https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

रविवार, १९ मे, २०२४

धाकट्या बहिणीला पत्र!

धाकटया बहिणीला थोरल्या भावाचे पत्र!

प्रिय भगिनी,

तुझ्या डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांनी तुला हे जग प्रत्यक्षात कसे आहे हे दाखवले आणि मन नावाच्या तुझ्या सहाव्या ज्ञानेंद्रियाने तुला परमेश्वर नावाच्या अलौकिक शक्तीची सहावी जाणीव करून देत अप्रत्यक्ष जाणिवेतला परमेश्वर समोर उभा केला. पण याच परमेश्वराने, तुझ्या तरूण वयात तुझी शक्ती व्यवस्थित असताना, तुझा उत्साह चांगला असताना तुझ्या  जीवनसाथीला म्हणजे तुझ्या पतीला अचानक तुझ्यापासून हिरावून घेतले आणि तरीही या परमेश्वराचे तू गुणगाण गातेस? त्याला उलट जाब का विचारत नाहीस?

ज्यांचे सर्व काही नीट चालले आहे त्यांना खुशाल त्या परमेश्वराची जपमाळ ओढत बसू देत पण तुझे काय? तू आयुष्यात कोणतीही वाईट करणी केली नाहीस. इमाने इतबारे संसार केलास. तुझ्या मुलांना असेल त्या कठीण परिस्थितीत वाढवलेस आणि तरीही हा परमेश्वर तुलाच असली भयानक शिक्षा करतोय? आणि उतार वयातही पुन्हा आणखी त्रास देतोय?

तुझ्या मुलांचा संसार चांगला चाललाय यात आई म्हणून तुला मोठे समाधान असणे हे ठीक आहे. पण या परमेश्वराने तुझा संसार मध्येच मोडला त्याचे काय करायचे? "दो हंसो का जोडा बिछड गयो रे" हे गाणे म्हणत रडत बसायचे का? की त्या परमेश्वराच्या नावाने खडे फोडत बसायचे? दुसरे करतात म्हणून तूही त्यांची री ओढत बसायचे का?

हा परमेश्वर कोणाला चांगला तर कोणाला वाईट. त्याचा थांगपत्ता ना कोणाला लागला आणि ना कोणाला कधी लागेल. याचा अर्थ असा नव्हे की परमेश्वरावर श्रद्धा ठेवू नये. जरूर ठेवावी. पण भोळी, आंधळी श्रद्धा ठेवू नये. चांगली डोळस श्रद्धा ठेवावी. बुद्धीने नीट विचार करून वास्तव नीट समजून घ्यावे. ज्या लोकांची बुद्धी भ्रमिष्ट झालीय अशा लोकांच्या नादी लागू नये. ही माणसे वास्तव नीट समजून न घेता विचित्र वागतात व स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही त्रास देतात जो त्रास कधीकधी फार भयंकर असतो. अशा लोकांचा विचार करून स्वतःचे आयुष्य बिघडवू नकोस. लोकांच्या नाकावर टिच्चून मस्त जग. तुझा जीवनसाथी आता परत येणार नाही. पण सगळं काही संपलेले नाही. कितीतरी चांगल्या गोष्टी अजूनही तुझी सोबत करीत आहेत. तुझी चांगली मुले, चांगल्या सुना, चांगली नातवंडे यांचा चांगला गोतावळा व आधार तुला आहे. वृद्धाश्रमातील लोकांचे दुःख तुझ्या वाट्याला आले नाही त्याबद्दल त्या परमेश्वराचे थोडे आभार मान. पण त्याचे जास्त आभार बिलकुल मानू नकोस. कारण याच परमेश्वराने तरूण वयात तुझा जीवनसाथी तुझ्यापासून हिरावून नेलाय. नुसत्या जगाशीच नव्हे तर परमेश्वराबरोबरही व्यवहारी वाग कारण जगाचा व्यवहार त्यानेच निर्माण केलाय. तेव्हा व्यवहारी बन व खंबीर मनाने मस्त जग!

-बाळू दादा, १९.५.२०२४

शनिवार, १८ मे, २०२४

परमेश्वराची अप्रत्यक्ष अनुभूती!

निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव व परमेश्वर शक्तीची अप्रत्यक्ष अनुभूती!

डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या मानवी शरीराच्या पाच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमांतून मानवी मेंदूला निसर्गाची प्रत्यक्षात जाणीव होते अर्थात निसर्ग प्रत्यक्षात अनुभवता येतो, ज्ञात होतो परंतु मानवी शरीराला चिकटलेल्या व मानवी मेंदूशी संलग्न असलेल्या या पाच ज्ञानेंद्रियांशिवाय मानवी मेंदूत आणखी एक सहावे ज्ञानेंद्रिय असते त्याला मन असे म्हणतात. या मनाला पाच ज्ञानेंद्रियांचा आधार घेऊन जसा निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो तसा या पाच ज्ञानेंद्रियांचा आधार न घेताही अगदी स्वतंत्रपणे निसर्गातील परमेश्वरी शक्तीची अप्रत्यक्ष अनुभूती मिळू शकते जर मानवी मनाची त्या महान शक्तीवर म्हणजे परमेश्वरावर तेवढी मोठी भावनिक श्रद्धा असेल तर. परमेश्वराची आध्यात्मिक अनुभूती म्हणजे मानवी मनाला होणारे परमेश्वराचे अप्रत्यक्ष ज्ञान. मानवी मनाच्या अशा अप्रत्यक्ष अनुभूतीला किंवा अप्रत्यक्ष ज्ञानाला विज्ञान मान्यता देत नाही कारण अशी अप्रत्यक्ष अनुभूती, अप्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध करता येत नाही. त्यामुळे निसर्गाच्या प्रत्यक्ष अनुभवालाच कायम चिकटून राहणाऱ्या विज्ञानाला परमेश्वर कायम अज्ञात राहिला आहे.

-©ॲड.बी.एस.मोरे, १९.५.२०२४

MYTH OF DEVELOPMENT!

DEVELOPMENT REMAINS MYTH WHEN BASIC SYSTEM REMAINS CONSTANT!

The technology & sociology are significant methods of intelligent use of the basic system of Nature by human beings to serve their selfish objects of convenience and advantage. But they do not change the basic system of Nature. If anybody feels any such change at human instance it is myth and feel good fantasy. Let human development be not turn into feel good fantasy. This is what happens when the class of few rich capitalists grow rich & rich while mass of human population fall down poor & poor. Let we not boast about any such development. Any such development is just myth and feel good fantasy and let us not make big noise about such development. Even otherwise, technology and sociology boosted developmental changes are only temporary changes when the basic system of Nature remains constant. Let be you ever so high with intake of high rich food and high rich medicine, let you be ever so highly regular and punctual in your physical exercise,  let you use all shrewd tactics to become high rich economic lord and high powerful political lord in human society and let you make thousands of prayers before almighty power of Nature called God, your all these technological, sociological & spiritual exercises go futile because they cannot stop natural biological process of your body aging & body sinking which is fixed pattern of basic system of Nature which remains constant all time in stereotyped and dictatorial way. In short, the development remains myth when basic system remains constant.

-©Adv.B.S.More, 18.5.2024

शुक्रवार, १७ मे, २०२४

सूक्ष्मातून सूक्ष्माकडे!

सूक्ष्मातून सूक्ष्माकडे!

एका सूक्ष्म कणाच्या महास्फोटातून (बिग बँग थिअरी) विश्वाची निर्मिती झाल्यावर विश्व प्रसरण पावत गेले व विश्वाचा पसारा वाढत गेला व तो वाढतच आहे असा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. आकुंचित विश्वाकडून प्रसारित विश्वापर्यंतचा विश्वाचा हा प्रवास अलौकिक आहे. पण प्रसरण पावलेल्या अशा या विश्वाचा उलट प्रवास (रिटर्न जर्नी) सुरू होऊन हे विश्व पुन्हा आकुंचित होत जाऊन त्याच्या मूळ सूक्ष्म कणात जाऊन बसेल का याविषयी निश्चित सांगता येत नाही. परंतु सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे या अगोदर सुलट्या व मग उलट्या प्रवासाचा अनुभव सजीव सृष्टीतील सर्वच सजीवांना घेता येतो व म्हणून तो माणसालाही घेता येतो.

पुरूष बीज व स्त्री बीज यांच्या एका छोट्या संयुक्त थेंबातून मनुष्याचा जन्म होतो. हा जन्म म्हणजे सूक्ष्म कणातून झालेली मानवी जीवन विश्वाची झालेली निर्मिती. हळूहळू बालपण, तरूणपण व प्रौढावस्था ही मानवी जीवनाची चढती कमान म्हणजे मानवी जीवन विश्वाचे चढते प्रसरण. पण त्यानंतर उतार वय सुरू होऊन मानवी जीवन विश्व आकुंचित होत जाते.

मनुष्याची वृद्धावस्था हा सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे नेणाऱ्या उलट्या जीवन प्रवासाचा एक त्रासदायक अनुभव आहे. या अनुभवात शरीर व मेंदूची हालचाल, सक्रियता मंदावते. आयुष्यभर साठवलेल्या ज्ञान व अनुभवाचा साठा वृद्धापकाळात मेंदूला जड होतो. मेंदूची उतरकळा शरीरालाही लागू होते. मेंदू बरोबर शरीरही जड व संथ होत जाते. उतार वयात मेंदू पूर्वीसारखा अनेकविध गोष्टींकडे सहजपणे लक्ष देऊ शकत नाही. अर्थात एकाच वेळी समरसता व एकाग्रता साधणे मेंदूला कठीण होऊन जाते. मग संपूर्ण आयुष्यभर जमवलेल्या अनेक गोष्टी वृद्ध मेंदूला त्रास देत राहतात. त्यातून आवश्यक तेवढ्या निवडक गोष्टीवरच लक्ष देण्याचा वृद्ध मेंदू प्रयत्न करतो. तरीही बऱ्याच वेळा अशा निवडक छोट्या गोष्टी सुद्धा परिपक्व वृद्ध मेंदूला पूर्वीसारख्या झेपत नाहीत.

मनुष्याचे सरासरी वय (आयुष्यमान) साधारण ६५ ते ७० वर्षे असले तरी काही माणसे ८०, ९० व नव्वदीच्या पलिकडेही जगतात. यात निसर्गाचा काहीसा दुजाभाव असला तरी तो चमत्कार नसतो. ते अनुवंशशास्त्र व जैविक विज्ञान आहे. अशाप्रकारे वय लांबणे म्हणजे मनुष्य जीवनाचा सूक्ष्मातून सूक्ष्माकडे जाण्याचा उलट प्रवास थोडासा लांबणे. अशाप्रकारे  लांबलेल्या आयुष्यात अशा काही तुरळक माणसांची शारीरिक व मेंदू सक्रियता लांबलेली दिसते. परंतु त्रासदायक उलट प्रवासाच्या विचित्र अनुभवातून सर्वांनाच जावे लागते. तिथे निसर्ग दुजाभाव करीत नाही. प्रसरणातून आकुंचनाकडे उलट चाललेल्या या त्रासदायक प्रवास अनुभवाचा शेवट माणसाच्या मृत्यूने होते. सूक्ष्मातून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास अशाप्रकारे शेवटी सूक्ष्मातच संपतो. शेवटी काय तर सगळं शून्य!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.५.२०२४

गुरुवार, १६ मे, २०२४

रियल इस्टेट कंपनी लॉयर!

बांधकाम कंपनीचा (रियल इस्टेट कंपनी) कायदा सल्लागार म्हणून वकिलाला अशाप्रकारचे विविध प्रश्न करार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, दस्तऐवज नोंदणी कायदा, भाडे नियंत्रण कायदा, सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा, मालमत्ता विकास नियमन कायदा, झोपडपट्टी पुनर्वसन कायदा, जुन्या इमारतींचा विकास कायदा, पालिका कायदा, म्हाडा कायदा अशा अनेक कायद्यांच्या माध्यमातून सोडवावे लागतात. -ॲड.बी.एस.मोरे

कारण की!

कारण की!

कोणत्याही गोष्टीला कारण असते. ठोस कारणाशिवाय ठोस कृती शक्य नाही व ठोस कृतीशिवाय ठोस परिणाम शक्य नाही. शिक्षण, कला, क्रीडा व तंत्र कारण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण ही मानवी मनाची काही प्रमुख कारणे होत. पण या सर्व कारणांच्या मागील मूळ कारण जर कोणते असेल तर ते निसर्गाचे विज्ञान हेच आहे. विज्ञान कारणाचा स्त्रोत निसर्ग असल्याने विज्ञानाचे कारण फक्त निसर्गालाच माहित आहे. काही माणसे निसर्गातील परमेश्वराला ते मूळ कारण माहित असेल असेही म्हणतील. पण मानवी बुद्धी त्या मूळ कारणावर फक्त तर्क लढवू शकते. तिला ते मूळ कारण सापडू शकत नाही जसा तिला निसर्गातील परमेश्वर सापडू शकत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.५.२०२४

बुधवार, १५ मे, २०२४

निसर्ग वास्तवाची चौकट!

निसर्ग वास्तवाची चौकट!

परमेश्वर नामक महाशक्तीपुढे रडून, ऊर बडवून, शरणागत होत प्रार्थना करून निसर्गाची मूलभूत रचना व मूलभूत व्यवस्था बदलत नाही. जे काही बदल दिसतात ते या मूलभूत निसर्ग रचना व व्यवस्थेचाच भाग असतात. मानव ज्ञात विज्ञान, मानव निर्मित तंत्रज्ञान व मानव निर्मित कायद्याची समाज व्यवस्था या तिन्ही गोष्टी निसर्गाच्या मूलभूत रचना व मूलभूत व्यवस्थेचाच भाग आहेत. निसर्गाचे मूलभूत वास्तव जेव्हा बदलता येत नाही तेव्हा ते आहे तसे स्वीकारण्यात शहाणपणा असतो. निसर्ग वास्तवाची चौकट मोडताना ठेच लागून आलेले शहाणपण मोठे असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.५.२०२४