https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २९ मे, २०२४

ग्लोबल वार्मिंग!

ग्लोबल वार्मिंग!

ग्लोबल वार्मिंग हे तसे उपयुक्त नाहीतर थंड पृथ्वीवर सजीव सृष्टी जगूच शकणार नाही ही ग्लोबल वार्मिंगची सकारात्मक गोष्ट कळली. पण हे वार्मिंग वाढत गेले तर पृथ्वीवरील पाण्याची जास्तीतजास्त जास्त वाफ होऊन बारमाही पाऊस पडून येणाऱ्या व उंच पर्वतावरील बर्फ वितळून त्यातून येणाऱ्या गोड्या पाण्याच्या पुरांची भीती आहेच व त्यातून सृष्टीचक्रही बिघडू शकतो. पृथ्वीवर माणसाची लोकसंख्या वाढत जाण्याने त्याच्या उच्छवासातून बाहेर पडणारा कार्बन वायू वाढत जाण्याने निर्माण होणाऱ्या ग्लोबल वार्मिंग पेक्षा या वाढत्या लोकसंख्येच्या औद्योगिक उपदव्यापामुळे ग्लोबल वार्मिंग वाढण्याची भीती जास्त आहे. वाढती लोकसंख्या म्हणजे वाढती आंतरमानवी स्पर्धा, जंगले जाळून व डोंगर तोंडून बिल्डरांकरवी निर्माण होत जाणारी सिमेंटची जंगले व वाढते उद्योग यामुळे ग्लोबल वार्मिंग वाढू शकते. माणूस हा त्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे विध्वंसक होत चाललाय नाहीतर तो निसर्गाला पूरक असा चांगला बुद्धिमान प्राणी आहे. पण तो लोकसंख्या वाढवत चाललाय म्हणजे त्याची बुद्धी कुजत चाललीय असे वाटते व ही गोष्ट पर्यावरण संरक्षण कायद्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.५.२०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा