https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

अवास्तवाशी मैत्री?

अवास्तवाशी मैत्री?

सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार आणि लाचखोर, भ्रष्टाचारी शासकीय कर्मचाऱ्यांवर या केसेस पडल्यावर न्यायालयांत त्यांची दोषसिद्धी होऊन या लोकांना  शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त ८ टक्के म्हणजे केसेस पडल्यावर ९२% लोक न्यायालयातून निर्दोष सुटले. गुरूवार, दिनांक ७.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकात ही बातमी वाचली व एक माणूस म्हणूनच नव्हे तर एक वकील म्हणून माझे मन सुन्न झाले. वकील हा खरं तर न्यायासाठी लढणारा न्यायदूत असतो. पण अशा   वातावरणात त्याची वकिली कशी  चालणार?

इंग्रजीत ट्रूथ इज बिटर म्हणजे सत्य कटू असते अशी म्हण आहे. पण सत्य नुसते कटू नसते तर ते भयानक असते असे म्हणावे लागेल. कारण भ्रष्टाचारी सोडा पण खून, बलात्कार यासारखे भयंकर हिंसक गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार सुद्धा पुराव्याअभावी संशयाचा फायदा मिळून न्यायालयांतून निर्दोष सुटून पुन्हा राजरोसपणे असले गुन्हे करण्यासाठी मोकाट सुटतात तेंव्हा मात्र कायदा, शासन व न्याय या तिन्ही गोष्टींवरील लोकांचा विश्वास उडतो.

वरीलप्रमाणे कायद्याचे राज्य या संकल्पनेवरील लोकांचा विश्वास उडाला की मग लोक अवास्तव गोष्टींच्या नादी लागतात कारण त्यांना भयानक वास्तव झेपत, पचत नाही. मनाला काल्पनिक, खोटं, भ्रामक, आभासी समाधान देणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टींचे पेव समाजात फुटलेय. अंधश्रद्धा हा त्यातलाच एक भाग. अशा आभासी, खोट्या मानसिक समाधानासाठी अवास्तव, निरर्थक गोष्टींत गुंतवून घेण्याची लोकांची मानसिकता ओळखून  तिचा गैरफायदा घेण्याच्या कुहेतूने काही धूर्त लोकांनी आभासी गोष्टींचे उद्योगधंदे सुरू केले ज्यावर या धूर्त लोकांचे अर्थकारण व राजकारणही चालू आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी लोकांची परिस्थिती आहे. स्वतःची बुद्धी नीट वापरून अशा परिस्थितीवर मात करण्याचे सोडून लोक देवधर्माच्या नादी लागून या संकटातून सुटण्यासाठी नवस, उपवास यासारखी धार्मिक कर्मकांडे करतात तेंव्हा मात्र ही परिस्थिती आणखी बिकट होते. कारण या परिस्थितीला देव नाही तर लोकांची भ्रामक मानसिकता जबाबदार असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ९.१२.२०२३

शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

LIFE IS A CIRCLE!

LIFE IS A CIRCLE!

The life is a circle. You have to go round this life circle touching diverse life points standing on this circle for your touch and temporary stay at those points. Since these life points standing  on the life circle are meant only for your temporary stay with them you are not supposed to get struck with any one life point for long time. But some life points on life circle are very tricky and they tempt you to get struck with them for long time thereby trapping you in a vicious circle. This tricky situation demands intelligent move from you to get away from such silly points & their vicious circle fot moving on to the next life points waiting for you for your touch. This is challenging job. Live with this reality of life without getting trapped in vicious circle including that of imaginary things bombarded on your mind by some fools or crooks!

-©Adv.B.S.More, 9.12.2023

ओसीडी बाबा की जय!

ओसीडी बाबा की जय!

माझ्या जीवन चक्रातील त्याच त्या जीवन बिंदूंवर मी पुन्हा पुन्हा गोल फिरत येतोय व त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतोय म्हणून मी स्वतःचे उप नामकरण ओसीडी बाबा असे केले आहे. ओसीडी चा इंग्रजी विस्तार आॕब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसआॕर्डर असा आहे व याला मराठीत मंत्रचळ असे म्हणतात. हा एक मानसिक आजार आहे असे वैद्यकीय शास्त्र म्हणते. तसे असेल तर हा आजार हे माझे वास्तव आहे.

थोडक्यात मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे व या वास्तवात मी जगतो. आभासी चलनवलनात व भ्रामक कल्पनांत जगण्यापेक्षा मला वास्तविक होऊन वास्तवात जगणे पसंत आहे. आता माझ्या या चक्री वास्तवापेक्षा लोकांचे वास्तव जर वेगळे असेल तर त्यांचे माझे न जुळल्याने ते माझी चेष्टा करीत राहून मला त्यांच्यापासून लांब ठेवणार हे आलेच. हेही माझे एक वास्तव आहे व लहानपणापासूनच मी जगापासून थोडा हटके वागत असल्याने या वास्तवाचा अनुभव लहानपणापासून मी घेत आलो आहे. या वास्तवाचा स्वीकार मी केला आहे.

म्हणून माझी थोडक्यात ओळख लोकांना करून देण्यासाठी मी माझे उपनामकरण ओसीडी बाबा असे केले आहे जेणेकरून लोक त्यांना माझा ओसीडी आजार लागू नये म्हणून मला आणखी लांब ठेवतील. ओसीडी बाबा हे उपनामकरण आध्यात्मिक नसून वास्तविक आहे कारण मंत्रचळी जीवनचक्र हे माझे वास्तव आहे. लोक माझ्यापासून लांब राहिल्याने ओसीडी बाबा म्हणून ते माझा जयजयकार करणार नाहीत. मग त्यांनी मी स्वतःच माझा तसा जयजयकार करण्यापासून मला रोखू नये ही त्यांच्याकडून माझी किमान, माफक अपेक्षा आहे. ओसीडी बाबा की जय!

-©ॲड.बी.एस.मोरे उर्फ ओसीडी बाबा, ८.१२.२०२३

बिटकाॕईन?

बिटकाॕईन?

दिनांक ७.१२.२०२३ च्या लोकसत्ता दैनिकातील बातमीनुसार एका बिटकाॕईनचे मूल्य सुमारे (?) ३६ लाख ७९ हजार रूपये? हा काय प्रकार आहे? क्रिप्टो एक्सचेंज व बिटकाॕईन म्हणजे आभासी चलन आर्थिक व्यवहारात कोणी व का सुरू केले? याला जगभरात (भारत धरून) सरकारी मान्यता नसेल तर मग सरकारच्या मध्यवर्ती बँकेच्या नाकावर टिच्चून हे आभासी चलन अर्थ व्यवहारात कसे चालू आहे? डिजिटल क्रांतीचा हा भाग असेल तर ही क्रांती आर्थिक व्यवहारातील गैरव्यवहारास प्रोत्साहन देणारी ठरेल काय? मग तुफान गाजलेल्या भारतातील नोटबंदीचे काय? ई.डी. चे याबाबतीत धोरण काय आहे? हे आभासी चलन आर्थिक भ्रष्टाचार वाढवेल की कमी करेल? माझ्या डोक्यात या आभासी चलनातून अनेक प्रश्न निर्माण झालेत. माझ्या जुजबी माहितीप्रमाणे बिटकाॕईन हे कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही आणि त्याला कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेचे पाठबळ नाही म्हणजे त्याची शासनमान्य हमी नाही. म्हणजे ते भ्रामक/काल्पनिक चलन आहे व त्यामुळे या चलनास भारतात बंदी आहे. माझा प्रश्न हा आहे की अशा आभासी, भ्रामक, काल्पनिक चलनाची बातमी होतेच कशी? याचा अर्थ हे आभासी चलन समांतर अर्थव्यवस्थेचा भाग बनून कायद्याच्या राज्यात कायदा व शासन व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून आपला काळा कारभार बिनधास्त करीत आहे. मग लोकांचा विश्वास कायदा व शासन व्यवस्थेवरून कमी  होईल की नाही?

-©ॲड.बी.एस.मोरे, ८.१२.२०२३

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

भ्रष्टाचार!

असल्या भ्रष्टाचारी वातावरणात मी भ्रष्ट न होता माझी वकिली टिकवली हे माझे आयुष्यातील फार मोठे यश! -ॲड.बी.एस.मोरे

MUSIC!

INTRODUCING MYSELF IN STAR MAKER MUSIC FORUM!

I am advocate having 35 years of legal practice and 67 age. I live at Dombivli in state of Maharashtra. I love music specially old Hindi and Marathi film songs of golden era. But I am just a bathroom singer and afraid to sing with fear that my singing may be found insulting to big legends in music like Mohammed Rafi, Kishor Kumar, Mukesh, Lata Mangeshkar, Asha Bhosale, Suman Kalyanpur etc. I am their one of the big fans. I am just zero in music before them. Salute to them!

-Adv.B.S.More, 8.12.2023

शरण तुला भगवंता!

मानवी विकास हा उत्क्रांतीचाच भाग!

पिढ्यानपिढ्या आपली मान ताणत झाडावरची पाने खाण्याचा अथक सातत्यपूर्ण प्रयत्न करीत राहिल्याने हळूहळू जिराफ या प्राण्याची मान लांब झाली. सगळ्या प्राण्यांनी असे लांब व्हायचे प्रयत्न केले पण सगळे लांब झाले नाहीत. काहीजण प्रयत्न करूनही आखूडच राहिले. त्यांनी मग "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान" ही म्हण डोक्यात घेऊन आखूड जीवन जगणे पसंत केले असावे. म्हणजे आळस केल्याने त्यांची उत्क्रांती खुंटली असावी. माणूस हाही एक प्राणीच असल्याने त्याच्या बाबतीत सुद्धा उत्क्रांतीचा हा प्रयत्नवादी नियम सार्थ ठरला असावा.

यातून हा वैज्ञानिक निष्कर्ष काढता येईल की, सजीवांची उत्क्रांती ही सजीवांनी केलेल्या सातत्यपूर्ण, अथक प्रयत्नांतूनच झाली असावी. हा बोध घेऊनच मानव समाजात "प्रयत्नांती परमेश्वर" ही म्हण निर्माण झाली असावी. या म्हणीनुसार माणूस त्याच्या साचेबंद, रटाळ नैसर्गिक जीवनात नाविन्य शोधतो व त्यातून मूलभूत नैसर्गिक वास्तवातून नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करीत राहतो. या नवनिर्माणालाच मानवी विकास असे म्हणतात. याचा अर्थ निसर्गाचे विज्ञान जर साचेबंद, रटाळ वास्तव तर मानवी बुद्धीचे तंत्रज्ञान हे नाविन्यपूर्ण नवनिर्माणाचे वास्तव असे म्हणता येईल.

नवनिर्माणाच्या याच ध्यासातून व तशा सातत्यपूर्ण, अथक प्रयत्नांतून मानवाने इतर प्राण्यांच्या पुढे जाऊन स्वतःचा विकास केला आहे. या मानवी प्रयत्नांना पूरक विकासाची नैसर्गिक संधी निसर्गात दडलेली आहे म्हणून हे नवनिर्माण माणसाला शक्य झाले आहे. या संधीलाच  निसर्गाची किंवा परमेश्वराची कृपा असे म्हणता येईल. पण या कृपेची अट प्रयत्न हीच आहे. आळसातून विकास किंवा नवनिर्माण शक्य नाही.

प्रयत्न हे नुसते विकासाचेच नसतात तर विकासाच्या आड येणाऱ्या वाईट  सवयी, वाईट विचार सोडण्याचेही असतात. याचा अर्थ हाच की आपण निसर्गाला काही मागायचे नसते तर सातत्यपूर्ण, अथक प्रयत्न करून निसर्गातून ते घ्यायचे असते. पण असे प्रयत्न करूनही काही भौतिक गोष्टी साध्य झाल्या नाहीत तर त्याने निराश न होता निसर्गाचा निर्माता, आईबाप, सगळं काही कोणीतरी परमेश्वर आहे असे मानून "शरण तुला भगवंता" हे एकच वाक्य शांतपणे मनी उच्चारून शांत व्हायचे असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, ७.१२.२०२३