https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, ८ जून, २०२०

काळतोंड्या कोरोना!

कुठून आलास रे काळतोंड्या कोरोना?

या कोरोनाने मला खूप काही शिकवले. हे माझे, ते तुझे या वादाच्या बूडालाच काडी लावली या कोरोनाने! या कोरोना लॉकडाऊन काळात आजूबाजूला माणसे मरताना बघतोय. कोरोनाग्रस्त रूग्ण मेल्याचे सोडा पण साध्या आजाराने किंवा वयोमानानुसार माणूस मेला तरी त्याच्या मयताकडे आणि मयताच्या कुटुंब सदस्यांकडे लोक टवकारून बघतात. मेलेल्या माणसाबरोबर किती आनंदाने दिवस घालवले असतील त्या कुटुंब सदस्यांनी! घरातला कुटुंब प्रमुख जाणे म्हणजे घराचा वटवृक्षच ढासळणे. पण हाच वटवृक्ष या कोरोना काळात ढासळला तर कसले दुःख आणि कसले रडणे! हळूच ॲम्ब्युलन्स बोलवायची, त्यात तो मयत झालेला  वटवृक्ष कोंबायचा आणि तोंडाला मास्क लावून घाबरत घाबरत तो वटवृक्ष धार्मिक विधी प्रमाणे जाळायला नाहीतर पुरायला स्मशानभूमीत किंवा कबरस्थानात न्यायचा. काय पण हा विचित्र अंत माणसाचा! कुठून आला आणि कोणी आणला हा कोरोना? वाट लावलीय सगळ्या माणसांची या नवीन विषाणूने! या काळात अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अर्धवटराव मात्र असा आव आणतात त्यांच्या  शहाणपणाचा की बोलायलाच नको! हे सगळे कोरोनाग्रस्त वातावरण बघून कोरोनाची भीती कमी आणि आजूबाजूला वावरणाऱ्या अर्धवट लोकांचीच भीती जास्त वाटू लागलीय. आता पावसाळ्यात थंडी, ताप, सर्दी, खोकला हे नेहमीचे आजार (सॉरी आजाराची लक्षणे) होणारच ना! पण ही सामान्य लक्षणे घेऊन  आपल्या फॕमिली डॉक्टरकडे जायची पण भीती वाटू लागलीय. काही भरवसा नाही त्या डॉक्टरचाही! चुकून त्याला कोरोनाचा संशय यायचा आणि मग ती महागडी कोरोना टेस्ट करायला सांगायचा. आणि त्या डॉक्टरलाच लक्षणे नसलेला कोरोना असला तर? बापरे, म्हणजे आली का नसती पंचाईत! घरात तीन महिने बसून कंटाळा आलाय. पण लॉकडाऊन उठवल्याने लोकल ट्रेन्स सुरू झाल्या तरी त्या ट्रेन्समधून डोंबिवली वरून मुंबईला कामाला जायची भीतीच वाटणार. किती वेळ तो मास्क तोंडाला लावून ठेवायचा! गुदमरून जायला होते. मोकळा श्वास घेता येत नाही. आणि ट्रेन मध्ये तीन फूटाचे अंतर ठेऊन कसे बसणार व कसे उभे राहणार? आणि ट्रेनला लटकत जाणाऱ्यांचे काय होणार? मला क्लायंटकडे भेट द्यावी लागते तेंव्हा तिथे लिगल टायपिस्टला जवळ बसून तोंडाने डिक्टेशन द्यावे लागते. आता मास्क लावून असे डिक्टेशन मी कसे देणार? या सगळ्या गोष्टी, हे सगळे विचित्र प्रश्न डोक्यात सारखे घोंघावत राहतात. या कोरोनाने माझ्यासाठी मात्र एक गोष्ट चांगली केली. माझी मरणाची भीतीच घालवून टाकली. मी आता बिनधास्त झालोय. मरायला तयार झालोय. पण काही मित्र फोनवर म्हणतात "अरे, तू खूप तयार झाला असशील कोरोनाशी लढत लढत कोरोना योध्दा म्हणून मरायला, पण तुझ्या बरोबर राहणाऱ्यांचे काय, तू मरशील पण वर जाताना त्यांना कोरोना चिकटवून जाशील त्याचे काय"? म्हणजे आली का पंचाईत! धड जगताही येत नाही आणि धड मरताही येत नाही. कुठून आलास रे काळतोंड्या कोरोना?

-ॲड.बी.एस.मोरे©९.६.२०२०

रविवार, ७ जून, २०२०

हे परमेश्वरा!

हे परमेश्वरा!

निसर्गात तसे सगळे मुबलक आहे. निसर्गाच्या अवाढव्य पसाऱ्यात निसर्गाचा कायदाही आहे. तरीही आपल्याला राजा लागतो, लोकशाही सरकार लागते. अगदी तसेच आपल्याला देवही लागतो. पण नास्तिक लोक याला अपवाद आहेत. तरीही वयानुसार अवयव गलितगात्र होतात, स्मृती कमकुवत होते त्यामुळे आपणच वाढवलेला भौतिक पसारा आपल्याला कमी करावा लागतो. त्याच न्यायाने आपण आपला आध्यात्मिक पसाराही कमी केला पाहिजे. देवधर्माची कर्मकांडे निदान उतार वयात तरी कमी केली पाहिजेत. उतार वय झाल्यावर तिर्थस्थळांना भेटी देणे, देवाच्या परिक्रमा करणे या गोष्टी तर मला पटतच नाहीत. उतार वयात स्वार्थाला ओहोटी लागलेली असते. मग का उधाण येते अचानक परमार्थाला! याचे कारण बहुतेक हे असावे की वृध्दापकाळी मृत्यूची चाहूल लागलेली असते. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या गोष्टींवर तर माझा बिलकुल विश्वास नाही. वृध्दापकाळी देवाचे प्रेम जास्त वाढते की त्याची भीती जास्त वाढते? तिर्थस्थळांना भेटी किंवा परिक्रमा या गोष्टी मी आयुष्यात कधी केल्या नाहीत. मग आता वृध्दापकाळी या गोष्टी करण्याचा तर प्रश्नच नाही. का, कशासाठी करायच्या या गोष्टी आणि त्याही विशेष करून म्हातारपणी! म्हातारपणी तुमचे शरीरच नीट साथ देईनासे होते. हात, पायच नाहीत तर ओठ, जीभ सुध्दा थरथरते. मग तुम्ही कसली लांबलचक देव प्रार्थना म्हणणार! देवाच्या अगोदर श्री अशी उपाधी लावूनच, ओम् शांती सारखे शब्द उच्चारतच देवाला स्मरले पाहिजे अशी मोठी अपेक्षा उतार वयात गलितगात्र झालेल्या शरीराकडून देव तरी करीत असेल का? कधीकाळी कोणत्या तरी धर्मपंडिताने सांगितले म्हणून तेच करीत बसायचे का? स्वतःला बुद्धी आहे की नाही? खरं म्हणजे मी आस्तिक आहे. पण माझी आस्तिकता ही नैसर्गिक आहे, वैज्ञानिक आहे, व्यावहारिक आहे. ती काल्पनिक किंवा आभासी नाही. निसर्गाचा गाभा, त्याचे मूळ म्हणजे देव अशी माझी कल्पना नव्हे तर ती माझी वैज्ञानिक संकल्पना आहे. कल्पना (imagination) व संकल्पना (concept) यात फरक असतो. त्या निसर्ग मूळाची म्हणजे देवाची प्रार्थना मी "हे परमेश्वरा" एवढेच म्हणून करतो. ख्रिश्चन धर्मीय "ओ गॉड" असे म्हणताना व मुस्लिम धर्मीय "या अल्ला" असे म्हणताना मी पाहतो, ऐकतो. अगदी तसेच हिंदू धर्मीय म्हणून "हे परमेश्वरा" असे मी थोडक्यात त्या देवाला स्मरतो. निसर्गात देव आहे ही संकल्पना जर मनात घट्ट असेल तर मग त्या देवाला सगळे कळते हेही मनाने ठाम स्वीकारले पाहिजे ना! तुम्हाला काय हवे आहे हे जर देवाला कळते तर मग त्याला पुन्हा का मागायचे? म्हणून आता उतार वयात देवाला "हे परमेश्वरा" एवढेच म्हणतो.

-ॲड.बी.एस.मोरे©८.६.२०२०

टीपः या लेखातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. देवाची प्रार्थना कोणी कशी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी इथे फक्त मी स्वतः देवाची प्रार्थना कशी करतो (खरं तर स्मरण कसे करतो) याविषयी लिहिले आहे. आणि विशेष म्हणजे माझे देवाला असे स्मरणे हे कोणत्याही निकषावर अधार्मिक नाही यावर देवावर श्रध्दा असणाऱ्या जगातील सर्वच धर्मांचे एकमत होईल असा माझा ठाम विश्वास आहे.

-ॲड.बी.एस.मोरे©८.६.२०२०

शुक्रवार, ५ जून, २०२०

WE ARE NOT SAME!

WE ARE NOT SCIENTIFICALLY SAME!

(1) We human beings are not same genetically (DNA wise) and also  mentally, although we are uniform biologically as top ecological living  species evolved by Nature. The mentally means both emotionally and intellectually. This is the reason why environmental effect including effect of disease causing germs and viruses on human body and mind and human body and mind response to environmental ups and downs differ from person to person meaning it is not the same for all human beings uniformly although all human beings are biologically uniform as top ecological living species.

(2) But inspite of this scientific truth it is paradoxical that our social laws insist on principle of equality for all human beings. The equality  as principle of law is conceived by communism. But the capitalism goes with equity as principle of law also known as the principle of reasonable classification. The  debate between communism and capitalism is actually the debate between equality and equity. My comparative study between natural law and social law reminds me that natural justice generated by Nature and social justice conceived by social conscience of human society  is not the same. We cannot drag Nature to the level of small part of Nature called human society. It is a fact that even after social law of civilized human society giving equal opportunity to all human beings to develop their talent, the human beings are not going to be equal because talent or intellectual capacity is not the same with all human beings. That is the reason why even if all rich students are given equal opportunity to learn in international schools of high repute all will not score equal marks in the examination conducted by such schools.

(3) What I understand from my aforesaid comparative study is that the equality is myth within Nature and if it is myth within Nature, it is also myth within human society because human society is just a small part of Nature. This can also be understood in the context of present corona (covid-19) epidemic and its effect on human society of the whole world. Although social government forced lockdown to prevent spread of this novel corona virus is uniform measure adopted by all governments worldwide and although mask and social distance measure is going to remain as an uniform measure of preventive care worldwide, fact remains that the immunity of all human beings to face this novel viral attack is not the same worldwide and therefore the medical treatment to cure corona disease cannot remain the same worldwide even after invention of uniform medicine on this disease.

(4) It is paradoxical that although our common preventive care is found to be same, our risk is not the same. This confirms that the equity is basic principle of law of Nature and not equality. The near exact uniformity cannot get converted into exact equality. Even physical exercise generally advised by doctors to almost all persons as uniform health measure is myth in my understanding because it cannot be applied equally in equal quantity to all persons. The heavy exercise of youngsters cannot be advised to old aged people. There is no perfect measurement of moderate exercise and that is scientifically true.

(5) Let us accept the fact that the exactness and perfection of basic elementary physics and chemistry is not applicable to evolutionary biology and sociology including philosophy and religion adopted by different human groups. We have to accept the fact that we are going to have difference of opinions in the matter of philosophy, religion and also our social laws because we human beings are not exactly the same or perfectly uniform living species in terms of science of Nature!

-Adv.B.S.More©5.6.2020


गुरुवार, ४ जून, २०२०

आॕनलाईन शाळा!

अॉनलाईन शाळा या शाळाच नव्हेत!

कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू व रोगजंतू पचवलेत माणसाने गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात. हळूहळू लॉकडाऊन सैल होणार व थोड्या दिवसांत तो उठवावाच लागणार. मग मास्क लावून विद्यार्थी व शिक्षक शाळेत जातील. जावेच लागेल. मैदानी खेळ घरात खेळता येत नाहीत तशा शाळा घरात अॉनलाईन चालत नाहीत, नव्हे अॉनलाईन शाळा या शाळाच नव्हेत!

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

कुदरत और ईश्वर!

कुदरत और ईश्वर!

कुदरत है, लेकिन ईश्वर नही, यह नास्तिक बहस चलता ही आया है. दोनोंको जोड दो, फिर आस्तिक-नास्तिक वाद खतम! तत्वज्ञान और विज्ञान मे फर्क है. कुदरत का विज्ञान वैश्विक सत्य है, लेकिन ईश्वर है या नही का तत्वज्ञान यह सब अपने अपने तर्क है. बहस तर्क पर ही होता है, सत्य पर नही!

-ॲड.बी.एस.मोरे©३.६.२०२०

गंमतीदार स्वप्न!

स्वप्नांना काय रोखणार, त्यांचीही गंमत असते!

(१) लॉकडाऊनचा काळ म्हणजे कोरोनाच्या भीतीने गांगरून, घाबरून जायचा काळ! या काळात झोपेत पडणारी स्वप्नेही तशीच हवीत ना! पण तसे होत नाही. काल रात्री झोपेत मला एक गंमतीदार स्वप्न पडले. पडले म्हणण्यापेक्षा माझ्या मेंदूने ते माझ्यावर लादले असेच म्हणावे लागेल.

(२) या स्वप्नात माझी कंबर दुखत होती म्हणून तिचा व एकूणच लॉकडाऊन मुळे आंबलेल्या माझ्या शरीराचा मसाज करण्यासाठी मी एका मसाज पार्लर मध्ये गेलो. सुरूवातीलाच मी काऊंटर वर मसाज फी म्हणून ५०० रूपये दिले. ती फी दिल्यावर मला पोहे व चहा देऊन  माझे स्वागत करण्यात आले. मसाज पार्लर व पोहे व चहाचा नाष्टा, हा प्रकारच माझ्या डोक्यावरून गेला. पण मी त्या नाष्ट्याची मजा घेतली. त्या पार्लर मध्ये मसाज करून घेणाऱ्या पुरूषांची रांग लागली होती. मी पण त्या रांगेत जाऊन बसलो. आत असलेल्या एका खोलीत एकेकाला घेऊन त्याचा मसाज केला जात होता.

(३) शेवटी माझा नंबर आला. मग मी त्या आतल्या खोलीत गेलो. तिथे डॉक्टरच्या दवाखान्यात असतो तसा गादीचा बाकडा होता. त्या खोलीत बिग बॉस सारखा कोठून तरी आवाज आला व मला त्या बाकड्यावर झोपा असे सांगण्यात आले. मी बाकड्यावर झोपल्यावर साधारण ७० वयाची एक म्हातारी आली. तिने मला तुमची बेंबी उघडी करा असे सांगितले. मी तसे केले. मग तिने माझ्या बेंबीवर नरसाळे धरून बेंबीत कसले तरी तेल ओतले व तेल बेंबीत चांगले जिरल्यावर आता चला अशी म्हणाली. मी त्या म्हातारीला म्हणालो "अहो, मी इथे मसाज करायला आलोय आणि तुम्ही हे काय केले"? तर ती मला म्हणाली की, यालाच मसाज म्हणतात. मी डोक्यावर हात मारून त्या मसाज पार्लरच्या बाहेर पडलो.

(४) तुम्हाला वाटेल की हे स्वप्न उगाच माझ्या कल्पनेने रंगवून सांगतोय. पण खरं सांगतोय की, हे स्वप्न अगदी असेच पडले. तुम्ही म्हणाल की, मग स्वप्नात म्हातारीच का आली, म्हातारा का आला नाही? तर याला माझ्याकडे उत्तर नाही. मीही ६३ वर्षाचा म्हातारा आहे, मग ७० वर्षाची म्हातारी का आली, यालाही माझ्याकडे उत्तर नाही. खरंच सांगतो की झोपी गेल्यावर आपला मेंदू आपला पूर्ण ताबा घेतो व त्याला हवी तशी स्वप्ने आपल्यावर लादतो. अशा स्वप्नांना रोखणे आपल्या नियंत्रणात नसते.

-ॲड.बी.एस.मोरे©४.६.२०२०

निसर्गराजा!

राज्य करावे तर निसर्गाप्रमाणे!

(१) लहानपणापासूनच निसर्गाचे मला खूप कुतूहल व आकर्षण! प्राथमिक शाळेपासून सतत पुस्तके वाचतोय, त्यातून या निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करतोय. अनेक शास्त्रज्ञांचे शोध वाचले व अनेक तत्ववेत्त्यांचे तात्विक लिखाण वाचले पण त्यातून माझी तृप्ती झालीच नाही व होतच नाही. माझ्या ज्ञानाचा घडा रिकामा राहिल्यासारखाच वाटत आहे. निसर्गाला मी जाणून घेण्यात खूप कमी पडतोय, म्हणून मी अतृप्त आहे.

(२) म्हणून वाचनाबरोबर मी निसर्गातील भवतालाचे, पर्यावरणीय हालचालीचे खूप जवळून, खूप बारकाईने निरीक्षण करण्याचा प्रयत्न करतो. त्या निरीक्षणातून मला जो निसर्ग कळतो तो मी पुस्तके वाचून मिळविलेल्या ज्ञानापेक्षा खूप मोठा आहे. निसर्गाच्या जास्त जवळ जाण्याने माझ्या जाणिवा प्रगल्भ होतात. त्या प्रगल्भतेतून पुस्तकातील ज्ञानाहून वेगळे असलेले जे ज्ञान मला मिळते त्याचा अंतर्भाव माझ्या लिखाणात असतो. अर्थात माझ्या लिखाणात पुस्तकांतून मिळविलेले ज्ञान व निसर्गाशी मैत्री करीत स्वतःच्या निरीक्षणातून मिळविलेले स्वतंत्र ज्ञान यांचे मिश्रण असते. निसर्गाविषयीचे माझे निरीक्षण व समाजात असणाऱ्या इतर लोकांचे निरीक्षण यात मोठी तफावत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी जे लिहितो ते लोकांना पटण्याची शक्यता तशी कमीच. तरीही वाद टाळीत मी माझे लिखाण चालूच ठेवले आहे.

(३) आजचा विषय राजा म्हणून निसर्ग मला कसा वाटतो हा आहे. जगाच्या पर्यावरणात व जन्म, जीवन व मृत्यू या जीवनचक्रात मला निसर्गाचे बळ जाणवते व त्या बळाचा प्रभाव जाणवतो. निसर्ग त्याच्या बळाचा वापर करतोय व सर्व गोष्टी त्या बळाच्या प्रभावाखाली अगदी अपरिहार्यपणे, अनिवार्यपणे घडवून आणतोय अशी मला जाणीव होतेय. पण जगत असताना आपण करीत असलेल्या गोष्टी आपण बळेच करतोय असे जाणवत नाही. त्या गोष्टी अगदी सहज, नैसर्गिकपणे आपल्याकडून घडतात. त्यात निसर्ग त्याच्या बळाने आपल्यावर त्याची बळजबरी करतोय अशी जाणीव होत नाही.

(४) मनुष्य त्याच्या बुद्धीने निसर्गाच्या राज्य कारभारात ढवळाढवळ करून ज्या कृत्रिम सोयीसुविधा स्वतःच्या सोयीसाठी निर्माण करतोय त्या गोष्टीही अगदी सहज, नैसर्गिकपणे होत आहेत, मग त्यांना कृत्रिम म्हणायचे कसे? त्याही नैसर्गिकच! कारण निसर्गाने त्यासाठी परवानगीच दिली नसती तर मनुष्याला स्वतःची तांत्रिक व सामाजिक प्रगती करताच आली नसती. म्हणून असे वाटते की, जणूकाही निसर्गच मनुष्याकडून या गोष्टी सहजपणे करून घेतोय आणि मनुष्याला मात्र उगाच वाटत राहते की स्वतःच्या बुद्धीने तोच निसर्ग राजावर मात करतोय.

(५) सद्याचा कोरोना विषाणूचा कहर असो नाहीतर चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत, निसर्ग आपल्याला यातून घडवतोय, शिकवतोय असेच माझ्या मनाला वाटत राहते. या व अशा सर्वच नैसर्गिक गोष्टींत निसर्गाच्या जुलूम जबरदस्तीचा भागच जाणवत नाही. या सर्व गोष्टींत निसर्गाचे बळ आहे, त्या बळाचा वापर आहे व त्या बळाचा प्रभाव आहे, पण निसर्गाची ती बळजबरी, ती हुकूमशाही मला जाणवतच नाही. सगळं अगदी नैसर्गिकपणे, सहज होतंय!

(६) निसर्गाच्या या आश्चर्यकारक, आगळ्या वेगळ्या राजेशाहीत निसर्गाचाच एक छोटा भाग असलेल्या बुद्धीमान मनुष्याने स्वतःच्या विशेष  सोयीसाठी स्वतःची एक स्वतंत्र हुकूमशाही लोकशाहीच्या नावाने सुरू केली आहे. या लोकशाहीत राज्य कारभार करणाऱ्या राज्य कर्त्यांचे हुकूम जनतेला असे वाटले पाहिजेत की जणूकाही त्यात निसर्गाची सहजता आहे. माझे नास्तिकांनाही जाहीर आव्हान आहे की, तुम्ही निसर्गाला देव मानू नका किंवा निसर्गात देवाचे अस्तित्व आहे हे मान्य करू नका, पण तुम्ही निसर्गाला राजा मानणार आहात की नाही? असे तर नाही ना की, तुम्ही शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांना मानणार पण त्या शरीराचा, इंद्रियांचा राजा जो मेंदू आहे त्याला तुम्ही मान्य करणार नाहीत? माझ्या मनाला तरी निसर्ग हा राजा म्हणून खूप भावतो व म्हणून माझे म्हणणे हे आहे की, राज्य करावे तर निसर्गाप्रमाणे!

-ॲड.बी.एस.मोरे©४.६.२०२०