https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, १ एप्रिल, २०२४

नाती जपली पाहिजेत!

नाती जपली पाहिजेत!

या मोबाईल, व्हॉटसॲप, फेसबुक मुळे नातेवाईक मंडळी दुरावली आणि ज्यांचा प्रत्यक्षात काहीही उपयोग नाही अशा अनोळखी लोकांचा भरणा आयुष्यात झाला. माझ्या पुतण्यासाठी लग्नस्थळे जमविण्याच्या निमित्ताने हवेने भुगलेला माझा आॕनलाईन फुगा, भ्रमाचा भोपळा फुटला आणि नातेवाईक मंडळींचे महत्व अधोरेखित झाले. -बाळू

मी माझा पुतण्या सिद्धीसाठी माझ्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेले वधुवर सुचक मंडळांचे सर्व अॕप्स डिलिट केले. सगळी आॕनलाईन फालतूगिरी चाललीय या ॲप्सवर. कुठून हे असले दिवस बघायची वेळ आली खरंच वैतागलो. आता पुण्याची नातेवाईक मंडळी म्हणजे पवार भाऊजी, रमेश, हेमा, कांचन, बळी, गजानन, मोहोळचा शिवा, मोहोळ येथील सिद्धीच्या आजोळची मंडळी, बदलापूरची आशा, वसंतराव, राजू, बंटी, कोल्हापूरची सुशा, सोनी, दिपू, रवि, जमलेच तर वांगणीची नानी, मगराच्या वाडीची नानी व स्वतः मी या नातेवाईक मंडळी शिवाय मला तरी आता कोणता मार्ग दिसत नाही सिद्धीला मुलगी (वधू) बघण्यासाठी. -बाळू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा