https://www.facebook.com/profile.php?id=61559396367821&mibextid=ZbWKwL

सोमवार, २२ जानेवारी, २०२४

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे!

धर्मभावनेवर सांभाळून लेखन करावे लागते!

श्री. रविंद्र मालुसरे, अध्यक्ष, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, आपण रामायणावर हे छान लिहिले आहे ते मी समाज माध्यमावर शेअर करतो. पण धर्माचे राजकारण करणाऱ्यांना हे कितपत रूचेल? सद्या वाल्मिकी रामायणाचाच गाजावाजा होताना दिसत आहे. तुलसीदासांचे रामायण पण आहे. भृगू ऋषी यांनी पण टीकात्मक रामायण लिहिले आहे असे कुठेतरी वाचण्यात आले. पण बहुसंख्य लोकांना धार्मिक भावनांवर डोलताना भौतिक वास्तवाचा अर्थात आकाशात उडताना पृथ्वीवरील जमिनीचा विसर पडताना दिसतो. लोकांच्या याच भावनिक मानसिकतेचा राजकारणी लोक फायदा उठवतात व धर्माला राजकारणाच्या दावणीला बांधतात. पण राजकारण्यांचा हा धूर्तपणा लोकांना कळत नाही. धर्माचा राजकारणासाठी वापर होऊ नये असे कितीही वाटले व ते असंविधानिक असले तरी तसा वापर होतोच. यावर रोखठोक बौद्धिक विचार मांडण्याची सोय नाही. कारण धर्मभावनेने बेभान  झालेले लोक अंगावरून चवताळून येतात. त्यांना वास्तव लेखन आवडत नाही. मला सुद्धा समाज माध्यमावर फार सांभाळून लेखन करावे लागते. खूप बौद्धिक कष्टाने मिळवलेले वकील पद व वयाचे ज्येष्ठत्व याची बिलकुल पर्वा न करता ओळख पाळख नसलेले पण स्वतःच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्र झालेले फेसबुकी मित्र अशा स्पष्ट लिखाणावर सरळ सरळ शिव्या द्यायला कमी करत नाहीत. मला असे अनुभव अधूनमधून येतात. मग खालची बौद्धिक पातळी असलेल्या चुकून माझे मित्र झालेल्या लोकांना मला ब्लॉक करावे लागते. म्हणून तर मी माझे फेसबुक खाते निवडक वैचारिक मित्रांसाठी मर्यादित ठेवले आहे. आपले लेखन छान असते. धन्यवाद!

-©ॲड.बी.एस.मोरे, २१.१.२०२४
https://poladpuraasmita.blogspot.com/2024/01/blog-post_21.html

व्यायाम व जीवन योग!

झोप अर्थात निद्रितावस्था ही जिवंत शरीर व मनाची तात्पुरती विश्रांती होय, झोप पुरी झाल्यानंतर सुरू होते जागृतावस्था ज्यात शरीराच्या शारीरिक हालचालीचा व मनाच्या भावनिक, बौद्धिक क्रियेचा व्यायाम सुरू असतो, दृढ निश्चय, मनोनिग्रह हा मनाच्या व्यायामाचा प्रमुख भाग असतो, शारीरिक व मानसिक व्यायाम ही समांतर प्रक्रिया आहे व दोन्ही व्यायाम प्रक्रियेत संतुलन हाच जीवन योग असतो! -ॲड.बी.एस.मोरे

राजेशाही, लोकशाही!

राजेशाही ही वारसा हक्काने घराण्यातच राहिली (तेव्हाची घराणेशाही) व पेशवाई (तेव्हाचे पंतप्रधान पद) ही कर्तबगारीवर चालू राहिली. पण जेव्हा पेशवेच राजे म्हणजे सत्ताधीश झाले तेव्हा पेशवाई सुद्धा वारसा हक्काने पेशवा घराण्यातच राहिली व अशाप्रकारे पेशवाईत घराणेशाही घुसली. आताच्या लोकशाहीतील सर्वसामान्य जनता ही त्यावेळच्या राजेशाहीतील सर्वसामान्य प्रजा होती. -ॲड.बी.एस.मोरे (मला थोडक्यात समजलेला राजेशाही इतिहास)

FREE ADVOCACY?

FREE ADVOCACY?

One being advocate in his housing society may turn irritating if society takes such advocate for granted for free legal advice not just on few occasions but always. If this is the case of advocate's own society where he live what about other social &/or political organizations if advocate proposes to go free without any gain in return. The advocates are specially learned in special branch of knowledge called law and so if advocates are not free for professional service to business organizations then they should not be free for other organizations too. The exceptional free legal service to any poor, needy individual is different from such service to any group of people, social or political. The selfless social service is degrading and foolish act in selfish human society. If an advocate is specially learned in special branch of knowledge called law, then he has to be truly professional!

-©Adv.B.S.More, 21.1.2024

ईश्वर एक पण धर्म अनेक!

ईश्वर एक, पण त्याच्या धार्मिक मान्यता अनेक (अनेक धर्म व पंथ) याचे प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेले ईश्वराचे विराट विश्वरूप. हा झाला विश्वाचा आध्यात्मिक अर्थ. याचा वैज्ञानिक अर्थ हा की, निसर्ग एक पण निसर्गाची विविधता अनेक (अनेकविध). हे असे की एकाच घड्याळाचे सेकंद काटा, मिनिट काटा व तास काटा हे तीन काटे वेगळे पण ते गोल चक्राकार फिरणाऱ्या वेळेचे संयुक्त भान देतात.  -ॲड.बी.एस.मोरे

सुशिक्षित वर्ग असुरक्षित वर्ग!

मानव समाजात मला आर्थिक शक्ती  एकवटलेले भांडवलदार, राजकीय शक्ती एकवटलेले राजकारणी, दहशतवादी शक्ती एकवटलेले डॉन, कला-क्रीडेत सिद्धी प्राप्त केलेले कलाकार-खेळाडू व धर्म शक्ती एकवटलेले धर्म पंडित हे पाच प्रमुख गट दिसतात, हे पाच गट प्रचंड सामर्थ्यशाली आहेत व म्हणूनच समाजावर ते प्रचंड मोठा प्रभाव टाकून आहेत, समाजातील या पाच महाशक्तींपुढे ज्ञान, विज्ञान लाचार आहे, त्यांचे गुलाम आहे कारण ते एकवटलेले नसून विखुरलेले आहे, बौद्धिक कष्टकरी सुशिक्षित वर्ग हा समाजातील सगळ्यात अल्पसंख्य व असुरक्षित वर्ग होय! -ॲड.बी.एस.मोरे 

रामायण व महाभारत!

रामायण व महाभारत!

हिंदू धर्मात लोकप्रिय असलेले महाभारत हे महाकाव्य महर्षी वेदव्यास यांनी रचले व बुद्धी देवता श्रीगणेश यांनी लिहिले अशी मान्यता आहे. या महाभारतात कौरव पांडवांचे जे महायुद्ध झाले त्या युद्धाच्या युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीता सांगितली. ती संजय यांनी त्या काळात प्रगत असलेल्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाने (दूरदर्शन) ऐकली व ती धृतराष्ट्राला सांगितली. ती धृतराष्ट्र यांनी ऐकली ती त्यांची झाली श्रुती (कानाने श्रवण करणे) व ती त्यांनी स्मरणात ठेवली. मग पुढे त्या श्रुती, स्मृतीच्या माध्यमातून महाभारत कथा व त्यातील गीतेचे तत्वज्ञान पिढ्यानपिढ्या पुढे सरकत गेले. हिंदू धर्मग्रंथांचा आधारच मुळात श्रुती व स्मृती आहे व म्हणून हिंदू ही एक सांस्कृतिक जीवनशैली बनून पुढे चालत आली आहे. मूळ कायद्यावर जसे वकील कारणमीमांसा देत विश्लेषणात्मक ग्रंथ (कमेंटरी) लिहितात तसाच ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला टीकात्मक (म्हणजे विश्लेषणात्मक) हिंदू ग्रंथ आहे. लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ किंवा विनोबा भावे यांचा गिताई हा ग्रंथ हे असेच गीतेवरील विश्लेषणात्मक ग्रंथ आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वर, लो. टिळक, विनोबा भावे यांना गीतेचे भाष्यकार असे म्हणता येईल. पण महाभारत व गीता या दोन्हींचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. त्यांचे मूळ श्रुती व स्मृती हेच आहे.

हिंदू धर्मात प्रिय असलेले रामायण हे आणखी एक महाकाव्य आहे. या महाकाव्याची रचना महर्षी वाल्मिकी यांनी केली व ते लिहिलेही त्यांनीच असे मानावे लागेल. कारण लेखक म्हणून श्रीगणेश वाल्मिकी ऋषींच्या मदतीला होते का याचा उल्लेख माझ्या तरी वाचनात आला नाही. रामायण वाल्मिकींनी रचले, लिहिले पण ते श्रीराम सीतेची मुली लव व कुश यांनी जनमानसात सांगून पसरवले. त्यामुळे लव कुश यांनाच रामायणाचे मूळ भाष्यकार म्हणता येईल. पण रामायण महाकाव्याचा मूळ दस्तऐवज सापडत नाही. म्हणजे इथेही श्रुती व स्मृती या गोष्टी आल्या ज्यातून रामायण पिढ्यानपिढ्या पुढे सरकले. पण रामायण या महाकाव्याचे पुढील टीकाकार (विश्लेषणात्मक भाष्य करणारे लेखक) कोण हे सापडत नाही. पण महर्षी वाल्मिकी या मूळ रचनाकाराबरोबर भृगु ऋषी यांनीही रामायणावर टीकात्मक म्हणजे  विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला असे सहज वाचण्यात आले होते. पण मी भृगु ऋषी लिखित रामायणाचा एक शब्दही वाचलेला नाही.

रामायण अगोदर घडले व त्यानंतर महाभारत घडले असे म्हणतात. दोन्ही महाकाव्यात धनुष्य बाण, गदा, तलवारी ही आयुधे व घोडे, रथ ही वाहने बघायला मिळतात. आता रामायण व महाभारत ही दोन्ही महाकाव्ये हिंदूंचे पवित्र धर्मग्रंथ झाले असून ते हिंदू जीवनशैलीचा भाग झाले आहेत.

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.१.२०२४