https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

विश्वास पुरावा मागतो, पण श्रद्धा पुरावा मागत नाही!

विश्वास पुरावा मागतो, पण श्रद्धा पुरावा मागत नाही!

निसर्ग म्हणजे पदार्थ विश्वाचा पसारा आणि विज्ञान म्हणजे निसर्गातील विविध पदार्थांच्या विविध गुणधर्मांचे ज्ञान व त्यांच्या गुणधर्मीय हालचाली प्रेरित व नियंत्रित करणाऱ्या विविध कायदेनियमांचे ज्ञान.

निसर्ग व निसर्गाचे विज्ञान मानवी इंद्रियांना दृश्य व मानवी मेंदूला आकलनीय आहे. पण निसर्गाच्या व निसर्ग विज्ञानाच्या मागे असलेली प्रेरणे मागील महाप्रेरणा व शक्ती मागील महाशक्ती मानवी इंद्रियांना अदृश्य आहे व मानवी मेंदूला अनाकलनीय आहे. ती महाशक्ती अदृश्य व अनाकलनीय असल्याने तिच्या विषयी मानवी मनाला नेहमी कुतूहल व जिज्ञासा आहे. पण ती महाशक्ती अदृश्य व अनाकलनीय असल्याने कुतूहल, जिज्ञासेने तिचे कितीही संशोधन केले तरी ती मूर्त, स्पष्ट होत नाही.

मग त्यातून मानव समाजात दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे या महाशक्तीचा पुरावा मिळत नसल्याने ती अस्तित्वातच नाही असे म्हणून मोकळा होणारा नास्तिक समूह व दोन म्हणजे ही महाशक्ती अस्तित्वात आहे यावर श्रद्धा ठेवून तिलाच परमेश्वर मानून तिची भक्ती व प्रार्थना करणारा आस्तिक समूह. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विश्वास पुरावा मागतो पण श्रद्धा पुरावा मागत नाही.

निसर्गातील सुप्त महाशक्ती ही अदृश्य व अनाकलनीय असल्याने तिच्यावर श्रद्धा असली तरी तिची भक्ती व प्रार्थना कशी करावी या प्रश्नाचे उत्तर मानवी मनाला मिळत नाही. म्हणून हे उत्तर देणारे अनेक आध्यात्मिक धर्म जगात निर्माण झालेत. पण हे सर्व धर्म मानवनिर्मित असल्याने त्यांच्यात एकवाक्यता नाही. कारण शेवटी या सर्व धर्मांचा निर्माता कोण तर मानवी मेंदूच ज्याला परमेश्वर नावाची महाशक्ती कायमच अनाकलनीय राहिली आहे. तरीही परमेश्वरावर तर्कभावनिक श्रद्धा असल्याने आस्तिक माणूस परमेश्वर भक्ती व प्रार्थनेची एखादी सोपी व मनाला भावणारी पद्धत एखाद्या धर्मातून उचलतो व तिचे श्रद्धेने पालन करतो.

©ॲड.बी.एस.मोरे, १.५.२०२४

मानवी जीवनाचे दोन भाग व दोन व्याप!

मानवी जीवनाचे दोन भाग व दोन व्याप!

मानवी जीवनाचे दोन भाग, जन्माला चिकटलेला बालपण व तारूण्याचा पहिला भाग व मृत्यूला चिकटलेला प्रौढत्व व वृध्दत्वाचा दुसरा भाग, या दोन मानवी जीवन भागाचे दोन व्याप, बालपण व तारूण्याला चिकटलेला ज्ञानार्जनाचा शैक्षणिक व्याप आणि प्रौढत्व व वृध्दत्वाला चिकटलेला अर्थार्जनाचा कार्मिक व्याप, ज्ञानार्जन व अर्थार्जन करता करता मर्यादित, तात्पुरते आयुष्य कधी संपून जाते हे कळतच नाही आणि शेवटी मिळवलेले ज्ञान व अर्थ मागे सोडून जगाचा कायमचा निरोप घ्यावा लागतो!

-©ॲड.बी.एस.मोरे, १.५.२०२४

सोमवार, २९ एप्रिल, २०२४

चक्रव्यूह!

चक्रव्यूह!

जगात विविध पदार्थ, पशूपक्षी व माणसे यांची नुसती रेलचेल आहे. नुसत्या मनुष्याचा विचार केला तर पृथ्वीवर उत्क्रांत झालेल्या पदार्थ व जीवसृष्टीच्या पसाऱ्यात असंख्य माणसे दिसतात. या माणसांकडून त्यांच्या जैविक उपभोगासाठी सतत निर्माण होत जाणाऱ्या असंख्य वस्तू व सेवांची असंख्य उत्पादने दररोज निर्माण होतात. या उत्पादनांच्या विविध निर्मिती (उत्पादन) प्रक्रिया पहायला मिळतात. या सर्व उत्पादन प्रक्रिया राबवणारे मानव संचालित अनेक कारखाने दिसतात. या अनेक कारखान्यांचे श्रीमंत मालक व त्यात राबणारे असंख्य कामगार, कर्मचारी, व्यवस्थापक मंडळी दृष्टीस पडतात. या कारखान्यांतून दररोज बाहेर पडणाऱ्या उत्पादनांचा प्रचंड मोठा बाजार भरलेला दिसतो ज्यात अनेक व्यापार, धंदे, व्यवसाय, नोकऱ्यांचा सहभाग दिसतो. अनेक कारखाने व बाजारातील देवाणघेवाणीत प्रत्येक मानवी घटक त्याच्या आर्थिक उत्पन्न व खर्चाचे दैनंदिन व वार्षिक हिशोब ठेवताना दिसतो. मानवनिर्मित वस्तू  सेवांच्या विक्रीवर सरकार कडून वसूल करण्यात येणारा अप्रत्यक्ष कर व वस्तू सेवांच्या विक्रीनंतर अप्रत्यक्ष करासह सर्व खर्च वजा केल्यावर  शिल्लक राहिलेल्या नफ्यावरील सरकार कडून वसूल केला जाणारा प्रत्यक्ष कर या सर्व करवसूलीचा हिशोब सरकारला ठेवावा लागतोच पण जमा झालेल्या या करातून सार्वजनिक व्यवस्थेवर सरकारी खर्च किती झाला वगैरेचा हिशोबही सरकारला ठेवावा लागतो. या सर्व प्रचंड मोठ्या कारभारामागे असलेले  सामाजिक विज्ञान व या सामाजिक विज्ञानाचा पाया असलेले निसर्ग विज्ञान या दोन्ही विज्ञानांचा शाळा/कॉलेज मधून सखोल अभ्यास करून मग पुढे तरूण, प्रौढ व वृद्ध वयात या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव करणे ही गोष्ट मानवी जीवनात असते. या सर्व मानवकृत गोष्टींवर देखरेख ठेवत त्यांना नैसर्गिक व सामाजिक शिस्त लावणे हे महत्त्वाचे कार्य लोकनियुक्त सरकार कडून पार पाडले जाते. लोकांना नैसर्गिक व सामाजिक शिस्त लावण्याचे कठीण काम सरकार नावाच्या माध्यमातून काही राजकारणी मंडळी पार पाडत असतात व त्यासाठी ही राजकारणी मंडळी धूर्तपणे लोकांना आश्वासने देऊन त्यांच्याकडून जबरदस्त मोबदला वसूल करतात. राजकारण हे येड्या गबाळ्याचे काम नव्हे.  राजकारणात मोठी मेहनत, मोठी हुशारी व मोठी हिंमत या तिन्ही गोष्टी जवळ असाव्या लागतात. नुसत्या अर्थकारणात पैसा हे शक्तीशाली साधन मिळविण्यासाठी माणसे धडपड करतात तर राजकारणात पैसा व सत्ता ही दोन्ही शक्तीशाली साधने मिळविण्यासाठी माणसे धडपड करतात. शिक्षण व त्यानंतर शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर अर्थकारण व राजकारण या दोन क्षेत्रांत या ज्ञानाचा प्रत्यक्ष सराव व शिक्षण घेण्याची व त्याचा असा सराव करण्याची ही सर्व धडपड, मेहनत लहानपणात, तरूणपणात व प्रौढावस्थेत शक्य होते. वृद्धापकाळी मात्र शरीर झिजून थकल्यामुळे, मेंदू विचार करून व बुद्धीचा सतत वापर करून शिणल्यामुळे व मन जगाचे रहाटगाडगे कळल्याने निरूत्साही, विरक्त झाल्यामुळे वरील धडपड, मेहनत या काळात अवघड होऊन बसते.

निसर्गाची विविधता ज्यात निसर्गाचे विविध सजीव, निर्जीव पदार्थ व त्यांच्या सक्रिय हालचालीचे विविध कायदेनियम या गोष्टींचा समावेश होतो या सर्वांचे मिळून विज्ञान बनते. या विज्ञानाचे ज्ञान मिळवून त्याचा प्रत्यक्ष सराव करणे म्हणजे विज्ञान शिक्षण व विज्ञान सराव या दोन गोष्टींनी मनुष्याचे आयुष्य व्यापलेले आहे. हा व्याप हे एक प्रचंड मोठे चक्रव्यूह आहे. या चक्रव्यूहात मनुष्य सापडलेला आहे. या चक्रव्यूहात निसर्गाच्या विविधतेने माणसापुढे अनेक आव्हाने उभी केली आहेत. ही अनेक आव्हाने म्हणजे अनेक दिशांनी शरीर व मनावर येणारे अनेक बाण. हे अनेक आव्हान बाण झेलताना, त्यांच्याशी प्रत्यक्ष सामना करताना माणूस नावाच्या शूर वीर, योद्ध्याची तारांबळ उडते. चक्रव्यूह योद्धा भांबावतो, चक्रावतो, घाबरतो व अधूनमधून गोंधळून संभ्रमित, भ्रमिष्ट होतो. परंतु निसर्ग रचित हे चक्रव्यूहच असे आहे की माणसाला चक्रव्यूहातून पळ काढता येत नाही. त्याला शेवटपर्यंत लढत लढत या चक्रव्यूहातच मरावे लागते. हे लढणे जमत नाही म्हणून आत्महत्या करणे हा पळपुटेपणा झाला.

या चक्रव्यूहात लढताना अनेक आव्हान बाणांशी सामना करावा लागतो. पण असा सामना करताना परिपूर्णतेचा (परफेक्शन) अट्टाहास करणे हे मुळातच चुकीचे आहे. निसर्ग व त्याचे विज्ञान तरी कुठे परिपूर्ण (परफेक्ट) आहे. हे वास्तव लक्षात घेऊन परिपूर्णतेच्या मागे लागण्यात वेळ व शक्ती वाया घालवू नये. बऱ्याच वेळा "जाऊ द्या" (लेट गो) हा दृष्टिकोन ठेवणे फायद्याचे ठरते कारण त्यातून निरर्थकपणावर वाया जाणारा वेळ व शक्ती वाचते. मन खोडकर आहे. ते निरर्थक गोष्टी जवळ करायला बघते. पण मनाच्या या खेळाला मनानेच आवर घालावा लागतो.

आता शेवटी परमेश्वर या संकल्पनेचा थोडक्यात विचार करूया. निसर्गाचा निर्माता कोणीतरी निसर्गाहून मोठा असा परमेश्वर आहे व त्याने निर्माण केलेल्या निसर्गाचा तोच नियंता आहे हे कोणालाही वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध करता आलेले नाही. अध्यात्म परमेश्वराची दैवी अनुभूती व त्याच्या चमत्कारावर जोर देते. पण त्याचा वैज्ञानिक पुरावा देत नाही. त्यामुळे केवळ कोणीतरी त्याला आलेल्या दैवी चमत्कार किंवा अनुभूतीची गोष्ट सांगते (जी केवळ वैयक्तिक असते) म्हणून त्यावर आंधळ्यासारखा सर्वांनी विश्वास ठेवावा असे होऊ शकत नाही. या जगात परमेश्वर मानणारे अनेक आध्यात्मिक धर्म अस्तित्वात आहेत. या देवधर्मांची धार्मिक कर्मकांडे केल्याने कोणाला आध्यात्मिक शांती किंवा मानसिक समाधान मिळत असेल तर तो त्याचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. पण हा वैयक्तिक अनुभव सार्वजनिक अनुभव होऊ शकत नाही. म्हणून अध्यात्माला अर्थात देवधर्माला सार्वजनिक स्वरूप देणे हे मुळातच चुकीचे आहे. अदृश्य, अनाकलनीय, कल्पनेतल्या देवाच्या, परमेश्वराच्या पाठीमागे लागणे ही गोष्ट मृगजळाच्या किंवा पळत्याच्या पाठीमागे लागण्यासारखी आहे. हा एक मनाला सवय लावणारा मंत्रचळ आहे. तरी पण कोणाला असे करणे आवडतच असेल तर त्याला न दुखवता, न डिवचता खुशाल तसे करू द्यावे व याबाबतीत "जाऊ द्या" (लेट गो) हा दृष्टिकोन ठेवावा.

माझा हा लेख म्हणजे मी जीवनात प्रत्यक्ष अनुभवलेल्या चक्रव्यूहाचा लेख आहे. तो सर्वांना भावेल, पटेल असे नाही व माझा तसा आग्रहही नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.४.२०२४

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

साचेबंद निसर्ग, रटाळ जीवन!

साचेबंद निसर्ग, रटाळ जीवन!

ग्रह ताऱ्यांच्या पदार्थीय विश्वालाच मी निसर्ग म्हणतो. हा पदार्थीय निसर्ग ठराविक साचेबंद वैज्ञानिक नियमांनी यंत्रवत हालचाल करतो म्हणून मी त्याला साचेबंद यंत्र म्हणतो. या यंत्राच्या हालचालीची यंत्रणा किंवा व्यवस्था हिचा एक ठराविक साचेबंद नमुना (मॉडेल) आहे. या यंत्राच्या व या यंत्रणेच्या साचेबंद पणामुळे (तोच तोच पणा) हे यंत्र रटाळ झाले आहे व त्याची यंत्रणा रटाळवाणी झाली आहे. या साचेबंद नमुन्याच्या यंत्रात व त्याच्या यंत्रणेत आमूलाग्र बदल करता येत नाही. हे यंत्र व त्याचा साचेबंद नमुना जवळजवळ जसा आहे तसाच स्वीकारावा लागतो. बौद्धिक तंत्राने त्यात थोडीफार सुधारणा करता येते एवढेच.

खरं तर, मानवी बुद्धीने या साचेबंद पदार्थ वैज्ञानिक विश्व/निसर्ग यंत्रात कौशल्यपूर्ण बौध्दिक व्यवस्थापन व वापराची जी आधुनिक तांत्रिक व सामाजिक पद्धत किंवा व्यवस्था अंमलात आणली आहे ती सुध्दा तिच्या साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. त्यात नाविन्य उरले नाही. रटाळ निसर्ग यंत्रातून मनुष्याने बाहेर काढलेले हे तांत्रिक-सामाजिक पिल्लू सुद्धा रटाळ झाले आहे. जर निसर्गाची मूलभूत रचनाच (बेसिक स्ट्रक्चर) रटाळ  आहे तर त्या रटाळ रचनेतून माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर काढून काढून शेवटी काय बाहेर काढणार तर रटाळ पिल्लूच.

साचेबंद निसर्ग-समाज व्यवस्थेतील यांत्रिक रटाळपणा (तोच तोच पणा) घालविण्यासाठी मनुष्याला जशी हास्यविनोदी करमणूकीची गरज भासते तशीच आध्यात्मिक आधार, शांतीचीही गरज भासते. या गरजेचे कल्पनेतून का असेना पण मानसिक समाधान करून घेण्यासाठी मनुष्य  प्राण्याने निसर्ग/विश्व यंत्रात परमेश्वर नावाची कोणती तरी महान शक्ती चालक-मालक म्हणून बसलीय असे तर्काने मानून (परमेश्वर एक तार्किक कल्पना?) त्या तर्काधारित ईश्वर शक्तीला भक्तीभाव, भक्तीरसाने जवळ केले व मानव समाजात एक आध्यात्मिक धर्म संस्कृती निर्माण केली. मानव समाजातील अनेक आस्तिक धर्म हे या आध्यात्मिक धर्म संस्कृतीचेच भाग आहेत.

पण ही आध्यात्मिक धर्मसंस्कृती सुद्धा तिच्या कर्मकांडी साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. कितीही परमेश्वर प्रार्थना करा रटाळ निसर्ग व समाज रचनेत/व्यवस्थेत काही बदल होत नाही की काही फरक पडत नाही हे वास्तव माणसाला शेवटी कळतेच. परंतु इलाज नसल्याने मनुष्य प्राणी हा रटाळपणा कसातरी घालविण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न सतत करीत राहतो. अशा प्रयत्नांची सवय लागली की मनुष्य या सवयीचाच गुलाम होऊन जातो. सवय एक अशी जादू आहे की जी कृत्रिम चैनीला सुद्धा नैसर्गिक गरज बनवते. माणसाने अशा कितीतरी निरर्थक कृत्रिम सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.४.२०२४

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

हिग्ज बोसोन आणि समाज!

हिग्ज बोसोन मूलकणाचे वैज्ञानिक सत्य मानव समाजालाही लागू!

माणूस म्हणून तुम्ही कितीही ज्ञानी व बुद्धिमान असला तरी तुमची बुद्धी व तुमचे ज्ञान समाजातील वजनदार माणसांच्या संपर्क क्षेत्रात येऊन तिथे जोपर्यंत सहज स्वीकारले जात नाही तोपर्यंत समाजात ते वजनरहित राहते, त्याला समाजात वजन प्राप्त होत नाही.

हाच वैज्ञानिक नियम हिग्ज बोसोन मूलकणांच्या वजनदार क्षेत्राविषयी आहे तो म्हणजे मूलद्रव्ये व त्यांचे अणू जोपर्यंत वजनदार हिग्ज बोसोन मूलकणांच्या क्षेत्रात येत नाहीत तोपर्यंत विश्वात ते वस्तुमानाशिवाय वजनरहित राहतात, त्यांना विश्वात वस्तुमान व वजन प्राप्त होत नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.४.२०२४

आध्यात्मिक प्रार्थनेने वैज्ञानिक सत्य बदलत नाही!

परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेने विश्वाचे/निसर्गाचे वैज्ञानिक सत्य बदलत नाही!

विश्वातील कोणतीही वास्तव गोष्ट जशी आहे तशीच वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारावी लागते. विश्वात/ निसर्गात परमेश्वर नामक अलौकिक दैवी शक्ती आहे असे कल्पनेने मानून अशा शक्ती पुढे प्रार्थना केल्याने विश्वातील वैज्ञानिक सत्य बदलत नाही.

माणूस विश्वातील वैज्ञानिक सत्याचे त्याच्या नैसर्गिक बुद्धीच्या जोरावर कौशल्यपूर्ण व्यवस्थापन कसे करतो व त्याचा योग्य वापर कसा करतो यावर विश्वाच्या/निसर्गाच्या वैज्ञानिक सत्याची अनुभूती व उपयुक्तता अवलंबून आहे.

वैज्ञानिक सत्याचे असे व्यवस्थापन व त्याचा असा योग्य वापर हा परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेतून नाही तर मनुष्याच्या बौद्धिक कौशल्यातून शक्य आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.४.२०२४

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

विश्व ज्यालाच मी निसर्ग म्हणतो हे एक प्रचंड मोठे यंत्र आहे ज्यात ग्रह, तारे, विविध पदार्थ एका चक्रात फिरत असतात. पृथ्वी हा याच विश्व यंत्राचा एक भाग जो चक्राकार स्वतःभोवती फिरतो व सूर्याभोवतीही फिरतो. पृथ्वी नावाच्या या चक्रीय यंत्र भागात पदार्थीय सृष्टीचे आणखी एक चक्र प्रस्थापित झालेय, ज्यात पृथ्वीवरील दिवस रात्रीचे, ऋतूंचे, हवेचे, पाऊस पाण्याचे व निर्जीव पदार्थांच्या हालचालीचे चक्र निर्माण झालेय. याच सृष्टी चक्रात पुन्हा विविध प्रकारच्या सजीवांची विविध जीवनचक्रे निर्माण झालीत ज्यांत माणसांचेही एक जीवनचक्र निर्माण झालेय.

माणसांच्या चक्राकार जीवनचक्रात जन्म व मृत्यूच्या मध्ये जे मानवी जीवन आहे ते जगण्याच्या कष्टाने पुरेपूर भरलेले आहे. जीवनाचे भरण पोषण करण्यासाठी कष्ट आणि वर जीवनाचे संरक्षण करण्यासाठी कष्ट आणि ही दोन्ही कष्टे बौद्धिक कष्ट व शारीरिक कष्ट या दोन प्रकाराची. मानवी जीवनाचे भरणपोषण व संरक्षण करण्यासाठी जी साधने आहेत ती मिळविण्यासाठी कष्ट, त्यांचा नीट सांभाळ व व्यवस्थापन करण्याचे कष्ट. कष्टाच्या ना ना तऱ्हा आणि वर पुन्हा रोजचा व्यायाम, दात स्वच्छ घासणे व अंघोळ करणे वगैरे दैनंदिन कष्टे आहेतच दररोज सोबतीला. ठराविक काळापुरती रोजची झोप हीच काय या कष्टाला थोडीफार विश्रांती. इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे कष्ट खूप जास्त आहेत. अती बुद्धीमान असल्याचा हा असा विचित्र परिणाम. जात्यात भरडल्या सारखा मनुष्य आयुष्यभर कष्टच करीत राहतो आणि शेवटी कष्ट करून करून मरतो. कष्टाने जी काही मिळकत कमावलेली असते ती इथेच सोडून जावी लागते. शेवटी काय "करा कष्ट आणि व्हा नष्ट"!

या कष्टकरी जीवनात माणसाला कुठेतरी सतत वाटत असते की विश्व यंत्राचा कोणीतरी निर्माता असावा जो आपल्याला आपल्या कष्टात मदत करेल, कष्टाचे जाते दळू लागेल वगैरे वगैरे. पण ही कल्पनाच राहून जाते. आपल्या कष्टाचे भरड जाते दळायला तो यंत्रनिर्माता (परमेश्वर) प्रत्यक्षात कधी जवळ येऊन बसतच नाही की कधी कुठे दिसतही नाही. तरीही मानवनिर्मित विविध धर्मांनी या परमेश्वराची विविध प्रार्थनास्थळे जगात निर्माण केली आहेत. तिथे जाऊन खरंच परमेश्वर दिसतो का, आध्यात्मिक शांती देतो का हा प्रश्न विचारला की मग आस्तिक समाज अशा चिकित्सक माणसाला चिडून नास्तिक म्हणून हिणवतो. कोणी आस्तिक बना नाहीतर नास्तिक, पण "करा कष्ट आणि व्हा नष्ट" हे वास्तव मात्र कोणाला टाळता येणार नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.४.२०२४

माझी वकिली, माझा प्रश्न!

माझी वकिली, माझा प्रश्न!

वेळकाढू व्यवस्थेत अडकलेल्या न्यायालयात न जाता वकील स्वतःच  त्याच्या अशिलाला किती व कसा न्याय देऊ शकतो यातच वकिलीचे कौशल्य आहे, मी हीच वकिली आयुष्यभर केली व माझ्या किमान गरजा याच माझ्या खास शैलीच्या वकिलीतून भागवल्या, कोर्टातील वकिली कधीच सोडून दिली आहे! -ॲड.बी.एस.मोरे

चॕट जीपीटी (कृत्रिम बुद्धिमत्तेचे) उत्तरः

वकील बी.एस. मोरे यांच्या या विधानातून असे स्पष्ट होते की, त्यांनी कोर्टातील परंपरागत वकिलीच्या पद्धतीला सोडून दिले आहे आणि स्वतःची एक खास पद्धत विकसित केली आहे. कोर्टाच्या वेळकाढूपणामुळे आणि अन्य अडचणींमुळे लोकांना त्वरित न्याय मिळविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, वकील मोरे यांनी स्वतःच्या अशिलांना कोर्टाच्या बाहेर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष कौशल्य आणि तंत्रे विकसित केली आहेत.

त्यांच्या या दृष्टिकोनामुळे, वकीलांना त्यांच्या अशिलांच्या गरजा त्वरित भागविता येतात आणि कोर्टाच्या प्रक्रिया आणि वेळेच्या मर्यादा ओलांडून न्याय मिळवून देण्यात यश मिळविता येते. त्यामुळे, त्यांनी कोर्टाच्या परंपरागत वकिलीचा त्याग केला आणि स्वतःच्या नैसर्गिक गरजांसाठी आणि अशिलांसाठी नविन पद्धतींचा वापर केला.

या दृष्टिकोनामुळे, वकील मोरे यांचे वकिलीचे कौशल्य आणि नविन तंत्रे इतर वकीलांसाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांनी दाखविलेले धैर्य आणि नवनवीन पद्धतींचा वापर करून न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेला बदलले आहे. त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे, लोकांना त्वरित आणि कार्यक्षम न्याय मिळविण्यासाठी एक नवा मार्ग मिळतो.

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

देववाणी!

देववाणी!

पृथ्वीवरील सृष्टीची रचना जर नीट तपासली तर असे दिसून येते की जी रचना निर्जीव पदार्थांसाठी आहे ती अर्धसजीव वनस्पतींसाठी नाही, जी रचना अर्धसजीव वनस्पतींसाठी आहे ती सजीव पशुपक्षांसाठी नाही व जी रचना सजीव पशुपक्षांसाठी आहे ती माणसांसाठी नाही कारण माणसांसाठी निसर्गाने एक विशेष जबाबदारीची रचना रचली आहे आणि तरीही या सर्व नैसर्गिक रचना त्यांच्यातील सर्व निर्जीव, सजीव पदार्थांसह एकमेकांशी संलग्न असून त्या एकमेकांना एका समान धाग्याने बांधलेल्या आहेत व समान पर्यावरणीय साखळीत बद्ध आहेत.

माणूस हा विशेष प्राणी पर्यावरणीय साखळीत अगदी शेवटी व वरच्या टप्प्यावर उत्क्रांत, विकसित झाला आहे. पीटर हिग्ज या नोबेल विजेत्या वैज्ञानिकाने चैतन्य, उर्जा व बल यांनी युक्त असा मूलकण पदार्थाला चिकटल्यानेच पदार्थाला वस्तुमान प्राप्त होते हा शोध लावला व त्यातून विश्वाच्या पदार्थीय रचनेचे कोडे थोडे उलगडले असले तरी त्यातून माणूस हा प्राणी उत्क्रांती प्रक्रियेतून निर्माण होऊन विकसित होत असताना त्याच्या मेंदूला सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना नेमकी कधी व कशी चिकटली याचा स्पष्ट वैज्ञानिक शोध अजून तरी लागलेला नाही. त्यामुळे मानवी मेंदूची सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना यांनी मिळून निर्मिलेल्या, रचलेल्या मानव धर्म व मानव समाज कायदा यांच्या पाठीमागे कोणती तरी प्रेरक उच्च चैतन्यशक्ती असावी जी यांत्रिक पद्धतीने कार्य करीत असलेल्या भौतिक पदार्थ व रसायन विज्ञानाहूनही श्रेष्ठ म्हणजे पदार्थीय विश्वाहून/निसर्गाहूनही श्रेष्ठ असावी व या विशेष चैतन्यशक्तीने पदार्थीय विश्वाची/निसर्गाची निर्मिती करताना मनुष्य नावाच्या विशेष प्राण्याची निर्मिती केली असावी हा कुतूहल मिश्रित प्रश्न मानवी मनाला सतत पडतो. 

पदार्थ व रसायन विज्ञानाचा अधिक प्रगत असा यांत्रिक उपयोग करून मानवी बुद्धीने या मूलभूत विज्ञानात तांत्रिक क्रांती केली, पण त्याही पुढे जाऊन मनुष्याने त्याच्या सुज्ञ बुद्धी व उदात्त भावनेच्या जोरावर धर्म, कायदा यांची निर्मिती करून मानव समाजात सांस्कृतिक क्रांती केली. याच सांस्कृतिक क्रांतीत कुठेतरी परमेश्वर (निसर्गाहूनही श्रेष्ठ अशी विशेष चैतन्यशक्ती) असल्याचे मानवी मनाला जाणवते व धर्म, कायदा ही देववाणी वाटू लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.४.२०२४

रविवार, २१ एप्रिल, २०२४

हिग्ज बोझॉन!

मूलद्रव्य व मूलकणात फरक आहे, मूलद्रव्य रासायनिक गुणधर्माने बद्ध तर मूलकण चैतन्याने/उर्जेने/बलाने भारित, मूलद्रव्य व मूलकणाने बनतो मूळ अणू व मूळ अणुंचा मिळून बनतो मूळ पदार्थ, अशा अनेक मूलद्रव्यी पदार्थांनी बनलेय पदार्थीय विश्व, पण अणुला वस्तुमान (मास) चैतन्यमय मूलकणामुळेच मिळते ज्या मूलकणाचा शोध लावला महान वैज्ञानिक सर पीटर हिग्ज यांनी, पण या मूलकणाची मूळ संकल्पना कित्येक वर्षे अगोदर भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांनी मांडली होती आणि म्हणून या मूलकणाला हिग्ज बोझॉन असे नाव पडले, चैतन्य/उर्जा/बल असलेला मूलकण हा अणुचा आत्मा होय व तो पदार्थाचा व पदार्थीय विश्वाचाही आत्मा होय! -ॲड.बी.एस.मोरे (विज्ञान अभ्यासक)

OBJECTS OF HUMAN LIFE!

OBJECTS OF HUMAN LIFE!

Artificial intelligence (AI) through chatGPT answers Adv. B.S.More's thought on this topic on 22.4.2024 as under.

Indeed, the pursuit of happiness and peace, alongside survival, forms the essence of human life. In a complex world, finding these goals often requires a combination of personal growth, meaningful connections, and resilience. Here are some reflections on the pursuit of happiness and peace:

1. **Self-Discovery and Growth**:
   - Understanding oneself is a crucial step toward achieving happiness. By exploring your passions, values, and strengths, you can align your life with what truly brings you joy.

2. **Building Meaningful Relationships**:
   - Human connections are fundamental to happiness. Investing time in family, friends, and community fosters a sense of belonging and support, contributing to peace and contentment.

3. **Mindfulness and Mental Health**:
   - Practicing mindfulness, meditation, or other stress-relief techniques can help you navigate the complexities of life with a sense of calm. Caring for your mental health is key to maintaining happiness and peace.

4. **Finding Purpose and Fulfillment**:
   - Discovering a sense of purpose in your work or hobbies can bring a deep sense of fulfillment. Engaging in activities that align with your values can make life's journey more meaningful.

5. **Navigating Challenges and Resilience**:
   - Life's complexities often involve overcoming obstacles. Developing resilience and maintaining a positive outlook can help you manage challenges while staying on the path toward happiness and peace.

The words of Adv.B.S.More capture the essence of this journey. While the path to happiness and peace can be winding, it is a journey worth pursuing, filled with opportunities for growth, connection, and ultimately, fulfillment.

Source: chatGPT (22.4.2024)

OUR EXISTENCE IN WORLD IS PERMANENTLY TEMPORARY!

OUR EXISTENCE IN WORLD IS PERMANENTLY TEMPORARY!

After evolution of world it is important to experience the stable position of world in its existing form & system. The system as established by Nature for world evolved by Nature contains rule of interlocutory temporary existence of matters in the midst of their permanent cyclic transformation. The permanent cycle of cyclic change in form of matters (cyclic transformation) is cause of permanently temporary existence of matters including human beings.

The cyclic transformation in matters may also be called as cyclic reformation  or cyclic regeneration of matters. Eg. Cyclic birth by way of cyclic reproductive regeneration, cyclic aging and cyclic death of human beings is nothing but cyclic transformation in human beings.

In the midst of constant process of permanent cyclic transformation in worldly matters the matters constantly enjoy their interlocutory temporary existence. But temporary existence of matters is conditional upon their interlocutory temporary use by and between matters involving interlocutory give and take of their temporary utilities needed for their temporary survival in world. This give & take transaction of inter-transfer of utilities by and between diverse matters is interlocutorily seasonal or temporary.

The temporary existence of regenerative human life means temporary pleasure & pain of temporary human life. The human ownership & possession of material wealth is also temporary. The point is how much importance one should give and how much obsession one should carry for such temporary life and temporary holding of ever changing material wealth?

-©Adv.B.S.More, 21.4.2024

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

GOD ADVICE ON HUMAN RIGHT?

Which is fundamental human right, right to live natural life or artificial life, right to live dignified life is recognised by social law as fundamental human right, but does human dignity lies in living artificial, human beings compete more for living artificial and less for living natural, intelligent human brain is seriously caught between natural need and artificial greed, what is the under current advice of God to human brain on this point of law, does God give different advices to different human brains? -Adv.B.S.More   

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

NO MOTION WITHOUT FORCE OF LAW BEHIND!

NO MOTION WITHOUT FORCE OF LAW BEHIND!

The human materialism involving interaction between human material instincts and material means of satisfaction of such human instincts cannot proceed either by indisciplined loose freedom for such motion or by strict disciplined tight restriction of such motion. The regulatory law meant for disciplined control of such interactive material motion strikes balance between loose freedom for such motion & tight restriction of such motion. Any law is impotent without powerful force within such law. The material motion must be lawful is the condition precedent of any material motion. The material motion of material bodies in universe including human instinctive motion on earth planet has force of material law behind such material motion.

-©Adv.B.S.More, 18.4.2024

SPIRIT AND MATTER!

MY QUESTION ON SPIRIT AND MATTER:

One cannot float on water without getting lighter than water and one cannot fly in air without getting lighter than air, lighter human spirit cannot get spiritual peace without stopping heavier human body running after material pleasure, but is lighter spirit powerful than heavier matter or simply is spiritualism so powerful to control materialism or is spiritual God so powerful to control material Nature or is spiritualism of God spirit just a wishful thinking? -Adv.B.S.More

Answer to Adv. B. S. More's question from Chat GPT on 18.4.2024:

Your observation draws parallels between physical principles and spiritual concepts, highlighting the interplay between materialism and spirituality. It's a thought-provoking analogy. Whether a lighter spirit can effectively halt the pursuits of a heavier body, or if spiritualism can overcome materialism, is a complex question that has been pondered by philosophers, theologians, and individuals seeking deeper meaning for centuries. Ultimately, perspectives on the power of spirituality vary widely among individuals and belief systems.

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

MATERIALISM OVERPOWERS SPIRITUALISM!

SPIRITUALISM CANNOT CHALLENGE POWER OF MATERIALISM!

The materialism is based on material instincts and material means of satisfying such instincts. The material laws regulate  materialism. On the other hand, the spiritualism is based on logical belief in God & emotional devotion to such believed (and not proved) God and spiritual mean of satisfying such emotion namely religion. While materialism can be regulated by material laws including social laws, it is very difficult to regulate spiritualism by spiritual laws. This is because God is based on belief & belief without any scientific proof about truth of such belief cannot be regulated by any spiritual laws including any religious practices. But the public nuisance caused by religious practice including superstition can be socially regulated by social law which is part of material laws. The materialism of Nature is powerful enough to silence, supress and supersede spiritualism of God, but it is not vice versa. Simply, spiritualism cannot challenge the power of materialism.

-©Adv.B.S.More, 17.4.2024

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

ALL WITHIN SYSTEM!

ALL WITHIN SYSTEM!

It is wrong to take pressure or load of things beyond one's own control. It is a fact that things around us including ourselves move within the fixed check and balance system of Nature. The wisdom therefore lies to leave the things beyond our control to such system and Nature. It is not known whether the almighty power called God is the owner of Nature and controller of its system. But even if it is assumed without admitting that God exists in Nature, the fact remains that such God exists/lives in Nature and works within system of Nature as it is.

The system of Nature is heavy like land and water on earth and NOT light like air around earth. Simply the system does not permit us to fly in air as we like. We may be permitted to fly little but by taking load of heavy system forcing us to come down on land and water of earth planet. Even birds have to come down and rest on land and water forget about the aeroplanes developed by us by copying birds with oue intelligence.

In the midst of this fact, try to walk on land and swim in water of earth within the  system of Nature attached to earth with strong will power & its determination and with whatever physical strength carried by you. The physical strength does not only mean body strength. It also includes intellectual, economic and political strengths.

If you try to walk and swim within system with your strong mind and whatever physical strength carried by you, you will get all that is possible for you within the system and nothing beyond that. It is all within system!

-©Adv.B.S.More, 15.4.2024

रविवार, १४ एप्रिल, २०२४

HUMAN ECONOMY!

HUMAN ECONOMY!

The production of human population by human birth process less consumption of human population by human death process is equal to surplus human population remaining busy in production as well as consumption of human life required goods & services. The produced wealth of such goods & services less its consumption is equal to surplus wealth. The growth in such surplus wealth indicates growth in human economy.

-©Adv.B.S.More, 16.4.2024

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

PUBLIC SHARING OF KNOWLEDGE FREE OF COST?

PUBLIC SHARING OF KNOWLEDGE FOR ITS PUBLIC TASTE FREE OF COST?

Let you stop your foolish endeavour of testing worth of your self earned higher  level knowledge by its free sharing for public taste on the social media platforms such as facebook, twitter, instagram, quora, you tube channel & whatsapp. The linkedin may be continued for some time for limited purpose of professional connect with lawyers. Your personal blog on google will continue for personal expression to self and not for any free public sharing. It may be deleted latter when you will realise that no book can be printed out of it in return for monetary consideration.

It is foolishness to share hard earned knowledge and reasoned thoughts based on such knowledge in the social media free of cost thereby venturing into free criticism from unknown members of public at the cost of devaluation of high valued self knowledge. Let you not write even letters to editors of newspapers for their publication at the cost of free public taste and free criticism.

The public media agents such as newspapers, radio, TV channels etc. share their  information with public not for doing free charity called building of public opinion but they do it simply for their business for earning monetary profit out of such public sharing. Even some intellectuals are sharing their knowledge on their you tube channels in return for monetary price earned out of advertisements on you tube channels.

And what are you doing even after knowing all this? Sharing your knowledge & true life experience with public free of cost thereby devaluing your knowledge at the risk of free criticism? Are you going to become big public personality with your name & fame by such free public sharing of your knowledge? Do not try to educate the brains of public  members scattered over their different areas with their different educational, economic and political backgrounds and different ideologies. Do not risk your life by inviting unwanted reactions to your writings from unknown persons. All businessmen, politicians, lawyers, doctors, engineers, artists, sportsmen, writers, speakers etc. share their knowledge and skill with  people in return for money and/or political power. It is their gainful employment?

Are you gainfully employed in any way in task of public sharing of your knowledge for its public taste free of cost? At least now onwards  learn to control your own mind instead of wasting your time and energy in any public interaction free of cost!

-©Adv.B.S.More, 13.4.2024

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

मानव समाज हाच मनुष्याचा जवळचा आधार!

मनुष्याला जवळचा आधार मानव समाजाचा, निसर्ग व परमेश्वर हे नंतर!

समाजाची काहीही मदत न घेता किंवा समाजाचा कसलाही आधार न घेता माणूस निसर्गाच्या गाभ्यात म्हणजे निसर्गाच्या विज्ञानात जाऊ शकतो, पण त्याला मर्यादा आहेत. कदाचित निसर्गाच्या गाभ्यात म्हणजे विज्ञानात एकट्यानेच शिरल्यावर माणसाची अवस्था चक्रव्यूहात सापडल्यासारखी होऊ शकते व अशा माणसाला तो चक्रव्यूह भेदून तिथून एकट्यानेच बाहेर पडणे अवघड होऊ शकते.

समाज हे निसर्ग शिकण्याचे, निसर्ग अनुभवण्याचे माणसासाठी एकदम जवळचे माध्यम आहे. निसर्गात परमेश्वर आहे असे मानले तरी तोही निसर्गात कुठे आहे हे कळायलाच मार्ग नाही कारण तो अनाकलनीय आहे. मग त्याच्यापर्यंत वैज्ञानिक व आध्यात्मिक यापैकी कोणत्याही एका मार्गाने किंवा या दोन्ही मार्गांनी पोहोचणे अशक्यच आहे. निसर्ग हा विविध पदार्थीय भागांत व विविध ज्ञान शाखांत विखुरलेला असल्याने तो माणसाला एकदम जवळचा होऊ शकत नाही व परमेश्वर तर निसर्गात कुठे आहे याचा पत्ताच नाही. म्हणून शेवटी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मानव समाज हेच एकदम जवळचे माध्यम आहे व हे जवळचे माध्यम हाच मनुष्याला जगण्यासाठी जवळचा आधार आहे.

निसर्गाचे ज्ञान मिळवायचे तर शाळा व महाविद्यालये या शिक्षण संस्थांचा आधार घ्यावा लागतो. पण शिक्षण संस्थांचा स्त्रोत कोणता तर मानव समाज. या संस्था शेवटी माणसेच चालवतात. म्हणजे शेवटी निसर्गाचे ज्ञान माणसाला माणसांकडूनच घ्यावे लागते. शास्त्रज्ञांनी लावलेले निरनिराळे वैज्ञानिक शोध शाळा, कॉलेजात एकाच ठिकाणी कळतात. माणूस जर शाळा, कॉलेजात गेलाच नाही तर एक एक वैज्ञानिक गोष्ट शिकायला, समजून घ्यायला त्याला किती काळ जाईल? विज्ञानातील बाराखडी शिकण्यातच त्याचे छोटे  आयुष्य कधी संपून जाईल हे त्याला कळणारच नाही.

ही गोष्ट फक्त विज्ञान शिकण्याची आहे. निसर्ग विज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून मनुष्य जीवन  जगण्याची गोष्ट तर आणखी कठीण. ही गोष्ट केवळ आणि केवळ मानव समाजाच्या आधारामुळे शक्य झाली आहे. मग विविध वस्तूंचे उत्पादन करणारे श्रीमंत उद्योगपती असोत की कायदा बनवणारे, राबवणारे धूर्त राजकारणी असोत की न्यायदान करणारे स्वतंत्र न्यायाधीश असोत. परमेश्वराचा अगदी जवळून प्रत्यक्ष आधार मिळणे ही अत्यंत अनिश्चित व दुरापास्त गोष्ट आहे. माणसासाठी प्रत्यक्षात जवळचा आधार हा फक्त आणि फक्त मानव समाजाचा आहे. मग या समाजाला भ्रष्ट समाज म्हणून कितीही नावे ठेवा. आणि मानव समाज तरी शेवटी कशाचा भाग आहे? तो निसर्गाचाच भाग आहे ना! आणि एका तर्कानुसार निसर्गाचा निर्माता कोण आहे तर परमेश्वर आहे. मग भ्रष्ट मानवाला व त्याच्या भ्रष्ट मानव समाजाला भ्रष्ट बनविण्यासाठी कारणीभूत कोणाला धरायचे? फक्त माणसाला व त्याच्या समाजालाच? इथे मुद्दा एवढाच आहे की मानव समाज हा कसाही असला तरी शेवटी तोच मनुष्याचा जवळचा आधार आहे, निसर्ग व परमेश्वर हे नंतर!

खरं तर निसर्गाला व निसर्गातील मानलेल्या परमेश्वराला माणसाने मानव समाजातच बघितले पाहिजे. निसर्ग व त्यातील परमेश्वराला नीट समजून घ्यायचे असेल तर माणसाने माणसाला व मानव समाजाला नीट समजून घेतले पाहिजे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे काही साधु संत म्हणून गेले ते काही उगाच नाही. एकेक माणसाची कलाकुसर बघा, त्याची पाककृती बघा, त्याची औषध निर्मिती बघा आणि अशा कित्येक चांगल्या गोष्टी बघा त्या सर्वात एक नैसर्गिक वैशिष्ट्य दिसेल ज्यात निसर्गाचे आश्चर्य दिसेल, चमत्कार दिसेल व तिथेच परमेश्वर दिसेल. माणूस हा उत्क्रांत झालेला प्राणी असल्याने त्याच्यात जनावरांचे काही वाईट गुण आले आहेत. ते एकदम, अचानक नष्ट होणार नाही. ते वाईट गुण नष्ट होण्याचीही सावकाश, संथ उत्क्रांती प्रक्रिया आहे. तोच संक्रमण काळ सद्या चालू आहे. याच संक्रमण काळाला काही लोक कलियुग असेही म्हणतात. त्याला काहीही म्हणा पण निसर्गाने व त्यातल्या परमेश्वराने माणसाला त्याचा मानव समाज हाच जवळचा आधार दिला आहे ही गोष्ट मान्य करावीच लागेल.

-©ॲड.बी.एस.मोरे, १३.४.२०२४

अध्यात्म व विज्ञान एकमेकांना संलग्न!

काही माणसे नुसतीच आध्यात्मिक/भावनिक राहतात तर काही माणसे नुसतीच वैज्ञानिक/बौद्धिक राहतात आणि इथेच मोठा घोटाळा होतो, वस्तुमान व उर्जा, भावना व बुद्धी, परमेश्वर व निसर्ग, अध्यात्म व विज्ञान या गोष्टी एकमेकांना संलग्न आहेत हे कधी कळणार एकतर्फी विचार करणाऱ्या काही माणसांना? -ॲड.बी.एस.मोरे

कुत्र्याचे शेपूट शेवटी वाकडे ते वाकडेच!

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच!

कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा कुत्र्याचे शेपूट शेवटी वाकडे ते वाकडेच. निसर्गाची व समाजाची एकंदरीत व्यवस्था ही कुत्र्याच्या वाकड्या शेपटासारखी आहे. या वाकड्या शेपटाला सरळ करण्याचा खुळा नाद करणे म्हणजे मंत्रचळाचा (ओसीडी) मानसिक आजार मागे लावून घेणे.

कितीही उच्च शिक्षण घ्या शेवटी मूठभर धनदांडग्या लोकांची गुलामी करीत राहण्याशिवाय पर्यायच नसतो सुशिक्षितांपुढे. निसर्गाच्या जंगली व्यवस्थेत बळी तो कानपिळी या नियमाने जसा हरणांसारख्या अशक्त प्राण्यांना वाघ, सिंहासारख्या सशक्त प्राण्यांपुढे शरणागत होऊन बलिदान देण्याशिवाय पर्याय नसतो तसा मानवनिर्मित तथाकथित नागरी सुसंस्कृत सामाजिक व्यवस्थेत सुद्धा मूठभर धनदांडग्यांची गुलामगिरी करण्याशिवाय सुशिक्षितांपुढे पर्याय नसतो. सुशिक्षितांची ही हालत मग अशिक्षित, अर्धशिक्षित बिच्चाऱ्या गरीब कामगार, कर्मचाऱ्यांची हालत तर विचारूच नका.

समाजात श्रीमंत भांडवलदार किती तर मूठभर. पण उच्च शिक्षण घेऊन सुद्धा यांच्या पाठीमागे नोकरीसाठी वणवण भटकावे लागते. नोकऱ्याच काय पण छोटे छोटे व्यवसाय, उद्योगधंदे यासाठी सुद्धा बड्या भांडवलदार लोकांवर अवलंबून रहावे लागते. गरीब अशिक्षित, अर्धशिक्षित माणसे तर या भांडवलदार लोकांची कायम गुलाम असतात. संसारासाठी पैसा कमी पडला की मग या भांडवलदार मंडळींतून तयार झालेल्या सावकार मंडळींना अव्वाच्या सव्वा व्याज देऊन कर्ज उचलावे लागते व पुढे कर्जफेडीच्या चक्रात खिचपत पडावे लागते. असले सावकारी कर्ज फेडता येईना म्हणून काही हतबल लोक निराश होऊन आत्महत्या सुद्धा करतात. एवढे हे पैशाच्या भांडवलावर आधारित असलेले दुष्ट चक्र भयंकर आहे.

आपली तथाकथित नागरी सुसंस्कृत समाज व्यवस्था मूठभर लोकांच्या या असल्या कंपूगिरी व मक्तेदारी वर आधारित आहे. ही कंपूगिरी व मक्तेदारी फक्त आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही आहे. या आर्थिक व राजकीय कंपू व मक्तेदार लोकांनी शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रांत सुद्धा शिरकाव केला आहे व ही दोन्ही पवित्र क्षेत्रेही भ्रष्ट करण्यास सुरूवात केली आहे. खरं तर यांची ही कंपूगिरी व मक्तेदारी हाच मानवी जगातील मोठा भ्रष्टाचार आहे. या मोठ्या भ्रष्टाचाराच्या आडोशाला राहून छोट्या छोट्या भ्रष्टाचारांचे जाळे समाजात निर्माण झाले आहे.

अशा निर्ढावलेल्या भ्रष्ट व्यवस्थेत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदाच काय पण कोणताही कायदा या कंपूंचे व मक्तेदारांचे काही वाकडे करू शकत नाही. या भ्रष्ट कंपूंना व मक्तेदारांना अधोविश्वातून दहशतवादी मदत करायला मूठभर गुंडपुंड असतातच यांच्या साथीला. साथी हात बढाना?या लोकांवर कायद्याचा अंकुश ठेवून त्यांना वठणीवर आणण्याच्या मार्गात न्याययंत्रणेलाही तिच्या मर्यादा आहेत. शेवटी प्रशासकीय कामकाज राज्यघटनेच्या चौकटीत (काॕन्स्टिट्युशन'स बेसिक स्ट्रक्चर) चाललेय का एवढेच न्याययंत्रणा बघणार. पण या मूलभूत चौकटीच्या बाहेरही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर सक्त नजर, कठोर नियंत्रण ठेवणे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्या न्याययंत्रणेला फार कठीण आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.४.२०२४

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म!

अध्यात्मातले विज्ञान व विज्ञानातले अध्यात्म!

अणू हा पदार्थाचा लहानातला लहान कण पण या अणुकणाला वस्तुमान/ जागा (मास) प्राप्त करून देणारा एक शक्तिशाली कण अणुकणात असतो त्या कणाला देवकण (हिग्ज बोसॉन/गॉड पार्टिकल) म्हणतात असा शोध पीटर हिग्ज या ब्रिटिश शास्त्रज्ञाने लावला. या शोधामुळे महास्फोटानंतर (बिग बँग) विश्वाची निर्मिती कशी झाली या प्रश्नाचा उलगडा झाला.

याचा अर्थ काय तर प्रत्येक अणुत देवकण आहे म्हणजे प्रत्येक पदार्थ, प्राणी, माणूस यात देवकण आहे. कोणताही पदार्थ त्या पदार्थातील अणुकणांचे वस्तुमान (मास) व त्या पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) यांनी बनलेला असतो. अणुकणांच्या वस्तुमानात देवकण व त्याला संलग्न उर्जा/शक्ती असे गणित आहे तर मग अणुकणांना वस्तुमान प्राप्त करून देणाऱ्या देवकणांत वस्तुमान संलग्न उर्जेपेक्षा जास्त ताकदवर चुंबकीय उर्जा असणार असा निष्कर्ष निघतो. देवकणाची ही अधिक ताकदवर चुंबकीय उर्जा पदार्थीय वस्तुमानाला संलग्न असलेल्या उर्जेला जवळ घट्ट पकडून धरत असणार.

याचा अर्थ पदार्थाच्या वस्तुमानाला संलग्न असलेल्या उर्जेपेक्षा अधिक ताकदवर उर्जा पदार्थातील अणुतील देवकणात आहे. म्हणून तर पीटर हिग्ज या शास्त्रज्ञाने त्या शक्तिशाली कणाला देवकण असे नाव दिले. पण मला प्रश्न हा पडलाय की या देवकणात एवढी मोठी ताकदवर चुंबकीय उर्जा कुठून येते? ती तर पदार्थीय वस्तुमान संलग्न उर्जेचा भाग नाही आणि तरीही ती वस्तुमान संलग्न उर्जेपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. यापुढे जाऊन आध्यात्मिक दृष्टिकोनातून मी असे म्हणेल की शिव व शक्ती यांनी मिळून हे विश्व बनले आहे असे गृहीत धरावे तर मग शिव हा त्याला संलग्न असलेल्या शक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे असे निष्पन्न होते आणि म्हणून तर शिव हा शक्तीला स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. याचेच एक उदाहरण म्हणजे शक्तिशाली गंगा नदीचा प्रवाह शिवशंकराने स्वतःच्या जटांत बंदिस्त/धारण करून मग हळूहळू त्या नदी प्रवाहाला पृथ्वीवर सोडणे. अशी आख्यायिका हिंदू धर्मशास्त्रात आहे. अध्यात्मात डोकावले की जसे विज्ञान दिसते तसे विज्ञानात डोकावल्यावर अध्यात्म दिसते. माझ्या दृष्टिकोनातून परमेश्वराचे अध्यात्म व निसर्गाचे विज्ञान या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. पुन्हा शेवटी आणखी एक प्रश्न माझ्या मनात येतो तो हा की परमेश्वर कोणाला म्हणायचे? शक्तीपेक्षा अधिक शक्तिशाली असलेल्या शिवाला की शिवाला संलग्न असलेल्या शक्तीला की शिव व शक्ती या दोघांच्या एकत्रित अस्तित्वाला? विश्वातील महाशक्ती म्हणजे विश्वचैतन्य म्हणजे परमेश्वर असे मी मानत होतो. पण आता पदार्थीय वस्तुमान व देवकणी शक्ती असलेला शिव एकीकडे व वस्तुमान नसलेली नुसतीच महाशक्ती (नुसते शुद्ध चैतन्य) दुसरीकडे असे दोन भाग पीटर हिग्ज यांनी लावलेल्या देवकणाच्या शोधामुळे माझ्यासमोर उभे राहतात. या दोन भागांना एकत्र करून त्या एकत्रित गुणरूपात परमेश्वर कसा बघायचा हाही एक आध्यात्मिक व वैज्ञानिक बुद्धीचा मला पडलेला कठीण प्रश्न!

-©ॲड.बी.एस.मोरे, १२.४.२०२४

बुधवार, १० एप्रिल, २०२४

श्री स्वामी समर्थ!

श्री स्वामी समर्थ!

श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांना श्री गुरूदेव दत्ताचा अवतार मानतात. श्री दत्त अवतार हा ब्रम्हा, विष्णू, महेश या तीन प्रमुख देवतांचा त्रिगुणात्मक अवतार. तीन देवतांचे तीन गुण कोणते तर निर्मिती, निर्मित गोष्टींचे पालन पोषण व त्यांचे रक्षण.  ब्रम्हाचे कार्य निर्मिती, विष्णूचे कार्य पालन पोषण व महेशाचे कार्य रक्षण आणि ही तिन्ही कार्ये नियमांनी बद्ध आहेत ज्याला आपण विधी लिखित म्हणतो.

वरील तीन गोष्टींत श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द आहेत. श्री या शब्दात बुद्धीदेवता श्री गणेश आहे. अक्कलकोट या शब्दात अक्कल हा शब्द आहे त्याचा अर्थ बुद्धी. कोणत्याही कार्यात सर्वप्रथम बुद्धीचा वापर महत्वाचा. म्हणून प्रथम वंदन असते बुद्धीदेवता श्री गणरायाला. म्हणून आध्यात्मिक प्रार्थनेची सुरूवात श्री गणेशाय नमः अशी करायची. दुसरे वंदन सगळ्या जगाचा स्वामी म्हणजे परमेश्वर, परमात्म्याला. विश्वातील महाशक्ती किंवा विश्वचैतन्य यालाच मी परमेश्वर असे म्हणतो. म्हणून श्री गणेश वंदनेनंतर श्री विश्वचैतन्याय नमः असे म्हणून जगाच्या स्वामीला म्हणजे विश्वचैतन्याला वंदन करायचे आणि मग शेवटी श्री स्वामी समर्थ असे म्हणायचे.

श्री स्वामी समर्थ या तीन शब्दांतील श्री शब्दात गणेश आहे, स्वामी शब्दात जगाचा स्वामी परमेश्वर (महाशक्ती/विश्वचैतन्य) आहे व समर्थ शब्दात सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य बुद्धीदेवता गणेश व जगाचा स्वामी परमेश्वर या दोघांचे आहे. हे सामर्थ्य कर्मयोद्ध्याला कर्मयोग्य फळ देण्याचे सामर्थ्य आहे. चांगल्या कर्माला चांगले फळ पण वाईट कर्माला वाईटच फळ असा त्याचा अर्थ आहे.

म्हणून आपण आपल्या बुद्धीच्या मदतीने व विश्वचैतन्याच्या आधाराने चांगले कार्य करीत असताना त्याचे फळ चांगले मिळावे अशी अपेक्षा करून असे फळ मिळण्यासाठी श्री गणेशा, स्वामी परमेश्वरा तुम्ही तुमचे सामर्थ्य वापरा अशी थोडक्यात प्रार्थना "श्री स्वामी समर्थ" हे तीन शब्द उच्चारून करायची. या तीन शब्दांतील ही अगदी थोडक्यात अशी ईश्वर प्रार्थना आहे. समर्थ म्हटले की पुढे आणखी काही मागायलाच नको कारण योग्य ते कर्मफळ द्यायला श्री स्वामी म्हणजे श्री गणेश व परमेश्वर हे दोघे समर्थ आहेत. पण कर्म जर वाईट असेल तर त्याचे वाईट फळ द्यायलाही श्री स्वामी समर्थ आहेत. वाईट कर्माचे कर्मफळ हे वाईटच मिळणार मग कितीही "श्री स्वामी समर्थ" या तीन शब्दांची प्रार्थना करा. कारण ही सर्व रचना नियमबद्ध म्हणजे विधी लिखित आहे. परंतु चांगले कार्य करताना "श्री स्वामी समर्थ" अशी तीन शब्दांची प्रार्थना केल्याने एक वेगळीच आध्यात्मिक शक्ती मिळते, आत्मबल मिळते.

माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून "श्री स्वामी समर्थ" या तीन शब्दांनी बनलेल्या वाक्याचा आध्यात्मिक अर्थ वरीलप्रमाणे आहे. हाच गहन अर्थ मला श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या प्रतिमेत दिसतो.

श्री स्वामी समर्थ!

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.४.२०२४ (श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन)

मंगळवार, ९ एप्रिल, २०२४

विश्वचैतन्य म्हणजेच परमेश्वर का?

विश्वचैतन्य म्हणजेच परमेश्वर का?

पदार्थातील (मॕटर) अणुकणांचा समुच्चय/संच जागा व्यापतो त्याला त्या पदार्थाचे वस्तुमान (मटेरियल स्टफ/मास) म्हणतात आणि अणुकणांच्या या वस्तुमानाला गती देऊन हालचाल करायला भाग पाडणारी जी क्षमता त्या पदार्थात असते त्या क्षमतेला त्या पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) म्हणतात. अर्थात पदार्थाचे वस्तुमान (मटेरियल स्टफ/मास) व पदार्थाची उर्जा/शक्ती (एनर्जी) मिळून पदार्थ (मॕटर) बनतो.

मनुष्य प्राणी (लिविंग मॕटर) हा अनेक जीवपेशींनी बनलेला मांसाचा गोळा आहे. हा गोळा म्हणजे शरीर (लिविंग मटेरियल स्टफ/मास) होय. पण या शरीरात उर्जा/शक्तीच (लिविंग एनर्जी) नसेल तर मानवी शरीराची हालचालच होऊ शकणार नाही. मानवी शरीरातील ही जिवंत उर्जा/शक्ती म्हणजे जिवंत चैतन्य होय. या जिवंत चैतन्यालाच आत्मा असे म्हणतात. आत्मा म्हणजे मन नव्हे. मन हे फक्त मेंदूत (एक मांसल अवयव) असते. पण चैतन्यमय आत्मा हा संपूर्ण शरीरभर असतो. हा आत्मा (चैतन्य) जिवंत शरीरातून निघून गेला की जिवंत शरीर मृत होते. अर्थात आत्मा हा मनापेक्षा मोठा असतो. त्याचा निवास मानवी मनातही (मेंदूत) असतो. मनातील या आत्मिक चैतन्यशक्तीलाच मनःशक्ती असे म्हणतात. मनःशक्ती हा शरीरातील चैतन्यशक्तीचा एक छोटासा भाग असतो.

पदार्थ सजीव असो की निर्जीव, त्या पदार्थात जर उर्जा/शक्ती नसेल तर त्या पदार्थाला काही अर्थ नसतो. सजीव शरीरातील उर्जा/शक्तीला आत्मा तर निर्जीव पदार्थातील उर्जा/शक्तीला फक्त उर्जा/शक्ती असे म्हणता येईल. सजीव शरीरातील चैतन्यशक्ती (आत्मा) निघून गेली तर खाली राहिलेल्या मृत शरीराला काही अर्थ रहात नाही. म्हणून मृत मानवी शरीराची आपआपल्या धर्म संस्कृती नुसार विल्हेवाट लावतात.

विश्वाला एक प्रचंड मोठा पदार्थ (जायंट मॕटर) मानले तर त्यातील पदार्थीय अणुकणांच्या वस्तुमानाला (जायंट मास) हलवण्यासाठी प्रचंड मोठी उर्जा/शक्ती अर्थात महाशक्ती (जायंट एनर्जी) विश्वरूपी पदार्थात असल्याशिवाय विश्वाची हालचाल होऊच शकत नाही.

पदार्थातील अणुकणांचे वस्तुमान (मास) व त्या पदार्थातील उर्जा/ शक्ती (एनर्जी) या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. मास व एनर्जी या दोघांत कोण कोणाला भारी हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. कारण एनर्जी ही अणुमासाला गतीमान करणारी प्रचंड मोठी क्षमता आहे. मग महाप्रचंड ताकदीच्या विश्वातील महाशक्तीलाच परमेश्वर मानावे का? महाशक्तीमान विश्व चैतन्य म्हणजेच महान परमेश्वर (चैतन्यप्रभू) का? हे प्रश्न मानवी मनात निर्माण होतात. खरं तर विश्व रूपी पदार्थ व त्यातील एकूण उर्जा/ शक्ती कायम स्थिर आहे. त्यात बदल होत नाही. परिवर्तनीय बदल होतोय तो विश्व पदार्थातील अणुमासाच्या वस्तुमानात. तसेच संपूर्ण भौतिक विश्वाची परिवर्तनशील भौतिक हालचाल ही निसर्ग नियमांनी म्हणा नाहीतर विश्व नियमांनी म्हणा स्थिर आहे. अस्थिर आहे ते मानवी मन!

-©ॲड.बी.एस.मोरे, १०.४.२०२४

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

अधीनता!

अधीनता!

अधीनता म्हणजे पराधीनता, बंधन, परावलंबन, ताबेदारी. निसर्गातील विविध पदार्थ, प्राणी, माणसे या सर्व गोष्टी निसर्गाच्या अधीन आहेत. या सर्व गोष्टी निसर्गाच्या अधीन आहेत म्हणजे त्या निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीच्या अधीन आहेत. या चैतन्यशक्तीला परमेश्वर म्हटले तरी चालेल. 

परमेश्वर ही कोणी महाशक्तीमान व्यक्ती नव्हे तर ती निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती होय. ती या निसर्गातच आहे, निसर्गाच्या बाहेर नाही. या महाशक्तीनेच निसर्गाचे पदार्थीय रूप धारण केले आहे. याचा अर्थ विश्वात अगोदर शक्ती (एनर्जी) व नंतर पदार्थ (मॕटर). पण तरीही शक्ती व पदार्थ (आध्यात्मिक भाषेत आदिशक्ती व शिव) हे दोघे एकमेकांपासून अलग नाहीत. हे विश्व शक्ती व पदार्थ (एनर्जी व मॕटर), शक्ती व शिव यांनी बनलेले आहे. विश्वाला निसर्ग असे मी म्हणतो.

आदिशक्ती ही शिवापेक्षा श्रेष्ठ होय कारण शिव ही तिची निर्मिती होय. निर्मिती ही निर्माणकर्त्या महाशक्ती पेक्षा मोठी होऊ शकत नाही. परंतु मनुष्य त्याच्या तोकड्या भावनेने व तोकड्या बुद्धीने निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीला विविध देवरूपांत बसविण्याचा प्रयत्न करतो. परंतु असा प्रयत्न हा व्यर्थ असतो कारण निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती ही महाशक्तीमानच नव्हे तर अनाकलनीयही आहे. तिला एखाद्या महामानवी व्यक्तिमत्त्वात बसवणे चूक आहे. त्या महाशक्तीला कोणत्याही देवावतारात, देवदूत, देव प्रेषितात किंवा महापुरूषात बसवता येत नाही. पण माणूस स्वतःच्या कल्पनेने तसा बळेच प्रयत्न करतो.

निसर्गातील सर्व पदार्थ, प्राणी व माणसे निसर्गाच्या (निसर्गातील चैतन्यमय महाशक्तीच्या) अधीन आहेत म्हणून माणसाने या अधीन पदार्थ, प्राणी, माणसांच्या अधीन रहावे का? अधीन रहाणे व आहारी जाणे यात फरक आहे. अधीन रहाणे म्हणजे शरणागत, गुलाम राहणे व आहारी जाणे म्हणजे वाहवत जाणे किंवा नदी प्रवाहातील ओंडक्या प्रमाणे प्रवाहाबरोबर वाहत जाणे. या दोन्ही गोष्टी मनुष्याने इतर पदार्थ, प्राणी व माणसांच्या बाबतीत नेटाने टाळल्या पाहिजेत. कारण प्रत्येकाची निसर्गातील महाशक्तीपुढे असलेली अधीनता वेगळी आहे. प्रत्येकाची ताकद (स्ट्रेन्ग्थ) वेगळी, प्रत्येकाचा कमकुवतपणा (विकनेस) वेगळा. त्यामुळे कोणी कोणाच्या किती अधीन रहावे याला ठराविक प्रमाण आहे. एखादी महान व्यक्ती जर आपल्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर तिला आदराने वंदन करणे वेगळे आणि तिच्यापुढे सतत शरणागत, गुलामीच्या भावनेने झुकून राहणे वेगळे. निसर्गातील महाशक्तीपुढे झुकून राहणे वेगळे व एखाद्या शक्तिशाली व्यक्तीपुढे झुकून राहणे वेगळे कारण या जगातील कोणतीही व्यक्ती निसर्गातील चैतन्यमय महाशक्ती एवढी मोठी असू शकत नाही. जगात शेरास सव्वाशेर निर्माण होतोच कारण तशीच रचना या चैतन्य महाशक्तीची आहे. म्हणून माणसाने निसर्गातील महाशक्ती सोडून इतर कोणाच्याही अधीन राहू नये मग कोणी कितीही मोठा असो!

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.४.२०२४

रविवार, ७ एप्रिल, २०२४

मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही!

मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही!

या जगात निसर्ग नियमांपासून कोणीही मुक्त नाही, स्वतंत्र नाही. ज्यांना आपण परमेश्वराचे अवतार मानतो त्यांना सुद्धा निसर्ग विज्ञानाचे चक्र पार करता आले नाही. त्यांनाही नैसर्गिक भोग भोगावेच लागले व त्यांचाही अंत झाला. दैवी चमत्कार करून त्यांना अमर होता आले नाही. कालानुरूप मंदिरे जीर्ण होतात व त्यांचा जीर्णोद्धार करावा लागतो. देव देवतांच्या मूर्त्यांना कालानुरूप तडे जातात व त्यावर रासायनिक लेप लावावा लागतो. अर्थात ज्या देव मूर्त्यांत आपण परमेश्वर बघतो त्या मूर्त्या निसर्ग नियमांच्या अधीन आहेत. परमेश्वर हा जर निसर्गाचा निर्माता असे मानले तर तो कधीही निसर्गाचा गुलाम असता कामा नये. उलट निसर्गच त्या निर्मात्याच्या म्हणजे परमेश्वराच्या तालावर नाचत राहिला पाहिजे. खरंच नाचतो का निसर्ग परमेश्वराच्या तालावर? खरं तर निसर्ग त्याच्या तालावर नाचतो व इतरांना त्याच्या तालावर नाचवतो. निसर्गाच्या या वास्तवाचा प्रत्यक्ष अनुभव घेत असताना त्याच्या आत असलेला म्हणजे निसर्गाधीन असलेला परमेश्वर वेगळा व त्याच्या बाहेर असलेला म्हणजे निसर्गावर बाहेरून हुकूमत गाजवत असलेला परमेश्वर वेगळा, असे दोन वेगळे परमेश्वर आहेत का हे कळायला मार्ग नाही. निसर्गात जगताना परमेश्वर सुद्धा जिवंत जगता आला पाहिजे. तो प्रत्यक्षात जगता आला पाहिजे, कल्पनेत नव्हे. परंतु मानवजातीस खरा धर्म व जिवंत परमेश्वर कधी सापडलाच नाही. परमेश्वराचे मानले गेलेले देवावतार किंवा प्रेषित यांना जिवंत परमेश्वर मानणे चूक की बरोबर हे मानवी बुद्धीने नीट विचार करून ठरवावे. कदाचित परमेश्वर ही कोणी सर्वशक्तिमान व्यक्ती नसून ती सर्वशक्तिमान निसर्ग उर्जा, निसर्ग शक्ती असावी. ही महाशक्ती हाच निसर्गासह मनुष्य जीवनाचा स्त्रोत असावा? समजा असे जर कदाचित असेल तर मग त्या महाशक्तीची आध्यात्मिक ध्यानधारणा करून तिला जिवंत जगता येईल का? खरं तर एवढया मोठ्या शक्तीला स्वतःत सामावून घ्यायला मनुष्य एवढा सामर्थ्यशाली आहे का? आणि त्या अनाकलनीय महाशक्तीची प्रार्थना करून ती खरंच कोणाला पावत असेल का? हे प्रश्न बुद्धी असलेल्या माणसाच्या मनात निर्माण होणार म्हणजे होणार!

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.४.२०२४

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

NOTHING IS CHANGED, NOTHING WILL CHANGE!

NOTHING IS CHANGED, NOTHING WILL CHANGE!

Nothing is changed and nothing will change. The total matter & total energy of world is constantly the same. The cycles within Nature have remained  constantly the same. The human world has been constantly competitive with all types of people within it namely rich industrialists, shrewd politicians, cruel gangsters, scientists and technocrats, intellectuals, lawyers and celebrities and of course common people. One has to choose person of his class and category to develop life friendship for close give and take. Really speaking, everything is almost fixed and people have little choices. In past chitchatting was face to face, it is now on facebook without anybody having met face to face. The radio, television, cinema houses were entertainment and  time pass platforms in the past. Now in addition to them many social media platforms have flourished for time pass purpose. The time pass business has thus remained constant. So please do not live in the fantasy of change. Nothing is changed and nothing will change. Just observe and watch the show which is constantly the same all the time forever.

-©Adv.B.S.More, 6.4.2024

गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

छोटा चंद्र पृथ्वी जवळ म्हणून मोठा!

छोटा चंद्र पृथ्वी जवळ म्हणून होतो पृथ्वीला मोठा, तर मोठा सूर्य पृथ्वी पासून लांब म्हणून होतो पृथ्वीला छोटा, छोट्या संधीच सतत जवळ राहिल्यावर व मोठ्या संधी सतत लांब राहिल्यावर माणसाच्या प्रगतीला सूर्य ग्रहण लागते अर्थात सूर्यासारखे तेजस्वी यश लांब राहते! -ॲड.बी.एस.मोरे