुद्धीचा बेअक्कल माणूस स्वतःच्या फालतू, बेकायदेशीर विचार, वर्तनाला रोखण्यासाठी स्वतःच कायद्याची निर्मिती करतो आणि पुन्हा स्वतःच तो कायदा मोडतो आणि वर पुन्हा स्वतःच्या कुशाग्र, तीक्ष्ण बुद्धीचा टेंभा मिरवतो. काय म्हणावे या मानवी मूर्खपणाला?

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.५.२०२४

बुधवार, २९ मे, २०२४

ग्लोबल वार्मिंग!

ग्लोबल वार्मिंग!

ग्लोबल वार्मिंग हे तसे उपयुक्त नाहीतर थंड पृथ्वीवर सजीव सृष्टी जगूच शकणार नाही ही ग्लोबल वार्मिंगची सकारात्मक गोष्ट कळली. पण हे वार्मिंग वाढत गेले तर पृथ्वीवरील पाण्याची जास्तीतजास्त जास्त वाफ होऊन बारमाही पाऊस पडून येणाऱ्या व उंच पर्वतावरील बर्फ वितळून त्यातून येणाऱ्या गोड्या पाण्याच्या पुरांची भीती आहेच व त्यातून सृष्टीचक्रही बिघडू शकतो. पृथ्वीवर माणसाची लोकसंख्या वाढत जाण्याने त्याच्या उच्छवासातून बाहेर पडणारा कार्बन वायू वाढत जाण्याने निर्माण होणाऱ्या ग्लोबल वार्मिंग पेक्षा या वाढत्या लोकसंख्येच्या औद्योगिक उपदव्यापामुळे ग्लोबल वार्मिंग वाढण्याची भीती जास्त आहे. वाढती लोकसंख्या म्हणजे वाढती आंतरमानवी स्पर्धा, जंगले जाळून व डोंगर तोंडून बिल्डरांकरवी निर्माण होत जाणारी सिमेंटची जंगले व वाढते उद्योग यामुळे ग्लोबल वार्मिंग वाढू शकते. माणूस हा त्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे विध्वंसक होत चाललाय नाहीतर तो निसर्गाला पूरक असा चांगला बुद्धिमान प्राणी आहे. पण तो लोकसंख्या वाढवत चाललाय म्हणजे त्याची बुद्धी कुजत चाललीय असे वाटते व ही गोष्ट पर्यावरण संरक्षण कायद्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.५.२०२४

माध्यमाचे विपणन महत्व!

माध्यमाचे विपणन महत्व!

ज्याप्रमाणे वस्तू उत्पादन केंद्र हे वस्तूंची सार्वजनिक विक्री करून त्यातून करोडो रूपयांचा नफा कमावण्याचे माध्यम असते तसे चित्रपट निर्मिती केंद्र हे चित्रपट कलाकारांच्या कलेची सार्वजनिक विक्री करून त्यातून करोडो रूपयांचा नफा कमावण्याचे व चित्रपट निर्मिती केंद्राच्या त्या नफ्यातून कलाकारांनी कोट्यवधी रूपयांची कला फी मिळविण्याचे माध्यम असते. तसेच राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या बाजारात नेत्यांना उभे करून लाखो, करोडो लोकांची पसंती मिळवून राजकीय सत्ता प्राप्त करण्याचे माध्यम असते. अर्थात तुम्हाला जर भरपूर पैसा, सत्ता व मानसन्मान मिळवायचा असेल तर तुमच्याकडे विशिष्ट कामाचे नुसते ज्ञान, कौशल्य असून उपयोग नसतो तर तुमचे ते ज्ञान, कौशल्य असंख्य लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रबळ सार्वजनिक माध्यम तुमच्या सोबत असणे गरजेचे असते. फेसबुक, यु ट्युब सारख्या समाज माध्यमांचा उपयोग सुद्धा आता चाणाक्ष निर्मिती केंद्रे, व्यावसायिक लोक त्यांची उत्पादने, सेवा हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यातून आर्थिक नफा कमावण्यासाठी करतात ही गोष्ट आता लपून राहिली नाही. अशी सार्वजनिक माध्यमे तुमच्याकडे जेवढी जास्त तेवढी तुमची नफ्याची संधी मोठी आणि या संधीसाठी तुमच्याकडे एखाद्या कामाचे नुसते ज्ञान, कौशल्य असून उपयोग नसतो तर जवळ भरपूर पैशाचे भांडवल लागते. निस्वार्थी समाजसेवी भावनेने समाज माध्यमातून समाज प्रबोधक लेखन करून ज्ञान, विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करणारी माणसे अशा बाजारात मूर्ख ठरतात.

-©ॲड.बी.एस.मोरे, २९.५.२०२४

मंगळवार, २८ मे, २०२४

सिलेक्टिव्ह व इलेक्टिव्ह मेरिट!

सिलेक्टिव्ह व इलेक्टिव्ह मेरिट!

शैक्षणिक ज्ञान संस्थांच्या परीक्षांचे निकाल म्हणजे ज्ञानसाधनेचे सिलेक्टिव्ह मेरिट तर लोकशाही राज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकप्रियतेचे इलेक्टिव्ह मेरिट, या दोन्ही मेरिटना एकत्र नांदवायचे म्हणजे कायद्याची तारेवरची कसरत! -ॲड.बी.एस.मोरे
२८.५.२०२४

शैक्षणिक ज्ञान संस्थांच्या परीक्षांचे निकाल म्हणजे ज्ञानसाधनेचे सिलेक्टिव्ह मेरिट आणि लोकशाही राज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकप्रियतेचे इलेक्टिव्ह मेरिट या विचारांवर आधारित ॲड. बी.एस. मोरे यांनी दिलेला हा विचार खूपच महत्त्वाचा आहे. यातून असे स्पष्ट होते की, शैक्षणिक प्रणालीमध्ये गुणवत्ता आणि ज्ञान यांना अधिक महत्त्व दिले जाते, ज्यामुळे निवडक विद्यार्थ्यांना संधी मिळते. तर, लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेच्या मताने निर्णय घेतला जातो, ज्यामध्ये लोकप्रियता महत्त्वाची ठरते.

या दोन प्रणालींना एकत्र नांदवणे म्हणजेच, शैक्षणिक गुणवत्ता आणि लोकशाही प्रक्रियेतून मिळणाऱ्या लोकप्रियतेचा समन्वय साधणे हे कायद्याच्या चौकटीत राहून करणे खूपच कठीण आहे. याचा अर्थ असा की, दोन्ही प्रणालींचे गुणधर्म वेगवेगळे असताना त्यांना एकत्रितपणे व्यवस्थापित करणे हे एक आव्हान आहे. यासाठी संतुलित आणि न्याय्य दृष्टिकोनाची आवश्यकता असते ज्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विकास होऊ शकेल.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता), २८.५.२०२४

वेळेचे बंधन!

वेळेचे बंधन!

वेळेच्या बंधनाचे ओझे घेऊन आयुष्यभर धावल्यानंतर उतार वयात हे ओझे थोडे सुद्धा नकोसे होते! -ॲड.बी.एस.मोरे, २८.५.२०२४

या वाक्यातील संदेश अत्यंत सार्थक आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रकारचे बंधन, जबाबदाऱ्या आणि ओझे येतात. कामाच्या ठिकाणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आणि सामाजिक बांधिलकी यामुळे व्यक्तीला वेळेचा वापर फारच काटेकोरपणे करावा लागतो. पण, जेव्हा वय उताराला लागते, तेव्हा हे बंधन आणि ओझे टाकून, निवांत आणि शांतीपूर्ण जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. हे वाक्य हेच सांगते की, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर व्यक्तीला मनःशांती, आराम आणि बंधनमुक्त जीवनाची गरज असते.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता),
२८.५.२०२४

एकटा राहणारा माणूस!

एकटा राहणारा माणूस!

एकटा राहणारा माणूस सगळ्यांना नीट ओळखून बसल्यावरच एकटे राहणे पसंत करतो, अनुभवातून शहाणा झालेला असा माणूस एकटे राहण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम असतो! -ॲड.बी.एस.मोरे, २८.५.२०२४

हे वाक्य एकटेपणाच्या निवडीबद्दल एक महत्वपूर्ण आणि विचारप्रवण दृष्टिकोन व्यक्त करते. एकटा राहणारा माणूस हा समाजातील विविध व्यक्ती आणि त्यांच्या वागणुकीचा अनुभव घेऊनच एकटे राहणे निवडतो. त्याच्या या निर्णयामागे अनुभवाने आलेले ज्ञान असते. अनेकदा समाजातील दांभिकता, खोटेपणा किंवा मतलबीपणा यामुळे असे निर्णय घेतले जातात. एकटेपणाच्या निवडीमागे आत्मनिर्भरता, स्वातंत्र्य आणि मानसिक शांततेची इच्छा असते. त्यामुळे, असा माणूस एकटेपणातही समाधानी आणि समाधानी राहू शकतो, आणि तो त्याच्या निर्णयावर ठाम असतो.

-चॕट जिपीटी (कृत्रिम बुद्धिमत्ता), २८.५.२०२४

सोमवार, २७ मे, २०२४

वाटणी!

हिस्स्याची वाटणी चोरीच्या मालाची असो, राजकीय सत्तेची असो, भांडवली संपत्तीची असो की आईबापाच्या इस्टेटीची असो, शेवटी वाटणी ही वादाला कारणीभूत होतेच, वाटणीचे वाद सुरूवातीला दिवाणी स्वरूपाचे असले तरी पुढे त्यांना हिंसक स्वरूप लागून त्यांचे रूपांतर फौजदारी गुन्ह्यांत होऊ शकते, इतकी ही वाटणी भयंकर असते. -ॲड.बी.एस.मोरे