https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २४ मे, २०१७

*Mistakes,  Failures ,  Insult,  Frustration and Rejections are Part of Progress and Growth.*
*No body has ever Achieved anything Worthwhile without Facing these Five Situations of Life...* -Unknown

रविवार, २१ मे, २०१७

*ADVOCATE'S CROSS EXAMINATION*!

*ADVOCATE'S CROSS EXAMINATION*!

Who says that half knowledge is dangerous? Advocates are generalists who carry half knowledge in different branches of knowledge, but they make specialists fully learned in particular branch of knowledge such as doctors, engineers cry when put in witness box after being caught in clutches of law. This only proves that full special knowledge has to pass through half general knowledge. -Adv.Baliram More 

*वकिलाची उलट तपासणी*!

कोण म्हणते की अर्धवट ज्ञान हे धोकादायक असते? सर्वव्यापी ज्ञान बाळगणा-या वकिलांकडे निरनिराळ्या ज्ञान क्षेत्रातील अर्धवट ज्ञानच असते, पण ठराविक ज्ञान क्षेत्रातील पूर्ण ज्ञान आत्मसात केलेल्या डॉक्टर, इंजिनियर सारख्या तज्ञांना कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर ही वकील मंडळी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात अगदी रडकुंडीला आणतात. पूर्ण असलेल्या विशेष ज्ञानाला अर्धवट असलेल्या सर्वसाधारण ज्ञानातूनच प्रवास करावा लागतो, हीच गोष्ट यातून सिद्ध होते. -एड.बळीराम मोरे

*गुलाबी जीवनाला काटेरी किनार*!

*गुलाबी जीवनाला काटेरी किनार*!

(१) गुलाबाच्या फुलाचे आकर्षण वाटत असेल आणि त्याचा सहवास हवा असेल तर त्याच्या काट्यांची पीडा सोसण्याची तयारी ठेवावीच लागेल.

(२) जीवनातील सर्वच भौतिक आकर्षणांचे हे असेच आहे. सुख भोगताना त्या सुखाला चिकटलेले दुःख सोसण्याची हिंमत नसेल तर भौतिक सुखाच्या मागे लागू नका. जीवन जगणे हाच एक आनंद आहे आणि तो आनंद भौतिक सुखाचाच एक भाग आहे. तो आनंद, ते सुख सहजासहजी मिळूच शकत नाही. कारण भौतिक सुखाचा मार्ग हाच मुळी भौतिक दुःखातून जातो.

(३) त्यामुळे शासनाने कितीही कायदे केले तरी भ्रष्टाचार, गुंडगिरी यासारख्या पीडादायक गोष्टी समाजात रहाणारच. अशा धोक्यांपासून सावधानता बाळगतानाच प्रसंगी त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी ठेवावीच लागते. काट्यांना किती घाबरणार? अंतर्गत पोलीस व देशाच्या सीमेवर पहारा देणारे सैनिक यांना त्यांच्या मर्यादा आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्याला नागरिकांच्या मर्यादा आहेत.

(४) माणसातले क्रूर वाघ, सिंह आपल्या आजूबाजूलाच आहेत हे सतत ध्यानात ठेवून स्वतःच शूर वीर बनून जगा. मरण तर असेही येणार आणि तसेही येणारच आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरण अटळ आहे. मग मृत्यूला का आणि किती घाबरायचे? तेंव्हा न घाबरता गुलाबाच्या काट्यांना हुशारीने बाजूला करीत, प्रसंगी त्यांना झेलीत जीवनातील गुलाबी सुख भोगायला शिका. *एड.बळीराम मोरे*

*NO SUICIDE*!

*NO SUICIDE*!

If anybody tries to harass you physically, just beat him and if anybody tries to harass you mentally, just shoot torrent of abuses against him in your mind, but never think of suicide. *Adv.Baliram More*

*आत्महत्या नाही*!

तुम्हाला जर कोणी शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला बडवा आणि कोणी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला मनातून भरपूर शिवीगाळ करा, पण आत्महत्येचा विचार मनात आणू नका. *एड.बळीराम मोरे*

*आध्यात्मिक शांती*!

*आध्यात्मिक शांती*!

(१) अबब! प्रचंड आकाराचे केवढे मोठे हे विश्व, त्या विश्वाचा केवढा मोठा हा पसारा आणि विविध ज्ञान शाखांत विखुरलेले त्या विश्वाचे केवढे प्रचंड हे ज्ञान!

(२) एवढया मोठ्या जगाच्या प्रत्येक कानाकोप-यात आपण पोहचू शकत नाही आणि एवढया प्रचंड ज्ञानाचे ओझे आपण उचलू शकत नाही. अगदी तसेच माणसांचे! प्रचंड लोकसंख्येने जगाच्या कानाकोप-यात पसरलेली किती ही असंख्य माणसे! 

(३) या असंख्य माणसांतील आपली माणसे किती? माझ्या दृष्टिकोनातून मनुष्याच्या दैनंदिन जीवनात नेहमीचा संबंध येणारी तीन प्रकारची नाती असंख्य माणसांतून निर्माण होतात. ती म्हणजे नोकरी, औद्योगिक, व्यावसायिक, राजकीय संबंधातून निर्माण होणारी केवळ स्वार्थावर आधारित व्यावहारिक नाती, नंतर भावनेपेक्षा वैचारिक जवळीकेतून निर्माण होणारे मित्रत्वाचे नाते आणि त्यानंतर विवाह संबंधातून निर्माण होणारी पतीपत्नी, आईवडील, मुलेबाळे, भाऊबहिणी इ. अत्यंत जवळची कौटुंबिक नाती व मेहुणामेहुणी, दीरभावजय, नणंदभावजय, काकामावशी, भाचाभाची इ. थोडी लांबची कौटुंबिक नाती. 

(४) परंतू नीट लक्षात घेतले तर, विचाराची सुध्दा स्वार्थापासून सुटका नाही आणि विवाह संबंध हा तर मानवी संभोग वासनेला सामाजिक दृष्ट्या नियंत्रित व संरक्षित करणारा कायदेशीर व्यवहारच असल्याने मित्रत्वाचे नाते काय किंवा कौटुंबिक नाती काय ही नाती केवळ स्वार्थावर आधारित असलेली व्यावहारिक नाती नसली तरी प्रेमभावना व स्वार्थी व्यवहार यांची भेसळ असणारी संमिश्र गुंतागुंतीची नाती आहेत, हे या नात्यांतील प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही.

(५) एवढे मात्र खरे की, तुम्ही अंतर्मुख होऊन थोडा जरी तुमच्या स्वतःचा विचार केला तर तुम्हाला जवळची वाटणारी तुमची ही मित्रमंडळी व तुमची नातेवाईक मंडळी तुमच्यावर स्वार्थीपणाचा शिक्का मारल्याशिवाय राहणार नाहीत. यातून तुमच्यावर खरे प्रेम करणारी तुमची जवळची माणसे किती व कोणती हे तुमचे तुम्हीच शोधा.

(६) एकदा का या भौतिक सत्याचे ज्ञान झाले की, माणसामाणसांतील अहंकार, द्वेष, मत्सर, असूया, राग, लोभ इ. मानवी भावनांमागे दडलेला स्वार्थ तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागेल. अशावेळी गांगरून न जाता, समोर उभे असलेले बलाढ्य विश्व, त्या विश्वाचे स्वतःच्या आवाक्यात न येणारे प्रचंड ज्ञान यालाच महावृक्ष मानून त्या वृक्षाच्या सावलीत छोटे होऊन शांत झोप घ्यायला शिका. एकदा का भौतिक सत्य नीट कळले की, आध्यात्मिक शांतता मिळविणे कठीण जात नाही. *एड.बळीराम मोरे*

*माझ्या लग्नाची गोष्ट*!

*माझ्या लग्नाची गोष्ट*!

(१) खरंच लग्न ही जगातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे का? या प्रश्नाचे उत्तर मी लग्न करून ३२ वर्षे झाली तरी अजूनपर्यंत मला सापडले नाही. तसेच लग्नाचा आधार घेतल्याशिवाय प्रेम नीट खुलत नाही, फुलत नाही हेही मला ६० वयाचा म्हातारा होऊन सुध्दा नीटपणे कळले नाही. प्रेमाच्या बाबतीत मी तसा बावळटच राहिलो आहे. अर्थात बाळू हे नाव "बावळट बाळू" म्हणून मी सार्थ केले आहे.

(२) आता माझ्या लग्नाची गोष्टच मी तुम्हाला बिनधास्त सांगतो. आतापर्यंतचा एकूण ३२ वर्षांचा माझा लग्नाचा अनुभव. बायकोने जवळ बसून फोटो काढू दिला तर मग दोघांचा फोटो फेसबुक वर टाकून ३१ मे २०१७ रोजी मी माझ्या लग्नाचा ३२ वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणार. 

(३) ३१ मे १९८५ रोजी पंढरपूर तिर्थक्षेत्री माझ्या बायकोशी माझे लग्न झाले. सुरक्षित संभोग क्रियेतून एकाच वर्षात आम्ही दोघांनी एका मुलीला जन्म दिला. कामगार वर्गाची पार्श्वभूमी असलेल्या आमच्या खानदानीत कोणी कधीही वकिली केली नाही. पण कसलेही पाठबळ नसताना गृहिणी बायको आणि मुलीला वाढविण्याची जबाबदारी अंगावर घेऊन काहीतरी वेगळे करुन दाखवायचे म्हणून मीच वकिलीत उडी घेतली. पण उडी महागात पडली. दरमहा ५०० रूपयांची कमाई करताना सुध्दा नाकीनऊ आले. मग ठरवून टाकले. "खर्चाला कार आणि बाळूला भार" म्हणून दूसरे मूल होऊ द्यायचे नाही, पण वकिलीत ठाम उभे रहायचे.

(४) मग वकिली थाटात मुलीला नामांकित शाळेत घातले. पोरगी पण भलतीच हुशार निघाली. परीक्षांमध्ये चांगले यश मिळवू लागली. पण नामांकित शाळेची फी परवडत नव्हती. बायकोला सारखी उसणवारी करावी लागत होती. मग काय घरात नेहमीच भांडणे. शेवटी एकदाचे स्वतःचे घरदार झाले. चाळीतील भाड्याच्या खोलीतून मालकीच्या फ्लॅटमध्ये आलो.

(५) संसारात राहून मुलीच्या शिक्षणाचा खर्च जरी मी उचलला असला तरी मुलगी हुशार नसती तर त्या खर्चाचा काही उपयोग नव्हता. पण हुशार मुलीने नामांकित व्यवस्थापन संस्थेतून मेरीटवर एम.बी.ए. चा पूर्णवेळ अभ्यासक्रम चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केला. आता ती नामांकित कंपनीत उच्च पदावर स्थिर आहे.

(६) आता माझ्या लग्नानंतर विषय पुढे येतो तो माझ्या मुलीच्या लग्नाचा. तिचा जीवन साथीदार तिनेच शोधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आम्ही पतीपत्नीने तिला दिले आहे. पण आमच्यापेक्षा लोकांनाच तिच्या लग्नाची जास्त काळजी आहे असे दिसते. अजून कसे जमले नाही म्हणून सारखी चौकशी करतात. 

(७) आता एकतर मी फटकळ माणूस. त्यामुळे यापुढे मुलीच्या लग्नाची जे कोणी चौकशी करतील त्यांना सरळ बोलूनच टाकणार की, "मुलीचे लग्न होईल, नाहीतर होणार नाही. मी काय मोठा दिवा लावलाय लग्न करून"? या ठिकाणी "दिवा" या शब्दाचा अर्थ "वंशाचा दिवा" अर्थात मुलगा असा घेऊ नये. लग्नाला एक जीवन व्यवहार समजणारा मी माणूस मुलामुलीत भेद करणाऱ्या फालतू गोष्टींना काडीचीही किंमत देत नाही. दिवा लावणे म्हणजे जीवनात येऊन महान कार्य करणे, असे मला म्हणायचे आहे. लग्न करणे आणि प्रेमाच्या नावाखाली ते खपवणे, याला मी जीवनातील महान कार्य मानत नाही. अजून संपली नाही माझ्या लग्नाची गोष्ट. हा झाला भाग एक. दूसरा भाग अजून बाकी आहे, कारण आयुष्य अजून बाकी आहे. *एड.बळीराम मोरे*

मंगळवार, १६ मे, २०१७

THINK FREE, BUT EXPRESS WITH CAUTION BECAUSE YOUR THINKING HAS NO CAPACITY TO MEASURE TOLERANCE LIMIT OUTSIDE! -Adv.Baliram More