https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

अंतराळ, अवकाश (स्पेस)

अंतराळ, अवकाश म्हणजे अशी पोकळी सदृश्य जागा (स्पेस) ज्या जागेत अनेक तारकापुंजांचे थवे (गॕलक्सीज) एकमेकांच्या जवळ येत एकमेकांत मिसळण्याची किंवा एकमेकांपासून दूर जाण्याची सतत हालचाल करीत असतात, याच पोकळी सदृश्य जागेचे व सगळ्या तारकापुंजांच्या थव्याचे मिळून विश्व किंवा ब्रम्हांड बनले आहे जे सतत प्रसरण पावत आहे, देश किंवा राष्ट्र ही सुद्धा पृथ्वीवरील एक अशी प्रादेशिक जागा ज्यात त्या देशाच्या नागरिकांचे थवे तारकापुंजांच्या थव्यांप्रमाणे गटागटाने एकमेकांच्या जवळ येत असतात किंवा असहकार पुकारून एकमेकांपासून दूर जात असतात! -ॲड.बी.एस.मोरे

Blood pressure and heart beat problems!

BLOOD PRESSURE AND HEART BEAT PROBLEMS ARE BOTH HEART ISSUES.

Blood pressure rate and heart beat rate problems are both heart related problems. Blood pressure is pressure when heart pushes blood out or when heart rests between beats. Normal BP is between 90/60 mmHg and 120/80 mmHg. High BP is 140/90 mmHg or higher. Low BP is below 90/60 mmHg.

Heart beat problem is different from blood pressure problem although both are heart related problems. Tachycardia is high heart beat rate issue and it exists when resting heart beat rate remains consistently above 100 beats per minute. On the other hand, Bradycardia is low heart beat rate problem and it exits when resting heart beat rate remains below 60 beats per minute. Low heart beats can give signs or symptoms of fainting, dizziness or slow/ shortness of breath.

Google search by Adv.B.S.More on 7.2.2024

आता लोकांच्या मागे लागणे बंद!

आता लोकांच्या मागे लागणे बंद!

स्वकष्टाने मिळवलेले माझे ज्ञान मी लोकांपुढे खूप पाजळले. पण त्यांना त्याची कदर नाही. व्यापारी भाषेत बोलायचे तर माझ्या ज्ञानाची लोकांना गरज नाही म्हणून माझ्या ज्ञानाला बाजारात मागणी नाही, उठाव नाही.

भारतीय स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास मी वाचला. तो इतिहास म्हणजे मागील पिढीचा इतिहास जी पिढी नैसर्गिक जीवन चक्रानुसार कालवश झाल्याने आता हयात नाही. त्या इतिहासात बघितले तर असे दिसून येईल की वर्तमान काळात जशी फक्त काही लोकांचीच शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांत चलती आहे तशी चलती त्या काळातही फक्त काही मूठभर लोकांचीच होती व ते मूठभर लोकच समाजात चमकत होते. याचा अर्थ असा नव्हे की फक्त त्या मूठभर लोकांकडेच काही विशेष गुण होते, काही विशेष बुद्धिमत्ता होती. असे कितीतरी हिरे त्या काळातही झाकोळले गेले होते. त्यांना चमकण्याची संधी मिळाली नाही किंवा त्यांना हेतुपुरस्कर त्या काळातील काही मूठभर सरंजामी प्रवृत्तीच्या लोकांकडून डावलले गेले. प्रतिकूल परिस्थितीतून काही महान माणसे त्या काळात पुढे आली पण त्या पुढे येण्यामागे फक्त त्यांचे विशेष गुण, विशेष बुद्धिमत्ताच कारणीभूत नव्हती तर योगायोगाने इतर घटकही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले ज्यांच्या पाठिंब्याने त्या व्यक्ती त्या काळी समाजात चमकू शकल्या व पुढे इतिहासात अजरामर होऊन वर्तमानकाळात मार्गदर्शक म्हणून उभ्या राहिल्या.

आता वर्तमान काळात वर्तमान पिढी कडूनही तेच होताना दिसत आहे. मी त्या महान व्यक्तींएवढा मोठा नाही. पण वास्तव हे आहे की स्वकष्टार्जित सखोल ज्ञान व प्रामाणिकपणा या चांगल्या गोष्टी जवळ असूनही या गोष्टींना उचलून धरणारे आर्थिक दृष्ट्या व राजकीय दृष्ट्या सबळ व्यक्तींचे पाठबळ तर मला मिळाले नाहीच पण समाजातूनही माझ्या या चांगल्या गोष्टींना झिडकारले गेले. त्यामुळे साहजिकच माझे ज्ञान माझ्या जवळच कुजले गेले, सडले गेले.

माझ्या ज्ञानाला व प्रामाणिकपणाला उचलून धरणारी पॉवरफुल माणसे योगायोगाने म्हणा किंवा आणखी कशाने म्हणा मला का मिळाली नाहीत? याला काहीजण दैव, नशीब म्हणतील तर काहीजण प्रारब्ध. या काहीजणांना तसे खुशाल म्हणू द्या. मी त्याकडे लक्ष दिले नाही व देणार नाही. दैवी चमत्कारावर माझा बिलकुल विश्वास नाही व तसल्या चमत्काराची मी अपेक्षाही करीत नाही. त्यासाठी देवळात जाऊन घंटानाद करण्यात, देवाच्या पोथ्या वाचण्यात किंवा देवाची जपमाळ ओढत बसण्यात मला जराही रस नाही. कारण माझे अध्यात्म हे अंधश्रद्ध नसून वैज्ञानिक आहे, वास्तव आहे. या अनुभवातून बोध घेऊन उतार वयात एकच गोष्ट करणार व ती म्हणजे सखोल अभ्यास करून अतिशय कष्टाने मिळवलेले ज्ञान आता लोकांपुढे फुकटात पाजळायचे नाही व आपले ज्ञान लोकांनी उचलून धरावे म्हणून लोकांच्या मागे लागायचे नाही व त्यांच्या नादी लागायचे नाही. माझ्या ज्ञानाला ओळखण्याची समाजातील लोकांची पात्रता नाही, लायकी नाही त्यांच्याकडून कसली अपेक्षा करीत बसायचे? स्वतःचे ज्ञान स्वतःपुरते वापरायचे व स्वतःसाठी एन्जॉय करायचे. आता लोकांच्या मागे लागणे बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.२.२०२४

SUPPLEMENTS!

SUPPLEMENTS!

The original structure and  working mechanism of the natural products including humans beings produced by Nature is so good, so perfect and so beautiful  that there is no need for any human intervention & intermeddling with it.

But the human beings at the instance of their over intelligence, over wisdom and with profit motive have spoiled original structure & original mechanism by artificial supplements. The processed fast foods as supplements to original natural food products is fine example of artificial supplements created by human beings out of their over enthusiasm & greed in the name of their technical advancement & industrial progress.

To get away from artificial supplements by throwing them in dustbin for living natural life has been made difficult by human beings themselves because they have forgotten originality of Nature by getting habitual to their own creation of artificial supplements. The artificial intelligence is the latest model of such man made artificial supplement.

-©Adv.B.S.More, 6.2.2024

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

मी मरणाच्या वयात आलो!

मी मरणाच्या वयात आलो!

वैद्यकीय निष्कर्षानुसार भारतीय लोकांचे सरासरी आयुष्य ६७ वर्षे आहे व खूप कमी लोक ८० वर्षाच्या पुढे जगतात. हा निष्कर्ष कळल्यावर मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. माझे मन आनंदाने नाचत आहे. याचे कारण काय तर मला हे कळले की परमेश्वराने मला सरासरी वयापर्यंत म्हणजे ६७ वर्षापर्यंत मस्त जगवले. मी आणखी पाच महिन्यांनी २७ जून २०२४ रोजी ६७ वर्षे पूर्ण करून ६८ वर्ष वयात प्रवेश करणार. म्हणजे ६७ वर्षे आयुष्याची सरासरी गाठायला आता फक्त पाच महिने बाकी आहेत. त्याच्या आतच गेल्या महिन्यात परमेश्वराने मला माझ्या मृत्यूचा सिग्नल दिला. मृत्यू घंटाच म्हणा की. गेल्या महिन्यात माझ्या हृदयात सेकंड डिगरीचा हार्ट ब्लॉक निघाला. त्यामुळे माझ्या हृदयाचे ठोके अनियमित, संथ झाले. तसा मी संथ माणूस. शांतपणे हळूहळू कासवासारखा जीवन जगणारा संथ माणूस. मोठ्या श्रीमंत लोकांच्या दारात जाऊन त्यांना कमी फी मध्ये शांतपणे मोठा वकिली सल्ला देणारा व कमी पैशात मोठ्या समाधानाने जीवन जगणारा विशाल मनाचा संथ वकील. आता अशा संथ माणसाच्या हृदयाचे ठोके महान परमेश्वराने ६७ या सरासरी वयात संथ केले व मी आता मरणाच्या वयात आलोय असे संथपणे सांगितले त्याबद्दल महान परमेश्वराचे आभार मानायचे सोडून बसवू का मी तो बॕटरीवाला पेसमेकर माझ्या छातीत माझ्या हृदयाशेजारी? माझे सगळे संघर्षमय जीवन न डगमगता मी बिनधास्त धाडसाने जगलोय. असला माणूस ते कृत्रिम उपकरण छातीत लावून जगण्याचा विचार तरी करू शकेल का? छे, असे करून मी त्या महान परमेश्वराने मला दिलेल्या नैसर्गिक सुंदर शरीर यंत्राचा व त्यातील सुंदर हृदय यंत्राचा अपमान करण्याचे पाप केल्यासारखे होईल. परमेश्वरा, हे पाप मी करणार नाही. तुझा अपमान मी करणार नाही. तुझे उपकार कसे फेडू? तू प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची केवढी मोठी हिंमत मला दिलीस. आता तू ६७ या सरासरी वयात मला माझ्या हृदयात तो ब्लॉक दिलास आणि माझ्या हृदयाची गती संथ केलीस. केलीच पाहिजे! किती धावत होतो मी पोटासाठी लोकांच्या दारात जाऊन भेट वकिलीची ती अपमानास्पद मजूरी व चाकरी करण्यासाठी आणि ही असली भेट वकिली करून आयुष्याच्या शेवटी आता माझी शिल्लक काय तर माझा एक फ्लॅट. पण माझ्या या कष्टाचे फळ म्हणून त्याहूनही मोठा ठेवा तू मला दिलास. तो ठेवा म्हणजे माझी उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम, वैवाहिक दृष्ट्या सुसंस्कारित अशी माझी एकुलती एक मुलगी व तेवढाच उच्च शिक्षित, सशक्त, समंजस माझा जावई. सोबत माझी सतत काळजी घेत मला प्रतिकूल परिस्थितीतही शेवटपर्यंत साथ देणारी माझी पत्नी. आणखी काय हवंय देवा मला! आता आणखी काही काही नको. मी जीवनात नुसता समाधानी नाही तर तृप्त आहे. चल कधी घेऊन जातोस मला या जगातून. मी आता त्यासाठी तयार झालो आहे. तुझे उपकार कसे आणि किती मानू! भयंकर वेदना देणारा कॕन्सर सारखा आजार तू मला दिला नाहीस. मी ६७ वर्षे या सरासरी वयात सुद्धा अगदी चांगला खातोय, पितोय आणि तू दिलेला हृदयाचा तो ए.व्ही. ब्लॉक बरोबर घेऊन हळूहळू चालतोय सुद्धा. देवा, सगळी माहिती घेतलीय मी त्या पेसमेकर नामक कृत्रिम उपकरणाची आणि ठाम निर्णय घेतलाय की मी तू दिलेल्या हृदयाच्या सुंदर, नैसर्गिक यंत्रात पेसमेकर नावाच्या त्या कृत्रिम उपकरणाने काड्या घालणार नाही. कशासाठी त्या काड्या घालू मी तू दिलेल्या तुझ्या सुंदर नैसर्गिक हृदय यंत्रात? ६७ या सरासरी वयानंतरही आणखी पुढे जगण्यासाठी? छे, बिलकुल नाही. कारण तुझे हे जग मी खालून वरून चांगले बघितले आहे. लोकांची हमालीही भरपूर केली आहे. आता हे जग आणखी बघण्याची इच्छा नाही व ती हमाली करण्याची इच्छा नाही. जे दिलेस ते भरपूर दिलेस. त्याने मी तृप्त झालोय  व त्यामुळे मृत्यूची मला भीती वाटत नाही. आणि तू जर मला हार्ट अटॕक नावाच्या सोप्या पद्धतीने मारायचे ठरवले असशील तर मरण्याच्या अगोदर ॲडवान्समध्ये मी तुझे  हृदयातून आभार मानतो. चल कधी बंद पाडतोस माझे हृदय!

-©ॲड.बी.एस.मोरे, ६.२.२०२४

https://youtu.be/3FdKjFlzxdM?si=Y9_XKzLxRbCofP2-

https://youtu.be/IDhnwY5M4c4?si=kFx5Y6GS-OZN_m5o

https://youtu.be/pkEQC0EnCXE?si=o2G1Z6ha0Eo_VcYh

https://youtu.be/ip6y-Lcp9HU?si=HfWktZLI54X1hkOT

https://youtu.be/DjGGQB5tPAE?si=XYXvtfHJo-Aikid9

माझी चळवळ बंद!

माझी चळवळ बंद, बंद, बंद!

लहानपणापासून चळवळी बघत आलोय व त्यातून शिकत आलोय. या चळवळी लोककल्याणासाठी असतात का? या चळवळींतून स्वतःच्या कल्याणासाठी भांडवल निर्मिती करून शेत जमिनी विकत घेऊन सधन शेतकरी झालेले तर काहींनी कारखाने उभे करून श्रीमंत  उद्योगपती झालेले धूर्त, वस्ताद लोक मी बघितले. याला काही अपवाद निघाले पण त्यांच्या आयुष्याची वाट लागली.

अशा स्वार्थी चळवळींपासून मी लांब राहिलो. या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत. शुद्ध राजकारण, शुद्ध समाजकारण, शुद्ध अर्थकारण इतकेच काय शुद्ध ज्ञानकारणही समाजात दुर्मिळ होत गेले व आता तर ते शोधूनही सापडेनासे झालेय. धर्मकारणाविषयी तर न बोललेले बरे. स्वार्थी अर्थकारणासाठी, स्वार्थी राजकारणासाठी व तसेच समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी धूर्त लोक देवधर्माचा दुरूपयोग, गैरवापर करत असताना स्पष्टपणे दिसत आहे. श्रीमंत भांडवलदार, धूर्त राजकारणी व दहशतखोर गुन्हेगार यांची दुष्ट साखळी घट्ट झाल्याचे दिसत आहे. लोकशाहीचे रूपांतर झुंडशाहीत होत असल्याचे दिसत आहे. पण माझी वकिली व माझी देवप्रार्थना या गोष्टी रोखू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात माझ्या ज्ञान व धैर्याच्या जोरावर मी जी काही थोडीफार सामाजिक चळवळ केली ती आता बंद. माझी ती चळवळ या भयंकर दुष्ट रेट्यापुढे इतकी कमकुवत, इतकी क्षीण ठरली की ती कोणाच्या नजरेसही आली नाही.

आजूबाजूला चाललेल्या या स्वार्थी चळवळी बघून मीही चळवळ केली व ती चळवळ म्हणजे अशिक्षित व गरीब कौटुंबिक वातावरणात खूप हिंमतीने, खूप जिद्दीने, खूप कष्टाने उच्च शिक्षण घेण्याची चळवळ. याच चळवळीतून मी वकील झालो. पण वकील बनून पोटासाठी शेवटी मला काय करावे लागले तर काही सधन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतमजूरी करावी लागली व काही श्रीमंत कारखानदार लोकांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी करावी लागली.

मी या स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात वकील म्हणून जाणे ही गोष्टच माझ्या उच्च शिक्षणाचा, माझ्या प्रामाणिक वकिलीचा घोर अपमान होता. पण या वकिलीत कोणाचाही भरभक्कम पाठिंबा नसल्याने मला हा अपमान सहन करावा लागला. माझ्या घराला मी वकिलीचा फलक (बोर्ड) लावला पण माझ्या घराच्या दारात माझ्या ज्ञानाला योग्य किंमत देणारे अशील आलेच नाहीत. शेवटी मलाच स्वार्थी चळवळी लोकांच्या दारात माझे ज्ञान घेऊन जावे लागले. दुसऱ्याच्या दारात जाऊन चांगल्या मालाची विक्री करू पाहणाऱ्या फिरत्या विक्रेत्याच्या मालाची लोक काय किंमत करतात? अगदी तसेच माझ्या ज्ञानाचे झाले.

काय म्हणावे माझ्या या असल्या वकिलीला? पण मी शेवटी फिरता वकील म्हणूनच प्रसिद्ध झालो. गंमत ही की अगदी कालपरवा सुद्धा एका माणसाने मला मेसेज केला की त्याचा काहीतरी कायद्याचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी मी त्याच्या नरीमन पॉईंट, मुंबई येथील कार्यालयात येऊ शकतो काय? काय म्हणावे या असल्या मागणीला? प्रश्न त्याचा, कायदेविषयक चर्चा त्याच्या प्रश्नावर करायची आणि त्यासाठी तो मला माझ्या डोंबिवलीच्या घरातून त्याच्या नरीमन पॉईंटच्या आॕफीसात बोलवतोय आणि त्यासाठी तो मला फी किती देणार यावर काही बोलत नाही? फिरता वकील म्हणून प्रसिद्ध झालेला मी वकील माझ्या भेटीची व नुसत्या चर्चेची फी कमीतकमी किती मागावी? निदान १०००० रूपये तरी पण नाही मला तो १००० रू. एवढी कमी फी सुद्धा त्याच्या दारात जाऊनही देणार नाही याची मला खात्री होती. शेवटी मी पडलो भिडस्त! म्हणून त्याला माझे खरे ते वैद्यकीय कारण सांगून शक्य नाही असे स्पष्ट सांगून टाकले. शिवाय त्याने ती तुटपुंजी १००० रू. फी त्या भेटीची व त्या चर्चेची दिली असती तरी माझे मन आता अशा फुटकळ भेटी व चर्चेला तयार नाही.

वकील असून आयुष्यभर श्रीमंतांच्या शेतात जाऊन एकतर शेतमजूरी केली किंवा त्यांच्या कारखान्यांत जाऊन चाकरी केली. भले ही मजूरी किंवा चाकरी कधी तीन तासांची, कधी दोन तासांची तर कधी एक तासाची होती तरी ती स्वतंत्र बाण्याची वकिली मुळीच नव्हती. लोकांच्या दारात जाऊन कसला वकिलीचा रूबाब दाखवणार मी? त्यांच्या दारात लांबून जाणे हे होते शारीरिक कष्ट व त्यांच्या शेतीतील किंवा कारखान्यातील कचरा माझ्या  कायद्याच्या ज्ञान कौशल्याने साफ करणे हे होते बौद्धिक कष्ट. हे दुहेरी कष्ट मी स्वार्थी चळवळी लोकांच्या शेतात व कारखान्यांत जाऊन ६७ वर्षे वयातही गेल्या महिन्यापर्यंत  करीत होतो.

पण आता परमेश्वरालाच ही गोष्ट पटली नसावी. त्याने माझ्या या दारोदारी भटकण्याच्या वकिलीला चांगलाच खुट्टा मारून ठेवलाय. खरं तर परमेश्वराने हे खूपच मस्त काम करून टाकले. त्याने हृदयाचे ठोके नियमित ठेवणारा माझ्या हृदयाचा इलेक्ट्रिक ट्रान्समिटरच बिघडवून टाकला कसला तो ए.व्ही. ब्लॉक माझ्या हृदयात निर्माण करून. आता  डॉक्टरने कसला तो पेसमेकर माझ्या हृदयात बसवण्याचा वैद्यकीय सल्ला दिलाय. कशासाठी बसवू मी ते कृत्रिम उपकरण माझ्या हृदयात? पुन्हा लोकांची ती हमाली लोकांच्या दारात जाऊन करण्यासाठी? नाही म्हणजे नाही, बिलकुल नाही! आता तो पेसमेकर नाही की ती हमाली नाही. माझी चळवळ बंद, बंद, बंद!

-©ॲड.बी.एस.मोरे, ५.२.२०२४

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वर ते सगुण ईश्वर!

निर्गुण परमेश्वराचे सगुण अस्तित्व म्हणजे निसर्ग. निसर्गाच्या भौतिक विविधतेला परमेश्वराचे विविध अंश चिकटलेले आहेत ज्यांना ईश्वरी अंश म्हणता येईल. हिंदू धर्मातील विविध देवदेवता म्हणजे निसर्गातील विविध ईश्वरी अंश. हे अंश सगुण आहेत व ते निसर्गाच्या भौतिकतेला ईश्वरी आध्यात्मिकतेने नियंत्रित करतात. या ईश्वरी अंशानाच देवकण (गाॕड पार्टिकल) असे म्हणता येईल जे देवकण असंख्य आहेत. हिंदू धर्मात असलेल्या तेहतीस कोटी देवदेवता म्हणजे हे असंख्य ईश्वरी अंश किंवा देवकण. निर्गुण परमेश्वर एक आहे पण सगुण देवकण अनेक आहेत. कोणताही देवकण सर्वगुणसंपन्न नाही. पण त्यातला एखादा देवकण  जर बहुगुणसंपन्न म्हणून निसर्गात अवतीर्ण झाला तर त्याला हिंदू धर्मात निर्गुण परमेश्वराचे सगुण रूप किंवा सगुण अवतार मानतात. हिंदू धर्मातील असंख्य देवदेवतांपैकी फक्त काही देवदेवताच बहुगुणसंपन्न आहेत. तीन मुख्य देव म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश अनुक्रमे सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या स्त्री शक्तींसह, श्री गणेश, राम, कृष्ण, गुरूदेव दत्त हे सर्व देवकण असे बहुगुणसंपन्न देवदेवता व देवावतार होत. सारांश हाच की, परमेश्वर निर्गुण परमात्मा आहे तर ईश्वर हा त्या परमात्म्याचा सगुण ईश्वरी अंश किंवा देवात्मा आहे. निर्गुण परमात्मा कायम आहे तर सगुण देवात्मे येतात, जातात म्हणजे ते तात्पुरते आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, ३१.१.२०२४