https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

दृष्टिकोन बदला, परिस्थिती बदलेल!

दृष्टिकोन बदला, परिस्थिती बदलेल!

माणूस देव नाही पण तो देवाच्या फार जवळ आहे कारण माणूस ही देवाची विशेष निर्मिती आहे. त्यामुळे जास्तीतजास्त देवगुणात राहणे यातच मनुष्य जीवनाचे हित आहे. त्यासाठी देवाची अनेक धार्मिक कर्मकांडे करण्याची काही गरज नाही. "हे परमेश्वरा, सुख शांती" या प्रार्थनेत सगळे आले.

माणूस ही विशेष निर्मिती दोन वैशिष्ट्यांनी पूर्ण आहे. एक सर्वसाधारण विशेषतः व दोन असामान्य विशेषतः! प्रत्येक मनुष्याला देवाने काहीना काही तरी विशेष गुण दिलेला असतो. तो असामान्य विशेष गुण वेळीच ओळखून त्यात प्रावीण्य मिळवून त्या असामान्य विशेष गुणाच्या जोरावर मर्यादित क्षेत्रातला राजा म्हणून जगायचे असते. परिस्थिती कशी का असेना या विशेष गुणाच्या जोरावर राजा म्हणून जगता आले पाहिजे. लोक या विशेष गुणाच्या  मर्यादित प्रमाणात का होईना पण मागे लागले व योग्य मोबदला देऊन अवलंबून राहू लागले की तुम्ही जिंकलात व ठराविक क्षेत्रातले राजे झालात. दुसऱ्याची श्रीमंती बघून स्वतःची श्रीमंती कमी लेखू नका. तसे केल्यास उगाच दुःखी व्हाल! न्यूनगंडी वृत्ती सोडा! दृष्टिकोन बदला, परिस्थिती बदलेल!

-ॲड.बी.एस.मोरे©१७.१२.२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा