https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL
सोमवार, ३ जून, २०२४
मान्सून पाऊस हा निसर्गाचा चमत्कार!
शुक्रवार, ३१ मे, २०२४
माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!
तंत्रज्ञान व सामाजिक कायदा हे निसर्ग विज्ञानाचेच भाग, माणूस निसर्गाच्या जास्त जवळ!
निसर्गाच्या मूलभूत साधनसंपत्तीचा मानवाकडून दोन प्रकारे वापर केला जातो. एक म्हणजे जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर व दोन म्हणजे सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर. या सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराला तंत्रज्ञान असे म्हणतात. निसर्गाच्या साधनसंपत्तीचे हे दोन्ही प्रकारचे मानवी वापर हे निसर्ग विज्ञानाचे भाग आहेत. निसर्गाच्या साधनसंपत्तीचा जसा आहे तसा मूळ नैसर्गिक वापर हा निसर्ग विज्ञानाचा भाग आहे हे समजायला जास्त बुद्धी चालवायची गरज नाही. पण या साधनसंपत्तीचा सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापर अर्थात तंत्रज्ञान हा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे हे मान्य करावेच लागेल. कारण तो तसा नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून तंत्रज्ञान हे अस्तित्वातच येऊ दिले नसते. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त तंत्रज्ञानात सुद्धा समाविष्ट आहे.
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मालकी हक्काचे व त्या संपत्तीच्या मूळ नैसर्गिक व सुधारित नैसर्गिक (तांत्रिक) वापराचे आंतरमानवी सामाजिक वाटप व देवाणघेवाण सामाजिक शिस्तीने व सामाजिक बंधनाने करण्याची सुधारित मानवी पद्धत किंवा प्रक्रिया म्हणजे सामाजिक कायदा. हा सामाजिक कायदा सुद्धा निसर्ग विज्ञानाचाच भाग आहे. तो जर निसर्ग विज्ञानाचा भाग नसता तर निसर्गाने मानवाच्या माध्यमातून सामाजिक कायद्याची निर्मिती होऊच दिली नसती. निसर्ग विज्ञानात निसर्ग पर्यावरणीय शिस्त अंतर्भूत असल्याने ती मूलभूत नैसर्गिक शिस्त सामाजिक कायद्यात सुद्धा समाविष्ट आहे.
पृथ्वीवर निसर्गाने उत्क्रांत केलेला माणूस ही पृथ्वीवरील निसर्गाच्या पर्यावरणीय साखळीत/उतरंडीत (इकाॕलाॕजिकल पिरॕमिड) सर्वात वरच्या टोकाची निसर्ग निर्मिती होय. या माणसाला निसर्गाने एवढी प्रचंड बुद्धिमत्ता का दिली व मूळ निसर्ग विज्ञानातच त्याच्यासाठी तंत्रज्ञान व सामाजिक कायद्याची सोय करून का दिली हे त्या निसर्गालाच माहित. मात्र यावरून एक तार्किक अनुमान काढता येते की मनुष्य प्राणी हा निसर्गाला सर्वात जास्त प्रिय प्राणी आहे. पण या लाडोबाने निसर्गावरच कुरघोडी केली तर मात्र निसर्ग या लाडोबा माणसाला त्याचा जबरदस्त इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही. माणूस निसर्गाच्या जास्त जवळ आहे हे मात्र नक्की!
-©ॲड.बी.एस.मोरे, १.६.२०२४
निसर्ग हे परमेश्वराचे घर!
निसर्ग हे परमेश्वराचे घर!
निसर्ग हे परमेश्वराचे प्रचंड मोठे घर आहे. हे घर कधीही नष्ट होत नाही कारण परमेश्वर कधी नष्ट होत नाही. अर्थात निसर्ग कायम आहे व त्यात असलेला परमेश्वरही कायम आहे. फक्त निसर्ग घरातील सामान कायम त्याच स्वरूपात रहात नाही. विविध प्रकारच्या त्या घर सामानाचे स्वरूप परिवर्तन क्रियेतून सतत बदलत राहते. आपण सर्व माणसे सुद्धा या परिवर्तनशील सामानाचाच एक भाग आहोत. त्यामुळे आपणही सतत बदलत आहोत. कारण परिवर्तन हा परमेश्वरी निसर्ग घराचा नियम आहे. त्यामुळे आपण आपले सामान जोर लावून कायम नीटनेटके ठेवण्याचा व ते तसे नीट राहिलेय का हे परत परत रोखून बघण्याचा मंत्रचळी अट्टाहास सोडायला हवा!
-©ॲड.बी.एस.मोरे, ३१.५.२०२४
गुरुवार, ३० मे, २०२४
माता!
व्यभिचारी विवाहबाह्य लैंगिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला कचरा कुंडीत फेकून देणाऱ्या माता बघायला मिळतात व अविवाहितेच्या लैंगिक छळातून जन्माला आलेल्या बाळाला आईचे प्रेम देण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या माताही बघायला मिळतात. मनुष्याच्या मानसिकतेचा, स्वभावाचा थांगपत्ता लागणे कठीण आहे. -ॲड.बी.एस.मोरे (संदर्भः लोकसत्ता बातमी, दि. ३०.५.२०२४)
न्यायाचे प्रतीक!
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेले न्यायाचे प्रतीक असलेले रोमन न्यायदेवीचे चित्र बदलून सिंहाचा चेहरा असलेले भारतीय न्यायदेवदेचे चित्र भारतीय न्यायसंस्थेने स्वीकारण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत ते महाराष्ट्रातून बार कौन्सिल आॕफ महाराष्ट्र अँड गोवा च्या माध्यमातून हे विशेष. आम्ही तर रोमन न्यायदेवीचे चित्र बघतच वकिली केली. आता भारतातील नवोदित वकील भारतीय न्यायदेवतेचे हे नवीन प्रतीक बघत वकिली करतील असे दिसतेय. -ॲड.बी.एस.मोरे (संदर्भः लोकसत्ता बातमी, दि.३०.५.२०२४)
प्रदूषण, प्रदूषण आणि प्रदूषण!
बुधवार, २९ मे, २०२४
ग्लोबल वार्मिंग!
ग्लोबल वार्मिंग!
ग्लोबल वार्मिंग हे तसे उपयुक्त नाहीतर थंड पृथ्वीवर सजीव सृष्टी जगूच शकणार नाही ही ग्लोबल वार्मिंगची सकारात्मक गोष्ट कळली. पण हे वार्मिंग वाढत गेले तर पृथ्वीवरील पाण्याची जास्तीतजास्त जास्त वाफ होऊन बारमाही पाऊस पडून येणाऱ्या व उंच पर्वतावरील बर्फ वितळून त्यातून येणाऱ्या गोड्या पाण्याच्या पुरांची भीती आहेच व त्यातून सृष्टीचक्रही बिघडू शकतो. पृथ्वीवर माणसाची लोकसंख्या वाढत जाण्याने त्याच्या उच्छवासातून बाहेर पडणारा कार्बन वायू वाढत जाण्याने निर्माण होणाऱ्या ग्लोबल वार्मिंग पेक्षा या वाढत्या लोकसंख्येच्या औद्योगिक उपदव्यापामुळे ग्लोबल वार्मिंग वाढण्याची भीती जास्त आहे. वाढती लोकसंख्या म्हणजे वाढती आंतरमानवी स्पर्धा, जंगले जाळून व डोंगर तोंडून बिल्डरांकरवी निर्माण होत जाणारी सिमेंटची जंगले व वाढते उद्योग यामुळे ग्लोबल वार्मिंग वाढू शकते. माणूस हा त्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे विध्वंसक होत चाललाय नाहीतर तो निसर्गाला पूरक असा चांगला बुद्धिमान प्राणी आहे. पण तो लोकसंख्या वाढवत चाललाय म्हणजे त्याची बुद्धी कुजत चाललीय असे वाटते व ही गोष्ट पर्यावरण संरक्षण कायद्याच्या दृष्टिकोनातून गंभीर आहे.
-©ॲड.बी.एस.मोरे, ३०.५.२०२४