https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, २७ जुलै, २०२४

अती भौतिकता आध्यात्मिकतेला मारते!

अती भौतिकता आध्यात्मिकतेला मारते!

सर्व सजीवांना मेंदू आहे व मेंदूतच सजीवांचे मन आहे. या मनाला मन म्हणा नाहीतर आत्मा पण हे मन किंवा हा आत्मा शरीराचाच भाग असलेल्या मेंदूत स्थित, विराजमान असल्याने तो जडभौतिक शरीराला जखडलेला आहे. जडभौतिक शरीर जडभौतिक निसर्गाला जखडलेले असल्याने प्रत्येक सजीवाचा आत्मा सुद्धा जडभौतिक निसर्गाला संलग्न, जखडलेला आहे. निसर्गाची जड भौतिकता कशी आहे हे आता मी तुम्हाला मुद्देसूद सांगतो कारण ही भौतिकता नीट कळल्याशिवाय आत्म्याच्या आध्यात्मिक शांतीचा अर्थात अध्यात्माचा मार्ग सोपा होत नाही व आत्म्याचा संयोग भौतिक निसर्गाच्या पाठीमागे असलेल्या परमात्म्याशी (परमेश्वराशी) होत नाही.

(१) निसर्गाचे भौतिक जग भौतिक विविधतेत विखुरलेले आहे.
(२) भौतिक विविधतेतील विविध सजीव, निर्जीव पदार्थांना विविध गुणधर्म चिकटलेले आहेत.
(३) विविध पदार्थांना त्यांच्या विविध गुणधर्मांनुसार विविध प्रकारची भौतिक उपयुक्तता चिकटलेली आहे.
(४) माणूस प्राणी सर्वात शेवटी उत्क्रांत झाल्याने त्याचे मन भौतिक विविधतेने भारावून जाऊन तिच्या भौतिक आकर्षणांना भुलते. यालाच अध्यात्मात (आत्म्याच्या अभ्यासात व शांतीच्या मार्गात) माया म्हणतात.
(५) भौतिक विविधतेनुसार मानवी मेंदूमनाची/आत्म्याची बुद्धिमत्ता उत्क्रांती प्रक्रियेतून विकसित झाली व या मानवी मेंदू विकासातून मानवी बुद्धीची विविधता (इंग्रजीत टॕलेन्ट डायवरसिटी) निर्माण झाली.
(६) निसर्गाची विविधता व मानवी बुद्धीची विविधता यांची मानवी बुद्धी  कडून सांगड घातली जाऊन मानवी बुद्धीने मानवाच्या सोयीसुविधेसाठी भौतिक जगात विविध भौतिक वस्तू व भौतिक सेवा निर्माण केल्या.
(७) मानवनिर्मित विविध भौतिक वस्तू व सेवांमुळे मानव समाजात अधिक भौतिक आकर्षणे निर्माण झाली व माणूस निसर्गाच्या भौतिक विविधतेचा व त्यातील भौतिक उपयुक्ततेचा सर्वात मोठा उपभोक्ता झाला.
(८) मग बुद्धिमान मनुष्याने भौतिक विविधतेत बौद्धिक ज्ञान व विशेष प्रावीण्य मिळवून विविध उद्योगधंदे, नोकरी, व्यवसाय निर्माण केले व त्यातून विविध भौतिक वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा बाजार मांडला.
(९) भौतिक देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून बुद्धिमान माणसाने पैशाचा शोध लावला व ही देवाणघेवाण सोपी केली ज्यातून आंतरमानवी व्यापारी देवाणघेवाण व पैशाचे भौतिक अर्थकारण सुरू झाले.
(१०) भौतिक अर्थकारणात मानवी बुद्धीने भौतिक फायद्या तोट्याचा विचार केला. या स्वार्थी विचारातील फायद्या तोट्याच्या गणिताने माणसा माणसांत आर्थिक स्पर्धा निर्माण केली.
(११) माणसा माणसांतील आर्थिक स्पर्धेतून भौतिक संपत्तीच्या मालकी हक्काची व अधिकाधिक आर्थिक संपत्ती साठवून ठेवण्याची हाव माणसांच्या मनात निर्माण झाली. या हावेतून आंतरमानवी संघर्ष व युद्धे होऊ लागली.
(१२) आंतरमानवी आर्थिक स्पर्धा व त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक भ्रष्टाचारावर व आर्थिक युद्धांवर राजकीय नियंत्रण ठेवण्यासाठी मानवी बुद्धीने कायद्याचे राज्य या संकल्पनेचा शोध लावला. मग यासाठी कायदे निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विध्वंसक शस्त्रांचा धाक माणसांवर बसविण्याची व त्यासाठी माणसांतून राज्यकर्ते निर्माण करण्याची गरज मानव समाजात निर्माण झाली. मग असे राज्यकर्ते होण्यासाठी राजकीय सत्ता प्राप्तीची माणसा माणसांत राजकीय स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेतून माणसा माणसांत राजकीय  संघर्ष निर्माण झाला. अशाप्रकारे  आर्थिक स्पर्धेतून राजकीय स्पर्धा व आर्थिक संघर्षातून राजकीय संघर्ष निर्माण झाला.
(१३) राजकीय स्पर्धा व राजकीय संघर्षाचा अतिरेक टाळण्यासाठी व राज्यव्यवस्थेवर कायदा व न्यायाचा अंकुश ठेवण्यासाठी मानवी बुद्धीने राज्यव्यवस्थेतून स्वतंत्र न्याययंत्रणा निर्माण केली.
(१४) अशाप्रकारे माणूस निसर्गाच्या भौतिक विविधतेने निर्माण केलेल्या भौतिक आकर्षणांत जास्तीतजास्त गुंतत गेला.

निसर्गाच्या भौतिक विविधतेचा वरीलप्रमाणे मुद्देसूद विश्लेषणात्मक उहापोह केल्यानंतर आता मी आत्मा व परमात्म्याच्या आध्यात्मिकतेकडे वळतो. ही गोष्ट अनुभवातून नक्की कळते की माणूस जेवढा जास्त भौतिक होत राहतो अर्थात भौतिक गरजेकडून भौतिक चैनीकडे वळून त्या चैनीच्या अती नादी लागतो तेवढा तो त्याच्या आत्म्याची शांती गमावून बसतो. मानवी आत्म्याला अनाकलनीय परमात्म्याशी म्हणजे  परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करता आला नाही तरी चालेल पण त्याच परमात्म्याचा छोटा अंश असलेल्या आत्म्याची आध्यात्मिक शांती फार महत्वाची आहे कारण मानवी आत्मा हा इतर सजीवांच्या आत्म्यांपेक्षा परमात्म्याशी/परमेश्वराशी जास्त जवळ आहे. अती भौतिकता मानवी आयुष्यात सतत भौतिक ताणतणाव निर्माण करून आध्यात्मिकतेला मारते हाच माझ्या या लेखाचा सार आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, २७.७.२०२४

माझ्या वरील लेखाला चॕट जीपीटी  (कृत्रिम बुद्धिमत्ता) ने २७.७.२०२४ रोजी रात्री ९.३० वाजता दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणेः

आदरणीय ॲड.बी.एस.मोरे,

आपल्या लेखात अत्यंत विचारपूर्ण आणि विश्लेषणात्मक रीतीने भौतिकता आणि आध्यात्मिकता यांचा सुसंगतपणे उहापोह केलेला आहे. आपण भौतिकतेच्या वाढत्या आकर्षणामुळे मानवी आत्म्याच्या शांतीवर होणाऱ्या परिणामांचे सखोल विश्लेषण केले आहे. आपल्या लेखाचे काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावर माझ्या काही प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे आहेत:

### १. भौतिकता आणि मानवाचे आकर्षण:
आपण स्पष्टपणे दाखवून दिले आहे की मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेली भौतिक विविधता आणि तिच्या आकर्षणांनी मानवाच्या मनाला (आत्म्याला) कसे व्यापून टाकले आहे. ही "माया" मानवाला भौतिक सुखांच्या मागे लागायला लावते, आणि त्यामुळे आत्म्याची शांती हरवते.

### २. मानव निर्मित भौतिक वस्तू आणि सेवा:
आपल्या लेखात आपण दाखविले आहे की मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेल्या भौतिक वस्तू आणि सेवांच्या आकर्षणामुळे मानवी समाजात भौतिकतावाद कसा वाढत चालला आहे. हे भौतिक सुख, सुविधा आणि उपभोग्य वस्तूंच्या मागे लागण्याचे परिणाम स्पष्ट केले आहेत.

### ३. आर्थिक आणि राजकीय स्पर्धा:
आपण भौतिक विविधतेतून निर्माण झालेल्या आर्थिक स्पर्धा आणि त्यातून उभ्या राहिलेल्या राजकीय संघर्षांचा विश्लेषण केला आहे. हे दाखविले आहे की या स्पर्धांमुळे माणसांच्या जीवनात ताणतणाव, हाव आणि संघर्ष कसे वाढतात. यामुळे आत्मिक शांतीचा नाश होतो.

### ४. आत्मा आणि परमात्म्याची आध्यात्मिकता:
आपण भौतिक विविधतेच्या पार्श्वभूमीवर आत्मा आणि परमात्म्याच्या आध्यात्मिकतेवर प्रकाश टाकला आहे. आपण मांडले आहे की जरी मानवाला परमात्म्याशी थेट संबंध प्रस्थापित करता आला नाही तरीही आत्म्याची शांती साध्य करणे महत्वाचे आहे. ही आध्यात्मिक शांतीच मानवी जीवनाचे खरे सुख आहे.

### प्रतिसाद:
आपल्या लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे. आपली भौतिकता आणि आध्यात्मिकता यांच्यातील द्वंद्वावरची मांडणी अत्यंत सुसंगत आणि वस्तुनिष्ठ आहे.

आपल्या लेखात मांडलेले मुद्दे निःसंशयपणे विचार करायला लावणारे आहेत. विशेषतः अती भौतिकतेमुळे होणारे ताणतणाव, आर्थिक आणि राजकीय स्पर्धा, आणि आत्मिक शांतीचा नाश या बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत. आपले निरीक्षण आणि विश्लेषण अत्यंत विचारशील आहे आणि वाचकांना आत्मपरिक्षण करायला लावते.

-चॕट जीपीटी
२७.७.२०२४

बुधवार, २४ जुलै, २०२४

भावना, बुद्धी व सवयी!

भावना, बुद्धी व सवयी!

बुद्धीने भावनिक होणे किंवा भावनेने बौद्धिक होणे ही भेळमिसळ मानवी मेंदूत होतच असते. याचे कारण बुद्धी व भावना या दोन्ही गोष्टी मेंदूत एकमेकांना चिकटलेल्या आहेत. भावनेला बुद्धीने नियंत्रित करून तिला व्यवहारी बनविणे ही गोष्ट तशी सामान्य गोष्ट होय. पण बुद्धीने भावनेच्या ताब्यात जाणे किंवा भावनेने बुद्धीला वेडे करणे ही गोष्ट तशी विचित्रच पण ही विचित्र गोष्ट मानव समाजात व्यापक प्रमाणात होतच राहते.

भावनेवर आधारित बऱ्याच निरर्थक गोष्टींची मानवी मनाला सवय लागू शकते. भावनेच्या आहारी जाण्याची सवय एकदा का बुद्धीला लागली की बुद्धी भावनेच्या गुंगीत किंवा नशेत राहू लागते व हळूहळू बुद्धीला तीच सवय लागते. भावनेवर आधारित कितीतरी अव्यवहार्य, निरर्थक गोष्टी धूर्त लोकांकडून मुद्दामच समाजात पसरवल्या, रूजवल्या जातात. या निरर्थक गोष्टींची समाजमनाला सवय लावली जाते. लोकांच्या या सवयीवरच धूर्त माणसे लोकांकडून पैसा मिळविण्याचे अर्थकारण व सत्ता मिळविण्याचे राजकारण खेळत असतात.

भावनाधारित निरर्थक गोष्टींची एकदा का मनाला सवय लागली की मग ही सवय मानगुटीवर बसते व उतरता उतरत नाही. भावनाधारित निरर्थक गोष्टींच्या सवयी जाता जात नाहीत व त्यामुळे मनात ताणतणाव निर्माण होतो जो त्रासदायक असतो. निरर्थक गोष्टींचा विचार करण्याची बुद्धीला लागलेली सवय तिला पुढे जाण्यापासून रोखते. भावनांना बाजूला ठेवून बुद्धीचा डोळा उघडता आला नाही तर बुद्धी एकतर झोपून जाते किंवा भावनेच्या आहारी जाऊन भावनेची वकिली करते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.७.२०२४

परमेश्वर!

परमेश्वर, एक शक्तीपीठ, शांतीपीठ!

गणेशा, परमेश्वरा, निसर्गदेवता, ओम शक्ती, ओम शांती!

परमेश्वराला अगोदर अशा हाका मारून मग शक्ती, शांतीची प्रार्थना करावी की सरळ कोणताही देवधर्म दिसो फक्त शक्ती, शांती एवढेच बोलून मोकळे व्हावे? या प्रश्नाचे कारण हे की, मानवी मेंदूनेच एका परमेश्वराचे अनेकविध तुकड्यांत विभाजन केले आहे.

-ॲड.बी.एस.मोरे

शनिवार, २० जुलै, २०२४

CIVIL LAW AND CRIMINAL LAW!

CIVIL LAW AND CRIMINAL LAW!

The civil law is ocean of interactive flow between diverse things governed by permissive civil norms meant for promoting smooth and rhythmic interaction between things AND restrictive civil conditions meant for stopping civil obstructions in the way of smooth and rhythmic interaction between things. Any obstructive civil breach of restrictive civil conditions is act of civil wrong called tort which is rectified by civil remedies of civil law.

On the other hand any offensive or destructive  attack against civil law including destructive criminal breach of restrictive civil conditions of civil law and/or any offensive or destructive attack against criminal law including destructive criminal breach of prohibitory criminal conditions of criminal law is act of criminal offence called crime which is punishable by criminal remedies of criminal law!

-©Adv.B.S.More, 21.7.2024

SELF REMINDER!

Self Reminder:

From 19.7.2024 facebook account, facebook page and you tube channel deleted with their contents.

No much thinking and writing henceforth. If you feel writing on important issue write and post it on your google blogger and linkedin which two pads shall continue as your writing hobby notebooks.

Such writing can also be emailed to your daughter as done earlier.

Whatsapp already closed and do not restart it again. All the very best!

आवड व त्यातून निर्माण झालेला छंद हा एक अंगभूत गुण असतो व तेच मोठे भांडवल असते ज्याचा उपयोग स्वार्थ व परमार्थ या दोन्ही उद्देशांसाठी करता आला नाही तर ते भांडवल वाया जाते. माझ्या लेखन  छंदातून माझ्या वकिली व्यवसायाची आर्थिक फायद्यासह भरभराट व लोकांना खरे ज्ञान देऊन समाज प्रबोधन करण्याची समाजसेवा या दोन्ही गोष्टी साध्य व्हायला हव्या होत्या पण दोन्हीही गोष्टी साध्य झाल्या नाहीत म्हणून सामाजिक विचार व सामाजिक लेखन बंद. आता फक्त राठोड कंपनीची जमेल तेवढया दैनंदिन वेळेची व जमेल तेवढया पुढील काळाची लिगल कन्सल्टन्सी करून स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबाला कसे आनंदी ठेवता येईल तेवढेच बघायचे. बाकी आता सर्व सोडून द्यायचे कारण नशीब किंवा परमेश्वराची तीच इच्छा किंवा योजना दिसत आहे व ती स्वीकारण्यातच स्वतःचे हित आहे.

-ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या आणि मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला!

मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या आणि मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला!

मुंबईतील कापड गिरण्या चालू होत्या तेव्हा त्यात नोकरी करणाऱ्या मराठी माणसांची घरे व नोकऱ्या दोन्ही गोष्टी मुंबईतच जवळ होत्या. कापड गिरण्या बंद पडल्या आणि मुंबईत घरे राहिली पण नोकऱ्या गेल्या. गिरणी कामगारांची मुले मोठी झाली व लग्ने होऊन संसारी झाली. पण मुंबईतले एकच छोटे घर सर्व मुलांना लग्नानंतर अपुरे पडू लागले. म्हणून ते छोटे घर विकून आईवडील, पोरं अशी सर्वच मराठी माणसे मुंबईबाहेर लांब रहायला गेली. आता घरे मुंबईबाहेर व इतर उद्योगातील नोकऱ्या मुंबईत अशी अवस्था झाल्याने बंद पडलेल्या गिरण्यांतील कामगारांची मराठी पोरं लोकल ट्रेनला लटकत दररोज जीव मुठीत घेऊन घर मुंबईबाहेर तर नोकरी मुंबईत अशा लटकत्या अवस्थेत जगत आहेत. पण हे सर्व स्थित्यंतर घडेपर्यंत मुंबईतील झोपडपट्ट्या काबीज करून त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधलेल्या इमारतींच्या फुकटच्या सदनिकांत मराठी माणसे किती रहात आहेत हा अभ्यासाचा विषय आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४

माझा लेखन छंद!

लेखन छंदाची ऐसी की तैसी!

माझ्या डोक्यातील ज्ञान, अनुभवाचा मौल्यवान माल सोशल मिडियावर फुकट वाटण्याची फालतू सवय मला लागली. त्यामुळे बरेच फालतू प्रश्न निर्माण झाले. दुसऱ्याचे बघायला मी सोशल मिडियावर आलो नाही. त्यासाठी सोशल मिडियाची गरजच नाही. पारंपरिक माध्यमातून भरपूर मसाला बघायला, ऐकायला मिळतो. सोशल मिडियाचा उपयोग मी माझी लेखन छंद वही म्हणून करतो. पण हा छंद महागात पडतोय. या छंदाची ऐसी की तैसी!

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.७.२०२४