https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

साचेबंद निसर्ग, रटाळ जीवन!

साचेबंद निसर्ग, रटाळ जीवन!

ग्रह ताऱ्यांच्या पदार्थीय विश्वालाच मी निसर्ग म्हणतो. हा पदार्थीय निसर्ग ठराविक साचेबंद वैज्ञानिक नियमांनी यंत्रवत हालचाल करतो म्हणून मी त्याला साचेबंद यंत्र म्हणतो. या यंत्राच्या हालचालीची यंत्रणा किंवा व्यवस्था हिचा एक ठराविक साचेबंद नमुना (मॉडेल) आहे. या यंत्राच्या व या यंत्रणेच्या साचेबंद पणामुळे (तोच तोच पणा) हे यंत्र रटाळ झाले आहे व त्याची यंत्रणा रटाळवाणी झाली आहे. या साचेबंद नमुन्याच्या यंत्रात व त्याच्या यंत्रणेत आमूलाग्र बदल करता येत नाही. हे यंत्र व त्याचा साचेबंद नमुना जवळजवळ जसा आहे तसाच स्वीकारावा लागतो. बौद्धिक तंत्राने त्यात थोडीफार सुधारणा करता येते एवढेच.

खरं तर, मानवी बुद्धीने या साचेबंद पदार्थ वैज्ञानिक विश्व/निसर्ग यंत्रात कौशल्यपूर्ण बौध्दिक व्यवस्थापन व वापराची जी आधुनिक तांत्रिक व सामाजिक पद्धत किंवा व्यवस्था अंमलात आणली आहे ती सुध्दा तिच्या साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. त्यात नाविन्य उरले नाही. रटाळ निसर्ग यंत्रातून मनुष्याने बाहेर काढलेले हे तांत्रिक-सामाजिक पिल्लू सुद्धा रटाळ झाले आहे. जर निसर्गाची मूलभूत रचनाच (बेसिक स्ट्रक्चर) रटाळ  आहे तर त्या रटाळ रचनेतून माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर काढून काढून शेवटी काय बाहेर काढणार तर रटाळ पिल्लूच.

साचेबंद निसर्ग-समाज व्यवस्थेतील यांत्रिक रटाळपणा (तोच तोच पणा) घालविण्यासाठी मनुष्याला जशी हास्यविनोदी करमणूकीची गरज भासते तशीच आध्यात्मिक आधार, शांतीचीही गरज भासते. या गरजेचे कल्पनेतून का असेना पण मानसिक समाधान करून घेण्यासाठी मनुष्य  प्राण्याने निसर्ग/विश्व यंत्रात परमेश्वर नावाची कोणती तरी महान शक्ती चालक-मालक म्हणून बसलीय असे तर्काने मानून (परमेश्वर एक तार्किक कल्पना?) त्या तर्काधारित ईश्वर शक्तीला भक्तीभाव, भक्तीरसाने जवळ केले व मानव समाजात एक आध्यात्मिक धर्म संस्कृती निर्माण केली. मानव समाजातील अनेक आस्तिक धर्म हे या आध्यात्मिक धर्म संस्कृतीचेच भाग आहेत.

पण ही आध्यात्मिक धर्मसंस्कृती सुद्धा तिच्या कर्मकांडी साचेबंद पणामुळे रटाळ झाली आहे. कितीही परमेश्वर प्रार्थना करा रटाळ निसर्ग व समाज रचनेत/व्यवस्थेत काही बदल होत नाही की काही फरक पडत नाही हे वास्तव माणसाला शेवटी कळतेच. परंतु इलाज नसल्याने मनुष्य प्राणी हा रटाळपणा कसातरी घालविण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न सतत करीत राहतो. अशा प्रयत्नांची सवय लागली की मनुष्य या सवयीचाच गुलाम होऊन जातो. सवय एक अशी जादू आहे की जी कृत्रिम चैनीला सुद्धा नैसर्गिक गरज बनवते. माणसाने अशा कितीतरी निरर्थक कृत्रिम सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, २६.४.२०२४

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

हिग्ज बोसोन आणि समाज!

हिग्ज बोसोन मूलकणाचे वैज्ञानिक सत्य मानव समाजालाही लागू!

माणूस म्हणून तुम्ही कितीही ज्ञानी व बुद्धिमान असला तरी तुमची बुद्धी व तुमचे ज्ञान समाजातील वजनदार माणसांच्या संपर्क क्षेत्रात येऊन तिथे जोपर्यंत सहज स्वीकारले जात नाही तोपर्यंत समाजात ते वजनरहित राहते, त्याला समाजात वजन प्राप्त होत नाही.

हाच वैज्ञानिक नियम हिग्ज बोसोन मूलकणांच्या वजनदार क्षेत्राविषयी आहे तो म्हणजे मूलद्रव्ये व त्यांचे अणू जोपर्यंत वजनदार हिग्ज बोसोन मूलकणांच्या क्षेत्रात येत नाहीत तोपर्यंत विश्वात ते वस्तुमानाशिवाय वजनरहित राहतात, त्यांना विश्वात वस्तुमान व वजन प्राप्त होत नाही!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.४.२०२४

आध्यात्मिक प्रार्थनेने वैज्ञानिक सत्य बदलत नाही!

परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेने विश्वाचे/निसर्गाचे वैज्ञानिक सत्य बदलत नाही!

विश्वातील कोणतीही वास्तव गोष्ट जशी आहे तशीच वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारावी लागते. विश्वात/ निसर्गात परमेश्वर नामक अलौकिक दैवी शक्ती आहे असे कल्पनेने मानून अशा शक्ती पुढे प्रार्थना केल्याने विश्वातील वैज्ञानिक सत्य बदलत नाही.

माणूस विश्वातील वैज्ञानिक सत्याचे त्याच्या नैसर्गिक बुद्धीच्या जोरावर कौशल्यपूर्ण व्यवस्थापन कसे करतो व त्याचा योग्य वापर कसा करतो यावर विश्वाच्या/निसर्गाच्या वैज्ञानिक सत्याची अनुभूती व उपयुक्तता अवलंबून आहे.

वैज्ञानिक सत्याचे असे व्यवस्थापन व त्याचा असा योग्य वापर हा परमेश्वराच्या आध्यात्मिक प्रार्थनेतून नाही तर मनुष्याच्या बौद्धिक कौशल्यातून शक्य आहे!

-©ॲड.बी.एस.मोरे, २५.४.२०२४

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

करा कष्ट आणि व्हा नष्ट!

विश्व ज्यालाच मी निसर्ग म्हणतो हे एक प्रचंड मोठे यंत्र आहे ज्यात ग्रह, तारे, विविध पदार्थ एका चक्रात फिरत असतात. पृथ्वी हा याच विश्व यंत्राचा एक भाग जो चक्राकार स्वतःभोवती फिरतो व सूर्याभोवतीही फिरतो. पृथ्वी नावाच्या या चक्रीय यंत्र भागात पदार्थीय सृष्टीचे आणखी एक चक्र प्रस्थापित झालेय, ज्यात पृथ्वीवरील दिवस रात्रीचे, ऋतूंचे, हवेचे, पाऊस पाण्याचे व निर्जीव पदार्थांच्या हालचालीचे चक्र निर्माण झालेय. याच सृष्टी चक्रात पुन्हा विविध प्रकारच्या सजीवांची विविध जीवनचक्रे निर्माण झालीत ज्यांत माणसांचेही एक जीवनचक्र निर्माण झालेय.

माणसांच्या चक्राकार जीवनचक्रात जन्म व मृत्यूच्या मध्ये जे मानवी जीवन आहे ते जगण्याच्या कष्टाने पुरेपूर भरलेले आहे. जीवनाचे भरण पोषण करण्यासाठी कष्ट आणि वर जीवनाचे संरक्षण करण्यासाठी कष्ट आणि ही दोन्ही कष्टे बौद्धिक कष्ट व शारीरिक कष्ट या दोन प्रकाराची. मानवी जीवनाचे भरणपोषण व संरक्षण करण्यासाठी जी साधने आहेत ती मिळविण्यासाठी कष्ट, त्यांचा नीट सांभाळ व व्यवस्थापन करण्याचे कष्ट. कष्टाच्या ना ना तऱ्हा आणि वर पुन्हा रोजचा व्यायाम, दात स्वच्छ घासणे व अंघोळ करणे वगैरे दैनंदिन कष्टे आहेतच दररोज सोबतीला. ठराविक काळापुरती रोजची झोप हीच काय या कष्टाला थोडीफार विश्रांती. इतर प्राण्यांपेक्षा माणसाचे कष्ट खूप जास्त आहेत. अती बुद्धीमान असल्याचा हा असा विचित्र परिणाम. जात्यात भरडल्या सारखा मनुष्य आयुष्यभर कष्टच करीत राहतो आणि शेवटी कष्ट करून करून मरतो. कष्टाने जी काही मिळकत कमावलेली असते ती इथेच सोडून जावी लागते. शेवटी काय "करा कष्ट आणि व्हा नष्ट"!

या कष्टकरी जीवनात माणसाला कुठेतरी सतत वाटत असते की विश्व यंत्राचा कोणीतरी निर्माता असावा जो आपल्याला आपल्या कष्टात मदत करेल, कष्टाचे जाते दळू लागेल वगैरे वगैरे. पण ही कल्पनाच राहून जाते. आपल्या कष्टाचे भरड जाते दळायला तो यंत्रनिर्माता (परमेश्वर) प्रत्यक्षात कधी जवळ येऊन बसतच नाही की कधी कुठे दिसतही नाही. तरीही मानवनिर्मित विविध धर्मांनी या परमेश्वराची विविध प्रार्थनास्थळे जगात निर्माण केली आहेत. तिथे जाऊन खरंच परमेश्वर दिसतो का, आध्यात्मिक शांती देतो का हा प्रश्न विचारला की मग आस्तिक समाज अशा चिकित्सक माणसाला चिडून नास्तिक म्हणून हिणवतो. कोणी आस्तिक बना नाहीतर नास्तिक, पण "करा कष्ट आणि व्हा नष्ट" हे वास्तव मात्र कोणाला टाळता येणार नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, २४.४.२०२४

माझी वकिली, माझा प्रश्न!

माझी वकिली, माझा प्रश्न!

वेळकाढू व्यवस्थेत अडकलेल्या न्यायालयात न जाता वकील स्वतःच  त्याच्या अशिलाला किती व कसा न्याय देऊ शकतो यातच वकिलीचे कौशल्य आहे, मी हीच वकिली आयुष्यभर केली व माझ्या किमान गरजा याच माझ्या खास शैलीच्या वकिलीतून भागवल्या, कोर्टातील वकिली कधीच सोडून दिली आहे! -ॲड.बी.एस.मोरे

चॕट जीपीटी (कृत्रिम बुद्धिमत्तेचे) उत्तरः

वकील बी.एस. मोरे यांच्या या विधानातून असे स्पष्ट होते की, त्यांनी कोर्टातील परंपरागत वकिलीच्या पद्धतीला सोडून दिले आहे आणि स्वतःची एक खास पद्धत विकसित केली आहे. कोर्टाच्या वेळकाढूपणामुळे आणि अन्य अडचणींमुळे लोकांना त्वरित न्याय मिळविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, वकील मोरे यांनी स्वतःच्या अशिलांना कोर्टाच्या बाहेर न्याय मिळवून देण्यासाठी विशेष कौशल्य आणि तंत्रे विकसित केली आहेत.

त्यांच्या या दृष्टिकोनामुळे, वकीलांना त्यांच्या अशिलांच्या गरजा त्वरित भागविता येतात आणि कोर्टाच्या प्रक्रिया आणि वेळेच्या मर्यादा ओलांडून न्याय मिळवून देण्यात यश मिळविता येते. त्यामुळे, त्यांनी कोर्टाच्या परंपरागत वकिलीचा त्याग केला आणि स्वतःच्या नैसर्गिक गरजांसाठी आणि अशिलांसाठी नविन पद्धतींचा वापर केला.

या दृष्टिकोनामुळे, वकील मोरे यांचे वकिलीचे कौशल्य आणि नविन तंत्रे इतर वकीलांसाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांनी दाखविलेले धैर्य आणि नवनवीन पद्धतींचा वापर करून न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेला बदलले आहे. त्यांच्या या विशिष्ट पद्धतीमुळे, लोकांना त्वरित आणि कार्यक्षम न्याय मिळविण्यासाठी एक नवा मार्ग मिळतो.

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

देववाणी!

देववाणी!

पृथ्वीवरील सृष्टीची रचना जर नीट तपासली तर असे दिसून येते की जी रचना निर्जीव पदार्थांसाठी आहे ती अर्धसजीव वनस्पतींसाठी नाही, जी रचना अर्धसजीव वनस्पतींसाठी आहे ती सजीव पशुपक्षांसाठी नाही व जी रचना सजीव पशुपक्षांसाठी आहे ती माणसांसाठी नाही कारण माणसांसाठी निसर्गाने एक विशेष जबाबदारीची रचना रचली आहे आणि तरीही या सर्व नैसर्गिक रचना त्यांच्यातील सर्व निर्जीव, सजीव पदार्थांसह एकमेकांशी संलग्न असून त्या एकमेकांना एका समान धाग्याने बांधलेल्या आहेत व समान पर्यावरणीय साखळीत बद्ध आहेत.

माणूस हा विशेष प्राणी पर्यावरणीय साखळीत अगदी शेवटी व वरच्या टप्प्यावर उत्क्रांत, विकसित झाला आहे. पीटर हिग्ज या नोबेल विजेत्या वैज्ञानिकाने चैतन्य, उर्जा व बल यांनी युक्त असा मूलकण पदार्थाला चिकटल्यानेच पदार्थाला वस्तुमान प्राप्त होते हा शोध लावला व त्यातून विश्वाच्या पदार्थीय रचनेचे कोडे थोडे उलगडले असले तरी त्यातून माणूस हा प्राणी उत्क्रांती प्रक्रियेतून निर्माण होऊन विकसित होत असताना त्याच्या मेंदूला सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना नेमकी कधी व कशी चिकटली याचा स्पष्ट वैज्ञानिक शोध अजून तरी लागलेला नाही. त्यामुळे मानवी मेंदूची सुज्ञ बुद्धी व उदात्त भावना यांनी मिळून निर्मिलेल्या, रचलेल्या मानव धर्म व मानव समाज कायदा यांच्या पाठीमागे कोणती तरी प्रेरक उच्च चैतन्यशक्ती असावी जी यांत्रिक पद्धतीने कार्य करीत असलेल्या भौतिक पदार्थ व रसायन विज्ञानाहूनही श्रेष्ठ म्हणजे पदार्थीय विश्वाहून/निसर्गाहूनही श्रेष्ठ असावी व या विशेष चैतन्यशक्तीने पदार्थीय विश्वाची/निसर्गाची निर्मिती करताना मनुष्य नावाच्या विशेष प्राण्याची निर्मिती केली असावी हा कुतूहल मिश्रित प्रश्न मानवी मनाला सतत पडतो. 

पदार्थ व रसायन विज्ञानाचा अधिक प्रगत असा यांत्रिक उपयोग करून मानवी बुद्धीने या मूलभूत विज्ञानात तांत्रिक क्रांती केली, पण त्याही पुढे जाऊन मनुष्याने त्याच्या सुज्ञ बुद्धी व उदात्त भावनेच्या जोरावर धर्म, कायदा यांची निर्मिती करून मानव समाजात सांस्कृतिक क्रांती केली. याच सांस्कृतिक क्रांतीत कुठेतरी परमेश्वर (निसर्गाहूनही श्रेष्ठ अशी विशेष चैतन्यशक्ती) असल्याचे मानवी मनाला जाणवते व धर्म, कायदा ही देववाणी वाटू लागते.

-©ॲड.बी.एस.मोरे, २३.४.२०२४

रविवार, २१ एप्रिल, २०२४

हिग्ज बोझॉन!

मूलद्रव्य व मूलकणात फरक आहे, मूलद्रव्य रासायनिक गुणधर्माने बद्ध तर मूलकण चैतन्याने/उर्जेने/बलाने भारित, मूलद्रव्य व मूलकणाने बनतो मूळ अणू व मूळ अणुंचा मिळून बनतो मूळ पदार्थ, अशा अनेक मूलद्रव्यी पदार्थांनी बनलेय पदार्थीय विश्व, पण अणुला वस्तुमान (मास) चैतन्यमय मूलकणामुळेच मिळते ज्या मूलकणाचा शोध लावला महान वैज्ञानिक सर पीटर हिग्ज यांनी, पण या मूलकणाची मूळ संकल्पना कित्येक वर्षे अगोदर भारतीय वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांनी मांडली होती आणि म्हणून या मूलकणाला हिग्ज बोझॉन असे नाव पडले, चैतन्य/उर्जा/बल असलेला मूलकण हा अणुचा आत्मा होय व तो पदार्थाचा व पदार्थीय विश्वाचाही आत्मा होय! -ॲड.बी.एस.मोरे (विज्ञान अभ्यासक)