Saturday 18 May 2024

MYTH OF DEVELOPMENT!

DEVELOPMENT REMAINS MYTH WHEN BASIC SYSTEM REMAINS CONSTANT!

The technology & sociology are significant methods of intelligent use of the basic system of Nature by human beings to serve their selfish objects of convenience and advantage. But they do not change the basic system of Nature. If anybody feels any such change at human instance it is myth and feel good fantasy. Let human development be not turn into feel good fantasy. This is what happens when the class of few rich capitalists grow rich & rich while mass of human population fall down poor & poor. Let we not boast about any such development. Any such development is just myth and feel good fantasy and let us not make big noise about such development. Even otherwise, technology and sociology boosted developmental changes are only temporary changes when the basic system of Nature remains constant. Let be you ever so high with intake of high rich food and high rich medicine, let you be ever so highly regular and punctual in your physical exercise,  let you use all shrewd tactics to become high rich economic lord and high powerful political lord in human society and let you make thousands of prayers before almighty power of Nature called God, your all these technological, sociological & spiritual exercises go futile because they cannot stop natural biological process of your body aging & body sinking which is fixed pattern of basic system of Nature which remains constant all time in stereotyped and dictatorial way. In short, the development remains myth when basic system remains constant.

-©Adv.B.S.More, 18.5.2024

Friday 17 May 2024

सूक्ष्मातून सूक्ष्माकडे!

सूक्ष्मातून सूक्ष्माकडे!

एका सूक्ष्म कणाच्या महास्फोटातून (बिग बँग थिअरी) विश्वाची निर्मिती झाल्यावर विश्व प्रसरण पावत गेले व विश्वाचा पसारा वाढत गेला व तो वाढतच आहे असा एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. आकुंचित विश्वाकडून प्रसारित विश्वापर्यंतचा विश्वाचा हा प्रवास अलौकिक आहे. पण प्रसरण पावलेल्या अशा या विश्वाचा उलट प्रवास (रिटर्न जर्नी) सुरू होऊन हे विश्व पुन्हा आकुंचित होत जाऊन त्याच्या मूळ सूक्ष्म कणात जाऊन बसेल का याविषयी निश्चित सांगता येत नाही. परंतु सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे या अगोदर सुलट्या व मग उलट्या प्रवासाचा अनुभव सजीव सृष्टीतील सर्वच सजीवांना घेता येतो व म्हणून तो माणसालाही घेता येतो.

पुरूष बीज व स्त्री बीज यांच्या एका छोट्या संयुक्त थेंबातून मनुष्याचा जन्म होतो. हा जन्म म्हणजे सूक्ष्म कणातून झालेली मानवी जीवन विश्वाची झालेली निर्मिती. हळूहळू बालपण, तरूणपण व प्रौढावस्था ही मानवी जीवनाची चढती कमान म्हणजे मानवी जीवन विश्वाचे चढते प्रसरण. पण त्यानंतर उतार वय सुरू होऊन मानवी जीवन विश्व आकुंचित होत जाते.

मनुष्याची वृद्धावस्था हा सूक्ष्मातून पुन्हा सूक्ष्माकडे नेणाऱ्या उलट्या जीवन प्रवासाचा एक त्रासदायक अनुभव आहे. या अनुभवात शरीर व मेंदूची हालचाल, सक्रियता मंदावते. आयुष्यभर साठवलेल्या ज्ञान व अनुभवाचा साठा वृद्धापकाळात मेंदूला जड होतो. मेंदूची उतरकळा शरीरालाही लागू होते. मेंदू बरोबर शरीरही जड व संथ होत जाते. उतार वयात मेंदू पूर्वीसारखा अनेकविध गोष्टींकडे सहजपणे लक्ष देऊ शकत नाही. अर्थात एकाच वेळी समरसता व एकाग्रता साधणे मेंदूला कठीण होऊन जाते. मग संपूर्ण आयुष्यभर जमवलेल्या अनेक गोष्टी वृद्ध मेंदूला त्रास देत राहतात. त्यातून आवश्यक तेवढ्या निवडक गोष्टीवरच लक्ष देण्याचा वृद्ध मेंदू प्रयत्न करतो. तरीही बऱ्याच वेळा अशा निवडक छोट्या गोष्टी सुद्धा परिपक्व वृद्ध मेंदूला पूर्वीसारख्या झेपत नाहीत.

मनुष्याचे सरासरी वय (आयुष्यमान) साधारण ६५ ते ७० वर्षे असले तरी काही माणसे ८०, ९० व नव्वदीच्या पलिकडेही जगतात. यात निसर्गाचा काहीसा दुजाभाव असला तरी तो चमत्कार नसतो. ते अनुवंशशास्त्र व जैविक विज्ञान आहे. अशाप्रकारे वय लांबणे म्हणजे मनुष्य जीवनाचा सूक्ष्मातून सूक्ष्माकडे जाण्याचा उलट प्रवास थोडासा लांबणे. अशाप्रकारे  लांबलेल्या आयुष्यात अशा काही तुरळक माणसांची शारीरिक व मेंदू सक्रियता लांबलेली दिसते. परंतु त्रासदायक उलट प्रवासाच्या विचित्र अनुभवातून सर्वांनाच जावे लागते. तिथे निसर्ग दुजाभाव करीत नाही. प्रसरणातून आकुंचनाकडे उलट चाललेल्या या त्रासदायक प्रवास अनुभवाचा शेवट माणसाच्या मृत्यूने होते. सूक्ष्मातून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास अशाप्रकारे शेवटी सूक्ष्मातच संपतो. शेवटी काय तर सगळं शून्य!

-©ॲड.बी.एस.मोरे, १८.५.२०२४

Thursday 16 May 2024

रियल इस्टेट कंपनी लॉयर!

बांधकाम कंपनीचा (रियल इस्टेट कंपनी) कायदा सल्लागार म्हणून वकिलाला अशाप्रकारचे विविध प्रश्न करार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, दस्तऐवज नोंदणी कायदा, भाडे नियंत्रण कायदा, सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा, मालमत्ता विकास नियमन कायदा, झोपडपट्टी पुनर्वसन कायदा, जुन्या इमारतींचा विकास कायदा, पालिका कायदा, म्हाडा कायदा अशा अनेक कायद्यांच्या माध्यमातून सोडवावे लागतात. -ॲड.बी.एस.मोरे

कारण की!

कारण की!

कोणत्याही गोष्टीला कारण असते. ठोस कारणाशिवाय ठोस कृती शक्य नाही व ठोस कृतीशिवाय ठोस परिणाम शक्य नाही. शिक्षण, कला, क्रीडा व तंत्र कारण, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण ही मानवी मनाची काही प्रमुख कारणे होत. पण या सर्व कारणांच्या मागील मूळ कारण जर कोणते असेल तर ते निसर्गाचे विज्ञान हेच आहे. विज्ञान कारणाचा स्त्रोत निसर्ग असल्याने विज्ञानाचे कारण फक्त निसर्गालाच माहित आहे. काही माणसे निसर्गातील परमेश्वराला ते मूळ कारण माहित असेल असेही म्हणतील. पण मानवी बुद्धी त्या मूळ कारणावर फक्त तर्क लढवू शकते. तिला ते मूळ कारण सापडू शकत नाही जसा तिला निसर्गातील परमेश्वर सापडू शकत नाही.

-©ॲड.बी.एस.मोरे, १६.५.२०२४

Wednesday 15 May 2024

निसर्ग वास्तवाची चौकट!

निसर्ग वास्तवाची चौकट!

परमेश्वर नामक महाशक्तीपुढे रडून, ऊर बडवून, शरणागत होत प्रार्थना करून निसर्गाची मूलभूत रचना व मूलभूत व्यवस्था बदलत नाही. जे काही बदल दिसतात ते या मूलभूत निसर्ग रचना व व्यवस्थेचाच भाग असतात. मानव ज्ञात विज्ञान, मानव निर्मित तंत्रज्ञान व मानव निर्मित कायद्याची समाज व्यवस्था या तिन्ही गोष्टी निसर्गाच्या मूलभूत रचना व मूलभूत व्यवस्थेचाच भाग आहेत. निसर्गाचे मूलभूत वास्तव जेव्हा बदलता येत नाही तेव्हा ते आहे तसे स्वीकारण्यात शहाणपणा असतो. निसर्ग वास्तवाची चौकट मोडताना ठेच लागून आलेले शहाणपण मोठे असते.

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.५.२०२४

Tuesday 14 May 2024

परमेश्वर निसर्ग रचनेत व मानवी जीवनात ढवळाढवळ करीत नाही!

परमेश्वर त्याच्या निसर्ग रचनेत व माणसांच्या जीवनात ढवळाढवळ करीत नाही!

अंतराळातील पदार्थीय विश्व रचना काय किंवा पृथ्वीवरील पदार्थीय सृष्टी रचना काय, ही संपूर्ण विश्व व सृष्टी रचना म्हणजे एकंदरीत निसर्ग रचना तिच्या मागे परमेश्वर नावाचा कोण रचनाकार आहे याचा निरर्थक शोध न घेता तिच्या विविध रंग, रूप, आकार, उर्जा, नियम या सर्वांसह आहे तशी स्वीकारावी लागते.

याच निसर्ग रचनेत आकाशातील गरूड पक्षी, सागरातील शार्क मासे व जंगलातील वाघ, सिंहासारखे प्राणी त्यांच्या नैसर्गिक ताकदीच्या जोरावर अशक्त पशुपक्षांची शिकार करतात व या क्रूर खेळात लुडबूड न करता परमेश्वर नावाचा तो रचनाकार अशक्त प्राण्यांविषयी कोणतीही दयामाया न दाखवता गप्प बसतो.

याच निसर्ग रचनेत माणसे आहेत, त्यांच्या मूलभूत जैविक वासना आहेत व या वासनांच्या सोबत त्यांच्या मनातील दया, माया, प्रेम, परोपकार या उदात्त भावनांचे एक गारूडही आहे. पण या गारूडाला डोक्यावर घेऊन किती नाचायचे हे या गारूडासोबत असलेल्या मानवी बुद्धीलाच ठरवावे लागते. वासना व उदात्त भावना यांच्या मध्ये संतुलन साधणारा जो निर्णय बुद्धी घेते या बौद्धिक निर्णयाला, ठरवण्याला व्यवहार म्हणतात. परमेश्वर नावाचा तो रचनाकार माणसांच्या जैविक वासना, उदात्त भावनांचे गारूड व त्यांच्या बौद्धिक व्यवहारामध्ये पडत नाही. माणसांना दिलेल्या बुद्धीवर सर्वकाही सोडून तो गप्प बसतो.

निसर्ग रचनेचा परमेश्वर नावाचा कोणीतरी रचनाकार आहे असे मानून त्याच्यावर आध्यात्मिक श्रद्धा ठेवून त्याची कितीही मनोभावे पूजाअर्चा करा, ऊर बडवून त्याची प्रार्थना करा पण तो बिलकुल हलत नाही. त्याने निर्माण केलेल्या निसर्ग रचनेत व माणसांच्या जीवनात तो ढवळाढवळ करीत नाही. हे वास्तव काहींच्या बुद्धीला कळते पण वळत नाही. 

-©ॲड.बी.एस.मोरे, १५.५.२०२४

Friday 10 May 2024

MY COMPARISON BETWEEN NUCLEUS OF ATOM AND INTELLECT OF HUMAN MIND!

MY COMPARISON BETWEEN NUCLEUS OF ATOM AND INTELLECT OF HUMAN MIND IN DISCUSSION WITH CHATGPT AT 3.45 A.M. ON 11.5.2024

Atom as smallest particle of matter continues to play constructive role so long as its nucleus remains firm and stable in controlling such atom by its focus on constructive goal, but once its nucleus is broken such nucleus becomes unstable and then such atom goes out of its control making it destructive, atom bomb plays havoc once chain reaction within such bomb is provoked by breaking of nuclei of atoms within such bomb, intellect of human mind is like nucleus of atom remaining firm and stable in controlling human mind by keeping its focus on constructive goal, do not break intellect! -Adv.B.S.More

Adv. B.S. More provides a powerful analogy comparing the stability of an atom's nucleus to the steadfastness of human intellect in controlling one's actions. Just as an atom's nucleus maintains stability to ensure constructive outcomes, so does the intellect in guiding human behavior positively. However, when the nucleus of an atom is disrupted, leading to instability and potential destruction, similarly, the intellect, once compromised, can lead to destructive actions. This analogy serves as a reminder of the importance of maintaining focus on constructive goals and not allowing disruptions to the intellect, which can lead to negative consequences. -ChatGPT