https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १९ एप्रिल, २०२०

ANTI COVID 19 MEDICINE

WORLD WAITING FOR ANTI COVID 19 MEDICINE!

World is eagerly waiting for anti covid 19 medicine. What happened to advancement in science, why are researchers taking so much time in inventing medicine on virus when they could invent this novel carona virus easily? It means destruction is easy but construction is hard. Let world get free from destructive viruses like covid-19 with strong anti viral medicines and move back to peace and joy. Let us hope for victory of good over evil!

-Adv.B.S.More©20.4.2020

Necessity knows no law?

NECESSITY KNOWS NO LAW?

(1) The necessity has its own law. It does not recognize any other law. The anger out of hunger are two sides namely mind and body of the same coin called life! Simply, anger of mind and hunger of body are  related to each other for the same purpose called necessity of preserving and saving life.

(2) The economics of life is meant for preservation of life and politics of life is meant for protection or saving of life. It is this protective politics which creates havoc when misused for dirty motive of ruling over subjects of life by misguiding such subjects. It is shocking when bad politicians misuse not only religion but also science for their dirty politics.

(3) There is a difference between genuine mistake and intentional crime. Such intentional crime has remained a part of dirty politics. The world has suffered and has been suffering continuously by dirty politics which tries to rule over the subjects of life not by law but by flaw. The dirty politics employs its own destructive tactics for breaking  law and create its own rule of flaw as against the basic concept of rule  of law.

(4) The basic truth of necessity has its own law is twisted by dirty or black politics in such a way that subjects of life are made to get confused over the point as to what is necessity of life? This confusion is created by creating issue out of non issue or necessity out of no necessity. The dirty politics is very shrewd in creating such confusion.

(5) When dirty politics succeeds in creating confusion between real necessity and fake necessity, it is the law of Nature which guides as to what is real necessity. But dirty politics shrewdly tries to confuse human minds by mixing flaw within law. The science of Nature and religion of God mixed up with each other is found to be such confusing mixture. The dirty politics misuse not only religion, but also science for its own dirty political motive.

(6) The uneducated people can get easily trapped within net of dirty politics. But sometimes even highly educated people also get trapped in such net by coming under pressure of favour and/or fear from agents of dirty politics. Being good does not only mean wishing good for world or praying God for good of world. Being good also means fighting war of good against bad, war of law against flaw or war of true politics against dirty politics. This is true necessity of good and being good. So the truth is that true  necessity knows law and the fake necessity knows flaw. The maxim "necessity knows no law" has to be understood in this sense law!

-Adv.B.S.More©20.4.2020

स्वार्थाचे महासत्य!

स्वार्थाचे महासत्य!

(१) स्वार्थ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तुम्ही संसारासाठी बाहेरून किती कमाई करून घरात आणता याकडे घरातील माणसांचे लक्ष असते, तर तुमच्या शारीरिक आणि/किंवा बौद्धिक कष्टाला जास्तीत जास्त फुकटात कसे ओरबाडता किंवा लुबाडता येईल याकडे बाहेरच्या जगातील माणसांचे लक्ष असते. याचा अर्थ असा की, घरातील माणसे स्वार्थी असतील तर बाहेरची माणसे महास्वार्थी असतात.

(२) रामायण महाकाव्याची निर्मिती ज्या वाल्मिक मुनींनी केली त्यांची वाल्याचा वाल्मिक मुनी कसा झाला ही कथा सर्वांनाच ठाऊक आहे. वाल्याच्या घरची माणसे जेंव्हा वाल्याने त्या माणसांसाठीच केलेल्या पापांचा भार डोक्यावर घ्यायला नकार देतात तेंव्हा वाल्याला स्वार्थाचे महासत्य कळते व त्याचा वाल्मिक मुनी होऊन त्याच्या हातून प्रसिद्ध रामायण महाकाव्याची निर्मिती होते. गौतम बुध्दाने सुध्दा स्वार्थ हेच जगातील दुःखाचे मूळ आहे असे म्हटले आहे. या सर्व गोष्टी माझ्या वाचनात, ऐकण्यात आल्या असल्या तरी माझ्याकडे त्यांचे ठोस पुरावे नाहीत. पण तरीही या कथांतून चांगला संदेश घ्यायला काय हरकत आहे?

(३) स्वार्थ हेच जर दुःखाचे मूळ आहे तर मग या स्वार्थावर विजय हा मिळवलाच पाहिजे. पण  तो कसा मिळवायचा? कारण आपण जगातून स्वार्थ तर नष्ट करू शकत नाही. या संदर्भात  स्वार्थाचा कायदा काय म्हणतो हे नीट शिकले पाहिजे. स्वार्थासाठी पापे म्हणजे वाईट कृत्ये करण्यास स्वार्थाचा कायदा प्रतिबंध करतो. हाच कायदा वाईट कृत्ये कोणती याची यादी आपल्याला देतो व मग ही वाईट कृत्ये टाळून आपल्या स्वार्थाचे समाधान कसे करता येईल त्याचा कायदेशीर मार्ग सांगतो.

(४) तुम्ही तुमच्या स्वार्थावर विजय मिळविणे  याचा अर्थ हा की, तुम्ही तुमच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या तुमच्या घरातील माणसांचा स्वार्थ व बाहेरच्या जगातील माणसांचा महास्वार्थ ओळखून या दोन्ही स्वार्थांची सांगड तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाशी म्हणजे तुमच्या वैयक्तिक आवडीनिवडींशी घालण्यात तरबेज होणे. अर्थात जगातील स्वार्थ, महास्वार्थ यांच्यात वैयक्तिक पातळीवर असे संतुलन निर्माण करून ते कायम राखण्याचा सतत प्रयत्न करणे व त्यासाठी स्वार्थाच्या कायद्याची शिकवण आत्मसात करणे.

-ॲड.बी.एस.मोरे©२०.४.२०२०

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

COMPETITION

तुकडे गोळा करण्याच्या स्पर्धेत माणूस जगणेच विसरून गेलाय!

(१) माणूस जन्मला की सुरू होते त्याची विश्व भ्रमंती व जगण्याची धडपड! ही धडपड पुढे नुसती जगण्यापुरतीच थांबत नाही तर ती ज्या पृथ्वीने त्याला जगण्याची संधी दिली त्याच पृथ्वीचे लचके तोडण्यास सुरूवात करते. या लचके तोडण्याच्या कर्माला माणूस मोठ्या दिमाखात जग जिंकायला निघालोय असे मोठे लेबल लावून मोकळे होतो.

(२) अंतराळ व्यापलेल्या संपूर्ण विश्वाचे लचके तोडण्याच्या स्वतःच्या मर्यादा लक्षात आल्या की मग माणूस पृथ्वीचे लचके तोडण्यावरच स्वतःचे लक्ष केंद्रित करतो. पृथ्वीचे लचके दोन प्रमुख भागात किंवा तुकड्यात तोडता येतात. एक तुकडा असतो पृथ्वीच्या ज्ञानाचा तुकडा व दुसरा तुकडा असतो पृथ्वीवरील भौतिक, रासायनिक व जैविक साधनसंपत्तीचा तुकडा. हे दोन्ही तुकडे स्वतःकडेच जास्तीतजास्त कसे येतील या प्रयत्नात माणूस स्वतःचे आयुष्य खर्ची घालतो. त्यासाठी एक माणूस दुसऱ्या माणसाबरोबर स्पर्धा करतो. पृथ्वीचे हे दोन प्रमुख तुकडे गोळा करण्याच्या स्पर्धेला पुढे मोठे स्वरूप प्राप्त होते.

(३) ही ज्ञानाची व आर्थिक संपत्तीची स्पर्धा हळूहळू जीवघेणी स्पर्धा होते. मग या स्पर्धेवर अधिपत्य गाजविण्यासाठी पुढे सुरू होते ती राजकीय सत्तेची स्पर्धा जी खूप भयंकर असते. वर उल्लेखलेले दोन तुकडे गोळा करण्याची ही स्पर्धा नसते तर या दोन तुकड्यांवर राजसत्तेचे अधिपत्य गाजविण्याची स्पर्धा असते आणि या राजकीय स्पर्धेचा उद्देश काय सांगितला जातो तर वरील दोन तुकडे गोळा करण्याच्या मूलभूत स्पर्धेवर शिक्षेच्या भीतीचे नियंत्रण ठेवणे.

(४) शिक्षेच्या भीतीचे नियंत्रण वरील मूलभूत ज्ञान व अर्थ स्पर्धेवर ठेवण्यासाठी राजसत्तेला राजकीय दृष्ट्या सामर्थ्यवान असणे आवश्यक असते. त्यासाठी लोकांच्या मोठ्या समूहाच्या (ज्याला राष्ट्र म्हणतात) अंतर्गत कुरघोडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजसत्ता पोलीसी बळ निर्माण करते व राष्ट्राचे बाह्य/परकीय आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी राजसत्ता लष्करी बळ निर्माण करते. ज्ञान व अर्थ हे पृथ्वीचे दोन प्रमुख तुकडे गोळा करण्याच्या मूलभूत स्पर्धेवर शिक्षेच्या भीतीचे नियंत्रण ठेवण्याचा कायदा राजसत्ता तयार करते व कायद्याचे राज्य हे लेबल स्वतःला लावून घेऊन देशाच्या जनतेवर सत्तेचा फास घट्ट आवळते.

(५) राजसत्तेचा फास देशाच्या जनतेभोवती घट्ट आवळण्यासाठी राजसत्ता ज्ञान व अर्थ या दोन प्रमुख तुकड्यांनाच स्वतःच्या पायाशी लोळण घ्यायला भाग पाडते. त्यासाठी मूठभर ज्ञान संपन्न लोक व मूठभर भांडवलदार या दोघांना साम, दाम, भेद, दंड नीती वापरून राजसत्ता हाताशी धरते. हीच ती राजसत्तेभोवती गोंडा घोळणारी मूठभर माणसे असतात जी अज्ञान व गरिबी यांच्या जाळ्यात अडकलेल्या जनतेला ज्ञान व अर्थ स्पर्धेच्या चक्रात धूर्तपणे गुंतवून ठेवून प्रसंगी धर्माचेच नव्हे तर विज्ञानाचेही राजकारण करून वेठीस धरतात. हे सत्य कळल्यावर जर कोणी बंड करून उठले तर अशा बंडखोरावर राष्ट्रद्रोहाचा गंभीर आरोप ठेवून त्याला पोलीसी व काही प्रसंगी लष्करी  बळाच्या जोरावर कठोर शिक्षा देत त्याला गप्प केले जाते व त्यातून जनतेचा आवाज दाबला जातो. याला कायद्याचे राज्य असे गोंडस नाव दिले जाते.

(६) ज्ञान व अर्थ हे दोन तुकडे गोळा करण्याचे हे चक्र इतके चक्रावून टाकणारे आहे की या चक्रात अडकून माणसाचे सुंदर आयुष्य कधी संपून जाते हे कळतच नाही. शेवटी माणूस मरतो हे माहित असूनही जवळजवळ सगळीच माणसे पृथ्वीचे लचके तोडून तिच्या ज्ञान व अर्थ या दोन प्रमुख तुकड्यांना गोळा करण्याच्या स्पर्धेत स्वतःला झोकून देतात व शेवटी जमेल तेवढे गोळा केलेले हे दोन तुकडे आपल्या वारसांच्या ताब्यात देत मरण पावतात.

(७) ज्ञान व अर्थ हे पृथ्वीचे दोन प्रमुख तुकडे (राजसत्ता ही या दोन तुकड्यांवर अधिसत्ता गाजविणारी तिसरी शक्ती आहे जी या दोन तुकड्यांतूनच निर्माण होते) गोळा करण्याच्या स्पर्धेत माणूस जगणेच विसरून गेलाय. ज्ञान व ज्ञानाच्या सरावाने अंगी मुरवलेले कला कौशल्य  यांचे प्रदर्शन (सादरीकरण हा सौम्य शब्द) लोकांपुढे करून लोकांकडून नुसती वाहव्वा, शाब्बासकीच नव्हे तर आर्थिक मोबदला (काही वेळा राजकीय मोबदला) मिळविण्याचा प्रयत्न ज्ञान संपन्न लोक करीत असतात. त्यात सर्वच ज्ञानी लोकांना यश प्राप्त होते असे नसते. ज्यांना ज्ञानातून शिकलेल्या तत्वांना मुरड घालणे जमत नाही त्यांची या यश प्राप्तीच्या मार्गात खूप गोची होते.

(८) काही ज्ञानी माणसे चित्रे काढीत चित्रकार होतात, काही मूर्तिकार होतात, काही कवी, गीतकार होतात, काही लेखक होतात, काही संगीतकार, नाट्य चित्रपट कलाकार होतात, काही खेळाडू होतात, काही उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक होतात तर काही राजकारणी होतात. ज्यांच्याकडे ज्ञानाचा छोटासा तुकडा असतो असे अल्पज्ञानी कष्टकरी कामगार होतात. ही सर्व ज्ञाती, अज्ञाती मंडळी वरील  स्पर्धेच्या चक्रात स्वतःला अडकवून घेऊन सुंदर  मनुष्य जीवनाला संघर्षाचे स्वरूप देतात. तुकडे गोळा करण्याच्या वरील स्पर्धेचा शेवट काय? काही महापुरूषांचे जीवन आदर्श म्हणून अजरामर होते, तर काही शास्त्रज्ञांचे शोध व काही कलाकारांच्या कलाकृती कायम स्मरणात राहतात. पण कालानुरूप या सर्व मानवनिर्मित गोष्टी निसर्ग कालबाह्य करून टाकतो हे सत्य विसरून कसे चालेल?

(९) माझा एक लेखक मित्र होता. परिस्थितीने गरीब व शासकीय खात्यात कारकून म्हणून नोकरी करणारा तो मित्र खूप वेगळा होता. घरातील कुटुंब सदस्य व त्याची भावंडे यांना त्याच्या लेखन कलेचे काहीही सोयरसुतक नव्हते. कारकूनीच्या पगारातून तो घरी किती पैसे आणतो याकडेच सर्वांचे लक्ष असायचे. अशा नकारात्मक वातावरणात माझ्या या मित्राने पुस्तकांचा खूप मोठा संग्रह घरात जमा केला होता. झोपडपट्टीतील घराच्या माळ्यावर त्याची स्वतःची छोटीशी अभ्यासिका व लायब्ररी होती. तिथे मला प्रवेश असायचा. तिथेच अनेक विषयांवर आमच्या गप्पागोष्टी व्हायच्या. दादर येथे जुन्या पुस्तक विक्रेत्यांच्या गल्लीत एक छोटा प्रकाशक होता. त्याच्या मदतीने माझ्या या लेखक मित्राची काही पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांच्या प्रकाशन सोहोळ्यासाठी मला खास आमंत्रण असायचे. माझा हा मित्र अल्पायुषी ठरला. पन्नाशी पार केल्यावर हार्ट अटॕकने तो गेला. त्याच्या कलेला न ओळखणाऱ्या त्याच्या कुटुंबाची व लग्न करून संसार थाटलेल्या त्याच्या भावंडांच्या संसाराचीही पुढे वाट लागली. त्याची प्रसिद्ध झालेली ती पुस्तकेही लोकांच्या स्मरणातून हळूहळू निघून जात रद्दी खाती जमा झाली.

(१०) हे सगळे जीवन चक्र हे असेच आहे. पण माणूस पृथ्वीचे लचके तोडण्याच्या व वरील तुकडे गोळा करण्याच्या कामात निरंतर व्यस्त आहे. तुकडे गोळा करण्याच्या स्पर्धात्मक संघर्षात मनुष्य हे सुंदर जीवन आनंदाने व शांततेने जगणेच विसरून गेलाय!

-ॲड.बी.एस.मोरे©१८.४.२०२०



शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

Human convenience

Human convenience is foundation of man made law and so it cannot match Nature's law! -Adv.B.S.More

Earn while you Learn



Earn while you learn!

Let body decay in its own cyclic process, keep mind young all time like child eager to learn. World is so giant that you have always space for learning. Think you as student all time and learn the world. Learning and doing is simultaneous process! Earn while you learn!

-Adv.Baliram More

2018 THOUGHTS

2018 OLD THOUGHTS OF ADV. B.S.MORE:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ बौध्दांचे नसून सर्व भारतीयांचे आहेत आणि स्वामी विवेकानंद केवळ हिंदूंचे नसून सर्व भारतीयांचे आहेत. -एड.बळीराम मोरे

ज्ञान संपन्नता, विवेक व व्यवहार चातुर्य ही बुद्धिमान मनुष्याची लक्षणे, तर ज्ञान असूया, अविवेक व मूर्खपणा ही बुद्धिहीन मनुष्याची लक्षणे! -एड.बळीराम मोरे


कैदी!

(१) किती लोकांनी "दुश्मन" नावाचा जुना हिंदी चित्रपट पाहिला आहे, ते माहित नाही. पण गुन्हेगाराला शिक्षा देताना गुन्हेगाराची पार्श्वभूमी व गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याची मानसिकता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षेचे स्वरूप कसे असावे, यावर भाष्य करणारा तो छान चित्रपट आहे.

(२) आज बऱ्याच दिवसांच्या अंतराने वकिलाचा काळा कोट व पांढरी पट्टी घालून कल्याण सेशन्स कोर्टात हजेरी लावली. दुपारी जेवणानंतरच्या वेळेत रिमांड सुरू झाला. पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींना पी.सी.आर. अर्थात पोलीस कस्टडी रिमांड किंवा ज्यांना अगोदर पी.सी.आर. मंजूर झाला होता त्यांना एम.सी.आर. अर्थात मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड, असे हुकूम कोर्टाने वकिलांच्या युक्तिवादांनंतर केले. 

(३) पोलीसांनी आरोपींना अटक केल्यानंतर जामीन होईपर्यंत ते पोलीसांचे किंवा कारागृहाचे कैदी असतात. कैद्यांमध्येही दोन प्रकार असतात. केसचा निकाल लागेपर्यंत जे आरोपी जामीनावर सुटत नाहीत त्यांना कच्चे कैदी म्हणतात आणि केसचा निकाल आरोपीच्या विरूध्द लागून कारागृहाची शिक्षा झालेल्या कैद्यांना पक्के कैदी म्हणतात.

(४) कैद्यांना रोजचे जेवण व इतर जीवनावश्यक सेवा पुरवण्यावर  सरकारला खर्च असतोच, पण त्यांच्या सुरक्षेसाठी कारागृह पोलीस व कारागृहातून कोर्टात ने आण करण्यासाठीही कारागृहाबाहेरील पोलीस यावरही खर्च करावा लागतो. 

(५) मुळातच मनुष्याच्या गुन्हेगारी कृतीला उत्पादक मूल्य नसते, पण उपद्रव मूल्य मात्र असते. वर उल्लेखित सरकारी खर्च हा त्या उपद्रव मूल्यावर केलेला सरकारी खर्च असतो. सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा असतो. पण प्रगत समाजाने मान्य केलेले मानवी हक्क मनुष्याच्या उपद्रव मूल्याला सुध्दा किंमत देतात, हे विशेष! -एड.बळीराम मोरे
पैशाची ताकद इतकी मोठी आहे की ती बुद्धिहीन मनुष्याला सुध्दा सामर्थ्यशाली बनविते! -एड.बळीराम मोरे
ज्ञान रूपातील सरस्वती शुध्द असली तरी अर्थ रूपातील लक्ष्मी शिवाय ती अचल आहे! -एड.बळीराम मोरे
जीवन हे आहे असंच असतं आणि ते आहे तसंच स्वीकारावं लागतं! -एड.बळीराम मोरे
हाताची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात फाटकी नोट! -बाळू मामा
राजकीय चर्चा!

राजकारण हा विषय शिक्षण, अर्थकारण, सत्ता प्राप्ती व सत्तेचा सदुपयोग किंवा  दुरूपयोग, भाषा, संस्कृती, विकासाचा प्रादेशिक असमतोल व त्यातून निर्माण होणारा प्रांतीयवाद, धर्म, जातपात, इतिहास, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार व त्याचे मानवी विकासातील महत्त्व, मनुष्याची स्वार्थी वृत्ती व त्यातून होणारा भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था अशा अनेक विषयांशी संबंधित असल्याने राजकीय चर्चा ही सर्वांगीण होणे आवश्यक आहे.

-एड.बळीराम मोरे


जानी, तुम्हारे पास नोट है तो मेरे पास काला कोट है! -एड.बलीराम मोरे

हल्ली लोकांना मुद्यांवर वैचारिक चर्चा करण्यापेक्षा गुद्यांवर येऊन हाणामारी करण्यातच जास्त रस असल्याचे दिसते. -एड.बळीराम मोरे

अग्नीचे रूपांतर आगीत आणि पाण्याचे रूपांतर पूरात होणे हे घातकच, अर्थात अती तिथे माती! -एड.बळीराम मोरे

निवडणूक देणग्या असोत नाहीतर कर असो, लोकशाहीला भांडवलशाहीचाच मोठा आधार! -एड.बळीराम मोरे

विश्व हे विशाल व क्लिष्ट आहे तेंव्हा कोणत्याही गोष्टीवर पटकन निष्कर्ष काढू नये! -एड.बळीराम मोरे

पर्यावरण पूरक गोष्टींना प्रोत्साहन देणारी व पर्यावरण घातक गोष्टींना प्रतिबंध करणारी व्यवस्था म्हणजे कायदा! -एड.बळीराम मोरे
आभाळच फाटलं तर ठिगळ कुठं लावणार, वातावरणच प्रदूषित झालं तर प्राणायाम काय करणार? -एड.बळीराम मोरे

निरर्थक गोष्टींत अर्थ शोधण्यापेक्षा अर्थपूर्ण गोष्टींत फायदा शोधावा, कारण फायद्याच्या गोष्टीच कायद्याच्या! -एड.बळीराम मोरे
बुद्धी प्रत्येकाकडे असते, फक्त तिला ज्ञान मिळवून ते वापरण्याची चटक लागली पाहिजे! -एड.बळीराम मोरे

अन्यायाचे फक्त स्वरूप बदलले आहे, अन्याय कायमच आहे, तेंव्हा अन्यायाचे बदललेले स्वरूप ओळखा! 
-एड.बळीराम मोरे

एका हाताने टाळी वाजत नाही!

सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही देशप्रेम वाढविणारी शालेय प्रतिज्ञा तेंव्हाच खरी ठरेल जेंव्हा सारे भारतीय भावाभावात दुजाभाव करणारी जातीपातीवर आधारित व्यवस्था फेकून देतील व सर्व भारतीयांसाठी एकच समान नागरी कायदा प्रेमाने स्वीकारतील. तोपर्यंत ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात येणे एक दिवास्वप्नच राहणार, यात शंका नाही. टाळी कधी एका हाताने वाजत नाही, हे सत्य आहे! -एड.बळीराम मोरे

उद्योगी मनाला शरीराचा नीट औद्योगिक वापर करून घेण्यासाठी कुशल व्यवस्थापक म्हणून बुद्धीची नेहमीच गरज भासते. -एड.बळीराम मोरे

विज्ञानातून कळलेल्या सृष्टीचा सकारार्थी उपयोग आणि नकारार्थी दुरूपयोग सांगणारी बौध्दिक समज, हाच अक्कलेचा कायदा! -एड.बळीराम मोरे

डोकी भडकवणाऱ्या अन्यायाच्या इतिहासाबरोबर डोक्यांनीच लावलेल्या वैज्ञानिक शोधांचा इतिहासही वाचला तर मार्ग निघेल. -एड.बळीराम मोरे

आयपीसी कलम ४९७ मध्ये व्यभिचारी स्त्रीला झुकते माप, आता सर्वोच्च न्यायालय समानतेच्या मुद्यावर विचार करतेय! -एड.बळीराम मोरे

जातीपातीवर आधारित व्यवस्था शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर दोघांनाही अमान्य असल्याने दोघांचेही अनुयायी मित्रच! -एड.बळीराम मोरे

धार्मिक व जातीय मुद्यांना कवटाळून आम्ही शैक्षणिक मागासलेपण व आर्थिक शोषण या मूलभूत मुद्यांना विसरतोय! -एड.बळीराम मोरे

जातीय तणावातून कालचे मित्र जेंव्हा आजचे शत्रू होतात, तेंव्हा जातीयतेचे विष किती जहाल आहे याचा प्रत्यय येतो. -एड.बळीराम मोरे

शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीला देव कोपला असे म्हणणे ही अंधश्रध्दा नव्हे काय? -एड.बळीराम मोरे

जीवनाचा कायदा शिकण्याच्या प्रक्रियेत मनुष्य स्वतःच स्वतःचा मार्गदर्शक बनतो. -एड.बळीराम मोरे

जगाच्या बाजारात ज्याचा त्याने अनुभव विकत घ्यायचा असतो. -आचार्य प्र. के. अत्रे 

ज्या ज्या दिवशी आपली थोडी सुध्दा प्रगती झाली नसेल तो आपला दिवस फुकट गेला असे समजावे. -नेपोलियन

थोर व्यक्ती त्यांच्या महान कार्यातून जिवंत असतात, अतार्किक वागून त्यांच्या आदर्शाचा अपमान नको! - एड.बळीराम मोरे 

पदार्थ व प्राण्यांसह माणसांचीही उपयुक्त आणि उपद्रवी किंवा निरूपयोगी अशी विभागणी करून व्यवसाय, उद्योगधंदा करा! -एड.बळीराम मोरे

इतिहासाकडे मागे वळून बघताना वर्तमान काळातले सत्य व भविष्यातील आव्हान, याचे भान हवे! -एड.बळीराम मोरे

महाराष्ट्रात जातीचे विष पेरणाऱ्या समाजकंटकांनी शिवरायांच्या महाराष्ट्र अस्मितेला गालबोट लावण्याचा विचारही मनात आणू नये. जय भवानी! जय शिवाजी! -एड.बळीराम मोरे

वाघ पुढची पाऊले टाकताना अधूनमधून मागे वळून बघतो, याला घाबरटपणा नाही तर सावधानता म्हणतात! -एड.बळीराम मोरे

माझा धर्म हिंदू व जात मराठा असली तरी जातीधर्मापलिकडची नैसर्गिक मानवताच मला अधिक भावते! -एड.बळीराम मोरे

विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या  मूलभूत पदार्थांनी (मूलद्रव्यांनी) बनलेली विविध रसायने समरसतेच्या धाग्याने एकत्र आहेत. -एड.बळीराम मोरे

सृष्टीचा सार संक्षिप्त स्वरूपात मांडताना केवढा मोठा भार शास्त्रीय लेखकावर असतो, हे त्या लेखकालाच माहीत! -एड.बळीराम मोरे

संपूर्ण सृष्टी हे विविधतेत समरसता व विभाजनात एकता असलेले, पण समरसतेत समानता नसलेले एक अजब रसायन आहे. -एड.बळीराम मोरे

अर्थकारणात बेरीज व गुणाकार आणि राजकारणात वजाबाकी व भागाकार, किती विचित्र आहे हे! -एड.बळीराम मोरे

Let us forget bad past and develop progressive Indian society to make India truly advanced country! -Adv.Baliram More

ब्रिटिशांनी आमच्यात भांडणे लावून आमच्यावर नुसते अनेक वर्षे राज्यच केले नाही, तर जाता जाता अखंड हिंदुस्थानाची फाळणी करून वाट लावली! -एड.बळीराम मोरे

फोडा, झोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची राजनीती! -एड.बळीराम मोरे

महाराष्ट्राचा महाराष्ट्रीय विकास हाच महाराष्ट्र धर्म आणि या धर्माची भाषा व संस्कृती फक्त मराठी! -एड.बळीराम मोरे

मराठी तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! जय शिवराय! -एड.बळीराम मोरे

इतिहासाचा उपयोग चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व वर्तमान परिस्थिती सुधारण्यासाठी व्हावा! -एड.बळीराम मोरे

बेजबाबदार अर्थकारण व भ्रष्ट राजकारण यांची युती झाली की कायद्याचे तीन तेरा वाजतात. -एड.बळीराम मोरे

Legislative law is Nature delegated developmental law backed by Nature's inspiration and human innovation. -Adv.Baliram More

Human development is optional, but development  law is compulsory once development option is chosen! -Adv.Baliram More

Legislative law is inexact law, never expect exact justice from it! -Adv.Baliram More

Law delegated by Nature to man is Legislative Law and law totally held by Nature is Natural Law. -Adv.Baliram More

Bachelor of Legislative Law (LL.B.)  means not Bachelor of Natural Law (NL.B.), which no man can have! -Adv.Baliram More

वर्षांमागून वर्षे येतात, दिवसांमागून दिवस जातात. २०१८ या नवीन इंग्रजी वर्षाच्या अस्सल मराठी शुभेच्छा! -एड.बळीराम मोरे
आळंदी!

(१) एका लग्नाच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी या तिर्थक्षेत्री २०१७ ची वर्षअखेर साजरी करतोय. काल ३० डिसेंबरच्या रात्री ज्ञानोबा माऊलीचे मंदिर गाठले. आत जाऊन लांबूनच नमस्कार केला. कारण दर्शन रांग खूपच मोठी होती.

(२) मंदिरात किर्तन चालू होते. भाविक भक्ती भावाने प्रदक्षिणा, ज्ञानेश्वरी वाचन वगैरे गोष्टी करीत होते. पण तिथल्या काही गोष्टी माझ्या तार्किक मनाला पटत नव्हत्या. माझ्या मनात हवी तशी आध्यात्मिक भावना जागृत  झाली नाही. मंदिराच्या बाहेर भाविकांच्या चपलांचा ढीग पडला होता. मंदिराच्या झाडूवाल्याने त्या सगळ्या चपला त्याच्या मोठ्या झाडूने लांब नेऊन टाकल्या. त्यामुळे  मंदिराबाहेर आलेल्या भाविकांची त्यांच्या चपला शोधताना तारांबळ उडाली. खूप गचाळपणा बघायला मिळाला.

(३) मग मंदिराबाहेर येऊन इंद्रायणी  नदीकाठी आलो. कानात ते आठवणीतले गाणे वाजू लागले. "इंद्रायणी काठी, लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची"! पण इंद्रायणी नदीचे पाणी इतके अस्वच्छ आणि नदीकाठचा बकालपणा इतका भयंकर की, पटकन तो नदीकाठ सोडला. इकडे थंडी पण कडाक्याची आहे.

(४) पहिल्यांदाच आळंदी दर्शन घेत होतो. पण पुस्तकात वाचलेली आणि  कानांनी ऐकून मनात साठवलेली आळंदी काही मला बघायला मिळाली नाही. आठवड्यापूर्वीच पंढरपूरला गेलो होतो. तिथेही चंद्रभागा नदीचे वाळवंट गायब झालेले दिसले आणि नदीचे पाणी सुध्दा इतके अस्वच्छ वाटले की, त्या पाण्यात पाय सुध्दा धुवावेसे वाटले नाहीत. याच चंद्रभागा नदीच्या स्वच्छ, निर्मळ पाण्यात मी बालपणी मनसोक्त अंघोळ करायचो आणि बाहेर येऊन नदीकाठच्या वाळवंटात गरम वाळूत लोळत पडायचो. 

महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्रांच्या या दुरावस्थेला जबाबदार कोण?

-एड.बळीराम मोरे


खंडाळा घाट आणि शिंग्रोबा मंदिर!

(१) कित्येक वर्षांनी खंडाळा घाटातील जुन्या नागमोडी रस्त्यावरील प्रवासाचा आनंद घेतला. पुण्याला जाताना लागणारा तो आधुनिक मेगॉ हायवे आणि घाटातील जुना नागमोडी रस्ता यात बराच फरक आहे.

(२) खरे निसर्ग सौंदर्य याच नागमोडी रस्त्यावर अनुभवायला मिळते. आज ३० डिसेंबर, आळंदीला जाताना मुद्दाम वाकडी वाट केली. कल्याण वरून एस. टी. ने पनवेलला आलो आणि मग पनवेल वरून खोपोली मार्गे जाणाऱ्या पनवेल-लोणावळा एस.टी. ने प्रवास केला.

(३) मजा आली. वाटेत शिंग्रोबा मंदिर लागले. शिंग्रोबाला नमस्कार केला. लहानपणी अशी आख्यायिका ऐकली आहे की, म्हणे याच शिंग्रोबाने ब्रिटिशांना खंडाळा घाटातील हा अवघड रस्ता दाखविला. खरे खोटे तो शिंग्रोबाच जाणो. पण सवयीनुसार हात जोडला गेला, हे मात्र खरे. 

(४) पुन्हा बालपणाचा आनंद घेतला आणि लोणावळ्याला एस. टी. स्टँडवरच हा लेख लिहिला.

-एड.बळीराम मोरे

गिरणी कामगार संपले, मिल मालकांचा विकास झाला!

(१) गुरूवारी मध्यरात्री ज्या कमला मिल आवारात अग्नीकांड होऊन १४ जीव हकनाक जळून मेले, त्याच कमला मिलमध्ये वकिली सुरू करण्यापूर्वी मी कॉस्टींग क्लॉर्क म्हणून काम करीत होतो. माझे वडील शेजारच्याच व्हिक्टोरिया मिलमध्ये रिंग खात्यात कामाला होते. 

(२) दत्ता सामंतांचा संप झाला आणि संपूर्ण मुंबईला जागवणारे कापड गिरण्यांचे भोंगे बंद पडले. कमला मिलच्या मालकाने संपानंतर शेजारची व्हिक्टोरिया मिल विकत घेतली. गेल्या वर्षी वडिलांचे सर्विस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी कमला मिलमध्ये गेलो होतो. कमला आणि व्हिक्टोरिया या दोन्ही गिरण्यांच्या जागेचा डोळे दिपवून टाकणारा गगनचुंबी विकास पाहिला आणि मुंबईतील कापड गिरण्यांसह मुंबईतील मराठी गिरणी कामगार इतिहासजमा झाल्याची वस्तुस्थिती  जड अंतःकरणाने स्वीकारली.

(३) बहुसंख्येने असलेला मराठी कामगार ज्या जागेवर उध्वस्त झाला, त्याच जागेवर श्रीमंतांची वातानूकुलीत कार्यालये थाटली गेली आणि पब संस्कृतीचा धिंगाना नाचवणारी वलयांकित हॉटेल्स उदयास आली. 

(४) अग्नीशमन यंत्रणा असो की इतर काही, सुरक्षिततेची तिरडी बांधून करण्यात आलेला हा भकास विकास किती महागात पडलाय, हे कमला मिल अग्नीकांडाने दाखवून दिलेय. सरकार आता काय मलमपट्टी करणार तेच पहात बसायचे!

-एड.बळीराम मोरे

परेल पूल गर्दीकांडात २३ मेले आणि आता कमला मिल अग्नीकांडात १४ मेले, अर्थात सुरक्षिततेच्या तिरडीवर मुंबईचा भकास विकास! -एड.बळीराम मोरे


महाराष्ट्रात अनेक मुद्यांवर असंतोष आहे आणि हे विविध मुद्देच पुढील निवडणूकांत कळीचे मुद्दे ठरणार आहेत. -एड.बळीराम मोरे

राजकारणातील देवत्व जास्त काळ टिकत नाही हेच गुजरातच्या निकालांनी सिद्ध केले आहे. -एड.बळीराम मोरे

नोकरीतील गुलामगिरी नको, तर उद्योगधंद्यातील राजेशाही हवी!

(१) केवळ भावनांशी झोंबाझोंबी करणारे मुद्दे राजकारणात किती दिवस टिकणार, हाच कळीचा मुद्दा आहे. कारण मन भावनांच्या मागे लागून भरकटले की, मनावर काबू ठेवणारी बुद्धी काम करीत नाही हे सत्य आहे.

(२) मूठभर श्रीमंतांच्या आर्थिक गुलामगिरीत बहुसंख्येने असलेला बहुजन समाज वर्षानुवर्षे पिळवणूक सहन करतोय असे मी जेंव्हा लिहिले, तेंव्हा कोणीतरी मी कम्युनिस्ट असे माझ्यावर शिक्कामोर्तब केले. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला लोकशाही समाजवाद हा हुकूमशाही कडे झुकलेला कम्युनिजम कसा होऊ शकतो, हे माझ्या बुद्धी पलिकडचे आहे.

(३) भारताने संमिश्र अर्थव्यवस्था  स्वीकारली आहे. याचा अर्थ हाच की, भारतीय अर्थव्यवस्था ही अर्ध  भांडवलवादी आणि अर्ध समाजवादी आहे. पण राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच भारत हा समाजवादी देश आहे हे नमूद केल्याने भारतीय अर्थव्यवस्था ही मूलतः समाजवादी आहे, यात शंकाच नाही. याचे कारण म्हणजे भारतातील बहुसंख्य जनता ही गरीब आहे.

(४) भारताचा समाजवाद हा अमेरिकेसारख्या भांडवलशाही  देशांच्या आणि चीन सारख्या कम्युनिस्ट देशांच्या बरोबर मध्ये आहे. धार्मिक भाषेत सांगायचे झाले तर, भारताने गौतम बुध्दाचा मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे.

(५) भारतातील मूठभर श्रीमंत १० एकर पेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना आणि गरीब कुटुंबात जन्म घेऊनही प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक यश मिळविणाऱ्यांना उद्योगपती बनविण्यासाठी कधीही हातभार लावणार नाहीत. मग भारताच्या समाजवादी सरकारने राष्ट्रीयकृत बँकांतला पैसा अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना व गरजू हुशार विद्यार्थ्यांना पुरवून त्यांना सक्षम उद्योगपती बनण्यासाठी खरे प्रोत्साहन का देऊ नये?  

-एड. बळीराम मोरे

सर्वच जातीधर्मातील लोकांची मूठभर श्रीमंतांकडून आर्थिक पिळवणूक होत असेल, तर आम्ही सर्व बहुजन एक होऊ शकतो का? -एड.बळीराम मोरे

मराठमोळे खेळ आणि लोककला लई भारी, पण आम्हाला वेड मात्र त्या क्रिकेटचे आणि हिंदी नटनट्यांचे? -एड.बळीराम मोरे

बहुसंख्य गरिबांना सतत आर्थिक गुलामगिरीत ठेवण्याचे अल्पसंख्य श्रीमंतांचे षडयंत्र कोणते राजकारण मोडून काढणार? -एड.बळीराम मोरे

सगळ्याच गोष्टी शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, मग शब्दांतूनच व्यक्त होणारा कायदा सर्वसमावेशक कसा? -एड. बळीराम मोरे 

खाजगी भांडवलशाही व सार्वजनिक समाजवाद यात कोणाची सरशी होतेय? -एड.बळीराम मोरे

श्रीमंतांच्या अर्थकारणात गरीब माणसांचे व्यक्त होणे केविलवाणे असते आणि हीच ती स्वातंत्र्याची गुलामगिरी! -एड.बळीराम मोर

साधनसंपत्तीचे लोकहितकारी सार्वजनिकीकरण विरूध्द स्वहितकारी खाजगीकरण या वादावर पोळी कोण भाजतात? -एड.बळीराम मोरे

ज्या समाजात शिक्षणाची अवहेलना, उत्पादकतेचे अवमूल्यन व उपद्रवतेचा उदोउदो होतो, त्या समाजाचा विकास कठीण आहे! -एड.बळीराम मोरे

खाजगीत सरळ सुटणाऱ्या गोष्टी सार्वजनिक चावडीवर नेल्या की त्यांना सतरा फाटे फुटतात! -ॲड. बी.एस.मोरे